मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग वीस

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग वीस  हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर सरदार पटेलांनी  राजस्थानातील विविध राज्यांचे एकीकरण घडवून आणले. या राजपुताना म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानचा प्रदेश विशाल होता. या प्रदेशात बहुतांशी रजपूत राजांची राज्ये होती. हे राजे शूर आणि परंपरांचा अभिमान असणारे होते. पण त्यांच्यात आपापसात भांडणे, हेवेदावे असल्यामुळे ही राज्ये जणू एकमेकांची शत्रू असल्यासारखी वागत होती. ही एकूण एकोणीस राज्ये होती. त्यांच्या एकीकरणासाठी सुमारे साडेआठ वर्षांचा कालावधी लागला. या एकीकरणाची प्रक्रिया १८ मार्च १९४८ रोजी सुरु झाली आणि एक नोव्हेंबर १९५६ ला पूर्ण झाली. १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात सामील न होता स्वतंत्र राहण्याची या राजांची इच्छा होती. त्याचे कारणही साहजिकच होते. एखाद्या मोठ्या राज्यात आपले राज्य विलीन करणे म्हणजे आपली स्वायत्तता गमावणे हा त्याचा अर्थ होता. आपली परंपरागत सत्ता गमावण्याची या राजांची तयारी नव्हती. राजस्थानातील या राज्यांमध्ये जयपूर, ...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग एकोणीस

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग एकोणीस  रझाकारांचे सामान्य जनतेवरील अत्याचार कमालीचे वाढले होते. अनेक जिल्ह्यांमध्ये लुटालूट, जाळपोळ आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना होत होत्या. निजामाचे प्रमुख लायक अली यांनी अशा परिस्थितीत भारताला आव्हान  देणारे वक्तव्य केले. ' भारताने जर आमच्यावर कारवाई करून आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न केला तर, आमचे हजारो लोक लष्करात भरती होतील. पाकिस्तान, सौदी अरब या देशातील विमाने भारतावर बॉम्बफेक करण्यासाठी सज्ज आहेत. ' कराचीहून काही विमानं शस्त्रास्त्र आणि दारुगोळा घेऊन हैदराबादला उतरत होती. त्यामुळे हैदराबादला पाकिस्तानची मदत आहे हे स्पष्ट होत होते.  पटेलांनी या सुमारास आपल्या एका मित्राला लिहिलेल्या एका पत्रात म्हटले होते की मी दीर्घकाळ आजारी असल्याने हैदराबादचा प्रश्न सुटू शकला नाही. पण आता मात्र मी तयार आहे आणि कोणतीही कारवाई करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही.  यावेळी पटेलांनी जनरल चौधरी यांना चर्चा करण्यासाठी आपल्याकडे बोलावून घेतलं. त्यांच्याशी  हैदराबाद...

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग अठरा

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग अठरा  माऊंटबॅटन यांची भारतातील कारकीर्द संपत आली होती. ते इंग्लंडला परत जाणार होते. जाता जाता हैदराबादच्या यशाचे मोरपीस आपल्या मुकुटात खोवावे अशी त्यांची साहजिकच इच्छा होती. त्यांना हैदराबाद भारतात सामील करण्याच्या बाबतीत रस नव्हता तर येनकेन प्रकारे ही समस्या मार्गी लावून त्याचे श्रेय त्यांना घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी एक कराराचा मसुदा तयार केला होता. या मसुद्यातील बऱ्याचशा अटी हैदराबादच्या बाजूने झुकणाऱ्या होत्या. या कराराची कागदपत्रे तयार करून त्यांनी पं नेहरू, डॉ राजेंद्र प्रसाद, गोपालस्वामी अय्यंगार आणि संरक्षणमंत्री बलदेवसिंह यांना आपल्या सोबत घेतले. स्वतःच्या खाजगी विमानाने ते या सर्वांना घेऊन पटेलांच्या भेटीसाठी डेहराडूनला आले. या काळात सरदार पटेल हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे तेथे विश्रांती घेत होते.  माऊंटबॅटन यांनी कराराच्या कागदपत्रांची फाईल पटेल यांच्यासमोर ठेवली. पटेल ती कागदपत्रे वाचत असताना त्यांच्या हावभावाकडे माऊंटबॅटन यांचे बारीक लक्ष होते. ...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सतरा

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सतरा  इंग्रजांनी भारताचे हस्तांतरण करण्यापूर्वी भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकमध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा जो पर्याय दिला होता, तो भारताच्या एकात्मतेच्या आणि अखंडतेच्या दृष्टीने धोकादायक होता. सुदैवाने सरदार पटेलांसारखा दूरदृष्टी असलेले नेतृत्व या काळात भारताला लाभले होते. पटेलांनी एकेक करून सगळी संस्थाने भारतात सामील करून घेण्याचे अखंड प्रयत्न सुरूच ठेवले होते. काश्मीरचा प्रश्न सरदार पटेलांना पूर्णपणे जरी सोडवता आला  नाही, तरी आज काश्मीर भारतामध्ये असण्याचे श्रेय पटेल यांनाच द्यावे लागेल. काश्मीरचा प्रश्न पटेलांकडे असलेल्या गृहखात्याच्या अखत्यारीतून नेहरूंनी काढून घेतल्यामुळे पटेलांना नंतर काश्मीर संबंधाने फार काही करता आले नाही.  स्वतंत्र भारत बलशाली करण्याचे पटेल यांचे प्रयत्न अखंड सुरूच होते. त्यांचे वय या सुमारास ७२ वर्षांचे होते. पण या वयातही या लोहपुरूषाची अखंड धावपळ, दौरे आणि भेटीगाठी सुरु होत्या. एकात्म आणि अखंड भा...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सोळा

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सोळा  सरदार पटेलांची दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि धडाडी त्यांनी हाताळलेल्या प्रत्येक प्रसंगातून दिसून येत होती. इंग्रजांनी जेव्हा सत्तेचं हस्तांतरण भारताकडे करण्याचं ठरवलं, तेव्हा सरदार पटेल नसते तर कोणकोणत्या विपरीत गोष्टी घडल्या असत्या याची कल्पनाही करवत नाही. केवळ पटेल यांच्या सारखा धडाडीचा नेता होता म्हणून विविध संस्थाने भारतात समाविष्ट होऊ शकली.  जीना यांचा भारतातील विविध राज्यं आणि संस्थानं यावर जसा डोळा होता, तसाच तो काश्मीरवरही होता. काश्मीरचा लचका भारतापासून तोडायला ते सर्वात जास्त उत्सुक होते. काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानी सेनाच पाठवण्याचा त्यांचा विचार होता. पण जेव्हा पाक सैन्यातील इंग्रज अधिकाऱ्यांनी या गोष्टीस नकार दिला, तेव्हा जीनांनी पठाणांच्या टोळ्या काश्मिरात घुसवून काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या टोळीवाल्यांना पाकिस्तानकडून शस्त्रे, पैसे इ गोष्टी पुरवण्यात आल्या. ४ नोव्हेंबर १९४७ हाच तो भयंकर दिवस. सशस्त्र पठाणांच्या टोळ्या या दिवशी...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग पंधरा

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग पंधरा  सरदार पटेलांनी जे जे निर्णय घेतले त्यातून त्यांचा दूरदर्शीपणा, मुत्सद्दीपणा दिसून येत होता. एवढेच नव्हे तर काळाच्या कसोटीवर त्यांनी घेतलेले निर्णय  अचूक आणि त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक होते हेही सिद्ध झाले. काठियावाड आणि भोपाळचा प्रश्न सोडवल्यानंतर त्यांच्या पुढे जुनागढचा प्रश्न आ वासून उभा राहिला. पटेलही या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज होते. आपला संसार सोडून त्यांनी देशाचा संसार करण्यासाठीच स्वतःला वाहून घेतले होते. वैयक्तिक सुखदुःखाचा विचार करायला या माणसाला वेळच नव्हता.  जुनागढ हे गुजरातमधील एक मोठे राज्य होते. पंधरा ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले. आणि त्याच दिवशी जुनागढने आपण पाकिस्तानात सामील होणार हे अचानक जाहीर केले. तोपर्यंत भारत सरकारला याचा सुगावाही लागणार नाही याची काळजी जुनागढचा नबाब, त्याचा दिवाण आणि जीना या मंडळींनी घेतली होती. दोन दिवसांनी वर्तमानपत्रात जेव्हा ही बातमी आली तेव्हा कुठे भारत सरकारला त्याबद्दल कळले. लागलीच भारत सर...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग चौदा

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग चौदा  त्रावणकोर राज्याप्रमाणेच गुजरातमधील काठियावाड हे राज्य देखील स्वतंत्र राहण्याची स्वप्नं पाहत होतं. काठियावाडमध्ये छोट्या छोट्या २२२ संस्थानाचा समावेश होता. या संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणासाठी सरदार पटेलांनी एक अठरा कलमी योजना बनवली होती.  या संस्थानांमध्ये पोरबंदरचा सुद्धा समावेश होता. गांधीजींचा जन्म सुद्धा पोरबंदर येथील असल्याने या संस्थानांचे एकत्रीकरण व्हावे या मताचे गांधीजी होते. पण या संस्थानांवर नवानगरचे राजे (आता जामनगर ) जामसाहेब यांचा मोठाच प्रभाव होता. काठियावाडमधील सात राज्यांनी भारतात सामील न होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरदार पटेलांसमोर हे एक मोठे आव्हान होते. जामसाहेब हे अनुभवी आणि प्रभावी व्यक्तिमत्व होते. राजस्थानमधील संस्थानिकांना आपल्या महासंघात सामील करून घेण्यासाठी ते आणि गुजरातच्या अन्य महाराजांचा एक गट दिल्ली विमानतळावर राजस्थानला जाण्यासाठी  थांबला होता.  पटेलांना याची खबर लाग...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग तेरा

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग तेरा  पूर्वीचं त्रावणकोर राज्य दक्षिण भारतातील कोचीनजवळ होतं. या त्रावणकोर राज्यानं स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. हे अत्यंत समृद्ध राज्य. निसर्गानं आपल्या सौंदर्याची उधळण मुक्त हस्ताने केलेली. तशातच या राज्यात युरेनियमचे साठे सापडले होते. शिवाय प्रसिद्ध पद्मनाभमंदिर याच राज्यात होतं. त्यावेळी या राज्याच्या गादीवर तीस वर्षांचा एक तरुण राजा म्हणून बसलेला होता. पण राज्याचा सगळा  कारभार सी पी रामस्वामी या नावाची एक अत्यंत बुद्धिमान व्यक्ती पाहत होती. राजा या रामस्वामींच्या प्रभावाखाली दबलेला होता. रामस्वामी खरं तर अत्यंत हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती होती. सुरुवातील वृत्तीने राष्ट्रवादी असलेले हे रामस्वामी डॉ  अ‍ॅनी बेझंट  यांच्या होमरूल चळवळीत सहभागी झाली होते. पण नंतर त्यांनी एकदम वेगळी आणि हटवादी भूमिका घेतली. त्रावणकोर राज्य स्वतंत्र राहील, ते भारतात सामील होणार नाही असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेला भोपाळचे महाराजा आणि जीना या दोघांचा पाठ...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग बारा

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग बारा  सरदार पटेलांनी भारतात विखुरलेल्या विविध संस्थानांचे विलीनीकरण करताना कृष्णनीती अवलंबली. काही संस्थानिकांना चुचकारून, काहींना गोड बोलून, काही संस्थानिकांना अस्थिरतेची भीती दाखवून तर काहींना सैनिकी कारवाईचा धाक दाखवून त्यांनी भारतीय संघराज्यात सामील करून घेतले. श्रीकृष्णाने त्याच्या मार्गात आड येणाऱ्या कालयवन, जरासंध इ बलवान राजांना युक्तिप्रयुक्तीने मारले. हे करताना त्याने प्रजेला कोणतेही नुकसान होणार नाही, निरपराध सैनिकांचा बळी जाणार नाही याची काळजी घेतली. त्याचप्रमाणे सरदार पटेलांनीही संस्थानांचे विलीनीकरण करताना देशाचा पैसा, मनुष्यबळ खर्ची पडणार नाही याचा विचार प्राधान्याने केला. त्या त्या राज्यातील जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. अर्थात कालयवन, जरासंध हे जसे श्रीकृष्णाचे शत्रू होते, तसे संस्थानिक हे शत्रू नव्हते. ते आपलेच भारतीय देशबांधव होते याची जाण सरदार पटेलांना होती. शिवाय त्यांच्यावर आक्रमण केल्याने संबंधात कायमची कटुता येण्याचा संभव ...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग अकरा

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग अकरा  भारतीय स्वातंत्र्याची पहाट दृष्टीपथात येत असताना तत्कालीन गांधी, नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारख्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यातील सर्वात मोठे आव्हान होते भारतातील संस्थानांचे. भारतात ५६५ छोटीमोठी संस्थाने होती. इंग्रजांनी आणि मुस्लिम लीगने या संस्थानामध्ये दुहीची बीजे पेरली होती. या संस्थानांचे प्रमुख ब्रिटिशांची हाजीहाजी करण्यात धन्यता मानत होते. आपली संस्थाने शाबूत राहावीत यासाठी त्यांनी जणू लाचारीचा पत्करली होती. काही संस्थानांची आणि त्यातील जनतेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी जनतेची अवस्था होती. याला एकच पर्याय होता आणि तो म्हणजे या राज्यांनी नव्याने निर्माण होत असलेल्या भारतीय संघराज्यात सामील होणे. यातच त्यांचे हित होते.  ब्रिटिशांनी या संस्थानांसमोर तीन पर्याय ठेवले होते. भारतीय संघराज्यात सामील होणे, पाकिस्तानात सामील होणे किंवा स्वतंत्र राहणे. काही संस्थानिक काँग्रेसच्...

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग दहा

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग दहा  स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्व लोक धर्म, जातीपाती, भाषा, प्रांतभेद विसरून एकत्र आले होते, त्याला बॅ जीनांसारख्या नेत्यांमुळे ग्रहण लागले. त्यांनी मुस्लिम लीगच्या नेतृत्वाखाली लोकांना धर्माच्या नावाखाली वेगळे पडण्यास सुरुवात केली. या गोष्टीला अर्थातच ब्रिटिशांची फूस होती. काँग्रेस आणि काँग्रेसचे नेहरू, गांधी यांच्यासारखे नेते हतबल झाले होते. व्हाईसराय वेव्हेल यांनी जीनांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे त्यांना मोकळीकच दिली होती.  मुस्लिम लीगने पंजाब आणि सरहद्द प्रांतात जाणीवपूर्वक दंगे घडवून आणून रक्तपात घडवला होता. त्यांनी ' प्रत्यक्ष कृतीच्या ' नावाखाली थेट हल्ले करून अमृतसर, रावळपिंडी, मुलतान, झेलम, अबोटाबाद या शहरात भयंकर दंगे घडवून आणले. हातात घातक शस्त्रे घेऊन तीन ते चार हजार जणांचा जमाव निःशस्त्र हिंदूंवर चालून गेला. या लोकांनी अनेक निरपराध हिंदू, शिखांना ठार मारले. महिला आणि मुलींवर अनन्वित अत्याचार केले. या काळात सरदार पटे...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग नऊ

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग नऊ  स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस जरी सर्वात मोठा आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेला पक्ष होता तरी या पक्षाने त्या वेळी ज्या काही चुका केल्या, त्याची फळे देशाला आजतागायत भोगावी लागत आहेत. पण याची फारशी माहिती आपल्याला नसते. या काळात सरदार पटेल यांच्यासारख्या धोरणी आणि दूरदर्शी नेत्याला या बाबत फार काही करण्याची संधी दिली गेली नाही. अन्यथा आज चित्र वेगळे दिसले असते.  १९४२ मध्ये गांधीजींनी जी ' चले जाव ' चळवळ सुरु केली होती, त्यामुळे इंग्रज सरकारने काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली होती. ते तुरुंगातून तीन वर्षांनी सुटले. तोपर्यंत जीनांसारख्या जातीयवादी नेत्यांचे फावले होते. त्यांनी तोपर्यंत आपली पाळेमुळे बळकट केली होती.  याच सुमारास केंद्रीय आणि प्रांताच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. खरं तर या निवडणुकांमुळे कोणताही प्रश्न सुटणार नव्हता. तसेच काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते देखील तुरुंगात होते. अशा परिस्थितीत निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश म...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग आठ

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग आठ  स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद खूपच वाढले असा तो १९४१-४२ चा काळ होता. आज ज्यांना आपण त्याकाळातील मोठे नेते मानतो, असे नेते देखील वैयक्तिक हेवेदावे, स्वार्थ, सत्तेची आस इ च्या अधीन होऊन स्वराज्य आणि स्वातंत्र्य यांना न कळत दुय्यम स्थान देऊ लागले होते. प्रांताप्रांतात निवडणुका होऊन महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सरदार पटेल या त्रयींमुळे काँग्रेस सरकारे सत्तेवर आली होती. पण ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा ( डिव्हाइड अँड रुल ) या नीतीचा परिणाम दिसू लागला होता. सरकारमधील काँग्रेसचे काही डाव्या विचारांचे नेते ब्रिटिशांच्या अपप्रचाराला बळी पडले होते. त्यांनी कायदेमंडळातून राजीनामे दिले होते. यातूनच जीनांसारख्या फुटीरतावादी नेत्यांचे फावले. त्यांना ब्रिटिशांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. ब्रिटिशांनीही जीना हेच काँग्रेसला पर्याय आहेत अशी जीनांची प्रतिमा निर्माण केली.  १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. या युद्धात ब्रिटनला भारताची मदत हवी होती. ...