उगवतीचे रंग
रंग सोहळा ...
परवाच होळी झाली. होळी म्हणजे रंगोत्सव. होळीला आपण तनमनाने रंगात रंगून जातो. होळी वर्षातून एकदाच येते. आणि आपल्या रंगात आपल्याला रंगवून जाते. तसं पाहिलं तर आपल्याकडचा प्रत्येक सण हा कुठल्या ना कुठल्या रंगात न्हायलेला असतो. म्हणून तर सण उत्सव आपल्या जीवनात रंग भरतात . रंगच नसते तर आपले जीवन किती नीरस झाले याची कल्पनाच करवत नाही.
पण खरा रंगारी म्हणजे निसर्ग. तो तीनही ऋतूत आपले वेगवेगळे रंग भरत असतो. आणि सगळे रंग विलोभनीय असतात. पावसाळ्यात तर आभाळ खाली उतरते. आणि धरतीला हिरवं स्वप्न दाखवते. मग तीही त्या स्वप्नात रंगून जाते. समृद्धीची हिरवी शाल अंगावर ओढून घेते आणि नवनव्या रूपात नटते. जणू नववधूचा शृंगारच केलेला असतो तिनं . त्यातूनच हिवाळ्यात येणारी विविधरंगी फळं, फुलं बहरून येतात. नुसते भाजी मंडईत गेलो तरी निसर्गाचे हे विविध रंग आपल्याला विविध भाज्या, फळं आणि फुलांच्या रूपात दृष्टीस पडतात.
आणि आता तर उन्हाळ्याला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. अशा वेळी निसर्गातही एक वेगळा रंग सोहळा सुरु होतो. त्याचं नाव वसंत. हा वसंतोत्सव मनमोहक असतो. झाडावरची जुनी पानं गळून पडलेली असतात. जणू आम्ही आता आमच्या जीवनातील शेवटचा उत्सव साजरा करतो आहोत असंच त्यांच्या मनात असावं. म्हणून सन्याशाचं पीत वस्त्र ते धारण करतात. पिवळ्या रंगात रंगतात. आणि आपल्या शेवटच्या निजधामी निघून जातात. पण त्यांचं जाणंही किती सुंदर ..! हळूच अलग होतात आपल्या फांदीपासून, आपल्या कुटुंबापासून. आणि मग वाऱ्याच्या लहरीवर तरंगत हळूहळू खाली येतात. आणि इतके दिवस उंचावर असलेले जीव धरित्रीवर विसावतात. त्यांची जागा मग नवी पाती घेतात. तीही किती सुंदर अवतीर्ण होतात. येताना सुंदर कोमल गुलाबी रंग लेऊन येतात. आणि मग हळूहळू मनमोहक अशा हिरव्या रंगात परावर्तीत होतात. जणू येतानाच सोबत हिरव्या रंगाचे स्वप्न घेऊन येतात. आणि मग सगळे झाडच हिरव्या रंगात रंगून जातं . बहुतेक निसर्ग हिरव्या रंगाचं स्वप्न पेरत असावा. धरित्रीच्या कुशीत. आणि मग ते स्वप्न सत्य होऊन धरित्रीच्या कुशीतून हिरव्या रंगात उमलतं. ते सोबत सौख्य, समृद्धी आणि आनंद घेऊन येतं .
वाहत्या पाण्यातही कधी कधी आकाश उतरतं . आणि जादू केल्यासारखं ते पाणी नीलवर्ण होऊन जातं . रात्रीच्या वेळी ते जल रात्रीचा श्यामरंग धारण करतं आणि एक गूढ काळिमा त्या जलावर पसरतो. पहाट झाली की तो गूढ काळिमा अदृश्य होऊन प्रकाशाच्या सोनेरी रंगात परावर्तित होतो . कधी कधी दाट धुकं पसरलेलं असतं . पहाटेच्या वेळी. अशा वेळी निसर्ग बघावा. सगळा निसर्ग जणू स्तब्ध झालेला भासतो. झाडं अंगावर धुक्याची शाल ओढून बसलेली असतात. अशा वेळी त्यांच्याकडे बघताना मला एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या साधूची आठवण येते. जोपर्यंत सूर्यदेवाची किरणं त्यांना जागी करत नाहीत, तोपर्यंत त्यांचं ते ध्यान चालूच असतं .
पूर्व क्षितिजावर अरुणोदय झाला की दिशा हळूहळू उजळू लागतात. झोपलेल्या सृष्टीला जाग येते. ' अंधाराचे जाळे फिटून आकाश मोकळे होते. आणि सगळीकडे प्रकाश भरून राहतो. पूर्वेच्या पटलावर तर अप्रतिम रंगोत्सव सुरु असतो. विविध रंगांनी ते नभोमंडल रंगलेलं असतं . रंग उगवतीचे असो की मावळतीचे, ते मनोहरच असतात. फक्त आपल्या दृष्टीवर ते अवलंबून असतात. आपण पाण्याच्या बाबतीत नेहमी म्हणतो, ' पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिला दो उस जैसा.' तसेच आपल्या मनाचेही असते असे मला वाटते. आपल्या मनाला कोणताही रंग नाही. ते निर्विकार असते. आपण आपल्या वेगवेगळ्या भावभावनांचे रंग त्यात मिसळतो. जशी भावना , तसा मनाचा रंग. कधी ' हास्य ' रंग तर कधी ' राग ' रंग ...! याप्रमाचे ते भय, शोक, चिंता या रंगातही रंगते.पण ते रंग कधी कधी नकोसे वाटतात. मनाला अस्वस्थ करतात. नकोसे वाटतात. मग सगळ्यात कोणता रंग चांगला ..? तो म्हणजे ' प्रेम ' रंग.
पतझर सावन बसंत बहार , एक बरस के मौसम चार
पाचवा मौसम प्यार का, इंतजार का.
हा प्रेम रंग एकदा का
मनात मिसळला की मग राग, शोक, चिंता, भय इ ना थाराच राहत नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, ' मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.' आणि मनाला जर त्या ' रामरंगात ' किंवा ' श्यामरंगात ' रंगायची सवय झाली तर मग सगळेच प्रसन्न होऊन जाते. आणि ' आनंदाचे डोही आनंद तरंग ' उठतात.
( ' उगवतीचे रंग ' वर प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक वाचक मित्रांनो , परवा माझ्या ' आकाशझुला ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असल्याने काही दिवस तुमच्या भेटीला येणं शक्य होणार नाही. पण तुमचं प्रेम असंच राहू द्या. पुन्हा भेटूच... )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२
रंग सोहळा ...
परवाच होळी झाली. होळी म्हणजे रंगोत्सव. होळीला आपण तनमनाने रंगात रंगून जातो. होळी वर्षातून एकदाच येते. आणि आपल्या रंगात आपल्याला रंगवून जाते. तसं पाहिलं तर आपल्याकडचा प्रत्येक सण हा कुठल्या ना कुठल्या रंगात न्हायलेला असतो. म्हणून तर सण उत्सव आपल्या जीवनात रंग भरतात . रंगच नसते तर आपले जीवन किती नीरस झाले याची कल्पनाच करवत नाही.
पण खरा रंगारी म्हणजे निसर्ग. तो तीनही ऋतूत आपले वेगवेगळे रंग भरत असतो. आणि सगळे रंग विलोभनीय असतात. पावसाळ्यात तर आभाळ खाली उतरते. आणि धरतीला हिरवं स्वप्न दाखवते. मग तीही त्या स्वप्नात रंगून जाते. समृद्धीची हिरवी शाल अंगावर ओढून घेते आणि नवनव्या रूपात नटते. जणू नववधूचा शृंगारच केलेला असतो तिनं . त्यातूनच हिवाळ्यात येणारी विविधरंगी फळं, फुलं बहरून येतात. नुसते भाजी मंडईत गेलो तरी निसर्गाचे हे विविध रंग आपल्याला विविध भाज्या, फळं आणि फुलांच्या रूपात दृष्टीस पडतात.
आणि आता तर उन्हाळ्याला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. अशा वेळी निसर्गातही एक वेगळा रंग सोहळा सुरु होतो. त्याचं नाव वसंत. हा वसंतोत्सव मनमोहक असतो. झाडावरची जुनी पानं गळून पडलेली असतात. जणू आम्ही आता आमच्या जीवनातील शेवटचा उत्सव साजरा करतो आहोत असंच त्यांच्या मनात असावं. म्हणून सन्याशाचं पीत वस्त्र ते धारण करतात. पिवळ्या रंगात रंगतात. आणि आपल्या शेवटच्या निजधामी निघून जातात. पण त्यांचं जाणंही किती सुंदर ..! हळूच अलग होतात आपल्या फांदीपासून, आपल्या कुटुंबापासून. आणि मग वाऱ्याच्या लहरीवर तरंगत हळूहळू खाली येतात. आणि इतके दिवस उंचावर असलेले जीव धरित्रीवर विसावतात. त्यांची जागा मग नवी पाती घेतात. तीही किती सुंदर अवतीर्ण होतात. येताना सुंदर कोमल गुलाबी रंग लेऊन येतात. आणि मग हळूहळू मनमोहक अशा हिरव्या रंगात परावर्तीत होतात. जणू येतानाच सोबत हिरव्या रंगाचे स्वप्न घेऊन येतात. आणि मग सगळे झाडच हिरव्या रंगात रंगून जातं . बहुतेक निसर्ग हिरव्या रंगाचं स्वप्न पेरत असावा. धरित्रीच्या कुशीत. आणि मग ते स्वप्न सत्य होऊन धरित्रीच्या कुशीतून हिरव्या रंगात उमलतं. ते सोबत सौख्य, समृद्धी आणि आनंद घेऊन येतं .
वाहत्या पाण्यातही कधी कधी आकाश उतरतं . आणि जादू केल्यासारखं ते पाणी नीलवर्ण होऊन जातं . रात्रीच्या वेळी ते जल रात्रीचा श्यामरंग धारण करतं आणि एक गूढ काळिमा त्या जलावर पसरतो. पहाट झाली की तो गूढ काळिमा अदृश्य होऊन प्रकाशाच्या सोनेरी रंगात परावर्तित होतो . कधी कधी दाट धुकं पसरलेलं असतं . पहाटेच्या वेळी. अशा वेळी निसर्ग बघावा. सगळा निसर्ग जणू स्तब्ध झालेला भासतो. झाडं अंगावर धुक्याची शाल ओढून बसलेली असतात. अशा वेळी त्यांच्याकडे बघताना मला एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या साधूची आठवण येते. जोपर्यंत सूर्यदेवाची किरणं त्यांना जागी करत नाहीत, तोपर्यंत त्यांचं ते ध्यान चालूच असतं .
पूर्व क्षितिजावर अरुणोदय झाला की दिशा हळूहळू उजळू लागतात. झोपलेल्या सृष्टीला जाग येते. ' अंधाराचे जाळे फिटून आकाश मोकळे होते. आणि सगळीकडे प्रकाश भरून राहतो. पूर्वेच्या पटलावर तर अप्रतिम रंगोत्सव सुरु असतो. विविध रंगांनी ते नभोमंडल रंगलेलं असतं . रंग उगवतीचे असो की मावळतीचे, ते मनोहरच असतात. फक्त आपल्या दृष्टीवर ते अवलंबून असतात. आपण पाण्याच्या बाबतीत नेहमी म्हणतो, ' पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिला दो उस जैसा.' तसेच आपल्या मनाचेही असते असे मला वाटते. आपल्या मनाला कोणताही रंग नाही. ते निर्विकार असते. आपण आपल्या वेगवेगळ्या भावभावनांचे रंग त्यात मिसळतो. जशी भावना , तसा मनाचा रंग. कधी ' हास्य ' रंग तर कधी ' राग ' रंग ...! याप्रमाचे ते भय, शोक, चिंता या रंगातही रंगते.पण ते रंग कधी कधी नकोसे वाटतात. मनाला अस्वस्थ करतात. नकोसे वाटतात. मग सगळ्यात कोणता रंग चांगला ..? तो म्हणजे ' प्रेम ' रंग.
पतझर सावन बसंत बहार , एक बरस के मौसम चार
पाचवा मौसम प्यार का, इंतजार का.
हा प्रेम रंग एकदा का
मनात मिसळला की मग राग, शोक, चिंता, भय इ ना थाराच राहत नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, ' मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.' आणि मनाला जर त्या ' रामरंगात ' किंवा ' श्यामरंगात ' रंगायची सवय झाली तर मग सगळेच प्रसन्न होऊन जाते. आणि ' आनंदाचे डोही आनंद तरंग ' उठतात.
( ' उगवतीचे रंग ' वर प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक वाचक मित्रांनो , परवा माझ्या ' आकाशझुला ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असल्याने काही दिवस तुमच्या भेटीला येणं शक्य होणार नाही. पण तुमचं प्रेम असंच राहू द्या. पुन्हा भेटूच... )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा