मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फुले वेचिता बहरू...

 उगवतीचे रंग फुले वेचिता बहरू… माझ्या बागेतल्या कुंदाच्या झाडावर सध्या एक अद्भुत दृश्य पाहायला मिळते आहे. कळ्यांनी लगडलेले झाड, शुभ्र फुलांनी भरून आलेले—जणू अंगणातच चांदणे उतरले. आरती प्रभू यांची एक सुंदर कविता आहे, समईच्या शुभ्र कळ्या. ही फुले म्हणजे जण समईच्या शुभ्र कळ्या असेच वाटले. किती फुले वेचली, तरी झाड बहरण्याचे थांबले नाही. त्याच्यावरच्या कळ्या उमलत राहिल्या. त्या क्षणी संत ज्ञानेश्वरांचा अभंग आठवला, “ फुले वेचिता बहरू कळीयासी आला ”. किती साध्या शब्दांत किती मोठे तत्त्व सांगून गेले आहेत ज्ञानेश्वरमाऊली! प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. मोगऱ्याची फुले उन्हाळ्यात येतात; उन्हाळ्यातच आंब्याला मोहर येतो आणि वातावरणात घमघमाट सुटतो. जणू संपूर्ण आसमंत सुगंधाने भरून जातो. तसाच कुंदालाही हिवाळ्यात बहर येतो आणि तो भरभरून फुलतो. निसर्ग प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत असतो—कधी सुगंधातून, कधी रंगांतून, तर कधी केवळ शांत सौंदर्यातून. फुलांना बहर, आंब्याला मोहर आणि हवेला सुगंध...! हे नक्षत्रांचे देणे, हे देवाघरचे देणे ! आपण अनेकदा देण्यात थांबतो.आता पुरेसे दिले, आता मा...

आपल्या काळात

 *उगवतीचे रंग* *आपल्या काळात.....!* मध्यंतरी एक सुंदर गोष्ट वाचनात आली होती. एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती असते. राहण्यासाठी प्रचंड मोठा राजवाडा . भरपूर नोकरचाकर. सर्व सुखे हात जोडून उभी. राजवाड्यात खेळण्यासाठी मोठे उद्यान , पोहण्याचा तलाव , धबधबा इ . गोष्टी. अशा या श्रीमंत माणसाला एकुलता एक मुलगा असतो. त्या मुलाला गरिबी म्हणजे काय,  भूक म्हणजे काय काही माहित नसते. अर्थातच माहिती असण्याचे काही कारणच नव्हते. एके दिवशी त्या श्रीमंत माणसाला असे वाटते की आपल्या मुलाला गरिबी म्हणजे काय हे कळले पाहिजे म्हणून तो त्याला एका छोटया गावात एका गरीब शेतकऱ्याकडे पाठवतो. आणि त्याला सांगतो तू आठ दिवस तेथे राहून सर्व निरीक्षण कर, ते लोक आपल्यापेक्षा किती गरीब आहेत हे बघ.  त्याप्रमाणे तो मुलगा खेडेगावातल्या त्या गरीब शेतकऱ्याकडे जातो. पण तेथे जातो तर तो तिथल्या वातावरणात रमून जातो. परत आल्यावर आपल्या वडलांना तेथील वृत्तांत सांगताना तो म्हणतो.  " तुम्ही म्हणता ती माणसे गरीब आहेत. पण ती माणसे मोकळ्या हवेत,मोकळ्या वातावरणात राहतात. त्यांच्या घरात पंख्यांची गरज नाही. मोकळी हवा,उजेड त्यांच्या...

इंद्रायणीकाठी...

उगवतीचे रंग इंद्रायणी काठी....      लहानपणी मला एक अभंग फार आवडायचा. त्यावेळी आजच्यासारखी गाणे ऐकण्यासाठी साधने नव्हती. कधी काळी रेडिओवर हा अभंग लागला की मी जीवाचे कान करून ऐकत असे. त्यावेळी त्या अभंगातला अर्थ फारसा कळत नसे. पण अभंगातील गोडवा आणि तळमळ मनाला स्पर्शून जात असे. तो अभंग होता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा- चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग दीपालाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेचिना.      सुमन कल्याणपूर यांनी आपल्या विलक्षण गोड आवाजात हा अभंग अजरामर केला आहे. आजही हा अभंग लागला की मी त्यात हरवून जातो. मग समोरचा माणूस माझ्याशी कितीही महत्वाचे बोलत असला तरी माझे त्याकडे लक्ष नसते. मग कधी कधी, “ अहो,  मी काय म्हणतो ? कुठे हरवलात ?”  यासारखी वाक्ये ऐकण्याची मी तयारी ठेवतो. असो.      इंद्रायणीचा काठच सुपीक ! जिथे तिच्या काठावर शेती, मळे बागबगीचे फुलले; तिथेच, त्याच काठावर विठ्ठल भक्तीचेही मळे फुलले. एक मळा फुलवला ज्ञानोबा माउलींनी आणि दुस...

हुशार बबू माकड

 *उगवतीचे रंग*  ( *आजचे उगवतीचे रंग खास छोट्या दोस्तांसाठी ! आपल्या घरातील लहान मुलांना जरूर वाचायला द्या किंवा वाचून दाखवा*.)  *हुशार बबू माकड*  उन्हाळ्याचे दिवस होते. कडक ऊन पडले होते. जंगलात सगळीकडे कोरडं कोरडं झालं होतं. पाणी मिळणं कठीण झालं होतं. जंगलातील पाण्याचे सगळे स्रोत आटले होते. हरणं, ससे, पक्षी आणि माकडं सगळेच तहानलेले होते. जंगलातील एका तलावात मात्र पाण्याचा भरपूर साठा होता. एके दिवशी माकडांची एक टोळी पाणी पिण्यासाठी त्या तलावाकाठी आली. “चला चला… आधी पाणी पिऊया,” टोळीचा म्होरक्या म्हणाला. सगळी माकडं आनंदाने तलावातलं थंडगार पाणी प्यायला. पाणी पिऊन झाल्यावर सगळी माकडं जवळच असलेल्या जांभळीच्या झाडावर चढली. झाडावर भरपूर गोड जांभळं लागलेली होती. या टोळीत बबू नावाचं एक छोटं माकड होतं. बबू खूप हुशार  होता पण तसाच खोडकरही...! जांभळीच्या झाडाची एक फांदी तलावावर झुकली होती आणि त्या फांदीला भरपूर जांभळं लागली होती. पण ती फांदी नाजूक आणि कमजोर होती. “अरे बबू, फार टोकाला जाऊ नकोस!” “ती फांदी कमजोर आहे!” सगळी माकडं त्याला सांगत होती. पण बबू कुठला ऐकतोय ? “मला फा...

वाळवंटातील हिरवळ...

  उगवतीचे रंग  वाळवंटातील हिरवळ... बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर स्वागत समारंभाचे आयोजन केले जाते. हल्ली त्यासाठी ' रिसेप्शन 'हा इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. कधी कोणाचा गौरव सोहळा असतो तर कधी कोणाची एकसष्ठी किंवा एकाहत्तरी किंवा सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम अशा विविध कारणांनी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांना बऱ्याच वेळा आपण हजेरी लावतो. कार्यक्रम पत्रिकेत उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले असते. हे स्नेहभोजन म्हणजे बऱ्याच वेळा बुफे असते.   ' कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी ' असे आवाहन केलेले असल्यामुळे सर्वजण उत्तम प्रकारचा पोशाख घालून अंगावर सुगंधी द्रव्य फवारून अशा कार्यक्रमांना जाऊन खरोखरीच त्यांची शोभा वाढवत असतात. बऱ्याच वेळेला असे कार्यक्रम म्हणजे फॅशन शो सारखे वाटतात. या कार्यक्रमांमध्ये बऱ्याच वेळा ओळखीची बरीच मंडळी भेटते. एखाद्या लांबट टेबलवर पांढरे स्वच्छ आच्छादन घालून निरनिराळे खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले असतात. बाजूलाच नव्या कोऱ्या डिश असतात. जणू काही त्...
  उगवतीचे रंग  सुख पर्वताएवढे! ​सध्या थंडीचे दिवस आहेत. परवाचीच गोष्ट ! मी बाहेर माझ्या पोर्चमध्ये आरामखुर्ची टाकून पेपर वाचत बसलो होतो. कोवळे, सुखद आणि उबदार ऊन अंगाला सुखावत होते. माझ्या मनात सहज विचार आला की मी किती भाग्यवान आहे ! कोवळ्या उन्हात बसण्याचं हे सुख अनुभवतो आहे. काही काही सुखांची पैशात तुलना करता येत नाही. पैसे देऊनही असे सुख विकत घेता येणार नाही. आज अनेक लोक असे आहेत की ज्यांना साधं हे उन्हात बसण्याचं सुख देखील अनुभवता येत नाही. या छोट्याशा परंतु मौल्यवान सुखाला ते पारखे झाले आहेत. कोणाच्या घरात ऊनच येत नाही तर कोणाला उंचच उंच इमारतींमुळे सूर्यदर्शन घडत नाही. कामाच्या धावपळीत अनेकांना त्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. कोणी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेला असतो तर कोणी फायलींच्या ढिगार्‍यात.  संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, 'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे'. पिढ्यानपिढ्या आपण हेच ऐकत आणि मानत आलो आहोत. पण कधीकधी वाटतं, आपण दुःखाच्या पर्वताकडे इतकं टक लावून पाहतो की, हाताच्या तळव्यावर असलेल्या 'जवा'एवढ्या सुखाच्या अस्तित्वाचाच आपल्याला विसर पडतो. आणि या दुःखाच्...
  उगवतीचे रंग  एक अनोखा ज्ञानयज्ञ... ​बाहेर प्रचंड थंडी आहे. थंडीचा कडाका वाढल्याने लोक अंगात स्वेटर चढवून घराच्या उबदार कोपऱ्यात विसावले आहेत. कुठे दूरचित्रवाणीवरील मालिकांचा आस्वाद घेतला जातोय, तर कुणी आपल्या मोबाईलच्या आभासी जगात व्यस्त आहे. पण अशा गारठलेल्या संध्याकाळीही चाळीसगावच्या एका कोपऱ्यात दोन-अडीचशे लोक आनंदाने एकत्र आले आहेत. निमित्त आहे एका आगळ्यावेगळ्या यज्ञाचे ! हा यज्ञ म्हणजे 'ज्ञानयज्ञ'. दररोज निरनिराळे वक्ते आपल्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या समिधा या यज्ञात अर्पण करत आहेत आणि हे सुंदर दृश्य पाहायला मिळत होते चाळीसगाव येथील आ. बं. हायस्कूलच्या प्रांगणात, जिथे शेठ नारायण बंकट वाचनालयाची 'सरस्वती व्याख्यानमाला'  काही दिवसांपूर्वी दिमाखात सुरू होती. तिची सांगता नुकतीच झाली आहे. तब्बल ८७ वर्षे एखादा उपक्रम अव्याहतपणे चालवणे ही साधी गोष्ट नाही. महाराष्ट्राला व्याख्यानमालांची मोठी परंपरा आहे. पुण्याची ऐतिहासिक 'वसंत व्याख्यानमाला' , नाशिकची 'सार्वजनिक वाचनालयाची व्याख्यानमाला' किंवा सांगलीची 'व्याख्यानमाला' ज्याप्रमाणे शहराची ओळख ...
  उगवतीचे रंग   माहेरओढ  परवा सहज योगप्रकाशचा डिसेंबर २०२५ चा अंक चाळत होतो. त्यावेळेस संपादकीय वाचताना ' माहेरओढ ' हा शब्द वाचनात आला आणि या शब्दाबद्दल एक वेगळंच कुतूहल आणि ओढ वाटायला लागली. ' माहेरओढ ' किती सुंदर शब्द ! तसे माहेरची ओढ हे शब्द आपल्याला माहिती आहेत पण ते जोडून माहेरओढ हा सुंदर शब्द तयार झाला. हा शब्द जरा वेगळाच वाटला. उच्चारातच माया आहे, ओढ आहे, आणि आठवणींचा एक लपलेला कप्पा उघडणारी ताकद आहे. ' माहेर ' हा शब्द उच्चारताच असंख्य आठवणींचं मोहोळ आपल्या मनात जागं होतं. मनाच्या आकाशात असंख्य आठवणींची गर्दी जमू लागते आणि अनेक सुंदर, भावविभोर करणारी गाणी नकळत ओठांवर येतात... “ घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात…” सासरी असलेल्या एखाद्या मुलीला खूप दिवसात माहेरी जायला होत नाही. मग खेड्यामधले घर कौलारू अशी गाणी तिच्या ओठांवर नकळत येतात. तिच्या मनात मग खेड्यातलं कौलारू घर, अंगणातली तुळस, विहिरीवरचं पाणी, आणि मायबापाच्या मायेचा ओलावा अशा आठवणी एकामागून एक दाटून येतात. त्या आठवणींनी ती हळवी होते, डोळ्यांत नकळत पाणी तरळतं. म्हणूनच बह...

आकाश कवेत, पाय मात्र जमिनीवर

  उगवतीचे रंग  आकाश कवेत, पाय मात्र जमिनीवर १९९२ मध्ये भारत सरकारने जे आर डी टाटा यांना ' भारतरत्न ' हा सर्वोच्च नागरी किताब देऊन त्यांचा सन्मान केला. ही आनंदाची बातमी त्यांना रतन टाटा यांनी कळवली. ही बातमी ऐकल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, ती त्यांचे मोठेपण दर्शवणारी आहे. ते म्हणाले," O my God, why I am selected for this honour ? आपण हे थांबवण्यासाठी काही करू शकतो का ? भारतात इतरही अनेक महान लोक आहेत जे भारतरत्न या किताबास पात्र आहेत. मी असे काय मोठे केले ? मी जे काही माझ्या आयुष्यात केले ते माझे कर्तव्यच होते. मी ते उत्तम प्रकारे पार पाडले एवढेच ! मी देशाला विमानसेवा दिली आणि मूल्याधारीत उद्योगसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला. पण म्हणून मी एवढ्या मोठ्या सन्मानाला पात्र आहे का ?" पदव्यांसाठी, पुरस्कारांसाठी हव्यास करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही प्रतिक्रिया आहे. आज प्रत्येक जण मोठेपणाला हपापलेला असतो. मी इतरांपेक्षा किती श्रेष्ठ, मला किती समजते हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतो. कधी कधी हे दाखवण्याच्या प्रयत्नात ती व्यक्ती केविलवाणी दिसते हेही खरेच ! र...