मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रंगांचा उत्सव : होळी ते रंगपंचमी

 उगवतीचे रंग  रंगांचा उत्सव : होळी ते रंगपंचमी  आपण भारतीय सण, उत्सव साजरे करण्यात आघाडीवर आहोत. आपल्या सगळ्या सणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सगळे निसर्गाशी आणि पर्यावरणाशी जोडले आहेत. आपले आरोग्य, जीवनशैली आणि अध्यात्म यांच्याशी त्यांची एक अतूट अशी नाळ जुळलेली आहे. होळी येते तेव्हा भोवतालचा निसर्ग आपले रूप बदलत असतो. पानगळ होऊन झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षांना बहर येतो. आंब्याच्या मोहराने भोवतालचा परिसर धुंद सुगंधी होऊन गेलेला असतो. अशातच कडक थंडी नाहीशी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते आणि अशातच फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण येतो. या पौर्णिमेलाच हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते. आपल्या इतर अनेक सणांप्रमाणेच हा सण अमंगलातून मंगलाकडे, वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याची प्रेरणा देतो. भक्त प्रल्हादाची कथा आपण सगळे जाणतो. प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. त्यामुळे त्याचा पिता हिरण्यकश्यपू याने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. ते सगळे अयशस्वी ठरले. शेवटी आपल्या बहिणीला म्हणजे होलिकेला प्रल्हादाला मांडीवर घेऊन जाळण्यासाठी हिरण्यकश्यपुने सांगितले. होलिकेला अग्नी जाळू शकणा...

पुण्यातीलआनंदाश्रम संस्था : एक दीपस्तंभ

 उगवतीचे रंग  पुण्यातीलआनंदाश्रम संस्था : एक दीपस्तंभ  गेल्या फेब्रुवारी ( २०२४ ) महिन्यात माझ्या पुण्यातील वास्तव्यात मी पेपरमध्ये एक बातमी वाचली. पुण्यातील बुधवार पेठेतील आनंदाश्रम या दुर्मिळ हस्तलिखितांचे आणि पुस्तकांचे प्रदर्शन २३ ते २५ फेब्रुवारी या दरम्यान भरले होते. हस्तलिखितांचे प्रदर्शन क्वचितच बघायला मिळते. मुळात हस्तलिखितेच पाहायला मिळत नाहीत इतकी ती दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे मी आवर्जून या ठिकाणी जाण्याचे ठरवले. २५ फेब्रुवारी या दिवशी मी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गेलो. संस्थेचे नाव आनंदाश्रम आहे. तिथे गेल्यानंतर खरोखरच 'आनंदाश्रम ' हे नाव सार्थ असल्याची अनुभूती मला आली. आनंदाश्रम ही संस्कृतच्या अध्ययन आणि संशोधनासाठी वाहून घेतलेली संस्था आहे. पुण्यातील अप्पा बळवंत चौकात या संस्थेची वास्तू दिमाखात उभी आहे. पुण्यातील भरवस्तीत असलेली ही प्राचीन दगडी वास्तू आजही आपले सौंदर्य राखून दिमाखात उभी आहे. १३५ वर्षांपूर्वी जरी ही वास्तू बांधली गेली तरी अजून किमान शंभर वर्षे तरी ती उत्तम स्थितीत राहील याची खात्री वाटते.  संस्थेत प्रवेश केल्यानंतर समोरच एक भव्य दुम...

शांतता कोर्टात गेली आहे

  उगवतीचे रंग  शांतता कोर्टात गेली आहे   ' पहाटेच्या रम्य आणि शांत वेळी...' अशा प्रकारची वाक्ये आता बहुधा कथा कादंबऱ्यातूनच वाचायला मिळतील की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसते. पहाट किंवा सकाळ ही शांत आणि रम्य राहिल्याचे चित्र आता अभावानेच आढळते. निरनिराळ्या आवाजांनी पहाटेची ही रम्य आणि शांत वेळ प्रदूषित केली आहे. सकाळी पाच वाजल्यापासून वाहनांचे आवाज सुरु होतात. काही वाहने लवकर सुरु न झाल्याने त्यांचे मालक अक्सिलेटर वाढवून ती बराच वेळ सुरु ठेवतात. जवळपास असलेल्या काही मंदिर आणि मशिदीवरील भोंगे आरती, प्रार्थना आणि अजान आदी सुरु होतात. तुम्हाला ते  ऐकण्याशिवाय काही चॉईस नसतो. पहाटेची शांत वेळ ध्यान करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी उत्तम असते असे म्हणतात. आता अशा या गोंगाटात ध्यान आणि अभ्यास कसा करणार ? सहा साडेसहा वाजेनंतर शाळेत जाणाऱ्या मुलांच्या रिक्षा आणि बसचे कर्कश हॉर्न सुरु होतात. मुलांनी तयार राहावे म्हणून ते लांबूनच हॉर्न वाजवत येतात. बऱ्याच वेळा मुलं शाळेसाठी तयार होऊन उभीच असतात, पण यांची हॉर्न वाजवण्याची सवय जात नाही. त्यावर काही टॅक्स नाही आणि ...

समर्थ रामदास आणि श्रीराम

 उगवतीचे रंग समर्थ रामदास आणि श्रीराम  समर्थ रामदास आणि श्रीराम यांचं नातं म्हणजे दुधात विरघळलेली साखर. वेगळं करता येणं शक्यच नाही. श्रीराम म्हणजे समर्थांचा श्वास आणि ध्यास. हा श्रीरामाचा ध्यास घेऊनच समर्थांनी अगदी बालवयातच घर सोडले.  रामा तुजकारणे । जिवलगांचा संग सोडला  असे समर्थ सांगतात. समर्थांना रामाचा जो ध्यास लागला होता, तो एकाएकी निश्चितच नव्हता. समर्थांच्या घरात गेल्या २२ पिढ्यांपासून श्रीरामांची उपासना चालत आली होती. त्याची पूर्वपुण्याई सूर्याजीपंत ठोसर आणि राणूबाई यांच्या पोटी जन्म घेतलेल्या नारायणाच्या पाठीशी होती. समर्थांचा जन्मही चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी म्हणजे रामनवमीला झाला. याला केवळ योगायोग म्हणता येणार नाही तर समर्थांच्या हातून पुढे जे धर्मरक्षणाचे आणि रामाच्या उपासनेचे कार्य व्हायचे होते त्याचा हा एक दैवी संकेत होता. श्रीरामांच्या भेटीचा ध्यास घेतलेल्या नारायणाने नाशिकजवळील टाकळीस रामनामाचे पुरश्चरण सुरू केले. बालवयातच पाण्यात उभे राहून त्यांनी कठोर साधना केली आणि प्रत्यक्ष रामरायांचे दर्शन त्यांना घडले. श्रीराम हेच त्यांचे गुरु होते. ते स्वतःला ...