मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वदेशीची जादू - भाग १२ चंद्र आहे साक्षीला

 उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू - भाग १२ चंद्र आहे साक्षीला  राजेश आणि पिंकी ही नव्या पिढीतील मुले होती. ज्ञान आणि माहिती  मिळवण्याची उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सतत कुठली तरी गोष्ट जाणून घेण्याचं कुतूहल त्यांना असायचं. त्यांच्या या ज्ञानयज्ञात भर घालण्याचे कार्य श्यामराव आणि श्यामलाताई त्यांच्या परीने करीतच होते. कधी कधी भगवानकाका त्यात मोलाची भर घालत. तशातच २३ ऑगस्ट २०२३ चा दिवस उजाडला. या दिवशी भारत आपले चंद्रयान-३ चंद्रभूमीवर उतरवणार होता. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर सुरु होते. सगळ्यांच्याच नजरा समोरच्या पडद्यावर खिळून होत्या. क्षणाक्षणाला चंद्रयान आणि चंद्राचा पृष्ठभाग यातील अंतर कमीकमी होत होते. संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी ' विक्रम ' लॅण्डर अलगदपणे चंद्राच्या जमिनीवर उतरले.  १४ जुलै २०२३ रोजी सुरु झालेली ही भारताची चंद्रझेप २३ ऑगस्टला यशस्वीपणे समाप्त झाली. बंगळुरूच्या नियंत्रणकक्षात काहीशा तणावात असलेल्या इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे चेहरे आनंदाने फुलून आले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. काहींच्या डोळ्यातून आनंदाश्रू ...

एक होती मणिबेन

उगवतीचे रंग एक होती मणिबेन कोण होती मणिबेन ? मी कशासाठी सांगतोय तिची गोष्ट ? मणिबेन आहे एका देशभक्त स्त्रीचं नाव. देशासाठी ती तुरुंगातही गेली, खूप खस्ता खाल्ल्या. नुकताच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवही साजरा केला. अशा वेळी ज्यांनी ज्यांनी देशासाठी योगदान दिलं आहे, त्यांचं स्मरण करायचं असतं. ते आपण करतोच पण भारतमातेच्या गळ्यातील देशभक्तरूपी जी मौक्तिकमाला आहे, त्यातील काही अमूल्य रत्ने अशीही असतात की ज्यांच्या त्याग आणि बलिदानाकडे कोणाचं फारसं लक्ष जात नाही. अशा मौक्तिकमालेतीलच एक तेजस्वी मणी म्हणजे मणिबेन ! मणिबेन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची कन्या. मणिबेनचा जन्म ३एप्रिल १९०३ रोजी झाला. मणिबेनचं दुर्दैव बघा. ती केवळ सात वर्षांची असतानाच तिचं मातृछत्र हरपलं. तिच्या पाठीवर तिला लहान भाऊ होता. त्याचंही संगोपन करण्याची आणि घर सांभाळण्याची जबाबदारी पोरवयातच तिच्यावर येऊन पडली. खरं तर तिचं खेळण्याचं वय. पण ती पडली सरदार पटेलांची लेक, तेवढीच खंबीर आणि परिस्थितीला धीरानं तोंड देणारी. आपल्या मुलांना सावत्र आईचा त्रास होऊ शकेल म्हणून सगळे म्हणत असतानाही आणि तरु...

स्वदेशीची जादू - भाग अकरा समृद्ध प्राचीन भारत

 उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू - भाग अकरा  समृद्ध प्राचीन भारत  श्यामराव, श्यामलाताई आणि भगवानराव यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा पिंकी आणि राजेश यांना आपल्या शाळेत माहिती सांगताना खूप उपयोग झाला. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी पिंकीने स्वदेशी खाद्यपदार्थ आणि वृक्ष आदींच्या उपयोगितेवर सर्वांसमोर एक छोटेसे भाषण केले. तिच्या भाषणाची शाळेतील मुख्याध्यापकांनी आणि प्रमुख अतिथींनी खूप तारीफ केली. शाळेतर्फे तिला क्रांतिवीरांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात आले. राजेशने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनात हेमाडपंती शिव मंदिर, वृक्षांची चित्रे, त्यांची माहिती आणि उपयोग या सगळ्या गोष्टींचा समावेश असलेली सुंदर चित्रे काढली. ही वेगळ्या विषयावरील चित्रे सर्वांची लक्ष वेधून घेत होती. शाळेने त्याची चित्रे शाळेच्या मासिकात घेण्याचे ठरवले.  आईबाबांनी पिंकी आणि राजेशला या सगळ्या गोष्टींबद्दल खूप शाबासकी दिली. मुलांना या सगळ्या गोष्टी भगवानकाकांना केव्हा सांगतो असे झाले होते. योगायोगाने दुसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयाला पारशी नववर्षाची सुटी होती. श्यामरा...

स्वदेशीची जादू - भाग दहा समृद्ध प्राचीन भारत

  उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू - भाग दहा  समृद्ध प्राचीन भारत  श्यामराव, श्यामलाताई, पिंकी आणि राजेश दोन दिवसांची सुटी सार्थकी लावून आले होते. श्यामरावांची आपल्या सोपान या बालमित्राशी भेट झाली होती. मुलांना खूप काही नवीन बघायला, शिकायला मिळाले होते. त्यामळे घरी परतल्यावर त्यांच्या मनात खूप आनंद आणि समाधानाची भावना होती. घरी आल्यानंतर पिंकी आणि राजेशने आपण काय काय नवीन पाहिले ते लिहून काढले. प्राणी आणि विविध वनस्पतींनी समृद्ध असलेले अभयारण्य, हेमाडपंती शिव मंदिर, सोपानरावांच्या गावातील बारा बलुतेदारांपैकी कुंभार, लोहार, सुतार आदींच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी, कळण्याची भाकरी, सातूचे पीठ यासारखे स्वदेशी खाद्यपदार्थ, वड, पिंपळ, बेल आदी  विविध वनस्पतींची माहिती त्यांनी लक्षात ठेवली होती. काही शंका असेल तर पुन्हा आपल्या आईबाबांना विचारून ते खात्री करून घेत होते.  देशी बियाणे आणि त्याचे राहीबाई पोपरे यांच्यासारख्या एका अशिक्षित महिलेने केलेले जतन याबद्दलची माहिती त्यांना खूप आवडली होती. त्याबद्दल पिंकी जेव्हा बाबांना म्हणाली, ' पिंकी अग, खूप मोठं काम आहे बरं का राही...

नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबवता येईल का ?

  उगवतीचे रंग  नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबवता येईल का ?  जेव्हा आपण नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबवता येईल का असा प्रश्न विचारतो, त्याच वेळी आपण नकळत हेही कबूल करतो की आज या घडीला नैतिक मूल्यांचा ऱ्हास झालेला आहे. एकदा हे लक्षात आले म्हणजे तो थांबवता येईल का ? खरंच आपल्याला असं करणं शक्य आहे का आणि ते शक्य असेल तर ते कशा प्रकारे साध्य करता येईल असे प्रश्न मनात येतात. जेव्हा एखादी समस्या आपल्यासमोर उभी राहते, तेव्हा विचारान्ती तिचे उत्तर पण आपल्याला मिळू शकते. एखाद्या समस्येचे उत्तर नाही, अशी समस्या असू शकत नाही. म्हणूनच नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबवता येईल का या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे.  नैतिकता, नैतिक मूल्य म्हणायला खूप मोठे शब्द वाटतात. असं वाटतं की ही काहीतरी कठीण गोष्ट आहे. पण तशी ती अजिबात नाही. मी समाजात वावरताना इतरांशी कसा वागतो, माझं वागणं इतरांसाठी आनंददायी ठरतं का की त्रासदायक ठरतं, माझ्याशी इतरांनी जसं वागावं असं मला वाटतं तसा मी इतरांशी वागतो का, मला अनंत अडचणी आल्या किंवा माझ्यासमोर काही प्रलोभनं उभी राहिली तर अशा वेळी मी माझी तत्त्वं गुंडाळून ठेवतो की ...

स्वदेशीची जादू - भाग नऊ देशी पारंपरिक बियाणे

उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू - भाग नऊ   देशी पारंपरिक बियाणे  हेमाडपंती मंदिराला भेट, त्यानंतर सोपानरावांकडे एक दिवस मुक्काम आणि त्या दरम्यान गावातील लोहार, कुंभार आदींना भेटणे या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच बघायला मिळाल्याने राजेश आणि पिंकी खुशीत होते. त्यांना खूप नवनवीन माहिती पण मिळाली होती. लिंब, वड, पिंपळ या सारख्या झाडांचे महत्व, बेलाच्या पानांचे महत्व ही सगळी माहिती त्यांना नवीन होती. श्यामराव आणि श्यामलाताईंनी त्यांना सतत वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शेकडो वर्षांपासून असणाऱ्या बारा बलुतेदारांची माहितीही त्यांना मिळाली होती.  दुपारी जेवण घेतल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला. रस्त्याने हिरवीगार शेतं डोलत होती. सगळीकडे जणू हिरवाईची चादर आच्छादली होती. कुठे शेतात केळी तर कुठे ऊस, कुठे कपाशी, ज्वारी, बाजरी आदी पिके दिसू लागली. कुठे कुठे भाज्यांची लागवड केलेली दिसत होती. ते सगळे पाहिल्यानंतर पिंकीला सोपानकाकांकडच्या जेवणाची आठवण झाली. ती म्हणाली, ' आई, त्या काकांकडे भाकरी आणि इतर सर्वच पदार्थ किती चवदार होते नाही ?...

स्वदेशीची जादू - भाग आठ बारा बलुतेदारी आणि फड पद्धती

उगवतीचे रंग   स्वदेशीची जादू - भाग आठ  बारा बलुतेदारी आणि फड पद्धती  सकाळची रम्य वेळ होती. श्यामराव आनंदात गाडी चालवत होते. बऱ्याच दिवसांनी आपला बालमित्र भेटल्याने आणि त्याच्याकडे राहून गप्पा मारल्याने त्यांचा मूड फ्रेश होता. छानपैकी ऊन पडले होते. वातावरणात सुखद गारवा होता. ' फिटे अंधाराचे जाळे ' हे गाणे त्यांच्या ओठी त्या वातावरणामुळे आपोआप आले होते. सोपानरावांकडे रात्रभर मुक्काम केल्यामुळे पिंकी आणि राजेश खुश होते. सोपानरावांनी गावात त्यांना कुंभार आळी, रामू लोहाराचे दुकान आदी वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून आणल्याने त्यांना त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांच्या मनात त्याबद्दल बरेच प्रश्न होते. गाडीत त्याबद्दल त्यांच्या गप्पा सुरु होत्या.  श्यामलाताई आणि सोपानराव यांचे एक वैशिष्ट्य होते. मुलांची उत्सुकता आणि कुतूहल ते कधी दाबून ठेवत नसत. आपल्या परीने ते त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करीत असत. माहिती नसेल तर माहिती घेऊन सांगत. श्यामराव आणि श्यामलाताई या दोघांचेही अवांतर वाचन बऱ्यापैकी होते. त्यामुळे ते मुलांचे कुतूहल शमवू शकत. मुलांनाही आपल्या आईवडिलांबाबत...

एक सांज डोळ्यात साठवलेली

  उगवतीचे रंग  एक सांज डोळ्यात साठवलेली  कालचीच गोष्ट. जळगावहून चाळीसगावला येताना बसने प्रवास करत होतो. तसा यावर्षी पाऊस खूपच कमी आहे. पण तरी धरित्रीनं ' हिरवं स्वप्न ' पाहिलं आणि त्याच्या खुणा तिच्या अंगाखांद्यावर ती मिरवत होती. नुकतेच ना धों महानोर आपल्यातून गेले पण त्यांची कविता मागे ठेवून गेले. त्यांच्या कवितेच्या ओळी अशा सांजवेळी आणि धरती पावसाची प्रतीक्षा करीत असताना आठवल्या नाहीत तरच नवल ! ते म्हणतात  ह्या नभाने भुईला दान द्यावे  आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे  कोणती पुण्ये अशी येती फळाला  जोंधळ्याला चांदणे लगडून जावे.  आकाशात काही काही ठिकाणी काळे मेघ अस्ताव्यस्त शाईचे मोठे ठिपके पसरावे तसे पसरले होते. याच मेघांना तर महाकवी महानोरांपासून तर बांधावरच्या गरीब फाटक्या शेतकऱ्यापर्यंत आणि कवी लेखकांपासून तर तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांपर्यंत सगळेच प्रार्थना करतो ना ! फक्त महानोरांना ते फार सुंदर शब्दात वरुणराजाकडे मागता आले. शेती आणि काव्य दोन्हीही महानोरांच्या व्यक्तिमत्वात एकरूप झाले. निसर्गाचं रूप, रस, गंध घेऊन महानोरांची कविता प्रकटली. ...

बात एक रात की

उगवतीचे रंग  बात एक रात की  मराठीमध्ये लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून अशी एक म्हण आहे. जो कोणी या अनुभवातून जाईल त्यालाच त्यातला गहन अर्थ कळतो. म्हणतात ना ' जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे .' काय एकेक म्हणी आठवताहेत आज ! आपल्या मराठी भाषेचा प्रभाव, दुसरं काय ! तर ते असो. झालं असं की काही दिवसांपूर्वी मी एका लग्नाला गेलो होतो. लग्न केल्याचा आणि घर बांधल्याचा असे दोन्ही अनुभव मी घेतले. त्याला बरीच वर्षे झाली. त्याबद्दल नाही बोलत मी. उगीच कशाला सांगायचे ते ! अहो, आपले अनुभव आपल्यापाशी असलेले बरे. नाहीतर कोण काय म्हणेल काही सांगता यायचे नाही. हां, तर मी काय सांगत होतो ? तर मी एका लग्नाला गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे ? आम्ही सगळेच जातोच की लग्नाला. तर मंडळी, मला काय म्हणायचे आधी नीट ऐकून तर घ्या.  माझ्या एका जवळच्या मित्राच्या मुलीचे लग्न ठरले होते. तुम्ही सगळे लग्नाला या असा त्याचा आणि वहिनींचा खूप आग्रह होता. म्हणून आम्ही दोघांनी या वेळी लग्नाला जायचे ठरवले. त्याप्रमाणे आरक्षण केले. आम्ही लग्नाच्या एक दिवस आधीच इच्छित ठिकाणी पोहोचलो. मी आधीपासून आमच्या...

स्वदेशीची जादू - भाग सात पौष्टिकता भारी - स्वदेशीची चव न्यारी

  उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू - भाग सात  पौष्टिकता भारी - स्वदेशीची चव न्यारी  श्यामराव, श्यामलाताई, पिंकी आणि राजेश यांनी मग रात्री सोपानरावांकडेच रात्री मुक्काम केला. दिवसभरच्या प्रवासाने सगळेच थकले होते आणि फिरल्यामुळे आणि गावाकडील मोकळ्या हवेत भूकही छान लागली होती. निर्मलाताईंनी मग सगळ्यांसाठी कळण्याच्या पिठाच्या गरम गरम भाकरी, तांबड्या भोपळ्याची भाजी, वांग्याचे चवदार भरीत, नागलीचे पापड, लसूण कोथिंबीर घालून केलेला हिरव्या मिरच्यांचा ठेचा आदी फर्मास बेत केला होता. कळण्याची चवदार भाकरी तर मुलांना फारच आवडली. सगळे नेहमीपेक्षा जरा जास्तच जेवले. श्यामलाताई निर्मलाताईंना म्हणाल्या, ' वहिनी, अहो घरी मुलं भाकरी म्हटली की तोंड वाकडं करतात आणि आज बघा इथे आवडीने खाताहेत. '  राजेश म्हणाला, ' आई, काकूंनी केलेल्या भाकरीना वेगळीच चव आहे. मला तर हे गरमगरम जेवण खूपच आवडले. '  सोपानराव म्हणाले, ' चला, आमचा खेड्यातील पाहुणचार तुम्हाला आवडला याचा आनंद झाला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा कधीही या. तुम्हाला आवडेल तो बेत करू या. काय निर्मलाबाई, बरोबर आहे का मी काय म्हणतो ते...