मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ५ )

  उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ५ ) जगणे आनंदी करणाऱ्या शैक्षणिक संकल्पना  मागील चार भागांमध्ये रवींद्रनाथ टागोरांचे व्यक्तिमत्व कसे घडत गेले हे आपण पाहिले. त्याचप्रमाणे त्यांच्या शिक्षणविषयक संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या या भागात आपण त्यांच्या याच शैक्षणिक संकल्पना जाणून घेण्याचा आणखी प्रयत्न करू या. रामायण, महाभारताच्या काळात आपल्या देशात शिक्षणासाठी तपोवन किंवा आश्रम पद्धती अस्तित्वात होती. गुरु आपल्या शिष्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देत असत. प्राचीन काळातील ऋषीमुनी चिंतन, मनन आणि तपसाधनेतून ज्ञान प्राप्त करीत. त्यातून प्राप्त झालेले ज्ञान आपल्या शिष्यांना सहजपणे देता यावे, देशहित आणि समाजहित साधतील असे उत्तम नागरिक त्यातून घडावेत असा त्यांचा उदात्त हेतू होता. हे ऋषीमुनी काही जीवनाला कंटाळून अरण्यात पळून गेलेले नव्हते. त्यांच्यासाठी निसर्गातील पंचमहाभूते म्हणजे खळाळणारे ईश्वरी चैतन्य होते. याच चैतन्याची अनुभूती त्यांना आपल्या शिष्यांना द्यायची होती. केवळ शिक्षणच नव्हे तर एकूणच त्यांचे जीवन जगणे आनंदी करायचे होते. या उदात...

लॉरेन्सबाई, तुमचे चुकलेच..!

उगवतीचे रंग   लॉरेन्सबाई, तुमचे चुकलेच..!  परवा पेपरमध्ये ( संदर्भ - महाराष्ट्र टाइम्स २४ जून २०२४ ) एक बातमी वाचली. प्रथम वाटलं आपलीच तर वाचण्यात काही चूक होत नाही ना ? म्हणून ही बातमी दोनदा वाचली. पण ती खरीच होती. माझीच समजून घेण्यात काहीतरी चूक होत होती. बातमी अशी होती, ' पूर्ण पगार देऊन काम न दिल्याने खटला. ' आता बातमीचं हे शीर्षक तुम्ही वाचलं तरी तुमचीही माझ्यासारखीच अवस्था होईल. कारण आपल्याकडे असा खटला कोणी भरण्याची सुतराम शक्यता नाही. बातमी अशी आहे. ' फ्रान्समधील एका महिलेने कंपनीला कोर्टात खेचले. सलग वीस वर्षे कोणतेही काम न देता पूर्ण पगार देऊन बसवून ठेवल्याबद्दल एका दिव्यांग महिलेने फ्रेंच टेलिकॉम कंपनी ' ऑरेंज '  विरोधात खटला दाखल केला आहे. या महिलेचं नाव आहे ' लॉरेन्स व्हॅन वॅसेनहॉव. ' ( याविरोधात कंपनीचं म्हणणं आहे की त्यांच्या सततच्या आजारपणामुळे आणि रजा घेण्यामुळे त्यांना काम देता आले नाही तर लॉरेन्सबाई म्हणतात की कंपनीने काही काम न दिल्याने त्यांची व्यावसायिक प्रगती खुंटली. आता यात न्यायालय काय निकाल द्यायचा तो देईल. आपल्याला त्याचा फारसा विच...

योग आणि योग्यायोग्य

  उगवतीचे रंग  योग आणि योग्यायोग्य  २१जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. या वर्षीही नुकताच आपण तो साजरा केला. योगाचे महत्व आज जवळपास संपूर्ण जगात मान्य झाले असून मोठया प्रमाणावर प्रतिसाद त्याला मिळतो आहे. त्याबद्दल मोठया प्रमाणात जनजागृती होते आहे ही आनंदाची गोष्ट आहे. योग म्हणजे केवळ योगासने आणि प्राणायाम नव्हे. ती एक जीवनशैली आहे. शरीराबरोबरच मनाचा विचार जिथे केला जातो अशी एक निरोगी आणि निरामय आयुष्य जगण्याची कला म्हणजे योग. समत्वम योग उच्चते असे भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात. सुखदुःख, यशापयश आदी सर्व प्रसंगात मनाचे संतुलन राखून व्यवहार करता येणे म्हणजे योग. योगः कर्मसु कौशलम असेही म्हटले जाते. आपली नित्यकर्मे चांगल्या प्रकारे पाडता येणे हा सुद्धा योगच आहे.  योग ही जीवनशैली व्हावी. रोजच्या जगण्याचा तो एक अनिवार्य भाग व्हावा. त्याशिवाय योगाचे फायदे आपल्याला मिळू शकणार नाहीत. त्यासाठी त्यात नियमिततेची आवश्यकता आहे. पण त्यासाठी अतिशय काटेकोर राहून कठोरपणे ते पाळलेच गेले पाहिजे असा अट्टाहास नको. काही वेळा परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याची लवचिकताही दाखवता याय...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ४ )

उगवतीचे रंग   रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ४ ) शांतिनिकेतनच्या स्थापनेमागील विचार  रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनची कल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी त्यांचे व्यक्तिमत्व कसकसे समृद्ध होत गेले ते आपण गेल्या काही भागापासून पाहत आहोत. ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्यांच्या शांतिनिकेतन मागील विचार आणि त्यांच्यातील शिक्षण विषयक भूमिकेचे आकलन होणार नाही. सुप्रसिद्ध नाटककार बर्नाड शॉने एका ठिकाणी असं म्हटलंय की माझ्या विकासाच्या आड प्रामुख्यानं काही आलं असेल तर ती म्हणजे माझी शाळा ! हे वाक्य आजही आपल्याला ऐकायला धक्कादायक वाटतं पण ते सत्य आहे. त्यांचेच समकालीन असलेल्या रवींद्रनाथ टागोरांचे विचारही असेच होते. रवींद्रनाथ म्हणतात, ' माझी शाळा संपल्यानंतरच माझे खरे शिक्षण सुरु झाले. ' आता हे सगळे वाचल्यानंतर आपला असा समज होण्याची शक्यता आहे की शाळा या आपल्या विकासाच्या आड येतात. त्यामुळे त्या बंद करायला हव्यात का ? अर्थात हा टोकाचा विचार झाला. सरसकट शाळांना दोष देण्यापेक्षा आपली जी प्रचलित शिक्षणपद्धती आहे, त्यात काही उपयुक्त सुधारणा करता येतील का  ? अशा सुधारणा की ज्या...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग तीन )

उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग तीन )  रवींद्रनाथांचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं आणि त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना कशी आणि का केली याची हकीगत मनोरंजक आहे. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ म्हणजे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. ते विद्वान आणि व्यासंगी होते. पण कोरडे पांडित्य त्यांच्याजवळ नावालाही नव्हते. एकदा बीरभूमीमध्ये ते काही कामानिमित्त आले होते. तेथून ते सुरूल या तालुक्याच्या गावी जाण्यासाठी बैलगाडीने निघाले. या रस्त्यावर वाटचाल करीत असताना त्यांना एक विस्तीर्ण असे मोकळे माळरान दृष्टीस पडले. या उघड्या माळरानावर दोन विशाल असे सप्तपर्णी वृक्ष त्यांना दिसले.  दाट छाया असलेल्या या वृक्षांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. ते आपल्या बैलगाडीतून खाली उतरले. त्या विशाल वृक्षांच्या छायेत बसले. त्या वृक्षांच्या शीतल छायेत त्यांची जणू समाधीच लागली. विलक्षण शांतता अनुभवास आली. मनन, चिंतन आणि ध्यान करण्यासाठी ही जागा अतिशय योग्य आहे असे त्यांना वाटले. त्यांनी मग तो चक्क ते माळरान विकतच घेतले. लवकरच त्यांनी त्या रम्य जागी एक छोटी एकमजली बंगली बांधली. ही जागा त्यांना शांतता द...