मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गा प्रकाशगीत

 उगवतीचे रंग  गा प्रकाशगीत... परवाच्या दिवशी एक सुंदर व्हिडिओ पाहण्यात आला. त्या व्हिडिओत दोन माणसे बोलताना दाखवली होती. त्या व्यक्तींची नावे त्यात दाखवली नाहीत. पण मला तो व्हिडिओ फार आवडला. जीवनाचे सत्य तो सांगून जातो. त्यातील एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे बहुधा डेव्हिड शॅड्स असावा. तो दुसऱ्या एका तरुण व्यक्तीशी बोलत होता. झाडांवरून त्यांची चर्चा सुरू होती. डेव्हिड त्या तरुणाला म्हणत होता," तुला माहिती आहे का झाडांची वाढ दोन दिशेने होत असते ? जमिनीच्या वरच्या बाजूला आणि जमिनीच्या खाली सुद्धा. " तो तरुण आश्चर्यचकित होऊन ऐकत होता. खरंतर झाडे जेवढी जमिनीवर वाढतात तेवढीच ती जमिनीखाली देखील वाढतात हे सत्य मला माहीत नव्हते असे नाही. पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ती गोष्ट मला अधिक तीव्रतेने जाणवली कारण यापूर्वी मी तसा विचारच केला नव्हता. मग झाडांबद्दल बोलताना डेव्हिड केवळ झाडांबद्दलच नव्हे तर जीवनाचे सत्यही उलगडू लागला. तो म्हणाला," आपल्याला सर्वांना जमिनीच्या वर वाढणारे झाड दिसते, त्याला येणारी फळे फुले दिसतात. आपण आनंदीत होतो आपल्याला फळे देणारा वृक्षच माहिती असतो. पण ही फळे किंवा ...

क्षितिजाच्या पलीकडे उभे...

 उगवतीचे रंग  क्षितिजाच्या पलीकडे उभे... जाणाऱ्याला जड अंतकरणाने निरोप द्यायचा आणि येणाऱ्याचे हसतमुखाने स्वागत करायचे अशी आपली परंपरा आहे. २०२४ हे वर्ष आपल्याला शेकहॅन्ड करून निघण्याच्या तयारीत आहे तर उंबरठ्यावर उभे आहे ते येणारे नवीन वर्ष २०२५. लवकरच सरणारे २०२४ चे वर्ष आपल्याला कडू गोड आठवणी देऊन गेले. काहीतरी मौल्यवान आपल्यातून घेऊन गेले आणि काहीतरी मौल्यवान आपल्याला देऊनही गेले. आपल्यातून काही प्रिय व्यक्तींना ते घेऊन गेले. आपल्या वयाचे एक वर्ष देखील त्याने चोरले. रिक्त हस्ते आले नाही आणि रिक्त हस्ते गेले नाही. जाता जाता आपल्याला आठवणी देऊन गेले, अनुभव देऊन गेले, त्या अनुभवातून येणारे ज्ञान आणि समृद्धी देऊन गेले. येणारे नवीन वर्ष कसे असेल त्याची झलक दाखवून गेले. आता त्यातून काय बोध घ्यायचा आणि पुढे कसे वागायचे ते त्यानं आपल्यावर सोपवलं आहे. दरवर्षी नवीन वर्ष सुरू होण्याआधी जे नवीन संकल्प केले जातात ते याही वर्षी केले जातील आणि ते करायलाच हवे त्यात वावगे काहीच नाही. आरोग्याशी संबंधित संकल्प जसे की लवकर उठणे, रोज काहीतरी नियमितपणे व्यायाम करणे, वजन कमी करणे किंवा वाढवणे, आहा...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३५

  उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ३५ रवींद्रनाथांची पत्रे मागील दोन भागात रवींद्रनाथांनी लिहिलेली राजकीय आणि सामाजिक पत्रे आपण पाहिली. या भागात त्यांनी लिहिलेली वैयक्तिक पत्रे आपण पाहू. वेगवेगळ्या व्यक्तींना लिहिलेली ही पत्रे आहेत. त्यांची पत्नी मृणालिनी, त्यांची पुतणी इंदिरा आणि छोटीशी चिमुरडी- दहा वर्षांची राणू यांना आणि इतरही अनेकांना त्यांनी वेगवेगळ्या वेळी पत्रे लिहिली आहेत. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक कंगोरे स्पष्ट होतात. या पत्रांमधून त्यांच्यातील महान तत्त्वज्ञ किंवा शिक्षणतज्ञ आपल्याला भेटत नाही तर एक सच्चा, साधा, प्रेमळ आणि दिलदार व्यक्ती म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन आपल्याला घडते. पत्नीला लिहिलेल्या पत्रातून त्यांच्यातील प्रेमळ पतीचे दर्शन होते तर इंदिरा त्याचप्रमाणे राणू यांना लिहिलेल्या पत्रातून त्यांच्यातील वात्सल्याचा वर्षाव करणारे पित्यासमान प्रेमळ हृदय दिसते. या सगळ्या पत्रांमधून आणखीही एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्यांचे निसर्गप्रेम. त्यांच्या प्रत्येक पत्रांमध्ये निसर्ग प्रतिबिंबित झाला आहे आणि त्याचे सु...

आणि मेट्रो रस्त्यावरून धावली...

 उगवतीचे रंग  आणि मेट्रो रस्त्यावरून धावली... पुण्यात १४ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला हजर राहण्यासाठी १५ तारखेला मी चाळीसगावहून पुण्याला निघालो. सकाळीच चार साडेचार वाजता मी पुणे स्टेशनवर उतरलो आणि माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी जायचे म्हणून मेट्रोने जायचे ठरवले. ती मेट्रोची त्या दिवसाची पहिलीच फेरी होती. मेट्रो स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती कारण ती अगदी पहाटेची वेळ होती. मोजून पंधरा-वीस लोक तिथे  उपस्थित असतील. मी तिकीट घेतले. गाडी प्लॅटफॉर्मला लागलेली होतीच. त्यात बसलो. उपस्थित लोकांपैकी काही लोक त्या डब्यात बसले. बाकीचे दुसऱ्या गाडीची वाट पहात तिथेच थांबले. गाडी निघण्याची वार्निंग झाली. दरवाजे आपोआप बंद झाले आणि गाडी निघाली. सकाळची वेळ असल्यामुळे प्रवासी पेंगत होते.  चालता चालता एकदम गाडी ट्रॅक सोडून केव्हा खाली उतरली ते कोणाच्याच लक्षात आले नाही. पण एका ठिकाणी रस्त्यावर चढ आल्यामुळे गाडीचा वेग कमी झाला. काही प्रवाशांच्या गाडी नेहमीचा ट्रॅक सोडून रस्त्यावर धावत आहे हे लक्षात आले आणि त्यांनी ताबडतोब गाडीतून खाली उड्या ...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३४

  उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ३४ रवींद्रनाथांची पत्रे - भाग दोन  रवींद्रनाथांनी अनेक राजकीय व्यक्तींना पत्र लिहिली.  त्यात अगदी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांचा देखील समावेश होता. या पत्राची पार्श्वभूमी थोडक्यात अशी होती की त्यावेळी वंगभंगाची चळवळ हिंसक झाली होती. रवींद्रनाथ तर कोणत्याही प्रकारच्या हिंसेच्या विरोधात होते. पहिल्या महायुद्धाचे भीषण परिणाम पाहिल्यानंतर तर ते आक्रमक राष्ट्रवादाचे कट्टर विरोधक बनले. त्याच सुमाराला अमेरिकेत काही हिंदी सशस्त्र संघटनांनी जर्मनीच्या मदतीने हिंसक चळवळीचा कट आखला होता आणि या कटात रवींद्रनाथांचा सहभाग आहे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले जात होते. अमेरिकेतील नागरिक या संदर्भात रवींद्रनाथांना दोषी समजत होते. हे समजल्यानंतर रवींद्रनाथांचे मन व्यथित झाले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांना आपल्या भूमिकेची जाणीव करून देणारे पत्र लिहिले. या पत्रात ते म्हणतात,  " अमेरिकेतील माझे मित्र आणि माझे लिखाण ज्यांनी काळजीपूर्वक वाचले आहे, असे वाचक कधीही अशा ग...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३३

  उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ३३ रवींद्रनाथांची पत्रे... रवींद्रनाथ यांनी आपल्या सुमारे ८० वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात अनेक पत्रे लिहिली. त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा होता आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल की त्यांच्या पत्रांचे १२ खंड प्रकाशित झाले आहेत. जेवढी पत्रे त्यांनी अति महत्त्वाच्या व्यक्तींना लिहिली, आहेत तेवढीच पत्रे सर्वसामान्य व्यक्तींना आणि अगदी लहान मुलांना देखील लिहिली. त्यांची पत्रे सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आणि व्यक्तिगत अशा अनेक प्रकारांमध्ये मोडतात. रवींद्रनाथांच्या साहित्यामध्ये आपल्याला वास्तवता आणि कल्पकता यांचे सुंदर मिश्रण आढळते. परंतु वास्तवता हे त्यांच्या साहित्यातील प्रमुख वैशिष्ट्य आहे. तेच वैशिष्ट्य त्यांच्या पत्रांमध्ये देखील आपल्याला आढळते. पण पत्र लेखनात सुद्धा वास्तवतेची कास धरताना त्यांनी सत्य आणि सुंदर ही मूल्ये जपली आहेत. त्यांचे साहित्य मग ते कथा, कविता, नाटक किंवा कादंबरी कोणतेही असो आजही ताजे वाटते.  तसेच त्यांची पत्रे देखील आजच्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला कालसुसंगत वाटतात आणि मार्गदर्शक ठरतात. रवींद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३२

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ३२   रवींद्रसंगीत - एका नवीन संगीत परंपरेचा सूर्योदय -  भाग 2 रवींद्रनाथांनी अडीच हजारांवर गीते लिहिली आणि या गीतांना चाली ही त्यांनी स्वतःच लावल्या. या गीतांनाच पुढे रवींद्र संगीत म्हणून प्रसिद्धी मिळाली. आपल्या कविता गद्यात म्हणण्यापेक्षा त्या सुरात म्हणणे त्यांना अधिक आवडायचे आणि तशाच त्या ते गात असत. त्यांचा आवाज अतिशय गोड होता ते म्हणायचे, " मी गीत गाण्यासाठीच या जगात आलो आहे. " रवींद्रनाथांच्या घरी गाण्याच्या ज्या मैफिली होत असत त्यांचे लहानपणापासून ते श्रोते होते त्यामुळे त्या मैफली ऐकत ऐकताच त्यांचा संगीताचा कान तयार होत होता. त्या वेळेचे प्रसिद्ध गायक यदुभट्ट, विष्णू चक्रवर्ती राधिका गोस्वामी, श्यामसुंदर मिश्र आदी रवींद्रनाथ यांच्या घरी गायनासाठी येत. या मंडळींकडूनच रवींद्रनाथांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.  यासोबतच पाश्चात्य संगीताचाही रवींद्रनाथांनी अभ्यास केला होता ते इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले असताना स्कॉट कुटुंबात राहिले त्या ठिकाणी मिस कॉल आणि त्यांच्या मुलींनी त्यांना आयरिश स...

मानवतेचा आणि सेवेचा प्रकाश : डॉ. प्रकाश आमटे

उगवतीचे रंग मानवतेचा आणि सेवेचा प्रकाश : डॉ. प्रकाश आमटे परवाच्या दिवशी व्हाट्सअपवर नवीन चित्रपटासंदर्भात एक पोस्ट फिरत होती. सालार, डंकी आणि आणखी असेच काही बॉलिवूडचे मसाला चित्रपट येत असताना प्रेक्षकांनी अस्सल हिरोकडे पाठ फिरवली. हा अस्सल हिरो म्हणजे सॅम बहादूर. सॅम माणेकशॉ हे भारताचे पहिले फिल्ड मार्शल. भारतीय लष्करात चाळीस वर्षे सेवा बजावून आपल्या देशातील जवानांना आणि तरुणांना सेवेचा आदर्श त्यांनी उभा केला. तरुणाईने पाहिलाच पाहिजे असा हा चित्रपट पण हा चित्रपट मी पाहायला गेलो तेव्हा थिएटरमध्ये तुरळक गर्दी होती. पाहणारे बहुसंख्य प्रेक्षक साठी ओलांडलेले होते. असाच एक रिअल हिरो म्हणजे प्रकाश बाबा आमटे. आपल्या वडिलांचा म्हणजेच थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या सेवेचा आणि त्यागाचा वारसा पुढे चालवणाऱ्या त्यांच्या विकास आणि प्रकाश या दोन सुपुत्रातील द्वितीय. हा द्वितीय पुत्र तसा एकमेवाद्वितीयच म्हणावा लागेल. बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी कार्य सुरु करतात. एक दिवस आपल्या मुलांसह भामरागडच्या जंगलात सहलीसाठी म्हणून जातात. भामरागडचे जंगल हे जाण्यासाठी अत्यंत गैरसोयीचे. रस्ते नीट नाहीत, दळणवळण सुविधा ...

दक्षिण भारतातील अप्रतिम मंदिरे - भाग दोन

  उगवतीचे रंग  दक्षिण भारतातील अप्रतिम मंदिरे - भाग दोन  दक्षिण भारतातील या मंदिरांचा बाह्य भाग जेवढा आकर्षक दिसतो, तेवढाच आकर्षक आतील भाग आहे. आतील मुर्त्या, कोरीव काम, नाजूक पण सुंदर अशी गुंतागुंतीची नक्षी मन मोहून टाकते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर गर्भगृहात आपल्याला भगवान विष्णूंची अतिशय सुंदर अशी मूर्ती दृष्टीस पडते. या गर्भगृहाच्या वर अप्रतिम असं नक्षीकाम केलेलं मकर तोरण आहे. त्याच्या मध्यभागी लक्ष्मी आणि विष्णूंचे शिल्प आहे तर  खाली दोन्ही बाजूला भगवान विष्णूंचे द्वारपाल आहेत. या द्वारपालांच्या मूर्ती देखील इतक्या रेखीव आणि प्रमाणबद्ध आहेत की त्या जिवंत वाटतात. द्वारपालांनी परिधान केलेले अलंकार लक्षवेधक आहेत. या द्वारपालांच्या पाठीमागे देखणी प्रभावळ आहे. द्वारपालांच्या हातात शंख आणि गदा ही आयुधे धारण केलेली आहेत. हे द्वारपाल जणू सूचित करतात की गर्भगृहाच्या आत कोणीही अपवित्र व्यक्ती जाता कामा नये. व्यक्ती मनाने आणि शरीराने पवित्र असावी. सोवळे नेसूनच आत प्रवेश करता येतो.  गर्भगृहात दोन प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे  काळ्या पाषाणातू...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य भाग ३१

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ३१ ( रवींद्रसंगीत - एका नवीन संगीत परंपरेचा सूर्योदय ) भारतीय संगीताला अत्यंत प्राचीन असा वारसा लाभलेला असून भारतीय संगीत परंपरा ही हजारो वर्षांपूर्वीची समृद्ध अशी परंपरा आहे. आपले वेद आणि उपनिषदे हे सूर आणि तालाच्या माध्यमातूनच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले. तत्त्वज्ञानासारख्या रुक्ष विषयांना वेदातील गेयतेमुळे सौंदर्य प्राप्त झाले. ताल आणि सुरांमुळे निर्जीव अक्षरांना मंत्रांचे सामर्थ्य प्राप्त झाले. त्यातूनच भारतीय संगीत परंपरेचा उदय झाला.   भारतीय संगीताने जात-पात किंवा इतर कोणतेही भेद बाळगले नाहीत. ते भारतीय समाजाशी एकरूप झाले होते. पण ज्याप्रमाणे पारतंत्र्यांमध्ये भारतीय कला, साहित्य, नाटक, नृत्य, शिल्प इत्यादी कलांना घरघर लागली होती, तशाच प्रकारची अवस्था संगीतालाही प्राप्त झाली होती. वाहत्या पाण्याचा ओघ अचानक थांबावा आणि त्याला एखाद्या डबक्याचे स्वरूप प्राप्त व्हावे तशाच प्रकारची अवस्था भारतीय पारंपरिक संगीताची झाली होती. रवींद्रनाथांनी ज्याप्रमाणे भारतीय नाट्यपरंपरेचे पुनरुज्जीवन केले, तशाच प्रकारचे पुन...