मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उगवतीचे रंग रामरक्षा : एक अद्वितीय स्तोत्र

उगवतीचे रंग रामरक्षा : एक अद्वितीय स्तोत्र लहानपणी आई आम्हाला देवासमोर बसून शुभंकरोती, रामरक्षा, मनाचे श्लोक आदी म्हणायला लावत असे. आता तर बदलत्या काळानुसार हे सगळे मागे पडले आहे. पण मंत्र आणि स्तोत्र पठणाचे महत्व तसेच अबाधित आहे. रामरक्षा बुधकौशिक ऋषींनी लिहिली त्याला हजारो वर्षे होऊन गेली, पण आजही पारंपरिक स्तोत्रात त्याचे स्थान फार वरचे आहे. हे स्तोत्र घरातील आबालवृद्धांनी म्हणायचे स्तोत्र आहे. ते मंत्र आहे. कवच आहे. रक्षा म्हणजे रक्षण करणारे आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांसाठी त्याचे विशिष्ट श्लोक आहेत. त्या त्या श्लोकांसाठी रामाच्या वेगवेगळ्या नावाचा उल्लेख केला आहे. उदा ' शिरो मे  राघव:  पातु  भालं दशरथात्मजा " म्हणजे रघुकुल भूषण ' राघव ' म्हणजेच राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरतपुत्र राम माझ्या भालाचं  म्हणजे कपाळाचे रक्षण करो. त्या त्या शब्दात विशिष्ट अर्थही दडलेला आहे. पण आज आपण तेवढ्या खोलात जाणार नाही आहोत. तसेही रामरक्षेचा अर्थ आपल्याला बऱ्याच पुस्तकातून वाचायला मिळतो. त्यामुळेआज फक्त रामरक्षेच्या रचनेमागील पार्श्वभूमी आणि तिचे महत्व फक्त मी स...

उगवतीचे रंग किस्से पुणेकरांचे...

उगवतीचे रंग किस्से पुणेकरांचे... आम्ही चाळीसगावासारख्या छोट्याशा गावात  राहणारी माणसं . पण वेळोवेळी काही कारणाने पुण्यात जावे लागते. तेव्हा कधी कधी अस्सल पुणेकरांशी गाठ पडते. आम्ही गावाकडचे लोक म्हणजे तसे पुणेकरांच्या दृष्टीने थोडे असंस्कृत,  ग्राम्य, गावंढळ वगैरे वगैरे.  मराठीत ( ? )  सांगायचं तर मॅनर्स नसलेले.  आम्ही  थोडंफार इंग्रजी शिकलेलो. आणि मॅनर्स म्हणाल तर हाय, हॅलो, थँक यु , धन्यवाद इ सारखे शब्द फक्त आम्हाला येतात. पण पुणेकर म्हणजे काय समजलात राजेहो ..! महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेलं शहर. शिक्षणाचं माहेरघर. इ इ  ऐकून असल्याने पुण्यात गेलो म्हणजे छाती दडपायला होते. आपल्याला जमेल का त्या लोकांशी वागणं, बोलणं असे बालिश ( त्यांच्या दृष्टीने ) प्रश्न आम्हाला पडतात. आमच्या गावाकडचं स्वागत कसं अघळपघळ असतं . अगदी मनमोकळं. कोणी पाहुणा आला की त्याला प्रथम घरात या म्हणून विनवले जाणार. तो आला की पाण्याचा तांब्या पेला हजर असतो. चहा तर किमान होणारच. या सगळ्या प्राथमिक स्वागताच्या गोष्टी झाल्यावर मग पाहुण्याला किंवा यजमानाला जसा व...

उगवतीचे रंग समर्थ रामदास : निसर्गाचे गायन करणारा महाकवी

उगवतीचे रंग समर्थ रामदास : निसर्गाचे गायन करणारा महाकवी महाराष्ट्र ही संतांची भूमी. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ आदी संतांनी समाजाला भक्तिमार्ग तर दाखवलाच पण त्यासोबतच निसर्ग सुद्धा आपल्या रचनेतून उलगडला. वागावे कसे, भक्ती कशी करावी हे सांगताना त्या सगळ्यांनी निसर्गातील प्राणी, पशु पक्षी, नद्या आदींची उदाहरणे देऊन समजावले.त्यांच्या काव्यात निसर्ग विविध रूपात प्रकट झाला आहे.  त्यामुळे त्यांची शिकवण कधीच निरस, रटाळ किंवा कंटाळवाणी झाली नाही. आज आपण पर्यावरणाचा उद्गोष करतो, पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करतो. पण संतांना त्याचे महत्व कधीच उमगले होते.  समर्थ रामदासांचे जेथे जेथे वास्तव्य होते, त्या सगळ्या जागा निसर्गाच्या सान्निध्यातल्या होत्या. नाशिकचे गोदातीर, टाकळी येथे केलेले पुरश्चरण, कृष्णतिरीचे कार्य, सज्जनगड किंवा समर्थानी जेथे दासबोध लिहिला ते शिवथरघळ ही सगळी ठिकाणे अतिशय निसर्गरम्य होती. आपली तपसाधना करताना हा निसर्ग समर्थांच्या दृष्टीआड कधीच झाला नाही. त्यांनी स्वतःच्या वास्तव्याचे वर्णन ' दास डोंगरी राहतो ' असेच केले आहे....

उगवतीचे रंग नमस्कार...

उगवतीचे रंग नमस्कार... नमस्कार ही  किती सुंदर गोष्ट ! आणि त्याहून सुंदर कृती. नमस्कार ही खरं तर प्राचीन भारतीय संस्कृतीची जगाला अनमोल देणगीच म्हटली पाहिजे. नमस्कार हा दोन्ही हात जोडून केला जातो. आपले दोन्ही हात, एक डावा आणि एक उजवा, पण नमस्काराच्या वेळी एकत्र येतात. मग डावे , उजवे शिल्लकच राहातच नाही. दोन्ही हातांची दहा बोटे या वेळी एकत्र येतात. जणू दशपाकळ्यांचे फुल.. ! आपले शरीर एक वृक्ष मानले तर दोन्ही हात या त्याच्या दोन फांद्या. त्या फांद्यांवर उमललेले हे दशपाकळ्यांचे फुल. त्या दोन्ही हातांच्या बोटांमध्ये एकत्र आल्यानंतर एक पोकळी तयार होते. काय नसते त्या पोकळीत सामावलेले ? जो नमस्कार करतो, त्याचे अवघे अस्तित्व, त्याचे व्यक्तिमत्व. तो नमस्कार असतो. हृदयापासून. हृदयकमल उमलल्याचे प्रतीक म्हणजे जुळलेले करकमल .  हृदयात असतो चैतन्याचा वास. ते चैतन्य जणू नमस्काराच्या कृतीतून साकार होते. आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला नमस्कार करतो, तेव्हा त्यामागे असतो त्या व्यक्तीबद्दलचा आदरभाव. त्या व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून आपण स्वीकार केला आहे हे दर्शविणारी ती कृती असते. त्याचबरोबर आपल...

उगवतीचे रंग हद कर दी आपने...

उगवतीचे रंग हद कर दी आपने... आपण सगळे मनाने आणि शरीराने २१ व्या शतकात वावरतो आहोत. आपल्यापैकी जे सुशिक्षित आहेत, मोबाईल व्हाट्सअप, फेसबुक इ चा वापर करताहेत,  त्यांनी बहुतेकांनी किमान पदवीपर्यंतचे शिक्षण तर घेतलेच असेल . काहींना पदवीपर्यंत नाही पोहोचता आले तरी दहावी बारावी तरी बहुतेकांनी उत्तीर्ण केली असेलच. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आपण सर्वांनी विज्ञानाचा अभ्यास केलेला असेल. विज्ञानम्हणजे काय तर एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने (systematic study) केलेल्या अभ्यास. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय.नेमकेपणाने सांगायचे तर विज्ञानाचे शिक्षण याचा अर्थ विवेकी, चिकित्सक व प्रयोगशील प्रवृत्ती अंगी बाणवणे असाच असला पाहिजे. ज्यांनी हे शिक्षण घेतले त्यांना सभोवताली घडणाऱ्या घटनांचा विज्ञानाच्या कसोट्यांवर विचार करता आला पाहिजे. आपल्या विचारातही तर्कशुद्धता पाहिजे. विज्ञान शिकून जी एक प्रकारची दृष्टी येते ती आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला वापरता आल...

उगवतीचे रंग... उन्नयन : विचारांचे, भावनांचे

उगवतीचे रंग... उन्नयन : विचारांचे, भावनांचे फार पूर्वी चीनमध्ये कन्फ्यूशियस नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला. चीनमधील तत्वज्ञानावर त्याच्या शिकवणुकीचा प्रभाव आहे. त्याची अनेक वचने प्रसिद्ध आहेत. ती मला तर सुभाषितांसारखीच वाटली. आणि आजच्या परिस्थितीतही ही कालबाह्य झालेली नाहीत. आपल्या एका वचनात तो म्हणतो, " तुम्हाला जर असे वाटले की तुम्हाला जे ध्येय साध्य करायचे ते खूप कठीण आहे, तर ते ध्येय बदलू नका. तर ते साध्य करण्याचे मार्ग किंवा पद्धत बदला. " इतर अनेक गुरूंसारखा त्याचाही मोठा शिष्यपरिवार होता. एकदा त्याला त्याच्या एका शिष्याने प्रश्न विचारला. ' कनिष्ठ दर्जाचा माणूस त्याच्या शत्रूला किंवा विरोध करणाऱ्याला कसे मारतो ? ' कन्फ्यूशियस तत्काळ उत्तरला, ' दगडाने. ' शिष्याने पुढे विचारले की मग उच्च दर्जाचा माणूस त्याच्या विरोधकाला कसे मारतो ? यावर कन्फ्यूशियस उद्गारला, ' लेखणीने. ' तसं पाहायला गेलं तर ही उत्तरे वरवर फार साधी वाटतात. पण त्यात खोल अर्थ दडलेला आहे. कनिष्ठ माणूस म्हणजे ज्याच्या विचार, भावनांचा विकास झालेला नाही असा माणूस. तो रानटी माणसासारखा प...

उगवतीचे रंग या सुखांनो या..

उगवतीचे रंग या सुखांनो या.. '  लाईफ इज ब्युटीफुल ' या चित्रपटात जोशुआ नावाच्या एका ज्यू व्यक्तीला नाझी सैनिक पकडतात आणि छळ छावणीत ठेवतात. या चित्रपटाला दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे. नाझी सैनिक ज्यूंचा अनन्वित छळ करतात. आणि शेवटी त्यांची हत्या करतात. या जोशुआला त्यांनी पकडलेले असते. पण तो आपला कायम आनंदी . तो म्हणतो, ' तुम्ही माझ्या शरीराला यातना देऊ शकाल. पण माझ्या मनाला नाही. आनंदी राहायचे की नाही ते मी ठरवणार. ' खरंच मला कौतुक वाटतं त्या जोशुआचं . इतक्या विपरीत परिस्थितीत तो आनंदी कसा राहू शकला ? त्याचे एकच कारण म्हणजे त्याची असलेली धारणा. त्याची धारणा ही की मला माझ्या मर्जीविरुद्ध कोणीही दुःखी करू शकणार नाही. पण जोशुआचं उदाहरण चित्रपटातलं म्हणून आपण सोडून देऊ. पण ते खोटं आहे असं मात्र नाही. कुठेतरी ही वस्तुस्थिती असल्याशिवाय दिग्दर्शकाने ते दाखवलेले नाही. सुख आणि दुःख याच्यावर मी जेव्हा विचार करतो, तेव्हा मला वाटतं की सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुठलाही प्रसंग किंवा घटना अगदी निर्भेळ अशी सुखाची किंवा दुःखाची नसतेच. सुखाच्या घटनेला अ...

घर...

उगवतीचे रंग घर... रात्री डिस्कवरीचं चॅनल पाहत होतो. एक वाघीण आणि तिची पिलं . मोठी गोजिरवाणी होती पिलं . वाघीण त्या पिलांचा सांभाळ करत होती. शिकार करायला शिकवत होती. आईच ती ! पाहता पाहता कधी झोप लागली कळलं नाही. रात्री स्वप्नात ती वाघीण आणि तिची पिलं आली .                                                                ************************************* घनदाट पसरलेलं जंगल. उंचच उंच पहाड. दऱ्या खोऱ्या. खळाळते झरे. डोंगराच्या माथ्यावर निबिड रान पसरलेलं. दिवसा सूर्याचा थोडाफार प्रकाश यायचा. पण एरव्ही झाडांची गर्द सावली. दिवसासुध्दा मनुष्य प्राणी तिकडे फिरकण्याची हिंमत करत नसायचा. अशा त्या जंगलात एका जाळीमागे नुकतीच व्यालेली एक वाघीण. तीन डौलदार, रुबाबदार आणि गोजिरवाणे छावे. कधी कधी ती त्यांना तोंडात धरून पाण्यापर्यंत घेऊन जाई . पण लगेच ते चालायला लागले. मग त्यांना तोंडात धरून नेण्याची गरज राहिली नाही. आईलाही तेच ...

आणि बुद्ध हसला...

उगवतीचे रंग आणि बुद्ध हसला... सध्या करोना व्हायरसने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर सहज मनात विचार येतो की हे एखाद्या देशाने विकसित केलेले जैविक अस्त्र तर नसावे ? कदाचित असेल किंवा नसेलही. तसे असले तरी ते बाहेर येणे अवघड आहे. पण भविष्यातील युद्धे ही समोरासमोर लढली जाण्यापेक्षा अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकतील. त्याची झलक यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे भौतिक हानी होणार नाही. पण प्राणी, माणसे आणि पर्यावरणाची हानी होऊ शकते. आणि हे युद्ध असे असेल की ते युद्ध आहे हे समजायला वेळ लागेल. तोपर्यंत एखाद्या राष्ट्राची किंवा राष्ट्रांची अपरिमित हानी झालेली असू शकेल. आणि त्या राष्ट्रांवर ताबा मिळवणे शत्रू राष्ट्राला सहजसाध्य होईल. भविष्यातील युद्धे ही  वेगवेगळ्या प्रकारची असू शकतील. जसे वर उल्लेख केल्याप्रमाणे जैविक युद्ध, एखाद्या देशाला आर्थिक गुलाम बनवून त्याला आपल्या अंकित करणे, पाकिस्तान जसे दहशतवादी घुसवून अनेक वर्षांपासून भारताशी छुपे युद्ध खेळतो आहे तसे युद्ध खेळणे आणि आणखी पुढचा प्रगत पर्याय असेल तो सुपर ह्यूमन्स किंवा सुपर सोल्जर्सच्या ...

नित्य नवा दीस जागृतीचा...

उगवतीचे रंग नित्य नवा दीस जागृतीचा... भक्ती सोपी नाही. भक्ती ही सुळावरची पोळी आहे, असे तुकाराम महाराज सांगतात. आणि या भक्तीमार्गात दिखावा चालत नाही. ती मनापासून असावी लागते. या अभंगात तुकोबा म्हणतात ' तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दीस जागृतीचा. ' हा तुकोबांचा अभंग आठवण्याचे एक कारण घडले. परवाच्या दिवशी रात्री माझ्या घरासमोर रस्त्यावर कोणीतरी एक वृद्ध माणूस झोपलेला दिसला. तो कुठून आला होता हे माहिती नाही आणि कुठे जाणार होता हेही माहिती नव्हते. पण रात्रीच्या वेळी आपल्या अंगाचे मुटकुळे करून तो झोपला होता. तो भिकारी होता की वारकरी, प्रवास करणारा होता की ज्याला घरातून कोणी काढून दिले असा निराधार होता. काही समजायला मार्ग नव्हता. त्याचे बूट त्याच्याजवळ पडलेले होते. पायात मोजे होते. त्याच्याजवळ एक छोटीशी बॅग होती. त्यामध्ये त्याचे काही कपडे आणि नित्याच्या वस्तू असतील. ती बॅग तो उशाला घेऊन शांत पडला होता. अंगावरती पांढरे धोतर त्याने ओढून घेतले होते. डास चावतात म्हणून असेल बहुधा. जणू धरतीचा बिछाना, आणि आकाशाचे पांघरूण त्याने ओढून घेतले होते. तो तसाच रात्रभर तिथे पडून हो...

सवय...

उगवतीचे रंग सवय... काय गंमत झाली बघा. नुकतेच घरात थोडे दुरुस्तीचे काम केलं. बाथरूमजवळ एक नवीन बेसिन बसवलं. आणि एक नवीन आरसा बसवला. त्याच्याजवळ उजव्या बाजूला एक प्लास्टिकचं कंटेनर होतं. त्यात कंगवे, टूथब्रश इ ठेवलेलं होत. नवीन आरसा थोडा मोठा असल्यामुळे ते प्लास्टिकचं कंटेनर जे उजव्या हाताला होतं, ते डाव्या बाजूला लावावं लागलं. ते लावून चारपाच दिवस झाले तरी ब्रश किंवा पेस्ट घ्यायला माझा हात जो नेहमी उजवीकडे जायचा, तो अजूनही बऱ्याचवेळा जातो. मग लक्षात येतं  की  अरे आपण त्याची जागा बदलली आहे. एकदा आपल्या हाताला किंवा अवयवाला जी सवय लागली ती अशी आपला पाठलाग करते. काही लोकांना कुलूप लावल्यानंतर पुन्हा ओढून पाहायची सवय असते. अशा काही गोष्टी नकळत केवळ सवयीमुळे घडत असतात. जी वयासह येते ती स-वय. एकदा लागलेली सवय पुढे आयुष्यभर टिकून राहते. सकाळी उठल्याबरोबर काही लोकांना चहा हवा असतो. त्याशिवाय त्यांचा दिवस सुरु होत नाही. अर्थात माझाही त्यात समावेश आहे. पण मग एखादे दिवशी सकाळी लवकर चहा नाही मिळाला की लागलीच बेचैनी येते. काहींचे डोके दुखते. सवयीचा हा परिणाम आहे. सवयी ...

आदतसे मजबूर...

उगवतीचे रंग आदतसे मजबूर... आमच्या घराच्या समोरून थोडे अंतर चालले की आपण मुख्य रस्त्यावर येतो. त्या रस्त्यावरच्या एका कोपऱ्यात एक पानाचा ठेला किंवा पान टपरी आहे.  मी लहानपणापासून तिथे गर्दी पाहत होतो. सुरुवातीला माझ्याकडे  कोणतेच वाहन नव्हते. साधी सायकलही नव्हती. पायी फिरायला आवडायचे. त्यामुळे वाहन नाही म्हणून तक्रार नव्हती. पण नकळत कधी तरी त्यांचे आकर्षण वाटायचे. मी ज्या पान टपरीचा उल्लेख करतो आहे, त्या ठिकाणी बरेच गाडीवाले थांबायचे. कोणी टू व्हीलरवाले तर कोणी फोर व्हीलरवाले. लहानपणी गाडीबद्दल असणाऱ्या नैसर्गिक कुतूहलातून मी त्यांचे निरीक्षण करायचो. एखादा टू व्हीलरवाला आपल्या गाडीवरून रुबाबात खाली उतरायचा. त्या पानवाल्याला एकशे वीस किमाम असले काही तरी सांगायचा . तो पानवाला आपल्या ग्राहकांच्या सेवेत अत्यंत तत्पर होता. त्याने प्लॅस्टिकच्या आवरणात अगोदरच काही पुड्या रबर लावून बांधून ठेवलेल्या असायच्या. त्याच्यात आणि त्याच्या ग्राहकांत फार सामंजस्याचे वातावरण होते. कारण त्यांच्यात फारसे संभाषण होत नसायचे. नेहमीच्या परिचयाने दोघे एकमेकाला चांगले ओळखत असत. ग्रा...

ज्योती कलश छलके ...

उगवतीचे रंग ज्योती कलश छलके ... पूर्वी दूरदर्शनवर राष्ट्रीय साक्षरता मिशन या कार्यक्रमाच्या प्रचारार्थ एक गाणं दाखवलं जायचं. मला ते फार आवडायचं. ते गाणं होतं ' पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा , जागी हर दिशा दिशा , जागा जग सारा. ' त्या गाण्यात सकाळच्या सूर्याचा सोनेरी प्रकाश,छोट्या मुलांचं पाटीवर मुळाक्षरं गिरवणं , त्या वृद्ध आजोबांचा हसतमुख चेहरा, त्यांचं दाढी करताना साबणाचा फेस त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्याला लावणं, नंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवणं, त्या मुलाचा विलक्षण हास्याने उजळलेला चेहरा, त्याचं निरागस हास्य या गोष्टी मनाला खूपच स्पर्शून जात होत्या. काही काही गोष्टी अशा चिरकाल स्मरणात राहून जातात. तसेच ते ' मिले सूर मेरा तुम्हारा ' हे गाणं . भारतातील विविध भाषा, विविध भागातील प्रादेशिक प्रथितयश कलाकार आणि गायक आणि विविध नयनरम्य दृश्ये यामुळे ते गाणं अमर झालं आहे. भारतातील विविधतेतील एकतेच दर्शन घडवण्यात त्या गाण्याचा दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. तसेच ज्योती कलश छलके हे गाणं . सूर्य उगवल्यानंतरच्या दृश्याचं मनोरम वर्णन त्या गाण्यात आहे. अशी खूप गाणी आहे...

नजर...

उगवतीचे रंग नजर... लहानपणीची एक गोष्ट आठवते. आम्ही कुठून बाहेरून खेळून वगैरे आलो की आई किंवा आजी आमच्या चेहऱ्याकडे बघायची. चेहरा चांगला आनंदी वाटला तर काही प्रश्न नसायचा. पण जर चेहरा म्लान झालेला किंवा कोमेजलेला असला तर त्यांना विशेष काळजी वाटायची. त्यातच कधी कधी अंगात कणकण असली किंवा थोडे अंग गरम वाटले तर आई म्हणायची ' कुणाची तरी दृष्ट लागली किंवा नजर लागली माझ्या राजाला. ' आणि मग म्हणायची ' थांब तुझी नजर काढते. ' आणि मग अंगावरून मीठ मोहऱ्या उतरवून काही तरी म्हणायची. मला नीटसं आठवत नाही आता. पण ' मीठ मोहऱ्या पाटीभर गवऱ्या, राम लक्ष्मणा तुझीच दाही, सीता जानकी तुझी दाही ' असं काहीसं म्हणायची. दोन्ही हातातील मुठीत मीठ मोहऱ्या घेऊन ती गरम तव्यावर किंवा लोखंडाच्या गरम पळीवर टाकायची. मग त्या मीठ मोहऱ्या चांगल्या तडतडल्या की म्हणायची, बघ खरंच दृष्ट लागली होती माझ्या राजाला. आता गेली बरं का. आता तुला बरं  वाटेल. कदाचित हा अंधश्रद्धेचा भाग असेल, मनाचे समाधान असेल आईच्या , आजीच्या आणि त्या काळात आपल्या बालगोपाळांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या माताभगिनीच्या. त्यात शास्त्...

तुम्ही युनिक आहात ..

उगवतीचे रंग तुम्ही युनिक आहात .. मागे एका शाळेत गेलो होतो. ती शाळा खूप प्रसिद्ध म्हणून पाहायला. त्या शाळेच्या ऑफिसमध्ये एक वाक्य वाचायला मिळालं. ' एव्हरी चाईल्ड इज  युनिक. ' आणि अगदी खरं आहे. प्रत्येक मूल दुसऱ्या मुलापासून वेगळं आहे. बुद्धीनं, रूपानं , विचारानं, भावनेनं. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट करण्याची क्षमता वेगवेगळी. जे एकाला खूप चांगलं जमतं , तसं दुसऱ्याला येईलच असे नाही सांगता येत. आपण पालक मात्र ही गोष्ट समजूनच घ्यायला तयार नसतो. एखादा मुलगा अभ्यासात हुशार असला तर आपण आपल्या मुलाला त्याचे उदाहरण देतो. तो अमुक अमुक बघ. कसा हुशार आहे. गणितात किती गुण मिळाले त्याला ! नाहीतर तू .. असे म्हणून आपण त्याला हिणवतो. आणि त्याचं फुलू पाहणारं व्यक्तिमत्व कोमेजण्यासाठी हातभार लावतो. अरे, निसर्गातही बघा ना. प्रत्येक फुल वेगवेगळं आहे. गुलाब फुलांचा राजा झाला म्हणून काय इतर फुलांचं सौंदर्य, सुगंध कमी आहे का ? प्रत्येक फुल आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. सगळेच गुलाब झाले तर कसे चालेल ? फुलांच्या हारामध्ये जेव्हा वेगवेगळ्या रंगांची फुलं असतात, तेव्हा तो हार शोभून दिसतो. पण आज मला लहा...

एक संधी खुणावतेय तुम्हाला..

उगवतीचे रंग एक संधी खुणावतेय तुम्हाला.. माझ्या प्रिय मित्रांनो, २०२० सालचा हा मार्च महिना जगाच्या इतिहासात आपली नोंद कायम स्वरूपी अतिशय वेगळी करून ठेवणार आहे. ती म्हणजे संपूर्ण जगभर पसरलेली कोरोनाची साथ आणि तिने घेतलेले बळी . आपल्यावर सतत त्याच बातम्यांचा सध्या भडीमार होतोय. कोणतेही टी व्ही चॅनल लावा, त्याच्याशिवाय दुसरी बातमी नाही. इंटरनेटची सगळी माध्यमं तोच तो भडीमार तुमच्या माझ्यावर करीत आहेत. कोणालाही फोन लावताना त्याच त्या सूचना आपल्या कानावर पडत आहेत. मित्रांनो, आपण सगळे एका विशिष्ट मानसिक अवस्थेतून जात आहोत. ज्याची आपल्याला सवय नाही. आता तर शाळा, कॉलेज, सिनेमागृहे, मॉल्स, बगीचे, मंदिरे सगळे काही बंद झालेत. जिथे अजून झाले नसतील तिथे ते लवकरच होतील. बऱ्याचशा कार्यालयांचे कर्मचारी घरून काम करणार आहेत. त्यासाठी ' वर्क फ्रॉम होम ' हा परवलीचा शब्द झालाय. घरातले सगळे सदस्य मग ती शाळेत जाणारी मुले असॊत वा कामावर जाणारी माणसे, विरंगुळा म्हणून बाहेर जाणारी घरातील वृद्ध माणसे हे सगळे घरात असतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपल्याला अगदी काही अत्यावश्यक कामे सोडली तर २४ तास ...

रंग सोहळा ...

उगवतीचे रंग रंग सोहळा ...  परवाच होळी झाली. होळी म्हणजे रंगोत्सव. होळीला आपण तनमनाने रंगात रंगून जातो. होळी वर्षातून एकदाच येते. आणि आपल्या रंगात आपल्याला रंगवून जाते. तसं पाहिलं तर आपल्याकडचा प्रत्येक सण हा कुठल्या ना कुठल्या रंगात न्हायलेला असतो. म्हणून तर सण उत्सव आपल्या जीवनात रंग भरतात . रंगच नसते तर आपले जीवन किती नीरस झाले याची कल्पनाच करवत नाही. पण खरा रंगारी म्हणजे निसर्ग. तो तीनही ऋतूत आपले वेगवेगळे रंग भरत असतो. आणि सगळे रंग विलोभनीय असतात. पावसाळ्यात तर आभाळ खाली उतरते. आणि धरतीला हिरवं स्वप्न दाखवते. मग तीही त्या स्वप्नात रंगून जाते. समृद्धीची हिरवी शाल अंगावर ओढून घेते आणि नवनव्या रूपात नटते. जणू नववधूचा शृंगारच केलेला असतो तिनं . त्यातूनच हिवाळ्यात येणारी विविधरंगी  फळं, फुलं बहरून येतात. नुसते भाजी मंडईत गेलो तरी निसर्गाचे हे विविध रंग आपल्याला विविध भाज्या, फळं आणि फुलांच्या रूपात दृष्टीस पडतात. आणि आता तर उन्हाळ्याला नुकतीच कुठे सुरुवात झाली  आहे. अशा वेळी निसर्गातही एक वेगळा रंग सोहळा सुरु होतो. त्याचं नाव वसंत. हा वसंतोत्सव मनमोहक असतो. झाडावर...