मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ये दिल मांगे मोअर ...

उगवतीचे रंग ये दिल मांगे मोअर ... माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला अधिक अधिक हवे असते. हवे , हवे आणि हवे. या हवेची हाव कधी संपत नाही. या अर्थाने तो ' हवेशीर ' प्राणी आहे. म्हणून तर आमच्या जाहिरातीत सुद्धा ये दिल मांगे मोअर अशा असतात. झालं असं की सुरुवातीला माझ्याकडे एक सायकल होती. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी. तेव्हा स्कूटर, मोटरसायकल चालवणाऱ्यांचा हेवा वाटायचा . मग पुढे मोटारसायकल आली . तेव्हा बऱ्याच मंडळींकडे फोरव्हीलर म्हणजे मराठीत आपली चारचाकी हो, ती असायची. तिचे सुख काही वेगळेच. आणि ज्या प्राण्यांकडे म्हणजे मनुष्यप्राण्यांकडे बरं का, ती असायची त्यांचा भाव वेगळाच असायचा. म्हणजे आताच्या भाषेत ' लई भारी.' पण करणार काय ? आपल्याला जे काही घ्यायचे ते आपल्याच बळावर. आपल्या पूर्वजांनी काही गडगंज संपत्ती कमावून ठेवली नव्हती. त्यांचा उदात्त हेतू इतकाच होता की पुढच्या पिढीच्या कर्तुत्वाला वाव मिळावा. त्यामुळे जोपर्यंत हातात पैसे येत नाही, तोपर्यंत गाडीत बसून फिरण्याचे स्वप्न फक्त पाहत होतो. दुसरं काय करणार ? ते किशोरकुमारचं गाणं आम्हाला आपलं वाटायचं. ' थोडा ह...

वो फिर नही आते...

उगवतीचे रंग वो फिर नही आते... आपल्या आयुष्यात  काही लोकांचे स्थान अतिशय जवळचे असते. त्यांचा आणि आपला जणू वेगळाच ऋणानुबंध असतो. आपण कधीही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टी कोणाला सांगायला धजावणार नाही अशा गोष्टी त्यांना सांगत असतो. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असतो. त्यांच्यावर हक्काने रागावत असतो, रुसत असतो. आपल्याकडे एखादे कार्य असले आणि ते नाही आले तर खूप रुखरुख लागून राहते. सगळे आले आणि कार्यही सुंदर रीतीने पार पडले तरी. आणि त्यांच्याकडे एखादा कार्यक्रम असला आणि आपण नाही जाऊ शकलो तर त्यांनाही असेच वाटते. पण कधी तरी बोलण्यातून एखादा गैरसमज होतॊ. आपण संतापून किंवा रागावून त्या व्यक्तीला असे काही बोलतो की ती व्यक्ती आपल्याला कायमची दुरावते. मी मधू गानू यांचं  ' सहवास गुणीजनांचा ' हे पुस्तक वाचत असताना पु ल देशपांडे यांनी मधू गानू यांना लिहिलेलं एक पत्र माझ्या वाचनात आलं. सहसा पु ल गंभीर लिहीत  नाहीत. पण हे मात्र तशा प्रकारचं आहे. हे पत्र वाचताना पुलंच्या हळव्या आणि संवेदनाक्षम मनाचा प्रत्यय येतो. वाचता वाचता नकळत आपणही अंतर्मुख होतो. या पत्...

‘ लाभले आम्हास भाग्य...’

     उगवतीचे रंग        ‘  लाभले आम्हास भाग्य... ’        ‘  जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.. ’  असे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने आपल्या आईचा आणि मातृभूमीचा गौरव करताना म्हटले आहे. त्यात आपल्या मातृभाषेचा समावेश करायला हरकत नाही. ज्ञानेश्वर माउलींनी तर म्हटलेच आहे-       माझा मऱ्हाटाची बोलू कवतुके       परी अमृतातेही पैजा जिंके       ऐसी अक्षरे रसिके ,  मेळवीन.       मराठी   भाषेतील   थोर   लेखक ,  कवी ,  नाटककार कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून जगभर साजरा होतो. जगाच्या कान्याकोपऱ्यात जिथे कुठे मराठी माणूस असेल तो अभिमानाने हा दिवस साजरा करतो. मराठीची आठवण करतो ,  मायभूमीची आठवण करतो. ही मराठी माती इतकी पवित्र आहे की कुसुमाग्रज म्हणतात            माझ्या मराठी मातीचा   ...