मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जलसंजीवनी देणारा देवदूत

उगवतीचे रंग   जलसंजीवनी देणारा देवदूत  १९७१ चे वर्ष. पाकिस्तानी सैनिक पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर भयंकर अत्याचार करीत होते. लाखो लोकांची सामुहिक हत्या करण्यात आली होती. लाखो स्त्रियांवर बलात्कार झाले होते. लोकांमध्ये प्रचंड भीती होती. त्यातूनच जवळपास कोट्यवधी लोक भारताच्या आश्रयाला आले होते. भारताने सीमावर्ती भागात या लोकांना आश्रय देण्यासाठी छावण्या उभारल्या होत्या. कडाक्याची थंडी पडलेली. काही लोक तंबूत तर काही उघड्यावर राहत होते. आपला प्रदेश, घरदार सोडून आलेल्या या लोकांची मानसिक अवस्था फार बिकट होती. भारतावरही प्रचंड आर्थिक ताण पडत होता पण मानवतेच्या भावनेतून या सर्व लोकांना भारताने आश्रय दिला होता. पण तरीसुद्धा एवढ्या लाखो लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतेच्या सुविधा देणे शक्य नव्हते. त्यातून त्या काळात जगातील अनेक देशात कॉलरा, अतिसाराच्या साथीने थैमान घातले होते. अशा वेळी व्हायचे तेच झाले. हजारो लोकांना कॉलरा आणि अतिसाराची लागण झाली. एवढ्या लोकांना वैद्यकीय उपचार किंवा सुविधा पुरवणे आवाक्याबाहेरची गोष्ट होती. त्यातच ढाक्यातील कॉलरा संशोधन केंद्र निधीअभावी आणि ...

रामायणातील ' प्रेम ' रस

उगवतीचे रंग   रामायणातील ' प्रेम ' रस  ' रामायण ' चार अक्षरी शब्द ! शतकानुशतके भारतीय मनाला मोहिनी घालणारे महाकाव्य ! रामायणात प्रेमरसाचा मंगल कलश काठोकाठ ओसंडून वाहतो आहे. ' वाल्मिकीच्या भाव मनीचे ' प्रामुख्याने प्रेमरसात भिजूनच बाहेर पडले आहेत. राजा, गुरु, पिता, पुत्र, माता, बंधू, सखा, भक्त, सेवक आदी नात्यातील हिमालयाएवढ्या उंचीचे आदर्श तर रामायणाने उभे केले आहेतच पण प्रेम काय असते, प्रेमातील समर्पण कसे असते याचे जे आदर्श रामायणात आहेत, ते अन्यत्र कोठेही आढळत नाहीत. प्रेमाचा सप्ताह आणि त्यातील विविध दिनविशेष साजरे करणे, व्हॅलेंटाईन डे ला भेटवस्तू आदी देऊन आपल्या प्रेमाचे प्रकटीकरण करणे या गोष्टी आज मोठया प्रमाणावर होत असताना  रामायणातील विविध व्यक्तिरेखा प्रेम कसे असावे या विषयावर मोठा सुंदर प्रकाश टाकतात. या प्रेमात काय नाही ? त्याग, सेवा, समर्पण आहे. आकाशाची उदात्तता आहे, सागराची खोली आहे, हिमालयाची उंची आहे, गंगाजलाचे पावित्र्य आहे, कुसुमांचा मंद दरवळणारा सुगंध आहे आणि अमृताचे माधुर्य आहे.  ' राम ' शब्दाचा अर्थच मुळी आनंद देणारा असा आहे. ' रम ...
  उगवतीचे रंग कसं हुईल, काय हुईल...! प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचं ' वऱ्हाड निघालं लंडनला ' हा एकपात्री प्रयोग बहुतेकांनी पाहिला असेल किंवा त्याचा ऑडिओ तरी ऐकला असेल. त्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे डिसेंबर (२०२३) महिन्यात आम्हाला एका लग्नाला जायचं होतं. ते लग्न होतं कर्नाटकात होस्पेट या गावी. तसं म्हटलं तर लग्नाला जाणं आवश्यक होतं . पण त्याआधी त्यांच्या साखरपुड्याला आणि कर्नाटकातील शिमोगा या सारख्या लांबच्या गावी हजर राहिल्यानं लग्नाला हजर नसतो राहिलो तरी ते चालून जाण्यासारखं होतं असा सोयीस्कर विचार आम्ही केला. पण आमच्या सौभाग्यवतीच्या आग्रहापुढे आमचा हा न जाण्याचा विचार फारसा टिकला नाही. ( अर्थात असं होणार याची मनोमन खात्री होतीच. देवानं माणसाला आणि प्राण्यांना सुद्धा जो सिक्स्थ सेन्स ( मराठीत काय म्हणतात माहिती नाही ) दिला आहे, तो प्राण्यांकडे तर आहे पण माणूस निसर्गापासून दूर गेल्याने तो ही मौल्यवान गोष्ट हरवून बसला आहे. पण समस्त नवरे मंडळींना मात्र अशा प्रकारचा सिक्स्थ सेन्स निसर्गानं अजूनही ठेवला आहे. त्यामुळेच पुढचे धोके लक्षात येतात. तर असो. तुम्हाला म्हणून सांगितलं...

आपण दोघं

  उगवतीचे रंग आपण दोघं मी तुला ओळखतो, अगदी लहानपणापासून नियतीनेच तुझी आणि माझी गाठ बांधली आहे एकमेकांची सुखदुःख आपण वाटून घेतो आणि ती सुद्धा अगदी आनंदाने. तू नेहमीच माझ्याबरोबर असतेस. कधी तू माझ्यावर प्रेम करतेस तर कधी रागावतेस, कधी रुसतेस आणि कधी मलाही रडवतेस. पण मी तुला नेहमीच आहे तसं स्वीकारलं आहे. अर्थात हे तुझ्याही लक्षात येत असेलच. कधी कधी तू माझ्यासमोर प्रचंड मोठी आव्हानं उभी करतेस आणि मग मी धडपडतो त्यांना तोंड देण्यासाठी. त्यात कधी यशस्वी होतो तर कधी अयशस्वी. पण या सगळ्या परिस्थितीत तू मला सांभाळून घेतेस. तुझं आणि माझं हे नातं माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहील. मी असतो तिथे तू असतेसच. तू दुसरी तिसरी कोणी नाहीस  तू तर आहेस माझी जिंदगी.   मी तुझ्यावर फार फार प्रेम करतो आणि करत राहीन. तुझी साथ अशीच राहू दे वर्षांवरचे वर्षानुवर्षे. © विश्वास देशपांडे, चाळीसगाव १०/०२/२०२४ प्रतिक्रियेसाठी  ९४०३७४९९३२ ( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )

मोदी सरांच्या वर्गात...

उगवतीचे रंग  मोदी सरांच्या वर्गात...  परवा सहज टीव्ही लावला आणि त्यावेळी टीव्हीवर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ' परीक्षा पे चर्चा ' हा कार्यक्रम सुरु होता. उत्सुकता म्हणून पाहत राहिलो. तसेही आयुष्य शिक्षकी पेशात गेल्याने विद्यार्थी कोणते प्रश्न विचारतात आणि मोदी सर त्यांना काय उत्तर देतात याचे कुतूहल नक्कीच होते. यापूर्वीही मोदीजींची अनेक भाषणे जरी प्रत्यक्ष नाही तरी टीव्हीवर ऐकण्याची संधी मिळाली होती. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली होती की मोदीजी हातात कुठलाही कागद न घेता उत्स्फूतपणे बोलतात, सहज बोलतात आणि समोरच्यांची मने जिंकून घेतात. तोच सुखद अनुभव यावेळीही आला. बुद्धिमान अशा तीन साडेतीन हजार विद्यार्थ्यांसमोर पंतप्रधान उभे राहून बोलत होते. त्याचवेळी देशाच्या विविध भागातील विद्यार्थी ऑनलाईन प्रश्न विचारत होते. या प्रश्नांना शांतपणे, खंबीरपणे आणि अत्यंत आत्मविश्वासाने मोदीजी उत्तरे देत होते. खरे तर हुशार विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शनासाठी उभे राहणे हीच एक मोठी गोष्ट आहे आणि त्यांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान करणे ही त्यापुढील गोष्ट !एखाद्या अनुभवी आणि कसलेल्या शिक्षक...