मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४२

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ४२ भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी रवींद्रनाथ - भाग तीन जगभरातील विविध देशात रवींद्रनाथ भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून आपला ठसा उमटवत होते. बऱ्याच ठिकाणी त्यांची व्याख्याने होत होती. युरोपातील बऱ्याच ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली आणि त्यांच्या चित्रकलेच्या वेगळ्या शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. याचवेळी आणखीही एक महत्त्वाची गोष्ट घडली. ते इंग्लंडमध्ये असताना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तेथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा हिबर्ट व्याख्यानमालेसाठी रवींद्रनाथांना आमंत्रित केले. यावेळी त्यांचे वय ६९ वर्षे होते. या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य असे होते की ही व्याख्याने युरोपातील विद्वान अशा तत्वज्ञ लोकांसाठी होत असत.  या व्याख्यानांमध्ये बोलणारी व्यक्ती देखील अत्यंत विद्वान तत्वज्ञ असावी अशी परंपरा होती. परंतु भारताच्या दृष्टीने एक सुखद आश्चर्य असे घडले की आतापर्यंत साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ख्याती असलेल्या रवींद्रनाथांना या व्याख्यानमालेसाठी तत्वज्ञ म्हणून आमंत्रित करण्यात आले. त्यांना या व्याख्यानांसाठी आमं...

जगण्यातला अर्थ

  उगवतीचे रंग  जगण्यातला अर्थ ' मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने ...' असं मुकेश यांनी गायलेलं एक गीत आहे. जगण्याची आशा जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत माणूस इंद्रधनुषी सात रंगांची स्वप्न पहात असतो. मंगेश पाडगावकर म्हणतात, " या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. " खरोखरच हे जीवन विविधरंगी आहे. पण कधी कधी हेच जीवन एखाद्यासाठी भयंकर असे दु :स्वप्न बनू शकते. आयुष्य जिवंतपणी नरक बनतं. अशा वेळी जगणं नकोसं होतं. परंतु अशाही विपरीत परिस्थितीत काही माणसं हार मानत नाहीत. कारण जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्याकडे असते. अशा परिस्थितीत ते असं काही जगतात की ते त्यामुळे त्यांचं जीवन सफल तर होतंच पण  ते इतरांसाठी प्रेरणादायी बनतं. अशीच एक कथा ऑस्ट्रियातील विक्टर फ्रँकल यांची. ते न्यूरोलॉजिस्ट आणि मानसोपचार तज्ञ होते. अभ्यास आणि संशोधन हेच जणू त्यांचे जीवन झाले होते. आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांसाठी ते काम करत होते. जीवनाला कंटाळून निराश झालेल्या आणि आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांना त्यापासून परावृत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. अशातच दुसरे महायुद्ध सुरू झाले. विक्टर फ...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग ४१

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ४१ भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी रवींद्रनाथ - भाग दोन रवींद्रनाथांच्या परदेश दौऱ्याचा दुसरा टप्पा १९२० पासून सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, स्वीडन, फ्रान्स आणि इतर देशांना भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि सून होते.   त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन लोकांपर्यंत भारतीय संस्कृती आणि परंपरा प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या अमेरिका भेटीच्या दरम्यान त्यांची भेट एका उच्चशिक्षित अमेरिकन तरुणाशी झाली त्याचे नाव एल्म हर्स्ट असे होते. हे एल्म हर्स्ट कृषी आणि अर्थतज्ञ होते. त्यांचा नुकताच डोरोथी व्हिटने स्टेट या श्रीमंत कुटुंबातील तरुणीशी विवाह ठरला होता. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव या दोघांवरही जबरदस्त होता. एल्म हर्स्ट यांनी तर नंतर आपल्या नोकरीतून निवृत्त होऊन रवींद्रनाथांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील ग्रामीण भागाच्या पुनर्रचना आणि विकासाच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतले. ब्रिटन आणि अमेरिकेखेरीज फ्रान्स, जर्मन...

पिल्लू (सोडणे )

उगवतीचे रंग  पिल्लू ( सोडणे ) लेखाचं शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना ! हा ' पिल्लू सोडणे ' काय प्रकार आहे हे मला खरोखरच काही वर्षांपूर्वी माहिती नव्हतं पहिल्यांदा माझ्या एका मित्राकडून हा वाक्प्रचार मी ऐकला. मला त्या शब्दाची मोठी गंमत वाटली. मग मी कुतूहलाने त्याचे बोलणे ऐकत राहिलो. माझा हा मित्र एका राष्ट्रीयकृत बँकेत कामाला होता. त्याच्या बँकेत घडलेल्या गमतीजमती तो संध्याकाळी फिरायला जायचे वेळी मला सांगायचा. अमुक एक असं म्हणाला. तो तसं म्हणाला. काही लोकांकडे खूप कामं असायची. नेमून दिलेली कामं करणं त्यांच्या जीवावर यायचं. मग ते काहीतरी पिल्लू सोडून द्यायचे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मॅनेजरला अशी काहीतरी गोष्ट सांगायचे की ती त्याला नाकारताही यायची नाही. म्हणजेच एखादी सांगयाची. ती गोष्ट मॅनेजर खरी माणूस चालायचा आणि पुढे चालून ती प्रथा पडायची. म्हणजेच ते सोडून दिलेलं पिल्लू हळूहळू मोठं व्हायचं.  आपल्या अवतीभवती सुद्धा असे अनेक लोक आपण पाहतो. काहीही माहिती नसताना ते एखादं पिल्लू सोडून देतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ते अफवा पसरवण्याचं काम करतात. यालाच कोणी खड्या पिकवणे असेही म्हण...

रवींद्रनाथ टागोर: वारसा आणि कार्य - भाग 40

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 40 भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी रवींद्रनाथ गीतांजलीचे इंग्रजीत भाषांतर झाले आणि इंग्रजी आवृत्ती प्रसिद्ध झाली. इंग्लंडमधील  ख्यातनाम साहित्यिकांच्या वर्तुळात त्यांच्या कवितांचे वाचन होऊ लागले आणि रवींद्रनाथांना थोर साहित्यिक म्हणून जागतिक मान्यता प्राप्त होऊ लागली. त्यानंतर लगेचच त्यांच्या ' गीतांजली ' या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार मिळाला आणि जागतिक कीर्तीचे साहित्यिक म्हणून त्यांच्यावर जणू शिक्कामोर्तब झाले. ब्रिटिश सरकारने देखील त्यांचा गौरव करून त्यांना ' सर ' ही पदवी दिली. तर कलकत्ता विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली.  रवींद्रनाथ भारतीय संस्कृतीचे आणि परंपरांचे अभिमानी होते. कोणीतरी देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून भारतीयांची ही दिव्य संस्कृती आणि परंपरेची ओळख जगाला करून द्यावी असे त्यांना वाटत होते. पण रवींद्रनाथ स्वतःच स्वक्षमतेचा विकास आणि आपले  साहित्य समृद्ध करून स्वतःला यासाठीच जणू सिद्ध करत होते.   एखाद्या भारतीय व्यक्तीने अभ्यासपूर्वक भारतीय संस्कृतीचा आणि परंप...

तू गाये जा...

 उगवतीचे रंग  तू गाये जा... बेकरार दिल तू गाये जा  खुशियों से भरे वो तराने  जिन्हे सुनके दुनिया झूम उठे  और झूम उठे दिल दीवाने... ' दूर का राही ' या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेलं हे सुरेख गाणं ! असेच आयुष्य जणू जगल्या सुरील्या आवाजाच्या धनी असलेल्या प्रसिद्ध गायिका चारुशीला बेलसरे. त्यांच्या गाण्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला. आई-वडिलांच्या असलेल्या संगीताचा वारसा घेऊन हे रोप वयाच्या अकराव्या वर्षीच बहरलं आणि मग पुढे त्याचा वटवृक्ष होऊन रसिकांवर सूर-सुमनांचा वर्षाव करू लागला. गाणं चारुशीलाच्या रक्तातच होतं. वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी आपल्या बोबड्या बोलात ' विठ्ठला समचरण तुझे धरिते ' हे गीत ती गुणगुणायला लागली. या ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम केलं ते तिच्या आई-वडिलांनी आणि त्यातून एवढी सुंदर मूर्ती घडवली की प्रत्यक्ष हृदयनाथ मंगेशकरांनी तिला ' बाल लता ' असं संबोधलं. आई वडील हे तिचे आद्य गुरु झाले. आपली नोकरी सांभाळून त्यांनी स्वतःची गायनकला जोपासली आणि विकसित तर केलीच पण या आपल्या चिमुकलीला गान कलेचा वसा आणि वारसा दिला. ' बोलात बोबडीच्या स...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग ३९

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ३९ नृत्यकलेचे पुनरुज्जीवन नृत्यकला ही ६४ कलांमधील एक प्रमुख कला आहे. भारतीयांना प्राचीन काळापासून या कलेचे उत्तम ज्ञान होते. भरत मुनींचा नाट्यशास्त्रावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. जेव्हा भाषेचा विकास झाला नव्हता तेव्हा नृत्य हेच अविष्काराचे. संपर्काचे आणि प्रकटीकरणाचे माध्यम होते. भाषा जेव्हा प्रगत झाली तेव्हा असे लक्षात आले की प्रकटीकरणासाठी किंवा भावनांच्या अविष्कारासाठी भाषिक अभिव्यक्ती जेव्हा अपूर्ण वाटते तेव्हा तिला संगीत आणि नृत्याची जोड दिली जाते. प्राचीन काळी धार्मिक कथा, पुराणे सांगण्यासाठी त्यांना नृत्याची जोड दिली जात असे. नृत्याची समृद्ध परंपरा प्राचीन भारतात होती. अनेक मंदिरांवरील शिल्पांमधून आपल्याला नृत्य कलेतील मुद्रा, पदन्यास प्रत्ययास येतात. भरतनाट्यम, कथ्थक, कथकली, मणिपुरी इत्यादी नृत्य प्रकारांची समृद्ध परंपरा भारतात आहे. अनेक धार्मिक आणि पौराणिक कथांच्या सादरीकरणसाठी हे नृत्य प्रकार प्राचीन भारतात वापरले जात असत. आजही त्यांचा वापर विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी केला जातो.  परंतु...

स्पर्श मानव्याचा : एक अस्वस्थ करणारे आत्मकथन

 उगवतीचे रंग  स्पर्श मानव्याचा : एक अस्वस्थ करणारे आत्मकथन विजयाताई लवाटे यांचे ' स्पर्श मानव्याचा ' हे पुस्तक हातात पडले आणि या पुस्तकाने अक्षरशः अस्वस्थ केले. खरे तर २००६ मध्येच हे पुस्तक प्रकाशित झाले आहे परंतु माझ्या हातात ते उशिरा आले. वेश्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी विजयाताईंनी आपले आयुष्य खर्च केले. आपला देह चंदनासारखा झिजवला. आजकाल समाजसेवेचा आव आणणारी आणि प्रतिष्ठितपणाची झूल पांघरणारी अनेक माणसे आपण समाजात पाहतो. व्यासपीठावर मिरवणे वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळवणे यापलीकडे त्यांचे काम फारसे जात नाही. या अशा मंडळींमध्ये बऱ्याच वेळा नेते किंवा मंत्री यांचाही समावेश असतो. व्यासपीठावरून मदत जाहीर केली जाते परंतु प्रत्यक्षात ती पोचतेच असे नाही.  वेश्यांच्या जीवनातील दाहकता काय असते ती हे पुस्तक वाचल्यानंतर समजते. कोणीही हौसेने या व्यवसायात येत नाही. खरे सांगायचे तर आपल्या सामाजिक व्यवस्थेचेच हे बळी असतात. पण समाज त्यांच्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघतो. विकृत पुरुषी मनोवृत्ती त्यांचा उपभोग घेण्यासाठी तयार असते पण त्यांना मदत करण्य...

रवींद्रनाथ टागोर: वारसा आणि कार्य - भाग ३८

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ३८ चित्रकार रवींद्रनाथ - भाग तीन  रवींद्रनाथांनी चित्रकलेच्या प्रांतात जरी उशिरा प्रवेश केला तरी त्यांनी भारतीय चित्रकलेचे उत्तम निरीक्षण आणि अभ्यास केलेला होता. साहित्याच्या अन्य प्रांताप्रमाणेच भारतीय चित्रकलेचे सुद्धा पुनरुज्जीवन कसे करता येईल याचा विचार त्यांच्या मनात नेहमी असायचा. अवनींद्रनाथ हा रवींद्रनाथांचा पुतण्या कलकत्त्यामध्ये एक उत्तम चित्रकार म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या चित्रकलेचे निरीक्षण आणि अभ्यास रवींद्रनाथ करीत असत. त्याला चित्रकलेमध्ये आणखी प्रगती करता यावी म्हणून त्याला अनुकूल वातावरण कसे निर्माण करता येईल याकडेही त्यांचे लक्ष होते. काही भारतीय चित्रकारांना त्यांनी जपान आणि इतर देशांमधील चित्रकलेचे निरीक्षण आणि अभ्यास करता येईल अशी व्यवस्था केली आणि त्यांच्यात एक नवी प्रेरणा निर्माण केली. त्याचप्रमाणे एका प्रसिद्ध जपानी चित्रकाराला भारतात बोलावून प्राचीन भारतीय चित्रकलेच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न केले. भारतीय चित्रकारांनी पाश्चात्य चित्रकलेचे अंधानुकरण न करता प्राचीन भारतीय आणि पौर्वात्य ...

निसर्गरम्य श्रीक्षेत्र बदामी

उगवतीचे रंग  निसर्गरम्य श्रीक्षेत्र बदामी डिसेंबर २०२३ मध्ये मला श्रीक्षेत्र बदामीला जाण्याचा योग आला. बदामी येथील श्री शाकंभरी देवी आमची कुलदेवता असल्याने यापूर्वीही अनेक वेळा या ठिकाणी जाण्याचा आणि दर्शनाचा योग आला होता. पण यावेळची अनुभूती काही औरच होती. मातेचे मंदिर खूपच सुंदर सजवले होते. सगळीकडे स्वच्छता होती आणि अतिशय प्रसन्न वातावरण होते. बदामी येथे एक दिवस मुक्काम केला आणि तेवढ्या वेळात देवीच्या त्रिवार दर्शनाचा योग आला. गाभाऱ्यात उभे राहून अतिशय जवळून दर्शन झाले. नंतर समोरील सभामंडपात बसून देवीचे निवांत दर्शन घेतले. सुदैवाने भाविकांची फारशी गर्दी नसल्याने देवीचे दर्शन खूपच शांत आणि निवांतपणे घेता आले. पूर्वीच्या विजापूर आणि आताच्या बागलकोट जिल्ह्यात हे निसर्गरम्य आणि पवित्र ठिकाण आहे. हुबळी रेल्वेस्टेशन पासून साधारणपणे शंभर किमीच्या अंतरावर हे ठिकाण आहे. सोलापूर-गदग रेल्वे मार्गावर बदामी स्टेशन आहे. या स्टेशनवर फारसा गजबजाट किंवा गोंगाट नसतो. इथून देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी अनेक प्रकारच्या वाहनांची सोय आहे. बदामी हे तालुक्याचे ठिकाण असून येथील बाजारपेठ मोठी आहे. भाविकां...

समर्थांच्या घरी...

 उगवतीचे रंग  समर्थांच्या घरी... २२ डिसेंबर २०२४ चा दिवस ! वर्ष संपत आले होते पण या वर्षांनी जाता जाता मला सुरेखशी भेट दिली. मागील जन्मी काहीतरी पुण्य केले असावे म्हणून जांब समर्थ या पुण्यभूमीला भेट देण्याचा पुण्यप्रद योग आला. याच दिवशी जालन्यामध्ये सौ. स्वाती रत्नपारखी यांच्या काव्यकस्तुरी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माझ्या उपस्थितीत झाले आणि त्यानंतर समर्थ रामदासांच्या जन्मभूमीला भेट देण्याचा योग जुळून आला. लहानपणी मनाच्या श्लोकांचे पाठांतर केले होते. लहानपणी त्यांचा फारसा अर्थ कळला नव्हता पण मोठेपणी त्यांच्यातली सत्यता कळू लागली. पुढे यथावकाश दासबोधही थोडाफार वाचला. कधीतरी वेळ प्रसंगी समर्थ रामदासांवर थोडेफार बोलण्याचाही योग आला. जिथे समर्थांनी आपले अवतार कार्य समाप्त केले आणि जिथे त्यांचे समाधी आहे अशा सज्जनगडावर तीन वेळा जाण्याचा आणि राहण्याचा योगही आला. परंतु ज्या जांब गावी समर्थांचा जन्म झाला होता ते गाव पाहण्याची इच्छा खूप दिवसांपासून मनात होती. आणि २२ डिसेंबरला ती इच्छा पूर्ण झाली. जांब हे गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी या तालुक्यात आहे आणि जालन्यापासून अंबड मार्गे दीड ...

रवींद्रनाथ : वारसा आणि कार्य - भाग ३७

  उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ३७ चित्रकार रवींद्रनाथ - भाग दोन  शब्दांचा चित्रकार असलेल्या रवींद्रनाथांना आपण खरेखुरे रेषांचा चित्रकार व्हावे असे प्रकर्षाने वाटू लागले. कारण त्यांच्यातील कलावंत एवढा मोठा होता की केवळ शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणे त्याला कुठेतरी अपूर्ण वाटत होते आणि त्यातूनच चित्रकार रवींद्रनाथांचा जन्म झाला असे म्हणावे लागेल. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी चित्रकलेच्या आराधनाला सुरुवात केली आणि नंतर त्यात कोणालाही तोंडात बोट घालायला लावेल एवढे प्राविण्य प्राप्त केले. यावरून आपल्या हे लक्षात येते की चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेण्याचे त्यांचे वय निघून गेले होते. आपल्याला कोणतीही नवीन गोष्ट शिकायची असेल तर वयाचे बंधन कधीही आडवे येत नाही. कोणत्याही वयात एखादी नवीन गोष्ट शिकण्याची सुरुवात आपण करू शकतो हेच रवींद्रनाथांच्या या उदाहरणावरून दिसते. चित्रकलेसाठी लागणारे वातावरण खरंतर त्यांच्या घरात पूर्वीपासूनच होते. त्यांचे मोठे बंधू ज्योतीरिंद्रनाथ हे उत्तम चित्रकार होते. तसेच त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेले अवनींद्...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य भाग ३६

  उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ३७ चित्रकार रवींद्रनाथ - भाग एक  रवींद्रनाथांना आपण एक महान साहित्यिक म्हणून ओळखतो. त्यांनी वाङ्मयाचे सर्व प्रकार हाताळले. परंतु तरी त्यांना असे वाटत होते की आपल्याला जे जे जाणवते किंवा ज्याची आपण अनुभूती घेतो त्या सर्व गोष्टी केवळ शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करणे अशक्य आहे. आपल्या मनात असणारे काहीतरी सांगायचे राहून जाते आहे. साहित्याचे सर्व प्रकार हाताळले तरी आपल्याला आपल्या उभ्या आयुष्यात आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्चाचा सखोल शोध घेता आला नाही अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात उतारवयात घर करू लागली होती. त्यासाठी दुसरे कुठले तरी माध्यम हवे आणि चित्रकलेच्या रूपाने ते माध्यम त्यांना गवसले. आतापर्यंत शब्दांच्या माध्यमातून वाचकांसमोर चित्र उभे करणारे रवींद्रनाथ आणखी व्यक्त होण्यासाठी चित्रकलेकडे वळले. रवींद्रनाथानी सुधीन्द्रनाथ दत्त या कवीला लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे,"शब्द मला संतुष्ट करत नाहीत. त्यांचे नियम कडक असतात. माझ्या रेषा मात्र त्यांच्या मनाप्रमाणे हसतात. त्या मला सीमित करत नाहीत. " आणखी एका ठिकाण...

मो. रफी - एक महान कलाकार

 उगवतीचे रंग  मो . रफी -एक महान कलाकार      परवा प्रवासात येताना गाडीमध्ये शास्त्रीय गाण्यांची एक सी डी  ऐकत होतो. त्यातील पहिल्याच गाण्याने मन  आकर्षून घेतले. गीत होते " मन तडपत हरी दर्शन को  आज. " बैजू बावरा या चित्रपटातील हे  गीत गायले आहे  मो .  रफी ने. या गीताचे संगीतकार आहेत  नौशाद .  लिहिले आहे हिंदी  चित्रपट सृष्टीतील महान गीतकार शकील बदायुनी यांनी. श्रीकृष्ण भक्तीचे हे गीत इतके अप्रतिम आहे की ऐकताना जणू समाधी लागते. नादब्रह्म म्हणजे काय याचा प्रत्यय हे गीत ऐकताना येतो.      हे गीत  तयार करणारे हे तिन्ही कलाकार धर्माने मुस्लिम  पण त्यांचा धर्म हे गीत सादर करताना कुठेही आड आला नाही.  मो .  रफी ने हे गीत अक्षरशः जीव  ओतून गायले आहे. त्यातील ईश्वर भक्तीची आर्तता मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. मालकंस रागावर आधारित हे गीत आहे. या गीताबद्दल संगीतकार नौशाद म्हणतात , "  यात मी विशेष काही केले नाही. ही तर  रफी साहेबांची कमाल आहे. "  मो .  रफी  म्हणतात की ,...