उगवतीचे रंग
हद कर दी आपने...
आपण सगळे मनाने आणि शरीराने २१ व्या शतकात वावरतो आहोत. आपल्यापैकी जे सुशिक्षित आहेत, मोबाईल व्हाट्सअप, फेसबुक इ चा वापर करताहेत, त्यांनी बहुतेकांनी किमान पदवीपर्यंतचे शिक्षण तर घेतलेच असेल . काहींना पदवीपर्यंत नाही पोहोचता आले तरी दहावी बारावी तरी बहुतेकांनी उत्तीर्ण केली असेलच. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आपण सर्वांनी विज्ञानाचा अभ्यास केलेला असेल.
विज्ञानम्हणजे काय तर एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने (systematic study) केलेल्या अभ्यास. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय.नेमकेपणाने सांगायचे तर विज्ञानाचे शिक्षण याचा अर्थ विवेकी, चिकित्सक व प्रयोगशील प्रवृत्ती अंगी बाणवणे असाच असला पाहिजे. ज्यांनी हे शिक्षण घेतले त्यांना सभोवताली घडणाऱ्या घटनांचा विज्ञानाच्या कसोट्यांवर विचार करता आला पाहिजे. आपल्या विचारातही तर्कशुद्धता पाहिजे. विज्ञान शिकून जी एक प्रकारची दृष्टी येते ती आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला वापरता आली पाहिजे. तरच त्या शिकण्याचा उपयोग.
हे सगळे आज मी या ठिकाणी का सांगतो आहे ? मी विज्ञानाचा पदवीधर नाही. पण आजपर्यंतच्या शिक्षणातून, वाचनातून माझा जो विज्ञानविषयक दृष्टिकोन विकसित झाला आहे, तो मला हे सांगतो की सध्या व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावर मी ज्या काही पोस्ट्स वाचतो आहे, त्या विज्ञाननिष्ठ नाहीत. त्यांना काही वैज्ञानिक आधार असेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
आता मी मूळ विषयावर येतो. सध्या करोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले असल्याने त्याच्याशी संबंधित अनेक पोस्ट्स, लेख किंवा व्हिडीओ या स्वरूपात सोशल मीडियावर येतात. हे लेख किंवा व्हिडीओ तुमच्या आमच्या सारखे सुशिक्षित आणि कमीत कमी ज्यांनी दहावी बारावीपर्यंत विज्ञानाचा अभ्यास केला आहे असे लोक वाचतात, पाहतात. आणि आपल्यासारखीच सुशिक्षित मंडळी अशा प्रकारचे लेख किंवा व्हिडीओ तयार करून पाठवतात. आज करोना साथीच्या निर्मूलनार्थ केंद्र सरकार आणि राज्य सरकार अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत हे सुरुवातीला नमूद करतो. आणि त्यांचे हे प्रयत्न प्रशंसापात्र आहेत. परंतु त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ती तर बदलत नाही.
आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांचा मी चाहता आहे. पण आदर असणे आणि चाहता असणे वेगळे. परवा व्हाट्सअपवर आलेल्या एका लेखात त्यांच्याबद्दल जी विपर्यस्त विधाने केली आहेत, ती पाहून खरंच आपण प्राथमिक विज्ञान किंवा विज्ञानाचे प्राथमिक सिद्धांत तरी अवगत केले का, शिकलो का हा प्रश्न पडतो. आता त्या लेखातील ही काही वाक्ये पहा-
" २२ मार्च म्हणजे फाल्गुन कृष्ण १३ शततारका होय. या दिवशी मधुकृष्ण त्रयोदशी वारुणी योग आहे. पंचांगानुसार २२ मार्च हा त्याज्य दिवस असून या दिवशी प्रखर उन असते. म्हणजे सूर्य प्रखरतेने तळपणारा हा दिवस आहे. कोरोना रोग भविष्यात भारतात येणार त्यावेळी आपण काय उपाय केले पाहिजेत, यावर चर्चा करण्यासाठी आदरणीय मोदीजींनी दोन महिन्यापूर्वी नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली होती.
त्यावेळी अनेकांनी त्यांची चेष्टा केली. पण, मोदींजींनी उपग्रहाच्या मदतीने पृथ्वीवर रसायन फवारता येईल का याबाबत इस्त्रो आणि नासाच्या शास्त्रज्ञांससोबत चर्चा केली. तेव्हा अनेकांना मोदींच्या बौद्धिक चातुर्याचे नवल वाटले. नासाच्या शास्त्रज्ञांनी तर मोदींचा आणि आईनस्टाईनच्या मेंदूचा आयक्यू सेम आहे, अशीही प्रशंसा केली. त्यावेळी मोदींनी २२ मार्चला सूर्यासमोर रसायनाने भरलेला उपग्रह आणायचा प्रस्ताव मांडला.
२२ मार्चला सकाळी सात वाजता त्या उपग्रहावर सूर्याची अतिनील किरणे पडतील. त्यानंतर उपग्रहातून वायूगळती होऊन त्याची वाफ उन्हाद्वारे पृथ्वीच्या दिशेने निघेल. पृथ्वीच्या वेगाशी उपग्रहाचा वेग मॅच केल्यास आशिया खंडातील फक्त भारत देशावर त्याची वाफ पसरेल असे गणितही आदरणीय मोदीजींनी मांडले. "
लेखातील वरील वाक्ये पुरेशी बोलकी आहेत. ज्याने कोणी ती लिहिली असतील, तो बिचारा एक तर अंधश्रद्धाळू तरी असावा किंवा विज्ञानाचा आणि त्याचा संबंध खूप लांबचा असावा. आता याच लेखातील अतिशयोक्तीचा कहर पहा -
" विशेष म्हणजे नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी यावर चर्चा करुन हे शक्य असल्याचेही सांगितले. ही बातमी गुप्त ठेवण्याचे ठरले होते. पण, नासावाले फुटीर निघाले. त्यांनी ही गोष्ट अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितली. ट्रम्पही आश्चर्यचकित झाले. पण, नासाच्या शास्त्रज्ञांनी आदरणीय नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने विद्वान असल्याचे स्पष्ट केले. त्यावर हा प्रयोग अमेरिकेत व्हायला हवा, असे ट्रम्प म्हणाले. मात्र, अंतराळात रसायनाने भरलेला उपग्रह भारतीय बनावटीचा असून त्याचा रिमोट मोदीजींकडे असल्याने नासाच्या अधिकाऱ्यांंनी स्पष्ट केले. म्हणून मोदीजींना विनंती करण्यासाठी महिन्याभरापूर्वी डोलांड ट्रम्प भारतातही आले. पण, मोदीजींनी त्यांना हुसकावून लावले.
आता प्रश्न हा होता की दिवसभराच्या प्रखर उन्हात तो वायू भारतभर पसरला तर त्याचा लोकांच्या आरोग्यावर काही परिणाम तर होणार नाही ना ? पण, याचेही उत्तर मोदींजीकडे तयार होते. या उत्तरासाठी मोदीजींनी हिमालयात आत्मसात केलेली विद्या कामी आली. मानवी शरीर हे पंचतत्वापासून बनलेले असते. प्रत्येक शरीरामध्ये आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी ही पंचतत्व असतात. आपण टाळी वाजवली कि ही पंचतत्व उत्तेजित होतात आणि शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून मोदीजींनी २२ तारखेला संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात, असे आवाहन केले आहे."
मला खात्री आहे की वरील वाक्ये वाचून आपली थोडीफार करमणूक सुद्धा होईल. एखादी शक्यता किंवा एखाद्या गोष्टीची तारीफ ही कुठपर्यंत ताणायची त्याचा हा मासलेवाईक नमुना आहे. आज तर मी व्हाट्सअपवर एक व्हिडीओ पाहिला. त्यात महाभारतातला प्रसिद्ध श्लोक ' यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत... ' हा देऊन जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते किंवा धर्म संकटात सापडतो तेव्हा तेव्हा परमेश्वर धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतो हे सांगून शेवटी मा नरेंद्र मोदींचा फोटो दाखवला होता. प्रश्न मोदी असे आहेत की नाहीत हा नाहीच. पण एखाद्या गोष्टीची तारीफ करताना आपण कुठल्या मर्यादेला जातो हा आहे. आणि अशा प्रकारची तारीफ त्या व्यक्तीला आणि तो प्रामाणिकपणे करीत असलेल्या त्याच्या कार्याला सुद्धा मारक ठरते याचे भान लिहिणारांना असत नाही. खरं तर अशा काळात जनतेने वस्थुस्थितीचा स्वीकार करून कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा मुकाबला विज्ञाननिष्ठ पद्धतीने केला पाहिजे.
२२ मार्चला सायंकाळी ५ वा मा पंतप्रधानांनी लोकांना आपापल्या घराच्या बाहेर येऊन टाळ्या वाजवा असे सांगितले. त्याचा उद्देश जे डॉक्टर, नर्सेस आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारी मंडळी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा होता.असे असताना, लोकांनी एखादा आनंदोत्सव साजरा करावा तसे एकत्र येऊन, मूळ उद्देशालाच हरताळ फासला . काही महाभागांनी तर फटाके फोडून आनंद साजरा केला. गच्चीवर, रस्त्यावर लोकांनी जमून टाळ्या वाजवल्या आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात धन्यता मानली . आता लोकांना घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करून देखील लोक ऐकायला तयार नाहीत. परिस्थितीचे गांभीर्यच त्यांना नाही. ग्रामीण भागात तर सोडूनच द्या पण मुंबई, पुण्यासारख्या शहरात ही परिस्थिती आहे. मग पोलिसांना नाईलाजाने लाठीमार करावा लागतो आहे. अशाही भयंकर वातावरणात स्वतःच्या जीवाला धोका असताना डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारे देवदूतासारखे काम करीत आहेत. त्यांना सलाम...!
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२
हद कर दी आपने...
आपण सगळे मनाने आणि शरीराने २१ व्या शतकात वावरतो आहोत. आपल्यापैकी जे सुशिक्षित आहेत, मोबाईल व्हाट्सअप, फेसबुक इ चा वापर करताहेत, त्यांनी बहुतेकांनी किमान पदवीपर्यंतचे शिक्षण तर घेतलेच असेल . काहींना पदवीपर्यंत नाही पोहोचता आले तरी दहावी बारावी तरी बहुतेकांनी उत्तीर्ण केली असेलच. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आपण सर्वांनी विज्ञानाचा अभ्यास केलेला असेल.
विज्ञानम्हणजे काय तर एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने (systematic study) केलेल्या अभ्यास. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय.नेमकेपणाने सांगायचे तर विज्ञानाचे शिक्षण याचा अर्थ विवेकी, चिकित्सक व प्रयोगशील प्रवृत्ती अंगी बाणवणे असाच असला पाहिजे. ज्यांनी हे शिक्षण घेतले त्यांना सभोवताली घडणाऱ्या घटनांचा विज्ञानाच्या कसोट्यांवर विचार करता आला पाहिजे. आपल्या विचारातही तर्कशुद्धता पाहिजे. विज्ञान शिकून जी एक प्रकारची दृष्टी येते ती आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला वापरता आली पाहिजे. तरच त्या शिकण्याचा उपयोग.
हे सगळे आज मी या ठिकाणी का सांगतो आहे ? मी विज्ञानाचा पदवीधर नाही. पण आजपर्यंतच्या शिक्षणातून, वाचनातून माझा जो विज्ञानविषयक दृष्टिकोन विकसित झाला आहे, तो मला हे सांगतो की सध्या व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावर मी ज्या काही पोस्ट्स वाचतो आहे, त्या विज्ञाननिष्ठ नाहीत. त्यांना काही वैज्ञानिक आधार असेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
आता मी मूळ विषयावर येतो. सध्या करोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले असल्याने त्याच्याशी संबंधित अनेक पोस्ट्स, लेख किंवा व्हिडीओ या स्वरूपात सोशल मीडियावर येतात. हे लेख किंवा व्हिडीओ तुमच्या आमच्या सारखे सुशिक्षित आणि कमीत कमी ज्यांनी दहावी बारावीपर्यंत विज्ञानाचा अभ्यास केला आहे असे लोक वाचतात, पाहतात. आणि आपल्यासारखीच सुशिक्षित मंडळी अशा प्रकारचे लेख किंवा व्हिडीओ तयार करून पाठवतात. आज करोना साथीच्या निर्मूलनार्थ केंद्र सरकार आणि राज्य सरकार अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत हे सुरुवातीला नमूद करतो. आणि त्यांचे हे प्रयत्न प्रशंसापात्र आहेत. परंतु त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ती तर बदलत नाही.
आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांचा मी चाहता आहे. पण आदर असणे आणि चाहता असणे वेगळे. परवा व्हाट्सअपवर आलेल्या एका लेखात त्यांच्याबद्दल जी विपर्यस्त विधाने केली आहेत, ती पाहून खरंच आपण प्राथमिक विज्ञान किंवा विज्ञानाचे प्राथमिक सिद्धांत तरी अवगत केले का, शिकलो का हा प्रश्न पडतो. आता त्या लेखातील ही काही वाक्ये पहा-
" २२ मार्च म्हणजे फाल्गुन कृष्ण १३ शततारका होय. या दिवशी मधुकृष्ण त्रयोदशी वारुणी योग आहे. पंचांगानुसार २२ मार्च हा त्याज्य दिवस असून या दिवशी प्रखर उन असते. म्हणजे सूर्य प्रखरतेने तळपणारा हा दिवस आहे. कोरोना रोग भविष्यात भारतात येणार त्यावेळी आपण काय उपाय केले पाहिजेत, यावर चर्चा करण्यासाठी आदरणीय मोदीजींनी दोन महिन्यापूर्वी नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली होती.
त्यावेळी अनेकांनी त्यांची चेष्टा केली. पण, मोदींजींनी उपग्रहाच्या मदतीने पृथ्वीवर रसायन फवारता येईल का याबाबत इस्त्रो आणि नासाच्या शास्त्रज्ञांससोबत चर्चा केली. तेव्हा अनेकांना मोदींच्या बौद्धिक चातुर्याचे नवल वाटले. नासाच्या शास्त्रज्ञांनी तर मोदींचा आणि आईनस्टाईनच्या मेंदूचा आयक्यू सेम आहे, अशीही प्रशंसा केली. त्यावेळी मोदींनी २२ मार्चला सूर्यासमोर रसायनाने भरलेला उपग्रह आणायचा प्रस्ताव मांडला.
२२ मार्चला सकाळी सात वाजता त्या उपग्रहावर सूर्याची अतिनील किरणे पडतील. त्यानंतर उपग्रहातून वायूगळती होऊन त्याची वाफ उन्हाद्वारे पृथ्वीच्या दिशेने निघेल. पृथ्वीच्या वेगाशी उपग्रहाचा वेग मॅच केल्यास आशिया खंडातील फक्त भारत देशावर त्याची वाफ पसरेल असे गणितही आदरणीय मोदीजींनी मांडले. "
लेखातील वरील वाक्ये पुरेशी बोलकी आहेत. ज्याने कोणी ती लिहिली असतील, तो बिचारा एक तर अंधश्रद्धाळू तरी असावा किंवा विज्ञानाचा आणि त्याचा संबंध खूप लांबचा असावा. आता याच लेखातील अतिशयोक्तीचा कहर पहा -
" विशेष म्हणजे नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी यावर चर्चा करुन हे शक्य असल्याचेही सांगितले. ही बातमी गुप्त ठेवण्याचे ठरले होते. पण, नासावाले फुटीर निघाले. त्यांनी ही गोष्ट अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितली. ट्रम्पही आश्चर्यचकित झाले. पण, नासाच्या शास्त्रज्ञांनी आदरणीय नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने विद्वान असल्याचे स्पष्ट केले. त्यावर हा प्रयोग अमेरिकेत व्हायला हवा, असे ट्रम्प म्हणाले. मात्र, अंतराळात रसायनाने भरलेला उपग्रह भारतीय बनावटीचा असून त्याचा रिमोट मोदीजींकडे असल्याने नासाच्या अधिकाऱ्यांंनी स्पष्ट केले. म्हणून मोदीजींना विनंती करण्यासाठी महिन्याभरापूर्वी डोलांड ट्रम्प भारतातही आले. पण, मोदीजींनी त्यांना हुसकावून लावले.
आता प्रश्न हा होता की दिवसभराच्या प्रखर उन्हात तो वायू भारतभर पसरला तर त्याचा लोकांच्या आरोग्यावर काही परिणाम तर होणार नाही ना ? पण, याचेही उत्तर मोदींजीकडे तयार होते. या उत्तरासाठी मोदीजींनी हिमालयात आत्मसात केलेली विद्या कामी आली. मानवी शरीर हे पंचतत्वापासून बनलेले असते. प्रत्येक शरीरामध्ये आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी ही पंचतत्व असतात. आपण टाळी वाजवली कि ही पंचतत्व उत्तेजित होतात आणि शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून मोदीजींनी २२ तारखेला संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात, असे आवाहन केले आहे."
मला खात्री आहे की वरील वाक्ये वाचून आपली थोडीफार करमणूक सुद्धा होईल. एखादी शक्यता किंवा एखाद्या गोष्टीची तारीफ ही कुठपर्यंत ताणायची त्याचा हा मासलेवाईक नमुना आहे. आज तर मी व्हाट्सअपवर एक व्हिडीओ पाहिला. त्यात महाभारतातला प्रसिद्ध श्लोक ' यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत... ' हा देऊन जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते किंवा धर्म संकटात सापडतो तेव्हा तेव्हा परमेश्वर धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतो हे सांगून शेवटी मा नरेंद्र मोदींचा फोटो दाखवला होता. प्रश्न मोदी असे आहेत की नाहीत हा नाहीच. पण एखाद्या गोष्टीची तारीफ करताना आपण कुठल्या मर्यादेला जातो हा आहे. आणि अशा प्रकारची तारीफ त्या व्यक्तीला आणि तो प्रामाणिकपणे करीत असलेल्या त्याच्या कार्याला सुद्धा मारक ठरते याचे भान लिहिणारांना असत नाही. खरं तर अशा काळात जनतेने वस्थुस्थितीचा स्वीकार करून कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा मुकाबला विज्ञाननिष्ठ पद्धतीने केला पाहिजे.
२२ मार्चला सायंकाळी ५ वा मा पंतप्रधानांनी लोकांना आपापल्या घराच्या बाहेर येऊन टाळ्या वाजवा असे सांगितले. त्याचा उद्देश जे डॉक्टर, नर्सेस आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारी मंडळी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा होता.असे असताना, लोकांनी एखादा आनंदोत्सव साजरा करावा तसे एकत्र येऊन, मूळ उद्देशालाच हरताळ फासला . काही महाभागांनी तर फटाके फोडून आनंद साजरा केला. गच्चीवर, रस्त्यावर लोकांनी जमून टाळ्या वाजवल्या आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात धन्यता मानली . आता लोकांना घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करून देखील लोक ऐकायला तयार नाहीत. परिस्थितीचे गांभीर्यच त्यांना नाही. ग्रामीण भागात तर सोडूनच द्या पण मुंबई, पुण्यासारख्या शहरात ही परिस्थिती आहे. मग पोलिसांना नाईलाजाने लाठीमार करावा लागतो आहे. अशाही भयंकर वातावरणात स्वतःच्या जीवाला धोका असताना डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारे देवदूतासारखे काम करीत आहेत. त्यांना सलाम...!
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा