मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
  उगवतीचे रंग  एक गोष्ट सांगू... ?  मंडळी, एक गोष्ट सांगू..? असं म्हटलंय खरं. पण मी गोष्ट वगैरे काही सांगणार नाहीये. म्हणजे आपली अशी म्हणण्याची पद्धत आहे हो ! आपल्या कोणाबरोबर तरी गप्पा सुरु असतात. मध्येच समोरची व्यक्ती म्हणते 'एक गोष्ट सांगू का ? ' म्हणजे ती व्यक्ती काही खरोखरोच गोष्ट सांगणार नसते. तिला आपल्याला काही तरी सांगायचे असते. बोलताना अशा खूप गमती जमती घडतात. पण अशी वाक्ये बोलण्याचा एक उद्देश हा असतो की समोरच्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे.  घराघरातून कानावर पडणारे ' अहो, ऐकलं का...' हे वाक्यही आपणा सर्वाना परिचित असेलच. मी बऱ्याच वेळा गमतीनं ' नाही ' असं म्हणतो कारण मी त्या आधी काही बोललं गेलेलंच नसतं. तो फक्त आपल्याला बोलावण्यासाठी आणि पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी तयारी ठेवावी म्हणून केलेला इशारा असतो.  ' अहो, ऐकलं का...' या तीन अक्षरी संबोधनात खूप मोठा अर्थ भरलेला असतो हे मला अनुभवाने कळलं आहे. प्रत्येक वेळा परिस्थितीनुसार त्याला वेगवेगळा संदर्भ असतो. उदा. ' अहो, ऐकलं का ? तेवढा फळीवरचा डबा काढून देता का पासून तर त्या अमुक एका दुकानात स...

चला, आपण आधुनिक कोलंबस होऊ या...

उगवतीचे रंग चला, आपण आधुनिक कोलंबस होऊ या... परवाच्या दिवशी आमच्या घर आणि जवळच्या परिसरात माकडे आली होती. पूर्वी क्वचितच मानवी वस्तीत दिसणारे हे वन्य जीव आता दिसणे नित्याचे झाले आहे. माकडे दिसली की त्यांच्या मागे वस्तीतील कुत्री लागतात. लहान मुले त्यांना मारण्यासाठी दगड घेऊन त्यांच्या मागे पळतात. माझा लहान नातू माझ्याकडे आला होता. त्याने विचारले, ' आजोबा, माकडं तर जंगलात राहतात ना ? मग आपल्या घराजवळ कशी काय येतात ती ? ' तसा तो लहान असल्याने त्याला फार काही सांगण्यात अर्थ नव्हता. पण त्याला म्हटलं, ' अरे, आपल्याला कसं रोज जेवण हवं असतं ना...! तसं त्यांनाही हवं असतं. पण आता दिवसेंदिवस जंगलात त्यांना काही मिळत नाही. म्हणून आपल्या अन्नाच्या शोधार्ध ते मानवी वस्तीत येतात. माणसानं आपल्या बेसुमार हव्यासापायी निसर्गाला हवं तसं ओरबाडलं आहे. शेखचिल्ली जसा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुऱ्हाडीने तोडत होता, तसाच मानवही जणू शेखचिल्लीच झाला. शेखचिल्ली मूर्ख होता, त्याला ही फांदी तोडल्याने आपणच खाली पडून मरणार आहोत हे कळत नव्हते. पण माणसाला मात्र कळतं. माणूस शिकला, त्याने प्रचंड वैज्ञ...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एक्केचाळीस ( अंतिम )

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एक्केचाळीस ( अंतिम ) ' स्वरमाऊली... ' आतापर्यंत ' आनंदघन : लता मंगेशकर ' या लेखमालेचे चाळीस भाग झाले. या भागातून दीदींचे जीवन, त्यांची सांगीतिक कारकीर्द, त्यांनी केलेले विविध संगीतकारांसोबत काम, त्यांचा स्वभाव, गुणवैशिष्ट्ये आदी गोष्टींचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केला. पण चाळीस भाग झाले तरी कुठेतरी काहीतरी राहिल्याची जाणीव किंवा दीदींचे व्यक्तिमत्व आपण शब्दात पुरेसे न बांधू शकल्याची खंत मनात होतीच. अर्थात हा एक्केचाळिसावा भाग झाला तरी ती मनात उरणारच आहे. त्याचे कारण म्हणजे परमेश्वर जसा सर्व चराचर सृष्टी व्यापून दशांगुळे वर उरतो, तसेच हे व्यक्तिमत्व आहे. शब्दात न बसणारे. परमेश्वराचे वर्णन करताना वेद, उपनिषदे थकून शेवटी ' नेति नेति ' म्हणतात. तशीच अवस्था दीदींबद्दल लिहिताना होते. दीदींची थोरवी एका वाक्यात सांगायची झाली तर ' दीदींसारख्या दीदीच ! ' असे म्हणावे लागेल किंवा त्यांनीच गायलेलं गाणं ' मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे...' असंच सांगावं लागेल.  परवा रेडिओवर त्यांनीच गायलेलं एक सुंदर असं...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग अडोतीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग अडोतीस शाश्वत स्वर... बालकवींचं एक सुंदर गीत लतादीदींनी म्हटलं आहे. गीत अतिशय अर्थपूर्ण आहे. माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे या विश्वाची एकतानता हे माझे गाणे आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गात. “निरध्वनी हे, मूक गान हे” यास म्हणो कोणी नभांत हे साठवले याने दुमदुमली अवनी. सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्‍नतिची माला सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला. हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली ! मंगल मंगल मद्गानाची गति ही शेवटली. दीदींच्या गाण्याला हे गीत तंतोतंत लागू पडते. हे नित्याचे गाणे आहे, शाश्वत गाणे आहे. अक्षय गाणे, अभंग गाणे आहे. म्हणूनच या लेखाचं नाव शाश्वताचा स्वर असं दिलं आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीतून तरुन वर आले. काळाच्या कसोटीवरही ते ' अ-भंग ' ठरले. दीदींचा स्वर असाच आहे.  त्यांच्या आवाजाला काळाची सीमा नाही. जोपर्यंत माणसाच्या...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग सदोतीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग सदोतीस नायिका अनेक, स्वर एक लतादीदींनी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीत अनेक नायिकांना आवाज दिला आहे. रुपेरी पडद्यावर या अभिनेत्रींच्या अभिनयाला जिवंत करण्याचे श्रेय निर्विवादपणे लतादीदींना द्यावे लागेल. लतादीदींनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याआधी चित्रपटात जर दोन अभिनेत्री असतील तर दोघींसाठी वेगवेगळ्या गायिकेचा आवाज वापरला जायचा. पण लतादीदी आल्या आणि गाण्यांची परिभाषाच बदलली. संगीतकार पूर्वीच्या गायिका डोळ्यांसमोर ठेवून ज्या चाली करायचे, त्यांना गायिकांच्या आवाजाची मर्यादा असायची. पण लतादीदींचे आगमन झाले आणि संगीतकारांना जणू आपली ड्रीम सिंगर गवसल्याचा भास झाला. आता ते अवघड रचना केवळ लतादीदींना डोळ्यासमोर ठेवून बांधू लागले. कधी कधी संगीतकारांना आपल्या मनातील भाव शब्दात सांगता यायचा नाही. पण लतादीदींचे वैशिष्ट्य असे की संगीतकाराच्या चाली, त्याच्या मनातील भाव शतपटीने, सहस्रपटीने सुंदर होऊन दीदींच्या गळ्यातून बाहेर पडायचे. एक काळ होता की जेव्हा दीदींचा आवाज पातळ आहे, किनरा आहे, तो नायिकेला शोभणारा नाही म्हणून नाकारला गेला होता. पण ...