उगवतीचे रंग असे देश असे नेते - भाग एक सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू जगातील अनेक देशांवर ब्रिटिशांचे साम्राज्य होते. पण हळूहळू हे देश पारतंत्र्याच्या बंधनातून मुक्त झाले. हे देश जसजसे स्वतंत्र झाले, तसतशी त्यांच्या क्षमतेनुसार, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार त्यांनी प्रगती केली. अनेक अविकसित राष्ट्रांचे विकसित राष्ट्रात रूपांतर झाले. या प्रगतीत त्या त्या देशातील जनता आणि त्या जनतेला दिशा देणारे नेतृत्व यांचा मोठ्या प्रमाणावर हात होता. आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर १८ वर्षांनी स्वातंत्र्य आणखी एका देशाला स्वातंत्र्य मिळाले. आग्नेय आशियातला हा टिकलीएवढा देश. ना शेतीयोग्य जमीन, ना नैसर्गिक साधनसंपत्ती. क्षेत्रफळ म्हणाल तर भारतातील एखाद्या राज्याएवढे. केवळ ७१०चौ. किमी चे हे बेट. त्याच्याजवळील ६३ बेटांचा समावेश या देशात होता. किमी. लोकसंख्या असेल साधारणपणे ५८ लक्ष. त्यातही विविध धर्म, विविध भाषिक, विविध वंशाचे लोक, गरिबी पाचवीला पुजलेली, अशिक्षित लोक, भ्रष्टाचाराची बजबजपुरी, अस्वच्छतेचे माहेरघर अशा समस्यांन...