मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बंदिस्त

उगवतीचे रंग   बंदिस्त  मानव जोपर्यंत प्राथमिक अवस्थेत होता, तोपर्यंत तो निसर्गाच्या जवळ होता. त्याच्यासाठी हे विश्व अफाट, अनादी आणि अनंत होते. पण तो जसजसा प्रगत होऊ लागला, तसतसा निसर्गापासून दूर जाऊ लागला. त्याच्यासाठी मग हे विश्व अनादी आणि अनंत राहिले नाही. ते मर्यादित झाले. किती विरोधाभास आहे बघा ! जेव्हा प्रगती नव्हती, मानव प्राथमिक अवस्थेत होता, तेव्हा हे विश्व विराट होते. पण जसजशी प्रगती होत गेली, निरनिराळे शोध लागत गेले, तसतसे हे विश्व जवळ आले, मर्यादित झाले. मानवाच्या प्रगतीला आकाश खुले झाले. दाहीदिशा मोकळ्या झाल्या. विश्वाला प्रदक्षिणा करायची तर वेळ लागणार. पण आईवडिलांनाच प्रदक्षिणा घातली तर विश्वप्रदक्षिणेचे पुण्य लाभेल. आईवडील म्हणजे विश्वच ! म्हणून गणपतीने विश्वाऐवजी आईवडिलांना प्रदक्षिणा घालून आपल्या बुद्धिमत्तेचा आणि मातापित्यांवरील आपल्या श्रद्धेचा प्रत्यय आणून दिला. मानवाने मात्र आपल्या बुद्धिचातुर्याने आणि वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर जणू या विश्वालाही प्रदक्षिणा घातली.  पण या गोष्टीला खरोखरंच प्रगती म्हणावं तर अनेक गोष्टींचा संकोच झालेला दिसतो. वैज्ञा...

जे तुझ्याचसाठी होते...

  उगवतीचे रंग  जे तुझ्याचसाठी होते...  काही गाणी मनाला स्पर्शून जातात. तसेच हे गीत. ' जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले, वाटेत तुझ्या मी फुल ठेवुनी गेले. ' परवा सहज रेडिओ लावला आणि हे गीत कानावर पडले. यापूर्वीही मी हे गाणं ऐकलं होतं. पण ते पुन्हा खूप दिवसांनी ऐकायला मिळालं. पूर्वी मला त्यातली न जाणवलेली गोडी, आर्तता, तरल भावना सगळं सगळं काही मनाला स्पर्शून गेलं. मंगेश पाडगावकरांची ही अवीट गोडीची रचना. त्या शब्दांना जिवंत केलं आहे उषा मंगेशकर यांनी. या गीताला संगीताची सुरेल साथ आहे संगीतकार विश्वनाथ मोरे यांची.  कविता नसती तर मानवी जीवन किती निरस झाले असते ? या अशा सुंदर गीतातून स्रवणारा मकरंद कधी चाखायला मिळाला असता ? गीत आणि संगीत आणि साहित्य म्हणजे मानवाला मिळालेलं दैवी वरदानच आहे. एका उच्च प्रकारच्या आनंदाची अनुभूती देण्याचं सामर्थ्य त्यात आहे. मानवी भावना, जाणिवा समृद्ध करण्याचं सामर्थ्य त्यात आहे. ' वाटेत तुझ्या मी फुल ठेवुनी गेले...' या गीताचे शब्दच फार गोड आहेत. कधी कधी आपल्याला खूप आवडणारी एखादी प्रसिद्ध व्यक्ती असते. आपण नकळतच अशा व्यक्तीवर प्रेम करायला लागतो. ...

बाग फुलवणारा एक योगी अवलिया

उगवतीचे रंग   बाग फुलवणारा एक योगी अवलिया  कधी कधी सामान्य व्यक्तीतही असामान्यत्वाचे दर्शन घडते. फक्त आपल्याजवळ ते पाहण्याची दृष्टी हवी. तुमच्या माझ्यासारख्या सुशिक्षित माणसांना पुस्तकं वाचता येतात. पण समोरचा माणूसही वाचता यायला हवा. त्यासाठी आपले नेहमीचे चष्मे बाजूला काढून ठेवावे लागतात. आपल्याला सवय असते ती आपल्या एका ठरविक मोजपट्टीतून माणसं मोजण्याची. त्यात जो बसला, तो चांगला. त्यात न बसणारी व्यक्ती आढळली की आपल्याला ती व्यक्ती खटकते. मी बऱ्याच वेळेला माझे पूर्वग्रह बाजूला ठेवतो. एका भेटीत किंवा अगदी दोनचार भेटीतही एखादी व्यक्ती आपल्याला कळतेच असे नाही. त्यासाठी काही ठराविक काळ जावा लागतो. मग अशा व्यक्तींच्या स्वभावाचे कंगोरे, गुणदोष आपल्याला कळत जातात.  आम्ही चाळीसगावला नवीन घरात राहायला आलो, तेव्हाची गोष्ट. आता साधारणपणे वीस वर्षे झाली असतील. आमच्या घरासमोर छोटीशी बाग करण्यासाठी पुरेशी मोकळी जागा होती. मला आणि आमच्या सौभाग्यवतीला बागेची फार आवड. त्यामुळे आम्ही ती मोकळी जागा बागेसाठी वापरायची असे ठरवले. सुरुवातीला मोठया हौसेनं वेगवेगळी झाडं लावत गेलो. काही चांगली...

मंगल भवन अमंगल हारी

उगवतीचे रंग   मंगल भवन अमंगल हारी  सध्या रामनवमीची धामधूम आहे. गावागावातील राममंदिरे सुंदर रोषणाईने सजली आहेत. रामभक्तीची धून सर्वत्र ऐकू येते आहे. वातावरणात एक अनोखे चैतन्य भरून राहिले आहे. जशी विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीची ओढ लागलेली असते, तशीच रामनवमीची वाट रामभक्त पाहत असतात. चैत्रशुद्ध नवमीला रामभक्तांचे मनोरथ पूर्ण होतात. चैत्र महिना रामभक्तांचा आनंद द्विगुणित करतो. रामभक्तांना रामाइतकेच प्रिय, वंदनीय आणि प्रातःस्मरणीय अशा हनुमंताची जयंती देखील लवकरच म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेला येते. आबालवृद्ध दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी करतात. रामाचं आणि हनुमंताचं दर्शन घेऊन धन्य होतात. अयोध्येत तर रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी जमतेच आहे.  मंगल भवन अमंगल हारी या तुलसीदासांच्या चौपाईत म्हटल्याप्रमाणे श्रीराम हे मंगलाचे धाम आहेत, मंगल करणारे आहेत आणि अमंगल हरण करणारे आहेत. त्यांची म्हणजेच या दशरथनंदनाची कृपा आपल्यावर सदैव राहो. पण रामाची प्रार्थना का करायची ? रामनाम हे श्रेष्ठ का आहे ? रामाचं मोठेपण कशात आहे या प्रश्नांची उत्तरं या लेखात शोधण्याचा प्रयत्न आपण क...

अंतर दृष्टिकोनातलं

उगवतीचे रंग   अंतर दृष्टिकोनातलं  हिंदीमध्ये ' दृष्टिकोन ' या मराठी शब्दासाठी ' नजरिया ' असा एक छान शब्द आहे. नजर आणि नजरिया यात फरक आहे. नजर म्हणजे दृष्टी आणि नजरिया म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किंवा विचार करण्याची दिशा. त्यावरून एक सुंदर आणि प्रेरणादायी वाक्य आहे. ' नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तीया बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. '  या वाक्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे दोन वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करत असताना, त्यातील काही प्रसंग वाचून मनात उठलेली विचारांची वादळं. त्या दोन गोष्टींनी मनाला अगदी हलवून सोडलं. व पु काळेंचं ' माझं माझ्यापाशी ' या नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वेळ मिळाला की मी अधूनमधून वाचत असतो. या पुस्तकात ' अमर चित्रपट ' या नावाचा एक लेख आहे. त्यात ' प्रभात ' चित्रपट निर्मित १९३७ सालच्या ' कुंकू ' चित्रपटाबद्दल अतिशय मूलभूत विचार वपुंनी मांडले आहेत. दुसरं पुस्तक मी सध्या वाचतो आहे त्याचं नाव आहे ' आश्रम नावाचं घर : कहा...