मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग तेरा )

  उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग तेरा ) रोमारोमात देशभक्ती... जे आर डी म्हणजे रोमारोमात देशभक्ती भिनलेला उद्योगपती. त्यांनी तयार केलेल्या मुंबई योजना किंवा बॉंबे प्लॅन बद्दल आपण भाग अकरा मध्ये डॉ जॉन मथाई यांची माहिती घेताना पाहिले आहे. देशातील आघाडीच्या उद्योगपतींना घेऊन तयार केलेल्या या योजनेत स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशाआकांक्षाचा विचार करून तरतुदी केलेल्या होत्या. पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा देशासाठी पंचवार्षिक योजनांचे नियोजन करण्यात आले, तेव्हा जे आर डींच्या सूचना गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. त्यानंतरही जे आर डींनी आत्यंतिक तळमळीने वेळोवेळी अनेक सूचना सरकारला केल्या. त्यातील बऱ्याचशा राज्यकर्त्यांना सोयीच्या नव्हत्या म्हणून त्या अमलात येऊ शकल्या नाहीत हे उघड आहे. जे आर डी आणि तत्कालीन पंतप्रधान पं नेहरू यांची खास मैत्री होती. या दोघांचेही वैशिष्ट्य म्हणजे दोघांनी अत्याधुनिक शिक्षण घेतलेले. दोघेही युरोपात शिकलेले होते. दोघांचीही विचारसरणी त्यामुळे आधुनिक होती. जे आर डींचे बालपण, शिक्षण जर...

द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग बारा )

  उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग बारा ) डोंगराएवढी माणसे... मी जसजसा जे आर डींच्या चरित्राचा अभ्यास करू लागलो तसतसा जे आर डी या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडलो. जे आर डीं नी टाटा मध्ये आणलेली एकेक माणसे पाहिल्यानंतर तर माझा आदर दुणावतच गेला. जे आर डींचे चरित्र म्हणजे जणू रत्नांची खाणच...! जसजसे उत्खनन करावे, तसतशी एकेक रत्ने हाताला लागत गेली. आजच्या भागात अशाच काही रत्नांचा परिचय. जे आर डीं नी जी गुणी आणि बुद्धिमान माणसे टाटा अँड सन्स मध्ये आणली, त्यातील सुमंत मुळगावकर आणि दरबारी सेठ यांनी विशेष कर्तृत्व गाजवले. त्यातील सुमंत मुळगावकर हे इंग्लंडच्या प्रख्यात इंपिरियल कॉलेजमधून इंजिनिअर झालेले होते. सुरुवातीला त्यांनी टाटांच्या बिहारमधील चायबासा या ठिकाणी सिमेंट कारखान्यात काम केले. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धानंतर सिमेंट कारखान्यासाठी परदेशातून यंत्रसामुग्री आयात परवानगी नव्हती. तेव्हा मुळगावकरांनी स्वतः यंत्रांचे आरेखन आणि उभारणी केली. टाटांच्या चार सिमेंट कारखान्यांचे रूपांतर एका अद्ययावत अशा सिमेंट निर्मिती कारखान्यात करण...

द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग अकरा )

  उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग अकरा ) डोंगराएवढी माणसे... एक चिनी म्हण आहे. ' तुम्हाला एका वर्षाची विकासयोजना राबवायची असेल तर, मका पेरा. पंचवीस वर्षे पुढची योजना राबवायची असेल तर, झाडांच्या बिया पेरा. शंभर वर्षांसाठीचा विचार करून एखादी योजना राबवायची असेल तर माणसं पेरा. ' जे आर डींनी नेमके हेच केले. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना गुणी माणसांची पारख होती. या रत्नपारख्याने निरनिराळ्या ठिकाणाहून अशी नानाविध रत्ने गोळा करून टाटांच्या उद्योगसमूहाला प्रगतीपथावर नेले. जे आर डींनी निवडलेल्या आणि टाटा सन्समध्ये सामावून घेतलेल्या अशा व्यक्तींनी अक्षरशः डोंगराएवढे काम केले. नुसते कामच केले असे नाही तर जे आर डींनी त्यांना टाटांसोबत वाढण्याची देखील संधी दिली. त्यामुळे या व्यक्तींनी टाटांचे नाव तर मोठे केलेच पण वैयक्तिक जीवनातही आदराचे मोठे स्थान प्राप्त केले. एखादी कर्तृत्वान आणि गुणी व्यक्ती जे आर डींच्या नजरेत भरली की त्या व्यक्तीला ते आपल्याकडे येण्याचे आमंत्रण देत. त्यासाठी त्यांच्या मागण्याही ते मान्य करत. कंपनीत त्या...

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग दहा )

  उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग दहा ) आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे... भारतात पहिली एअरमेल सेवा सुरु करण्याचे श्रेय जे आर डींच्या दूरदृष्टीला द्यावे लागेल. जे आर डी हे भारतात विमान चालवण्याचा परवाना मिळवलेले पहिले वैमानिक होते. इंग्लंडच्या रॉयल एरो क्लबने वैमानिकांसाठी एक स्पर्धा ठेवली होती. त्यात जो वैमानिक एकट्याने सहा आठवड्यांच्या कालावधीत इंग्लंड ते भारत किंवा भारत ते इंग्लंड असा प्रवास पूर्ण करेल, त्याला पाचशे पौंडाचे बक्षीस जाहीर केले होते. मुळातच साहसाची आवड असलेल्या जे आर डींनी या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले. या स्पर्धेत त्यावेळी तीनच वैमानिक सहभागी झाले. एक म्हणजे मनमोहनसिंग, दुसरी व्यक्ती म्हणजे केवळ १८ वर्षांचा असलेला आस्पी इंजिनिअर या नावाचा मुलगा आणि तिसरी व्यक्ती म्हणजे स्वतः जे आर डी. जे आर डी त्यावेळी साधारणपणे २७/२८ वर्षांचे होते. उत्तम वैमानिक होण्यासाठी जे काही गुण लागतात, ते जे आर डीं मध्ये पुरेपूर भरलेले होते. वैमानिकाला कोणत्याही कठीण प्रसंगी आपले डोके शांत ठेवता यायला हवे. बरेचदा एकापेक्षा एक कठी...

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग नऊ )

  उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग नऊ ) जे आर डीं ना गुणी माणसांची अचूक पारख होती. त्यांनी एकेक करून टाटामध्ये घेतलेल्या व्यक्तीने अक्षरशः डोंगराएवढे काम उभे केले आहे. पण त्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या भागात पाहू. आजच्या भागात जे आर डीं च्या लग्नाची मजेशीर हकीगत आपण पाहू. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भलेबुरे असे अपघात किंवा योगायोग येतात. असे भरपूर योगायोग जे आर डींच्या आयुष्यात आले. पहिल्या महायुद्धाच्या काळात ते जपानमधून बोटीने भारतात येताना बॉम्बहल्ल्यापासून सुदैवाने बचावले. वडिलांनी बोलावून घेतल्याने फ्रेंच सैनिकांचे मोरोक्कोत झालेल्या शिरकाणापासूनही ते बचावले. त्यांचे आयुष्य म्हणजे अशा बऱ्या वाईट घटनांनी भरलेली एक कथा आहे. पण डगमगून न जाता सगळ्या प्रसंगातून ते आपल्या धैर्याने, हुशारीने आणि प्रसंगावधानाने पार पडले. त्यांचे लग्न थेल्मा विकाजी नावाच्या तरुणीशी कसे झाले ही मात्र गमतीदार कथा आहे. जे आर डीं ना विमाने, मोटारी इ ची अतिशय आवड होती. आपल्या वडिलांच्या मागे लागून त्यांनी त्यांना आपल्यासाठी महागडी बुगाटी कार घ्याय...

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग आठ )

  उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग आठ ) जे आर डीं च्या कर्तृत्वाचा विस्तृत आढावा घेण्याआधी जमशेटजींचे ज्येष्ठ चिरंजीव सर दोराबजी जे आधी टाटा अँड सन्सचे प्रमुख होते, त्यांचे योगदान जाणून घेणे महत्वाचे आहे, नाहीतर दोराबजींवर अन्याय केल्यासारखे होईल. जे आर डींचे वडील आर डी आणि दोराबजी यांनी मिळून टाटा अँड सन्सची भरभराट केली. दोराबजी जरी थकले होते, तरी त्यांनी अखेरपर्यंत काम करून टाटांना एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे श्रेय त्यांच्या नावावर आहे. १९२० व १९२४ मध्ये ऑलिम्पिक मध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंचा खर्च त्यांनी स्वतःच्या पैशातून केला होता. त्यांची पत्नी मेहेरबाई यांनी बॉंबे वूमन प्रेसिडेन्सी कौन्सिल स्थापन करून भारतीय महिलांना इंटरनॅशनल वूमेन्स कौन्सिलमध्ये प्रवेश मिळवून दिला. टाटांच्या तीन कापडमिल, पोलाद कारखाना, तीन विद्युत प्रकल्प, टाटा केमिकल्स या उद्योगांची पायाभरणी आणि विस्तार दोराबजींच्याच काळात झाला. दोराबजींना भारतात रेडियम इन्स्टिट्यूटची स्थापना करायची इच्छा ह...

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सात )

  उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सात ) सैन्यात भरती होण्यापूर्वीचा काही काळ जेहने आपल्या वडील आणि भावंडांसोबत घालवला. त्यांचा निरोप घेऊन तो फ्रान्सला सैन्यात भरती होण्यासाठी परतला. या ठिकाणी त्याला विविध भागातून आलेल्या सैनिकांबरोबर प्रशिक्षण घ्यायचे होते. काही तरुण मोरोक्को तर काही अल्जेरियातून आलेले होते. मात्र त्यातील बहुसंख्य अशिक्षित आणि नागरी चालीरीतींची माहिती नसणारे असे होते. ते कित्येक दिवस विना अंघोळीचे राहत. शिवाय त्यांच्या प्रशिक्षणाचे ठिकाण हे उजाड आणि भकास वातावरण असलेले होते. या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेणे जेहला कठीण गेले. त्या काळात घोड्यावर ऐटीत बसून दौड करणारे सैनिक त्याला आवडायचे. म्हणून त्याने घोडदळात प्रवेश घेतला. पण इथे त्याला अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागले. राहण्याखाण्याची व्यवस्था नीट नव्हती. शिवाय घोड्यावर बसण्याची सवय नसल्याने त्याच्या पार्श्वभागाला सूज येऊन फोड आले. अशातच एक चांगली संधी त्याच्यासाठी चालून आली. त्याला टायपिंग येते हे कुणाकडून तरी कॅप्टनला कळले. त्याने त्याला आपल्या ऑ...

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सहा )

  उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सहा ) सुनी गेली तेव्हा ती फक्त ४३ वर्षांची होती. जेहने नुकतेच तारुण्यात पाऊल ठेवले होते. तो साधारण १९/२० वर्षांचा असेल त्यावेळी. आर डीं ना सुनीचे अंत्यदर्शन होऊ शकले नाही. ते आठ दिवसातच फ्रान्सहून परतले. आता त्यांना मुलांकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे क्रमप्राप्त होते. त्यांच्या मनात जेहला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचे होते. जेहच्या मनात देखील केम्ब्रिज विद्यापीठातून इंजिनिअर होण्याची इच्छा होती. आर डी परत येईपर्यंत ते ज्या टाटा इंडस्ट्रियल बँकेला वाचवण्यासाठी धडपडत होते, ती बँक आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन झाली होती. आर डी आणि मुले आता एकत्र राहू लागली. आर डी म्हणजे अनेक गुणांनी विभूषित झालेले व्यक्तिमत्व होते. वक्तशीरपणा, शिस्त याबाबतीत ते अत्यंत काटेकोर होते. सर्व कामे वेळच्या वेळी व्हावीत असा त्यांचा कटाक्ष असे. आर डींच्या स्वभावात एक दोष मात्र होता. ते लवकर संतापत आणि दुसऱ्या माणसावर लगेच चिडत. त्यांची ही सगळीच स्वभाववैशिष्ट्ये जेहने जशीच्या तशी उचलली होती. आर...

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग पाच )

   उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग पाच ) मुलांच्या शिक्षणासाठी सुनीला वारंवार घर बदलावे लागे. तिची खूप धावपळ होत असे म्हणून सुनीच्या आणि मुलांच्या सोयीसाठी आर डी नी फ्रान्समध्ये हार्डलॉट येथे स्वतःचे घर विकत घेतले. हे घर फ्रान्समधील प्रसिद्ध वैमानिक लुई ब्लेरिओ याच्या घराजवळच होते. १९०९ मध्ये आपल्या विमानाने इंग्लिश खाडी पार करणारा लुई हा पहिला वैमानिक होता. जेहला मुळातच मोटारी आणि विमाने यांची आवड होती. एका प्रसिद्ध वैमानिकाच्या घराजवळ राहायाला मिळणे ही जेहसाठी सुवर्णसंधीच होती. लुईच्या विमानांची उड्डाणे आणि लँडिंग जेह मोठ्या उत्सुकतेने बघत असायचा. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. या युद्धात अनेक सैनिक जखमी होत होते. या कठीण प्रसंगी देशाची सेवा करता यावी या उदात्त भावनेतून सुनीने पॅरिसमधीलच एका अमेरिकन हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करायला सुरुवात केली. आपल्या कामात व्यत्यय येऊ नये तसेच मुलांची आबाळ होऊ नये म्हणून तिने आपल्या मुलांना तिच्या आईकडे पाठवले. हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली...

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग चार )

   उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग चार ) जमशेटजींच्या अथक प्रयत्नातून जमशेटपूरला पोलाद कारखाना उभा राहिला. १९१२ मध्ये या कारखान्यातून पोलादाची पहिली लड बाहेर पडली. जलविद्युत प्रकल्प उभे राहिले. शिवाय साखर उद्योग, इलेक्ट्रो-केमिकल्स, बांधकाम व्यवसाय इ अनेक उद्योगात टाटांनी आपले पाय भक्कमपणे रोवले. जमशेदपूरच्या कारखान्यातून पोलादाचे उत्पादन सुरु झाल्यानंतर सगळ्यांना अतिशय आनंद झाला. कामगारांनी जल्लोष केला. भारतातही टाटांच्या कारखान्यातून पोलाद निर्मिती झाली याचा आनंद व्यक्त होत होता. या निमित्ताने भारताची क्षमता जगाला दिसून आली. याच कालखंडामध्ये पहिले महायुद्ध सुरु झाले होते. मेसोपोटेमियामध्ये वाहतूक करण्यासाठी ब्रिटिशाना रेल्वेमार्गाचे जाळे उभारायचे होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलादाची आवश्यकता होती. युद्धजन्य परिस्थितीमुळे पोलादाची टंचाई होती. या आणीबाणीच्या काळात टाटांनी ब्रिटिशांना पोलाद पुरवले. केवळ दोन वर्षांची बाल्यावस्था असलेल्या या कारखान्याने ( टाटा आयर्न अँड स्टील वर्क्स अर्थात तेव्हाचा टिस्को ) मेसोपो...