मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४७

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ४७ सहजपाठ : रवींद्रनाथांची अनमोल देणगी (२) बंगालमधील लोक खरंच भाग्यवान ! रवींद्रनाथांचे सहजपाठ जणू त्यांच्या रक्तातच भिनले होते. अगदी शिशुवर्गात जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध असणाऱ्या बंगाली माणसांपर्यंत त्यांच्या सहजपाठातील कविता सर्वांना पाठ होत्या. ही रवींद्रनाथांनी घडवून आणलेली जादू होती. खरंतर शिक्षण क्षेत्रातील ही एक क्रांती होती असे म्हटलेले जास्त योग्य ठरेल. पु ल देशपांडे यांचा मुक्काम शांतीनिकेतनला असताना त्यांच्यासोबत सलील घोष नामक तेथीलच एक तरुण होता. त्याच्याबरोबर एकता ते शिशुभवनाच्या वस्तीगृहात गेले. त्या प्रसंगाचे मोठे सुंदर वर्णन त्यांनी आपल्या ' वंगचित्रे ' या पुस्तकात केले आहे. ते वर्णन अत्यंत हृद्य आहे. तेथे गेल्यावर सलीलने त्यांची तेथे शिकवणाऱ्या बाईंशी ओळख करून दिली. त्या प्रसंगाचे मोठे मनोरंजक वर्णन पुलं करतात. ते त्यांच्याच शब्दात-  " बाईच्या भोवती पाच पंचवीस पोरींचा किलबिलाट चालला होता. आम्हाला पाहिल्यावर उगीचच त्या पोरी लाजल्या काय, गंभीर काय झाल्या, खुदकन हसल्या काय. काही बोलायची सोय ना...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 46

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 46 सहजपाठ : रवींद्रनाथांची अनमोल देणगी (१) रवींद्रनाथांच्या स्वतःच्या शिक्षण विषयक काही कल्पना होत्या. मुलांना औपचारिक पारंपारिक शिक्षण देण्यापेक्षा नैसर्गिकरित्या ते कसे शिकतील यावर त्यांचा भर होता. त्या दृष्टीनेच त्यांनी शांतिनिकेतन मधील मुलांना शिकवले. रटाळ घोकंपट्टी त्यांना कधीच मान्य नव्हती. तर भोवतालचे वातावरण, निसर्ग यांचे निरीक्षण करता करता मुलांनी त्यातून सहज शिकावे असे त्यांना वाटत होते. त्यातूनच त्यांचे सहजपाठ निर्माण झाले. रवींद्रनाथ केवळ व्यासपीठावरून भाषण देणारे किंवा वृत्तपत्रात मोठ-मोठे शिक्षण विषयक लेख लिहिणारे शिक्षणतज्ज्ञ कधीच नव्हते. कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून आणि मुळापासून करणारे ते प्रायोगिक शिक्षणतज्ज्ञ होते. म्हणून केवळ शिक्षणसंस्था काढून ते शांत बसले नाहीत तर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अतिशय सुंदर पाठ्यपुस्तके तयार केली. ही पाठ्यपुस्तके म्हणजेच सहजपाठ आणि हे सहज पाठ म्हणजे त्यांनी बंगालला दिलेली सर्वात मोठी देणगी असे म्हणावे लागेल ! मुळात ' सहजपाठ ' हे नावच किती सुंदर आहे ! सहजपाठ होणारे ...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...
 फुलले ऋतू  मंद मंद पवन गात वसंत गीत ये भरात  सांग कुठे आहेस तू  फुलले ऋतू फुलले ऋतू. बगळ्यांची माळ अंबरी  कोकिळेची मधु ललकारी धुंद गंध मोहराचा लागला सुटू फुलले ऋतू फुलले ऋतू  निसर्गात या जादू घडे  पीत पानांचे भूमी सडे   वृक्षांना स्वप्न हरित लागले दिसू फुलले ऋतू फुलले ऋतू  फुलली ही माळराने  फुलली ही उपवने  अवनीवर रंग फुलांचे लागले दिसू फुलले ऋतू फुलले ऋतू  धुंद अशा वातावरणी नवचैतन्य येई धरणी  मनी मानसी असशी तू फुलले ऋतू फुलले ऋतू. © विश्वास देशपांडे, चाळीसगाव  १२/२/२०२५ प्रतिक्रियेसाठी  ९४०३७४९९३२ ( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 44

उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 44 शांतिनिकेतन ते विश्वभारती शिक्षण कसे असावे याबद्दल रवींद्रनाथांच्या स्वतःच्या काही कल्पना होत्या. त्यांना लहानपणी आलेला शाळेतील आलेला कटू अनुभव त्याच्या जोडीला होताच. शाळेत दिले जाणारे साचेबद्ध औपचारिक शिक्षण त्यांना आवडत नव्हते. हे शिक्षण मुलांचा बौद्धिक आणि भावनिक विकास करण्यास असमर्थ आहे अशी त्यांची भावना होती. शिवाय त्यांचा मुलगा रथींद्रनाथ याचे देखील शाळेत नाव दाखल करण्याचे वय झाले होते. आपल्याला अपेक्षित असलेल्या पद्धतीने त्यालाही शिक्षण देता यावे असे त्यांना वाटत होते. त्यांच्या चिंतनातून झालेला मानवता धर्माचा साक्षात्कार त्यांना समाजाची निष्काम सेवा करावी अशी प्रेरणा आतून देत होताच. या सगळ्या कारणांमुळे आपल्याला अपेक्षित असणारे उत्तम शिक्षण देणारी एखादी संस्था आपणच का निर्माण करू नये असे त्यांना वाटू लागले आणि त्यातूनच १९०१ मध्ये शांतिनिकेतनची स्थापना झाली. प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या धर्तीवर शिक्षण देणारी संस्था असे शांतिनकेतनचे स्वरूप होते. हळूहळू या संस्थेची वाढ आणि विकास होऊ लागला. शांतिनिकेतनचा विकास होत असतानाच्...

स्पर्श होता तुझा...

 उगवतीचे रंग  स्पर्श होता तुझा... जेव्हा तुझी नि माझी सहजीच भेट झाली   केसात रुपेरी माझ्या पाती हिरवी फुलून आली. जगणे सुंदर होतेच ते आणखी सुंदर झाले  जगण्यास या आता अर्थ नवे मिळाले . असे खूप दुर्मिळ जरी तो स्पर्श तुझा मला लाभला  दिव्य त्या स्पर्शे देह माझा रोमरोमी फुलून आला. शारदेच्या उपवनातील पुष्पे दोन मला मिळाली  दिव्य त्यांच्या सुगंधाने काया ही पुलकित झाली.   शारदेच्या वीणेचे ते दिव्य स्वर कानी आले मधुर त्या स्वरांनी आयुष्य माझे झंकारले.  कृपा ही अशीच राहो जन्म जन्मांतरी  तुझिया अमृताने व्हावी धन्य मम वैखरी. ( प्रिय रसिक वाचकहो, या कवितेचे थोडे स्पष्टीकरण देतो. सेवानिवृत्तीनंतर मी लेखनाला सुरुवात केली. आतापर्यंत जे लेखन माझ्या हातून घडले ते केवळ माझे नसून त्या शारदामातेचा दिव्य स्पर्श कुठेतरी मला लाभला असावा. त्यामुळेच हे शक्य झाले. यात माझे स्वतःचे असे काही नाही. त्याचेच वर्णन करणारी आणि तिची कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता ! ) © विश्वास देशपांडे, चाळीसगाव  ११/२/२०२५ प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ ( कृपया कविता नावासहित अग्रेषित कर...

माझे आदर्श आणि दिलदार मित्र श्री उत्तमराव काळे सर

 उगवतीचे रंग  माझे आदर्श आणि दिलदार मित्र श्री उत्तमराव काळे सर चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवा करत असताना एक उत्तम मित्र मला लाभला त्या मित्राचे नाव श्री उत्तमराव काळे सर. खरोखरच नावाप्रमाणे उत्तम असे हे व्यक्तिमत्व ! सुदृढ शरीरयष्टी, गौरवर्ण आणि चारचौघात उठून दिसणारे रुबाबदार व्यक्तिमत्व सरांना लाभले आहे. चेहऱ्यावरून करारी वाटणारे सर अंतरंगी अतिशय प्रेमळ आहेत.  विद्यार्थ्यांना त्यांचा आदरयुक्त धाक असायचा. गणित आणि विज्ञान हे विषय शिकवण्यात सरांचा हातखंडा. सांगण्याची आणि शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी. हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सरांच्या हाताखालून शिकून गेले आणि मोठे झाले. अशा अनेक ओल्या मातीच्या गोळ्यांना त्यांनी आकार दिला आणि त्यातून सुंदर मूर्ती घडवली. त्यापैकी अनेक विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्टर, वकील अशा उच्च पदावर कार्यरत आहेत.  अनेक विद्यार्थी परदेशात उत्तम प्रकारे सेवा बजावत आहेत. हे सर्व विद्यार्थी आजही भेटले की सरांचे आवर्जून नाव काढतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज आपण या यशाच्या पायरीपर्यंत पोहोचू शकलो याचा आवर्जून उल्लेख ...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४३

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ४३ मानवतावादी धर्माचा साक्षात्कार  रवींद्रनाथ हे भारतीय संस्कृती आणि परंपरांचे अभिमानी असले आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून परदेशात त्यांनी प्रतिनिधित्व केले असले तरी देखील नेहमीच पारंपारिक गोष्टी जशाच्या तशा स्वीकारण्यापेक्षा त्यावर विचार करून, त्यात काहीतरी बदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच राहिला. त्यांची धर्मविषयक कल्पना सुद्धा अशाच प्रकारे विकसित पावली. भगवद्गीतेमध्ये परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे तीन मार्ग सांगितले आहेत. ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग आणि कर्ममार्ग. परंतु रवींद्रनाथांचे म्हणणे असे की अशा वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर प्राप्तीचा प्रयत्न करण्यापेक्षा ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा मेळ घालून परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचता येईल.  ईशोपनिषदात असे म्हटले आहे की  ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।। ( याचा अर्थ हे सर्व चराचर जग ईश्वराने व्याप्त आहे. त्याचा जाणीवपूर्वक उपभोग घ्यावा. मी त्याचा मालक आहे, हे सर्व माझे आहे या भावनेने त्य...