मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतरत्नावली द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग चार ( अंतिम )

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग चार ( अंतिम )  विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर  अध्यक्ष आणि सदस्य म्हणून मौलिक स्वरूपाचे कार्य केले आणि आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा या संस्थांना करून दिला.  याशिवाय देशभरातील विविध  नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले. विश्वेश्वरैयानमध्ये एक उत्तम लेखकही दडलेला होता. त्यांनी लिहिलेली ' रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया ', प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया, प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेमॉयर्स ऑफ माय वर्किंग लाईफ ही पुस्तके आजही त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या कार्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना ' सर ' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी लिट ही पदवी देऊन गौरविले.  विश्वेश्वरैयाना भारताचा सर्वोच्च सन्मान देण्याचे भारत सरकारने ठरवले. त्यासाठी त्यांची संमती घेणारे पत्र सरकारने त्यांना पाठवले. त्या पत्राला विश्वेश्वरैय्यानी दिलेले उत्तर पुरस्का...

उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग तीन

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग तीन  आपल्या अभियंतेपदाच्या कारकिर्दीत विश्वेश्वरैया यांनी अनेक कामे केली. या सगळ्या कामांवर  कार्यपद्धतीचा ठसा उमटला आहे. पुढे त्यांनी काही काळासाठी अनेक देशांना भेटी दिल्या. विश्वेश्वरैया हे शिस्त आणि वक्तशीरपणा या गोष्टींचे अतिशय कटाक्षाने पालन करणारे होते. त्यांच्या अमेरिका दौऱ्यातील एक किस्सा सांगण्यासारखा आहे. ते अमेरिकेत असताना त्यांना एका ठिकाणी एका महत्वाच्या मीटिंगसाठी जायचे होते. ते स्टेशनवर आले असताना त्यांना कळले की आपल्याला ज्या गाडीने जायचे ती गाडी अचानक रद्द झाली आहे. ते लगेच जाऊन स्टेशनमास्तरला भेटले. त्यांना सांगितले की मी या देशात भारताचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. माझी साडेदहा वा मिटिंग आहे. आपण गाडी रद्द केल्याने मी मीटिंगला उपस्थित राहू शकणार नाही. मला मीटिंगला जाण्यापासून रोखणे म्हणजे मी माझ्या देशाचा अपमान समजतो.  या संदर्भात मला आपल्या देशाच्या अध्यक्षांशी बोलावे लागेल. त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर स्टेशनमास्तर हादरले. त्यांनी त्व...

भारतरत्नावली द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग दोन

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग दोन   धुळ्याला आल्यानंतर तेथील आवाहनात्मक कामे जणू त्यांची वाटच पाहत होती. दातर्तीच्या पाटाचे काम आणि धुळे शहराचा पाणीपुरवठा यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ते पावसाळ्याचे दिवस होते. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. अशा वेळी त्यांची कसोटी लागणार होती. त्यांनी नदीच्या पात्राखालून पाईपलाईन टाकून , त्यात सायफन किंवा वक्रनलिकेचे तत्व वापरून ह्या दोन्ही योजना पूर्ण केल्या. धुळे शहरात त्यांचे वास्तव्य फक्त सोळा महिने होते, पण या अल्प कालावधीत आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला. त्या कामांना आज एकशे तीस वर्षांच्या वर कालावधी लोटला आहे. पण अजूनही त्या योजना वापरात आहेत.  पुढे त्यांनीआपल्या कल्पकतेने अनेक मोठमोठे प्रकल्प राबवले पण आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी केलेला या परिसराचा कायापालट चिरस्मरणीय आहे.  आपल्या कारकिर्दीचा त्यांचा पुढील यशस्वी टप्पा म्हणजे पुणे येथे राबवलेल्या निरनिराळ्या योजना. त्यांच्या पंचवीस वर्षांच्या सेवा कालखंडातील व...

भारतरत्नावली द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग एक

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग एक  कर्नाटक मधील जोग धबधबा. या ठिकाणी  एक कुटुंब आपल्या मुलांना धबधबा दाखवण्यासाठी घेऊन गेले होते.  तो भव्य आणि आशिया खंडातील सर्वात उंच असलेला धबधबा पाहून सर्वजण आनंदित झाले. धबधबा पाहून झाल्यावर जवळच्याच मंदिरात सगळेजण दर्शनासाठी  गेले. त्या कुटुंबातला एक छोटा मुलगा मात्र त्यांच्यासोबत गेला नाही. तो एका जवळच्या टेकडीवर जाऊन त्या धबधब्याची भव्यता निरखित होता. अफाट उंचीवरून कोसळणारा तो  पाण्याचा प्रवाह पाहून त्याच्या मनात आले केवढा हा शक्तीचा आणि पाण्याचा अपव्यय. या शक्तीचा काही उपयोग नाही का करून घेता येणार ? आपण मोठे झालो की नक्कीच यासाठी काहीतरी करू या अशी खूणगाठ त्या मुलाने मनाशी बांधली. पुढे या जोगच्या धबधब्यावर जलविद्युत निर्माण होऊन ती ऊर्जेच्या रूपाने कारखान्यांची चक्रे फिरवू लागली. लाखो लोकांची घरे प्रकाशमान झाली. जलविद्युत निर्माण झाल्यानंतर त्याच पाण्याचा वापर शेतीच्या सिंचनासाठी होऊन शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध झाले. ते या मुलाच्या ...

भारतरत्नावली उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग चार ( अंतिम )

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग चार ( अंतिम ) कामात झोकून देणे किंवा एखादे काम किती निष्ठेने करावे याचे कलाम मूर्तिमंत उदाहरण होते. याचे एक उदाहरण येथे सांगण्यासारखे आहे. याच कालावधीत त्यांच्या प्रिय बहिणीच्या मुलीचे लग्न होते. जोहरा आणि तिचे पती यांनी कलाम यांना वेळोवेळी शिक्षणासाठी मदत केली होती. पण जोहराच्या मुलीच्या लग्नाचे देखील कलाम यांना लक्षात राहिले नाही एवढे ते आपल्या कामात गढून गेले होते. एकाएकी लग्नाच्या दिवशी त्यांना आठवण झाली. पण त्यासाठी त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तेथे पोहोचण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. ही गोष्ट तत्कालीन संरक्षणमंत्री वेंकटरमण यांच्या कानावर गेली. त्यांनी तत्काळ कलाम यांच्यासाठी इंडियन एअर लाईन्सला कलामांसाठी स्वतंत्र विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले. हे विमान त्यांना चेन्नई पर्यंत घेऊन गेले. तेथून पुढे त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांच्यासाठी एक हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले होते. अशा रीतीने कलाम आपल्या प्रिय भाचीच्या लग्नात पोहचू श...

भारतरत्नावली उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग तीन

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग तीन       आपल्या शिक्षकांकडून मिळालेले हे ज्ञान , संस्कार आणि आशीर्वाद घेऊन कलाम प्रत्यक्ष व्यावहारिक जगामध्ये आपली भूमिका पार पडण्यासाठी निघाले. १९५८ मध्ये बंगलोर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ट्रेनी म्हणून नोकरी स्वीकारली. येथे त्यांनी विमान तयार करण्याचे प्रत्यक्ष शिक्षण घेतले. या संस्थेतून खूप काही आत्मसात केल्यानंतर ते पदवीधर एरोनॉटिक्स इंजिनिअर म्हणून बाहेर पडले. यावेळी त्यांच्या समोर दोन पर्याय होते. एक म्हणजे भारतीय वायुदलात वैमानिक म्हणून काम करणे किंवा दुसरे म्हणजे भारताच्या संरक्षण खात्यात ( Directorate of Technical Development and Production ) नोकरी स्वीकारणे. या दोन्ही ठिकाणच्या परीक्षा त्यांनी दिल्या. हवाई दलातील परीक्षा देण्यासाठी त्यांना देहराडूनला जावे लागले. पण तेथे त्यांना यश मिळाले नाही. दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयातील संचालनालयाच्या विभागात त्यांना नेमणूक मिळाली आणि तेथे ते वरिष्ठ वै...