मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आनंदघन : लता मंगेशकर - भाग वीस

  उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंदघन : लता मंगेशकर - भाग वीस  ये जिंदगी उसी की हैं ... ( लता मंगेशकर आणि सी रामचंद्र ) सी रामचंद्र म्हणजे रामचंद्र नरहर चितळकर. अहमदनगर जिल्ह्यातील चितळी त्यांचं मूळ गाव. वडील रेल्वेत असल्यामुळे त्यांच्या बदलीनिमित्त त्यांचे विविध ठिकाणी राहणे आणि फिरणे झाले. पण रामचंद्रला शालेय शिक्षणात फारशी रुची नव्हती. त्याऐवजी गाणी, शास्त्रीय संगीत यामध्ये त्याला स्वारस्य होते. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. तरुण वयात चित्रपटसृष्टी त्यांना खुणावत होती. आपणही नट होऊन नाव कमवावे असे त्यांना वाटत होते. काही चित्रपटात त्यांनी सुरुवातीला भूमिकाही केल्या. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ते मिरसाहेब या संगीत दिग्दर्शकांच्या सहवासात आले. त्यांच्यामुळे त्यांचा मास्टर भगवान उर्फ भगवान दादा यांच्याशी परिचय झाला. मा. भगवान यांनी त्यांना मद्रासला बोलवून घेतले. तिथे त्यांनी तीन तामिळी चित्रपटांना संगीत दिले. रामचंद्र चितळकर तेथेच सी रामचंद्र म्हणून प्रसिद्ध झाले. पुढे भगवान दादांबरोबर ' अलबेला ' हा चित्रपट त्यांनी केला. ...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणीस

  उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणीस   संगीतकार नौशाद आणि लता मंगेशकर  चित्रपट सृष्टीतील दीदींची कारकीर्द नुकतीच सुरु झाली होती. अशातच त्यांना नौशाद अली या गुणी संगीतकाराने हेरलं. नौशाद म्हणजे रत्नपारखीच. लता मंगेशकर नावाच्या हिऱ्याची पारख त्याने अचूक केली आणि आपल्या पहिल्यावहिल्या ' अंदाज ' या चित्रपटासाठी त्यांना गायनाची संधी दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मेहबूब खान. या चित्रपटात दिलीप कुमार, राजकपूर आणि नर्गिस असे दिग्गज कलाकार होते. स्वतः मेहबूब खान आणि दिलीपकुमार यांच्या मते लता ही मराठी मुलगी होती जिने नुकतीच गायला सुरुवात केली होती. तिला उर्दू शब्दांचे उच्चार नीट करता येणार नाहीत असे त्यांचे मत होते, त्यामुळे नर्गिस सारख्या अभिनेत्रीवर चित्रित होणारी गाणी तिला देऊ नये असे स्पष्ट मत त्यांनी मांडले होते. पण आपल्या मतांबाबत संगीतकार म्हणून नौशाद आग्रही होते. त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. त्यापूर्वीच लतादीदींनी आपल्या उर्दूच्या उच्चारांवर मेहनत घेतली होती. शिवाय नौशाद सांगतील तशा पद्धतीचे उच्चार, चाली त्यांनी लगेच आत्मसात केल...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग अठरा

  उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंदघन : लता मंगेशकर - भाग अठरा  सिनेसंगीतातील अनोखे पर्व - शंकर जयकिशन आणि लता मंगेशकर  शंकर जयकिशन आणि लता मंगेशकर यांना एकत्र आणून सिनेसंगीताच्या क्षेत्रात एक अनोखं रम्य दालन उघडण्याचं श्रेय निःसंशय राजकपूर यांना दिले पाहिजे. आपल्या ' आग ' या चित्रपटानंतर राजकपूर ' बरसात ' या नव्या चित्रपटाच्या निर्मितीत गुंतले होते. याच सुमारास त्यांनी एका प्रसंगी लता दीदींचा आवाज ऐकला आणि त्यांना जणू आपल्या हाती एक अनमोल रत्न आल्याचा भास झाला. या नवीन आवाजाने ते झपाटून गेले. राजकपूर नेहमी नवीन चेहऱ्यांच्या शोधात असत. आपल्या नवीन चित्रपटासाठी त्यांनी हुस्नलाल भगतराम या संगीतकारांच्या हाताखाली काम करणारी तरुण संगीतकारांची जोडी निवडली. या जोडीचे नाव होते शंकर आणि जयकिशन. दोघंही संगीतातले दर्दी होते आणि दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की त्यांच्यापैकी कोणीही एखाद्या गीताची चाल बांधली तरी कोणीही एकटा त्याचे श्रेय आपल्या नावावर घेत नसे. राजकपूर यांनी लतादीदी आणि शंकर जयकिशन यांना एकत्र आणले आणि या त्रयीने पुढे चित्रपटसंगीतात इतिहास निर्माण केला. शंकर जय...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग सतरा

  उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंदघन : लता मंगेशकर - भाग सतरा  वेगळ्या वाटेवरची गाणी  दीदी   या आनंदघन आहेत. त्यांच्या आवाजातील गाणी मग ती कोणत्याही भाषेतील असो, ती ऐकायला गोडच वाटतात. कवी ग्रेस यांच्या कवितेप्रमाणे ' तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला. ' साऱ्या भारतीयांच्या मनाला स्पर्शून गेलेला हा अमृत स्वर आहे. कितीही ऐकला तरी ज्याची गोडी काही कमी होत नाही असा हा स्वर्गीय आनंद देणारा स्वर आहे. हिमालयात पर्यटनाला जा की कन्याकुमारीला, पूर्वेकडील देशात जा किंवा पश्चिमेकडील देशात जा, जिथे कुठे भारतीय माणूस आहे, तिथे त्याच्या जोडीला हा स्वर्गीय आवाज असतोच असतो. थोडक्यात म्हणजे भारतीय मनामनाला जोडणारा हा स्वर आहे. नादब्रह्माची अनुभूती देणारा हा स्वर आहे.  आतापर्यंत दीदींनी विविध अशा सुमारे ३६ भाषांमधून  पन्नास हजाराच्या आसपास गाणी नक्कीच गायिली असतील. हा फार मोठा विक्रम आहे. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. दीदींच्या सुरांना भारतीय मातीचा सुगंध आहे. मराठमोळ्या संस्कृतीचा गंध आहे. आपली संस्कृती, भाषा, देव, धर्म य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग सोळा

  उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंदघन : लता मंगेशकर - भाग सोळा  एक गायिका म्हणून...    लतादीदी अलीकडेच म्हणाल्या होत्या की मी गेली ८३ वर्षे गाते आहे यावर माझा विश्वासच बसत नाही. खरंच आपल्याला देखील आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. सत्तर-ऐंशी वर्षे गात राहणं म्हणजे काही चेष्टा नाही. याचा अर्थ दीदी जाहीर कार्यक्रमात आठ नऊ वर्षांच्या असल्यापासूनच गायला लागल्या होत्या. याचा उल्लेख सुरुवातीच्या भागात आलाच आहे. दीदींच्या गाण्याची गंमत काय आहे बघा, आपण बरेचदा चित्रपट विसरतो, त्यातील नायक नायिका विसरतो पण लक्षात राहतात ते दीदींच्या गाण्याचे बोल. हे त्यांच्या गाण्याचं सामर्थ्य आहे. त्यांच्या सुरांना हे सामर्थ्य काही एकाएकी प्राप्त झालं नाही. त्यामागे तपश्चर्या आहे. गाण्याची तयारी आहे. आपण आयुष्याचा जो काही ध्येयमार्ग निवडला त्यावर अविचल निष्ठा आहे. त्यासाठी त्या किती मेहनत घेत होत्या याचा एक अलीकडचा किस्सा आहे.  भारतीय हवाई दलासाठी एक गीत दीदींना गायचं होतं. ही गोष्ट १९९३ मधली आहे. दीदी बराच वेळ आपल्या खोलीत होत्या. रात्रीचे नऊ वाजले होते. काही वेळाने त्या आपल्या ...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग पंधरा

  उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंदघन : लता मंगेशकर - भाग पंधरा  निर्भयता रोमारोमात..  दीदींचं जीवन हे गंगेसारखं निर्मळ आणि पवित्र आहे. ज्यांना एखाद्या व्यक्तीच्या केवळ चुकाच दिसतात किंवा समोरच्या व्यक्तीमध्ये दोषच काढण्याची सवय असते अशांना माझं हे विधान कदाचित आवडणार नाही. पण त्यांच्या जीवनाकडे पाहताना मला जे जाणवलं ते मी सांगितलं. दीदींच्या स्वभावातील निर्भयतेसोबतच त्यांचा स्पष्टवक्तेपणा देखील मला भावतो. जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही, ती स्पष्टपणे नाकारण्याचे आणि मुख्य म्हणजे समोरच्या व्यक्तीला तसे स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य त्यांच्यामध्ये आहे. मग ती समोरची व्यक्ती कोणीही असो. ती व्यक्ती प्रख्यात गीतकार, संगीतकार, निर्माता किंवा दिग्दर्शक कोणीही असो. अशा वेळी त्या आपल्याला असे केल्याने काय नुकसान होईल याचा विचार करत नाहीत. असा स्पष्टवक्तेपणा फार कमी लोकांना जमतो.  कदाचित या सगळ्याचे मूळ त्यांना लहानपणी जे बाळकडू आपल्या मात्यापित्यांकडून मिळाले त्यात असू शकेल. मास्टर दीनानाथ आणि माई हे दोघेही तसे निर्भय, साहसी आणि स्पष्टवक्ते होतेच. लतादीदींमध्ये तर दी...

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग चौदा

  उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंद घन : लता मंगेशकर - भाग चौदा  समज आणि गैरसमज  ( २ ) याही भागात लतादीदींबद्दल असलेल्या काही गैरसमजांचा आपण आढावा घेणार आहोत. दीदींसारख्या ज्या व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात असतात, अशा व्यक्तींच्या खाजगी आयुष्याबद्दल लोकांना फार कुतूहल असते. खरे म्हणजे अशा व्यक्तींच्या जीवनाकडे एका महान कलाकाराचे जीवन या दृष्टीने पाहिले जाणे उचित असते. त्यांची कामगिरी, कारकीर्द ही या दृष्टीने महत्वाची असते.  दीदींनी आपले वडील आणि गुरु असलेले मास्टर दीनानाथ यांच्या अकाली मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. घरातील सगळ्यांच्याच मनाविरुद्ध लग्न करून काही काळ घरातून निघून गेलेल्या आशाताईंचा  त्यांनी पुन्हा घरात स्वीकार करून त्यांची संगीतातील पुढील करिअर एकप्रकारे सुरक्षित केली. आपली लहान बहीण मीनाताई हिचे मोठ्या थाटामाटात इंदूरचे दत्तात्रय विनायक खडीकर यांच्यासोबत करून दिले. हे लग्न कोल्हापूरला भालजी पेंढारकर यांच्या स्टुडिओत अतिशय भव्य प्रमाणात साजरे झाले. लग्नाच्या वेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. लग्नाच...

आनंद घन : लता मंगेशकर - भाग तेरा

  उगवतीचे रंग  भारतरत्नावली  आनंद घन : लता मंगेशकर - भाग तेरा  समज आणि गैरसमज  ( १)  व्यक्तीचे जीवन एकदा सार्वजनिक झाले की लोकांना त्याच्याबद्दल काहीही बोलण्याचं जणू स्वातंत्र्य मिळतं. काही लोक विकृत आनंदनातून या अफवा पसरवण्याचा आनंद घेत असतात. पण खरे मोठे लोक तेच असतात जे लोकांच्या अशा बोलण्याला काडीचीही किंमत देत नाहीत. लतादीदींचे जीवनही अशा प्रकारच्या विविध प्रवादांनी लोकांनी दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे. पण दीदींसारखी मोठी माणसे अशा गोष्टींनी विचलित होत नसतात. ज्यांची आपल्या ध्येयावर अढळ निष्ठा असते, असे लोक या गोष्टी सहजपणे दृष्टीआड करताना दिसतात. सर्वसामान्य व्यक्ती मात्र अशा प्रवादांना बळी पडून पथभ्रष्ट झालेल्या दिसतात. तसे लतादीदींनी होऊ दिले नाही म्हणूनच त्या एक यशस्वी गायिका म्हणून सर्वोच्च शिखरावर आरूढ होऊन ' भारतरत्न ' ठरल्या.  दीदींवर विविध गायिकांनी एकाधिकारशाही आणि मक्तेदारीचा आरोप केला. पण यातील एकही आरोप कोणालाही सिद्ध करता आला नाही. दीदी या चित्रपट क्षेत्रातील पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी विविध गायिका या आपले नशीब अजमावत...