मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक नवी सकाळ तुमची वाट पहात आहे

  उगवतीचे रंग    एक नवी सकाळ तुमची वाट पहात आहे  २०२३ चा आज शेवटचा दिवस आणि उद्याची सकाळ असणार आहे नवीन वर्षाची. सकाळ असेल रोजच्यासारखीच ! पण आठवड्याची सुरुवात ज्या वाराने होते, तो सोमवार म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस असेल आणि २०२४ ची नवीन कोरी करकरीत सकाळ आपल्या स्वागतासाठी सज्ज असेल. या प्रसंगी मला कविवर्य भा. रा. तांबे यांची ' मावळत्या दिनकरा ' ही कविता आठवते आहे. उगवत्या सूर्याला वंदन करणारे आणि मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवणारे हे जग ! पण ज्या मावळत्या सूर्याने मला आजचा दिवस दिला, त्याच्याबद्दल मी कृतज्ञ राहायला नको का ? माझा उद्या हा आजच्या पायावरच उभा असणार आहे. कविवर्य तांबे जसे मावळत्या दिनकराला वंदन करतात, तसे मीही मावळत्या वर्षाला करतो. कारण २०२३ च्या पायावरच २०२४ उभे असणार आहे. २०२३ ने मला आणि तुम्हाला खूप काही दिले आहे.  आर्थिक वर्ष संपत आलं की बँका, वित्तीय संस्था, करसल्लागार त्या त्या वर्षाचा हिशेब मांडतात. जमा बाजू, खर्चाची बाजू, हातात राहिलेली शिल्लक वगैरे. त्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा किती झाला याचाही हिशेब केला जातो. तसंच आपल्या आयुष्यातलं जाणारं...

मैत्रीचा गाव

उगवतीचे रंग  मैत्रीचा गाव   काही दिवसांपूर्वी मी पुण्यात होतो. माझे चाळीसगावचे एक अतिशय जवळचे सहकारी सुद्धा पुण्यातच त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास होते. परवाच्या दिवशी सकाळी मला अचानक त्यांचा फोन आला. त्यांचा आवाज अगदी खोल गेला होता. मला म्हणाले, ' सर, माझे हृदयाचे ऑपरेशन झाले आहे. मला एकदा भेटायला येऊन जा. ' त्यांचे आणि माझे नाते जरी मैत्रीचे असले तरी ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आम्ही सगळेच त्यांना अण्णा म्हणतो. अशा या अण्णांचा फोन आला आणि आम्ही दोघं तातडीनं त्यांना भेटायला गेलो. आम्ही आल्याचा अण्णांना कोण आनंद ! तशाही अवस्थेत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. काय सांगू, किती सांगू आणि कसं सांगू अशी त्यांची अवस्था झाली होती. शेवटी त्यांचा मुलगा म्हणाला, ' अण्णा, तुम्ही बोलू नका. मी सगळं सांगतो. '  गंमत म्हणजे आदल्या दिवशीच अण्णांना हॉस्पिटलमधून घरी सोडले होते. अण्णांना जास्त बोलायला डॉक्टरांनी मनाई केली होती. अण्णांनी पूर्ण विश्रांतीच घ्यावी, त्यांना कोणाच्याही फोनचा त्रास होऊ नये या हेतूने मुलांनी त्यांचा फोन काढून घेतला होता. पण तशाही परिस्थितीत अण्णांनी कुठून ...

मानवतेचा आणि सेवेचा प्रकाश : प्रकाश आमटे

  उगवतीचे रंग  मानवतेचा आणि सेवेचा प्रकाश : प्रकाश आमटे  परवाच्या दिवशी व्हाट्सअपवर नवीन चित्रपटासंदर्भात एक पोस्ट फिरत होती. सालार, डंकी आणि आणखी असेच काही बॉलिवूडचे मसाला चित्रपट येत असताना प्रेक्षकांनी अस्सल हिरोकडे पाठ फिरवली. हा अस्सल हिरो म्हणजे सॅम बहादूर. सॅम माणेकशॉ हे भारताचे पहिले फिल्ड मार्शल. भारतीय लष्करात चाळीस वर्षे सेवा बजावून आपल्या देशातील जवानांना आणि तरुणांना सेवेचा आदर्श त्यांनी उभा केला. तरुणाईने पाहिलाच पाहिजे असा हा चित्रपट पण हा चित्रपट मी पाहायला गेलो तेव्हा थिएटरमध्ये तुरळक गर्दी होती. पाहणारे बहुसंख्य प्रेक्षक साठी ओलांडलेले होते. असाच एक रिअल हिरो म्हणजे प्रकाश बाबा आमटे. आपल्या वडिलांचा म्हणजेच थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या सेवेचा आणि त्यागाचा वारसा पुढे चालवणाऱ्या त्यांच्या विकास आणि प्रकाश या दोन सुपुत्रातील द्वितीय. हा द्वितीय पुत्र तसा एकमेवाद्वितीयच म्हणावा लागेल. बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी कार्य सुरु करतात. एक दिवस आपल्या मुलांसह भामरागडच्या जंगलात सहलीसाठी म्हणून जातात. भामरागडचे जंगल हे जाण्यासाठी अत्यंत गैरसोयीचे. रस्ते नीट नाहीत, ...

वाचावी बहुतांची अंतरे

उगवतीचे रंग  वाचावी बहुतांची अंतरे   केवळ दोन वर्षांचा असलेला प्रणाद त्याच्या आईवडिलांसोबत एका पुस्तक महोत्सवात गेला. तेथील एका स्टॉलवर असणारे आकर्षक छोटे पुस्तक पाहून हे पुस्तक मला पाहिजेच म्हणून त्याने हट्ट धरला आणि मग त्याच्या आईबाबांना ते पुस्तक घ्यावेच लागले. त्या लहानग्याला वाचता येत नव्हते पण पुस्तकातील रंगीबेरंगी चित्रांनी त्याला आकर्षित केले. माझ्या मते हा पुस्तकाचा सगळ्यात छोटा ग्राहक असावा आणि हेच पुणे येथे भरलेल्या पुस्तक महोत्सवाचे वेगळेपण आहे असे मला वाटते. आपल्या मुलांना अनेक ठिकाणे दाखवण्यासाठी आपण घेऊन जातो पण पालकांनी आपल्या मुलांना घेऊन या पुस्तक महोत्सवाला जरूर जावे असे मला वाटते आणि अनेक सुज्ञ पालक तसा लाभ आपल्या मुलांना मिळवून देत आहेत.  आजच्या मोबाईलची क्रेझ असलेल्या जमान्यात आपल्या मुलांवर जर वाचनसंस्कार करायचा असेल तर असे हे पुस्तक महोत्सव त्यांना दाखवायलाच हवे. ही आधुनिक पर्यटनाची ठिकाणे समजावीत. अनेक शाळा देखील या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना हा पुस्तक महोत्सव दाखवण्यासाठी घेऊन येताहेत. या पुस्तक महोत्सवात येणाऱ्या रसिकाला आश्चर्याचा सुखद ...

चरैवती चरैवती

 उगवतीचे रंग  चरैवती चरैवती  तसे आमचे संस्कृत लहानपणापासून कच्चे. आता अर्थात ते सुधारण्याचा संभव कमीच ! संस्कृतमध्ये काही काही शब्द वेगळ्या अर्थाने येतात. आपल्या मराठीत आणि त्यांच्या मूळ अर्थात फरक असतो. पण आम्हाला हे सांगतो कोण ? लहानपणी रामरक्षा म्हणायचो. अर्थ कळायचा नाही. रामरक्षा म्हणताना ' रामम रमेशम भजे ' असे शब्द यायचे. लहानपणी ' भजे ' म्हणजे भजणे किंवा आळवणे  हा अर्थ माहितीच नव्हता.  पुढे तो केव्हा तरी कळला. तोपर्यंत देवासमोर बसून रामरक्षा म्हणताना हे शब्द आले की आम्हाला भजेच आठवायचे. कधी कधी रामरक्षा म्हणताना समोर डिशमध्ये गरमागरम भजी ठेवली आहेत, आणि ते स्तोत्र म्हणत असताना ती अधूनमधून तोंडात टाकतो आहोत अशी कल्पनाही यायची.  तसेच कधीतरी ' चरैवती चरैवती ' हे शब्द कानावर पडले होते. मूळ अर्थ माहित असण्याचे काही कारणच नव्हते. लहानपण एका अगदी छोट्याशा खेड्यात गेले. आमच्याकडे शेती असल्याने गाई, बैल वगैरे असायचेच. सकाळी गाई चरायला जायच्या. बैल रिकामे असले तर शेतात चरायला सोडले जायचे. बकऱ्या देखील चरून यायच्या. घरात सुद्धा आम्ही स्वयंपाकघरातील डबे उचकून काह...

गाठी आतल्या आणि बाहेरच्या

  उगवतीचे रंग  गाठी आतल्या आणि बाहेरच्या  परवा माझा एक मित्र दुसऱ्या एका मित्राबद्दल बोलताना म्हणाला, ' अरे, तो ना फार आतल्या गाठीचा आहे बरं का ! त्याच्यापासून सावध राहा. ' तो हे बोलून तर गेला पण मी विचार करायला लागलो. खरोखर आतल्या गाठीचा म्हणजे कसा असेल ? तसा हा शब्द मला नवीन नव्हता. मी लहानपणापासून तो ऐकत आलो होतो. आतल्या गाठीचा म्हणजे आपल्या मनात काय आहे ते दुसऱ्या व्यक्तीला सहजासहजी समजू न देणारा. या अर्थाने मला हा शब्द माहिती होता. पण तो कसा आला असावा याचा विचार करता करता मला गाठी आठवल्या.  पूर्वी किराणा दुकानातून वाणसामान आणताना वाणी ते सामान बहुधा कागदात बांधून द्यायचा. त्याला एक दोरा गुंडाळून त्याची गाठ मारली जायची. घरी गेल्यावर वस्तू काढताना हा दोरा सोडायचा. कधी कधी सुती दोरी किंवा सुतळीने बांधलेली एखादी वस्तू घरात यायची. त्यालाही सुतळी गच्च आवळून गाठ मारलेली असायची. ही गाठ सोडवण्याचे दोन मार्ग असायचे. एक म्हणजे हातांनी ती गाठ सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि दुसरा मार्ग अतिशय सोपा. तो म्हणजे ब्लेड, सुरी किंवा कात्री यांच्या साहाय्याने ती गाठ कापून काढणे. यातील प...

आभासी जगातील हिरवळ

 उगवतीचे रंग  आभासी जगातील हिरवळ   आजकाल संगणक, मोबाईल यांच्या जाळ्यात आपण सारेच अडकलो आहोत. या गोष्टी आता प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाल्या आहेत असे म्हटले तरी वावगे होणार नाही. पण यावरील माणसे, जग या सगळ्या गोष्टींना आपण आभासी जग ( virtual world ) म्हणत असतो. काही लोक कायम याच विश्वात वावरतात. त्यांना आभासी जगात वावरणारे असे आपण म्हणतो. आभासी म्हणजे जे प्रत्यक्षात अस्तित्वात नाही पण मोबाईल, संगणकावर दिसतात अशा गोष्टी. या अशा आभासी जगात वावरणाऱ्यांना आपण बऱ्याचदा नावेही ठेवत असतो. कारण यात बऱ्याचदा फसवणूकही होते. पण अशा या आभासी जगातही हिरवळीची काही बेटं आढळून येतात. सगळ्याच गोष्टी पूर्णपणे वाईट किंवा टाकाऊ नसतात. आपण त्यांचा वापर कसा करतो यावर बरेच काही अवलंबून असते. ही अशीच काही या वाळवंटातील हिरवळीची उदाहरणे.  साहित्य संस्कृती मंच या नावाचा एक व्हाट्सअप समूह आहे. गेल्या महिन्यात म्हणजे २५ आणि २६ नोव्हेंबर या दिवशी या समूहाने माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच एक साहित्य संमेलनवजा गेट टुगेदर आयोजित केले होते. या समूहात प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान, ...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

 उगवतीचे रंग   अभिव्यक्ती स्वातंत्र्य काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो. जेव्हा प्रमुख वक्त्यांचे भाषण सुरु झाले तेव्हा त्यांनी मर्यादा सोडून बोलणाऱ्या आजच्या राजकारण्यांवर टीका केली. खरोखरच राजकीय नेते म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. पण त्याचे भान काही अपवाद सोडले तर आज कुठेही दिसत नाही. ते उपरोधिकपणे म्हणाले ' विद्या विनयेन शोभते ' असे एक संस्कृत सुभाषित आहे. पण बोलणाऱ्यानी एवढी खालची पातळी गाठली आहे की ते म्हणतील, ' ही कोण आणि कुठली विद्या ? कुठला विनय ? ' रोजच्या बातम्या पाहिल्या आणि त्यात राजकारण्यांनी केलेली विधाने पाहिली की याचे प्रत्यंतर येते. बातम्या सुद्धा बघू नये असे सुजाण नागरिकांना वाटत असल्यास नवल नाही.  याच व्यासपीठावरून आणखी एक वक्त्या बोलल्या. त्यांनी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक विधान केले. त्या म्हणाल्या, ' सुरुवातीला मला सावरकरांबद्दल प्रचंड आदर होता पण आता तो कमी झाला आहे. ' त्याचे कारण त्यांनी सांगितले की राहुल गांधी जर सातत्याने सावरकरांवर टीका करत असतील, तर त्यांच्या हाता...