उगवतीचे रंग एक संवाद बाबासाहेबांशी... आदरणीय बाबासाहेब, प्रथम आपल्याला मानाचा मुजरा ! खरं म्हणजे तुम्हाला भेटण्याची,तुमच्याशी बोलण्याची आणि तुमचा पदस्पर्श करून आशीर्वाद घेण्याची इच्छा होती. पण ते सगळं अपूर्णच राहिलं. तुम्ही इतक्या लगेच निरोप घ्याल असं वाटलं नाही. म्हणून आता पत्रातूनच आपल्याशी संवाद साधतो. पत्र हे भावना पोहोचवण्याचं माध्यम आहे. आपण जरी आता देहरूपाने आमच्यात नसलात तरी आपली ओजस्वी वाणी, पल्लेदार लेखणी आणि शिवमय आठवणी आमच्यासोबत आहेतच. पुढच्या अनेक पिढ्या हा वारसा जपतील. त्यावर पोसल्या जातील हा विश्वास आहे. तुमच्या अजोड, अद्वितीय कार्याचा गौरव कोणी केला नाही ! अगदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, आताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर या सगळ्यांनी तुमची मुक्तकंठाने स्तुती केली. तुमचं कार्यच इतकं अफाट आहे की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. मागच्या वर्षी तुमचा ९९ वा वाढदिवस झाला. आम्हाला तुमचा केवढा अभिमान... ! म्हटलं बाबासाहेब आता शंभरीत पदार्पण करता आहे...