मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

होय, आम्ही आहोत कृतघ्न

 उगवतीचे रंग  होय, आम्ही आहोत कृतघ्न  देव्हाऱ्यात ठेवलेल्या मूर्तींची  करायची असते पूजा  नसते कधी विचारायचे  त्या खऱ्या आहेत की खोट्या ? पूजा असते बांधायची  त्यांच्या विचारांची  गायची असतात स्तोत्रे  त्यांच्या पराक्रमाची  पण आम्ही शोधत बसतो  कुठे दिसतात का त्यांचे दोष  जणू भलतेच आदर्श आम्ही  त्यांच्या नावाने करतो कंठशोष  दोषारोप करण्यात आम्ही भलतेच मग्न  म्हणून तर म्हणावे लागते  होय, आम्ही आहोत कृतघ्न ! आमच्या देव्हाऱ्यात असतात  नेहरू गांधी टिळक  कधी कधी थोडीफार स्वातंत्र्यवीरांची झलक  पूजा मांडलेली असती छत्रपतींची सुद्धा  करतो साजऱ्या जोशात जयंत्या अन पुण्यतिथ्या  कुठले त्यांचे कार्य अन कुठला त्यांचा विचार ?  कारण आम्ही तर असतो आमच्यातच मग्न  म्हणूनच म्हणतो दोस्तहो  होय, आम्ही आहोत कृतघ्न.  नसतात आठवायची  त्यांनी दिलेली माफीपत्रे  आठवायची असते ती  त्यांनी समुद्रात घेतलेली उडी  अंदमानच्या काळकोठडीत  अंगावरची बेडी.  आठवायचे असतात ...

उगवतीचे रंग कावळ्यांची शाळा

उगवतीचे रंग  कावळ्यांची शाळा  रंग काळा काळा काळा  कावळ्यांची भरली शाळा  कावळे गुरुजी हुशार फार  गोष्टी सांगती युक्तीच्या चार  म्हणे करू नका फार  काव काव काव  कावळे जातीचे खराब होईल नाव  गुरुजी म्हणाले बाळांनो  आता निसर्ग राहिला थोडा  माणसाला देऊ आपण  पर्यावरण रक्षणाचा धडा  स्वच्छतेवर झाली  शाळेमध्ये चर्चा  गावोगावी साऱ्या  नेऊ आपण मोर्चा  नाही ऐकले माणसाने  तर जाऊ आपण पळून  जंगलातच राहू मग  आपण सारे मिळून  © विश्वास देशपांडे, चाळीसगाव  १४/११/२०२२ प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२  
( सुरेश पंडित यांच्या ' टेक ऑफ ' या कथासंग्रहासाठी )  प्रस्तावना  माझे ज्येष्ठ मित्र आणि साहित्यिक सुरेशजी पंडित यांनी मला त्यांच्या आगामी ' टेक ऑफ ' या कथासंग्रहासाठी प्रस्तावना  लिहिण्याची विनंती केली. मी त्यांना होकारही दिला. सुरेशजी कविता, कथा लेखन करतात हे मला माहिती होते पण त्यांच्या साहित्याशी मी परिचित नव्हतो. त्यांनी मला त्यांची पूर्व प्रकाशित तीन पुस्तके पाठवली. त्यात त्यांचा ' अद्वैत ' हा पहिला कथासंग्रह, ' अगतिक ' हा काव्यसंग्रह आणि ' निर्णय ' या कथासंग्रहाचा समावेश आहे. ' अगतिक ' या काव्यसंग्रहातील कविता वाचताना जाणवले की सुरेशजींचा पिंड हा एका कवीचा आहे. पण त्यांच्या कथा वाचताना त्यांच्यातील सिद्धहस्त कथा लेखकही प्रत्ययाला येतो. कथा आणि काव्य या दोन्ही साहित्याच्या प्रांतात त्यांची लेखणी सहजतेने विहार करते. त्यांच्या कवितेत प्रेमाचे, अगतिकतेचे, नीतिमूल्यांचे, देशप्रेमाचे रंग आहेत. भावनांचा प्रामाणिकपणा आहे, मायेचा ओलावा आहे, प्रेमाची उब आहे. त्यांच्या कथा या विविधरंगी, विविध विषयांवर आहेत. त्यांच्या अनेक कथांमधून आपल्याला त्...

उगवतीचे रंग - सेवाव्रती

उगवतीचे रंग  सेवाव्रती  पहाटेची वेळ किती रम्य असते ! सर्वांनाच आवडते. उगवतीचा सूर्य जसा आल्हाददायक असतो तसाच मावळतीचा सूर्य देखील. दिवसभरात लोकांना ऊर्जा, प्रकाश देऊन सूर्य कृतार्थ होऊन मावळतीला निघालेला असतो. म्हणून तर भा रा तांब्यांसारखा कवी म्हणतो, ' मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडून  दोन्ही करा. ' असेच मावळत्या दिनकरासारखेच वंदनीय असलेले डॉ अलका कुलकर्णी आणि डॉ शशांक कुलकर्णी मला शहाद्यात भेटले. या दोन्ही सेवाव्रतींची भेट झाल्याचा अतिशय आनंद मला झाला. त्यांचे कार्य डोळ्यांनी पाहता आले हे एक प्रकारचे भाग्यच ! डॉ सौ अलका कुलकर्णी आणि डॉ शशांक कुलकर्णी यांची आणि माझी भेट योगायोगाने पुण्याला विश्वकर्मा प्रकाशनाच्या कार्यालयात झाली. विश्वकर्माचे सहसंपादक आणि लेखक संदीप तापकीर यांनी माझा परिचय डॉ कुलकर्णी दाम्पत्याशी करून दिला. खान्देश हा आमच्या दोघांमधला समान दुवा होता. मग गप्पा झाल्या, ओळखी निघाल्या. रंगगंध या संस्थेने आयोजित केलेल्या साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या निमित्ताने कुलकर्णी दाम्पत्य चाळीसगावी येऊन गेले होते. नंतर पुढे कोरोनाने डोके वर काढले. त्या दरम्यानच्या काळात...