मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग आठ

   उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग आठ वाटचाल नव्या क्षितिजाकडे... लताच्या संघर्षाचा काळ सुरु होता. परिस्थती प्रतिकूल होती. प्रतिकूल परिस्थतीत मी मी म्हणणारी माणसे मोडून पडतात. पण ज्यांच्या डोळ्यांसमोर ध्येयाचा ध्रुवतारा अढळ असतो, ती माणसे पराभूत न होता वाटचाल करत राहतात. ' कोलंबसाचे गर्वगीत ' या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला. प्रतिकूल परिस्थितीचा अग्नी आपल्याला भाजून काढत असतो. जे त्यातून तावून सुलाखून निघतात, त्यांना सुवर्णाप्रमाणे झळाळी प्राप्त होते. लता हे प्रतिकूल परिस्थितीच्या भट्टीतून भाजून निघालेले असेच बावनकशी सोने आहे. १४/१५ वर्षांची अल्लड पोर. वडिलांचे छत्र हरपलेले. स्वतःचे घर नाही, पैसा नाही, लहान भावंडांची असलेली जबाबदारी यासारखी संकटे तिची परीक्षा पाहायलाच उभी होती. पण अशाही परिस्थितीत हार न मानता स्व कर्तृत्वाने यशाचा मंडप तिने उभारला. त्या काळी स्टुडिओत चौदा चौदा तास काम करावे लागत असे. पगार होता दरमहा ऐंशी रुपये. जेवण वेळेवर मिळेलच असे नाही. कधी कधी तर अंगात ताप, पायाला सेप्टिक झालेले अशा...

आनंद घन : लता मंगेशकर - भाग सात

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग सात संघर्षाचे दिवस... दीनानाथ नावाचा गानसूर्य अस्ताला गेला होता. दशदिशा अंधारल्या होत्या. हा गानसूर्य मावळल्यानंतर ऐश्वर्य, प्रतिष्ठा, मानसन्मान याही गोष्टी लोप पावल्या होत्या. ज्यांनी एकेकाळी प्रतिष्ठा, ऐश्वर्य उपभोगले होते अशा मंगेशकर कुटुंबियांवर आता गरिबी, पोटासाठी वणवण या संकटांना तोंड देण्याची वेळ आली होती. पण कोणत्याही संकटांनी कधीच खचून जायचं नसतं. रात्र झाली असली तरी पहाट होणारच असते. कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाळ रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं. मास्टर दीनानाथांपासून तेज ग्रहण केलेल्या लता नावाच्या सूर्याचा क्षितिजावर उदय होणार होता. ' हृदया' पासून तर हृदयनाथपर्यंत हा प्रकाश फाकणार होता. ( लता मंगेशकरांचं नाव ' हृदया ' होतं ) आणि आपल्या सुरांनी अवघ्या सृष्टीला प्रकाशमान करणार होता. पण सध्या तरी संकटाचा काळ होता. अशा या संकटाच्या वेळी मंगेशकर कुटुंबातील दोन व्यक्ती खंबीरपणे उभ्या राहिल्या. एक म्हणजे माई आणि दुसरी म्हणजे भावंडांमध्ये ज्येष्ठ असलेली लता. दीनानाथ बाबा...

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग सहा

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग सहा दीनानाथ पर्वाची अखेर... मास्टर दीनानाथ संगीतसूर्य म्हणून तळपत असताना, लता, मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ ही मंगेशकर भावंडे संगीतक्षेत्रात आपल्या पित्याकडून प्रकाश, उष्णता, शक्ती ग्रहण करीत होती. ही छोटी छोटी रोपटी रुजून वर यायला सुरुवात झाली होती. या सगळ्यात लतादीदी आणि तिच्या खालोखाल मीनाताई या मोठ्या असल्याने त्यांना मास्टर दीनानाथांकडून जास्त शिकायला मिळाले. सगळी मुलं आपल्या आईबाबांची लाडकी असतात, तशी ही भावंडं देखील होती. आईबाबा आपल्या मुलांना लाडाने वेगळं नाव ठेवतात आणि ती मुलं नंतर कितीही मोठी झाली तरी त्याच नावाने त्यांना ते हाक मारतात. अशीच ही भावंडं दीनानाथांची लाडकी होती. त्यांनी त्यांची मोठी मजेशीर नावं ठेवली होती. छोट्या लताला बाबांशिवाय क्षणभरही करमत नसे. ती सारखी बाबा बाबा करायची म्हणून लाडाने ती झाली लताबाबा आणि तताबाबा, मीनाताईंचं बारसं मिणको म्हणून करण्यात आलं तर आशाताई आणि हृदयनाथ यांचे नामकरण अनुक्रमे हबं आणि बाळ असे झाले. दीनानाथांचा गाण्याबरोबरच ज्योतिषविद्येचाही उत्तम अभ्यास होता. त्यांनी भाकीत केलेल्या ...

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग पाच

  उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंद घन : लता मंगेशकर - भाग पाच  ' स्वर ' लता घडताना...  काही वर्षांपूर्वी लतादीदींची मुलाखत घेताना कोणीतरी त्यांना विचारलं होतं की आपण महान गायिका आहात पण आपल्याला आणखी कोणत्या क्षेत्रात जायला आवडलं असतं  ? त्यांनी दिलेलं उत्तर त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. त्या म्हणाल्या, ' मी कोणत्याही क्षेत्रात गेले असते तरी त्या क्षेत्रातील लता मंगेशकरच झाले असते. त्यांनी दिलेल्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर मला खूप आवडलं. त्यांना विचारलं होतं की पुढील जन्मी आपल्याला काय व्हायला आवडेल ? त्यांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं. त्या म्हणाल्या, ' पुढील जन्मी मला शास्त्रीय संगीत शिकायला आवडेल. ' हे उत्तर खूप काही सांगून जाणारं आहे. प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असणारी एक गायिका असं म्हणते. आजच्या काळात प्रसिद्धीच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्यांना हे दीदींचे उद्गार खूप काही शिकवून जातात. अशा या महान गायिकेची जडणघडण काही अचानक झालेली नाही. गळ्यात जन्मजात गंधार घेऊन आलेल्या लतादीदी लहानपणापासूनच नवनवीन गोष्टी शिकण्याची जिद्द देखील...

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग चार

 उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंद घन : लता मंगेशकर - भाग चार  मुलाचे ( मुलीचे ) पाय पाळण्यात दिसतात...  लताचा जन्म झाला आणि आपल्या सोबत ती दीनानाथांसाठी समृद्धी घेऊन आली.  सुरांची समृद्धी तर ती सोबतच घेऊन आली होती. आता दीनानाथांना गायक नट म्हणून देशभर प्रसिद्धी मिळत होती. गावोगाव त्यांच्या बलवंत नाटक मंडळीचे दौरे होत. त्यातून अमाप पैसा मिळू लागला होता. १९२९ मधील त्या काळात जेव्हा सोने वीस रुपये तोळा होते, तेव्हा बलवंत नाटक मंडळीचा खर्च एका नाटकासाठी सत्तर हजार रुपये होता. नाटक मंडळींचा सर्व खर्च जाऊनही दीनानाथांना भरपूर पैसा शिल्लक राहू लागला. त्यातून त्यांनी गोव्यात आमराई व काजूच्या बागा घेतल्या शिवाय दोन लाख रुपये देऊन एक डोंगरही खरेदी केला.  बलवंत नाटक मंडळीने काही नवीन प्रथाही सुरु केल्या. यापूर्वी मराठी नाटकांचे प्रयोग रात्रीच होत असत. या नाटक मंडळीने नाटकाचा ' मॅटिनी शो ' सादर करायला सुरुवात केली. त्या काळी त्यांच्या मुंबईतील नाटकाचे पहिल्या रांगेतील तिकिटाचा दर होता पाच रुपये. त्या दराची तुलना आजच्या काळातील दोनशे ते अडीचशे रुपयांच्या तिकिटा...

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग तीन

 उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंद घन : लता मंगेशकर - भाग तीन  निसर्गानं माणसाला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे तारुण्य ! तारुण्य म्हणजे सळसळते चैतन्य ! तारुण्यातच ती शक्ती असते, जी माणसाच्या पुढील आयुष्याचा पाया रचते. माणसाकडून जर काही अफाट, अचाट कर्तृत्व घडण्याची शक्यता असेल, तर ती तारुण्यात. तारुण्यातील कर्तृत्वाच्या पायावरच पुढील जीवनाची इमारत उभी असते. लहानगा दीना आता तारुण्यात पदार्पण करून दीनानाथ झाला होता. गायकीची जन्मजात प्रतिभा आणि रूपाचं लेणं तर नियतीनंच त्याला बहाल केलं होतं. अभिषेकी हे आडनाव टाकून देऊन त्याने मंगेशकर हे आडनाव धारण केलं होतं आणि आता काळाच्या कसोटीवर त्याला मंगेशकर हे नाव सिद्ध करून दाखवायचं होतं. त्या रस्त्यानं त्याची घोडदौडही सुरु झाली होती.  अनेक नाटक कंपन्या पायघड्या घालून दीनानाथला आपल्या कंपनीत येण्यासाठी आमंत्रित करीत होत्या. त्याप्रमाणे त्याने विविध नाटक कंपन्यातून कामही केले. हिंदी, उर्दूतूनही नाटके केली. त्यातूनच त्याचे या भाषांवरही प्रभुत्व निर्माण झाले. पुढे प्रख्यात किर्लोस्करांच्या नाटक कंपनीत काही काळ काम करून त्याने रं...

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग दोन

 उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंद घन : लता मंगेशकर - भाग दोन  हृदयनाथ मंगेशकरांचं ' मराठा तितुका मेळवावा ' या चित्रपटातलं एक अतिशय सुंदर गाणं आहे. मला ते खूप आवडतं. ते गाणं आपणा सर्वांच्याही परिचयाचं असेल याची मला खात्री आहे. ते गाणं आहे  शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती  देव देस अन धर्मासाठी प्राण घेतलं हाती...  हे गाणं आठवण्याचं कारण म्हणजे ज्या आनंदघन लता मंगेशकरांबद्दल आपण बोलतो आहोत, त्यांच्या पूर्वजांना हे शब्दशः लागू पडतं. त्यांचे पूर्वज गोव्यातले. मंगेशी गाव आणि मंगेशीचा सुंदर, पावन, पवित्र परिसर. मंगेश म्हणजे शंकर. याच मंगेशच्या छत्रछायेखाली जगणारं शूर, स्वाभिमानी, देवभक्त आणि देशभक्त हर्डीकर घराणं. त्या काळात पोर्तुगीज लुटारू आणि मोगलांचे हल्ले होत. हिंदूंच्या देवस्थानांचा विनाश करून त्यांच्या श्रद्धेवर आघात करणं  हे या आक्रमकांचं आवडतं काम.  पण हर्डीकर घराण्यातले पुरुष आपल्या देवस्थानाचं प्राणपणानं रक्षण करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी मंदिरात आपल्या रक्ताचा अभिषेक करून देवस्थानचे रक्षण करण्याची शपथ घेतली. ते ' अभिषेकी ' म्ह...

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग एक

उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंद घन : लता मंगेशकर - भाग एक  स्वरसम्राज्ञी, गानसम्राज्ञी अशा बिरुदांनी मिरवावं ते लता दीदींनी. मास्टर दीनानाथांनी लावलेलं रोपटं आकाशाला स्पर्श करतं झालं. वेल गगनाला भिडला. ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात सांगायचं तर ' मोगरा फुलला. ' या मोगऱ्याला एवढा बहर आला की त्याची खाली पडलेली फुलं वेचता वेचता झाडावरच्या कळ्या फुलतच राहिल्या. हा सुगंध दशदिशांना पसरत राहिला. जो जो या झाडाच्या सान्निध्यात आला, तो तो या दिव्य सुगंधाने मोहरून गेला. भारतीय आणि जगभरातील रसिक या दिव्य सुरांचा आस्वाद अनेक पिढयांपासून घेत आहेत. हा कल्पवृक्ष अनेक वर्षांपासून अव्याहतपणे रसिकांच्या मनावर राज्य करतो आहे. त्याची जागा कोणीही घेतली नाही आणि घेऊ शकत नाही.  लतादीदी या नावाने संगीत सृष्टीत, चित्रपट सृष्टीत ख्यातकीर्त असणारं हे गाणारं झाड. तसा लौकिक अर्थानं दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ ला झाला. स्वर्गलोकीचे सूर दीदींच्या रूपाने धरतीवर अवतरले. जन्मतःच गळ्यात सुरांचे दैवी चांदणे घेऊन आलेली ही लता पाहता पाहता आभाळाइतकी उंच झाली. त्या आभाळातून सुरांची बरसात होऊ लागली. ही बरसात...

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सतरा )

  उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सतरा - अंतिम भाग ) जे आर डीं मधला माणूस या आधीच्या लेखातून जे आर डींच्या स्वभावाचे विविध पैलू आपण पाहिले आहेत. द्रष्टा उद्योगपती, सच्चा देशभक्त, गुणी माणसांची कदर असणारा, माणसांची पारख असणारा, नानाविध उद्योगांची टाटा समूहात भर घालणारा, आपल्या माणसातील विविध गुणांच्या प्रकटनासाठी वाव देऊन त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारा असे जे आर डींचे अनेक पैलू आपण पाहिलेत. जे आर डींमध्ये एक कुटुंबवत्सल माणूसही दडलेला होता. त्यांचे वडील आर डी हे लवकर गेल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी मोठा मुलगा म्हणून त्यांच्यावर आली होती. आई तर आधीच स्वर्गवासी झाली होती. जे आर डींनी आपल्या भावंडाना आईवडिलांचे प्रेम दिले. त्यांची मोठी बहीण सिल्या ही दिसायला आणि स्वभावाने सुद्धा त्यांच्यासारखीच होती. ती उत्तम टेनिसपटू होती. शिवाय ती देशातील पहिली महिला वैमानिक होती. तिने आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेक माणसे जोडली होती. फली पेटिट यांच्याशी तिने लग्न केले होते. तिचा मुलगा नुस्ली पेटिट हाही एक उत्तम वैमानिक होता. दुसऱ्या महायुद्धात तिने...