मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जो हुकूम मेरे आका...

 उगवतीचे रंग  जो हुकूम मेरे आका...  अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा मला आठवण्याचं एक कारण झालं. माझं जीमेल ओपन केलं की मला वरच्या चौकटीत ठळक लाल अक्षरात एक मेसेज दिसायचा. तो म्हणजे तुमचे स्टोरेज संपले असल्याचा. मग दोन पर्याय यायचे. पहिला पर्याय म्हणजे manage storage आणि दुसरा पर्याय buy storage. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला गोंधळात टाकणारी ही स्थिती. कारण एक तर आम्ही प्रयत्नांती हे सगळं वापरायला शिकलो. त्यामुळे चुकत जायचं आणि शिकत जायचं अशी परिस्थिती. मग एक दोन मित्रांना विचारलं. ते म्हणाले, ' स्टोरेज विकत वगैरे घेऊ नका. तुम्हाला न लागणारे फोटो, इमेल्स, व्हिडीओ वगैरे डिलीट करा. ' मग आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार पहिला पर्याय निवडला. तो म्हणजे manage storage चा. नको असलेल्या इमेजेस, व्हिडीओ, इमेल्स धडाधड डिलीट मारल्या. बरेच एम बी, जीबी वगैरे काय असेल तो डेटा डिलीट झाला. पण ती सूचना काही जाईना. त्या जिनचे समाधान होईना. तो आपला समोर सारखा उभा राहायचा. मी डिलीट कर म्हटलं की जो हुकूम मेरे आका म्हणून लगेच डिलीट करायचा. बरंच काही डिलीट करून झालं. अगदी आठवण म्हणून जपून ठेवाव्य...

अवलियांचा गाव : राहाता

उगवतीचे रंग  अवलियांचा गाव : राहाता  अहमदनगर जिल्ह्यातील राहाता नावाचं गाव. साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शिर्डीपासून जेमतेम चार किमी असलेलं. अशा या गावी जाण्याचा अचानक योग आला. झालं असं की या गावात रवींद्र धस नावाचे माझे एक वाचक मित्र राहतात. माझी काही पुस्तके त्यांना हवी होती. मी त्यांना विचारलं की तुम्हाला कुरिअरने किंवा पोस्टाने पाठवून देऊ का ? तेव्हा ते म्हणाले, ' सर, मी पुस्तक घेईन पण ते तुमच्या हातून. तुमची सही असलेलं आणि तेही तुम्ही मला माझ्या घरी येऊन देणार आहात. ' रवींद्रची ही प्रेमळ धमकी म्हणा की आग्रह म्हणा, मनाला कुठेतरी स्पर्शून गेली. त्यातली अकृत्रिमता, जिव्हाळा जाणवला आणि मी ठरवलं की चाळीसगावहून पुण्याला जाताना या रवीला भेटायचं. साईबाबांचं दर्शन पण घेता येईल. मला सात जुलैला पुण्याला जायचंच होतं. मग मी शिर्डी मार्गे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. सहा जुलैलाच मी आणि माझी पत्नी सौ श्रद्धा चाळीसगावहून निघालो. दोन तीन दिवस आधी रवींद्रना आम्ही येणार म्हणून फोन केला होता. आम्ही दोघेही सायंकाळी पाचच्या सुमारास राहात्याला पोहोचलो. रवी...

एक सोहळा :आगळावेगळा...

 उगवतीचे रंग  एक सोहळा :आगळावेगळा...  २० मे २०२२ रोजी पुण्यात एका छोटेखानी हॉलमध्ये एक आगळावेगळा सोहळा पार पडला. हा सोहळा होता व्रतबंध किंवा मुंजीचा. हा व्रतबंध सोहळा होता माझा अतिशय गोड नातू चि. स्वराज याचा. पण मुंजीबद्दल बोलण्याआधी माझी मुलगी चि सौ सारिका हिच्या सासरच्या मंडळींची पार्श्वभूमी सांगणे मला आवश्यक वाटते.  सारिकाने आंतरजातीय विवाह केला. तिच्या आनंदाखातर आम्हीही तो आनंदाने करून दिला. तिच्या सासरकडील मंडळी माळी समाजाची. पण तिच्या लग्नापासूनच ही तिच्या सासरकडची माणसे आणि आमच्यामध्ये एवढे प्रेमाचे ऋणानुबंध निर्माण झाले की जातपात हा विचार कुठल्याकुठे पळून गेला.  सारिकाच्या सासरकडील मंडळी मूळ विदर्भातील खामगावची. खामगाव, शेगाव याठिकाणी त्यांचा समाज, नातेवाईक. तिच्या लग्नानंतर काही निमित्ताने या नातेवाईकांना भेटण्याचा योग आला, त्यांच्या घरी जाणे झाले. या सगळ्या मंडळींच्या मनाच्या मोठेपणाचा प्रत्यय वेळोवेळी येत गेला. त्यातील काहींची आर्थिक परिस्थिती उत्तम तर काहींची अगदी साधारण. काहींची घरे लहान तर काहींची मोठी. पण त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट ...

संवाद ज्ञानोबा तुकयाचा

 उगवतीचे रंग  संवाद ज्ञानोबा तुकयाचा  समस्त ज्ञानासी असशी तूच पाया  तूच ज्ञानराया, तुका म्हणे केले तुवां खुले ज्ञानाचे भांडार हर्ष अपरंपार होई लोका.  थोर तुझा महिमा काय मी वर्णावा निःशब्द हा तुका ज्ञानदेवा.  दावियली लोकां ऐसी शब्दकळा फुलविला मळा अमृताचा सोसुनी प्रहार लोकनिंदेचे बोल अमृताचे प्रसवले.  गीतेचा तो अर्थ सांगे ज्ञानेश्वरी दिव्य ती वैखरी अमृताची.  म्हणे ज्ञानराजा ऐक ऐक रे तुकया माझिया सखया भूलोकीच्या रचियली तुवां अभंगाची गाथा भाविक तो माथा टेकतसे.  रूढी परंपरा, दंभ अभिमान व्यर्थ ते लक्षण भाविकांचे दावियला तुवां भक्तिमार्ग लोका धन्य माझा तुका बोले ज्ञानदेव.  काळावरी तरले तुझे ते अभंग धरूनिया संग श्रीहरीचा असे मी जरी पाया तू झालासी कळस आली देवळास अलौकिक शोभा.  तुका म्हणे ज्ञानराजा आता वंदितो चरण न करी वर्णन  आणिक माझे.  साक्षी तया दोघा इंद्रायणी पार सोन्याचा पिंपळ डुलतसे.  धन्य  इंद्रायणी, धन्य चंद्रभागा कृपा पांडुरंगा झाली तुझी.  © विश्वास देशपांडे, चाळीसगाव प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ ( कृपया कविता न...