मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रवींद्रनाथ टागोर वारसा आणि कार्य - भाग २५

  उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर वारसा आणि कार्य - भाग २५ रवींद्रनाथांच्या आणखी काही कादंबऱ्या  १९१६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या त्यापैकी एक होती 'घरे बाहिरे 'आणि दुसरी होती ' चतुरंग.' ' चतुरंग ' ही एक सामाजिक कादंबरी आहे. या कादंबरीत नावाप्रमाणेच चार व्यक्तींच्या स्वभावाचे चार रंग रवींद्रनाथांनी दाखवले आहेत. या चारही व्यक्ती म्हणजे गावोगावी फिरणारे आणि कीर्तन करून समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार आहेत. जेव्हा व्यक्तीच्या जीवनात संघर्ष सुरू होतो तेव्हा मानसिक संतुलन राखण्यासाठी व्यक्ती जी प्रयत्नांची पराकाष्ठा करते, त्याचे सूक्ष्म चित्रण या कादंबरीत रवींद्रनाथांनी केले आहे. त्यातून त्यांचा मानवी स्वभावाचा सूक्ष्म अभ्यास दिसून येतो. रवींद्रनाथांच्या कादंबऱ्यांमध्ये ' गोरा 'या कादंबरीचा अपवाद वगळला तर अनेक साहित्य रसिकांना त्यांची ' चतुरंग ' ही कादंबरी खूप भावते. त्यांच्या ' घरे बाहिरे ' या कादंबरीला बंगालच्या फाळणीची पार्श्वभूमी आहे. या कादंबरीत निखिल, संदीप आणि विमला अशी तीनच पात्रे आहेत. त्यांच्या आत्मनिवेदनात...

रवींद्रनाथ टागोर वारसा आणि कार्य - भाग २४

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर वारसा आणि कार्य - भाग २४  कादंबरीकार रवींद्रनाथ  मागील भागात आपण रवींद्रनाथांच्या ' नष्टनीड ' या लघु कादंबरीचा आढावा घेतला. आज त्यांच्या आणखी काही कादंबऱ्यांविषयी जाणून घेऊया. काव्यलेखनाला रवींद्रनाथांनी अगदी लहान असतानाच सुरुवात केली होती परंतु कादंबरीच्या प्रांतात त्यांनी त्या मानाने बऱ्याच उशिरा प्रवेश केला. साधारणपणे वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी कादंबरी लेखनास सुरुवात केली. त्यांच्या आधी बंगालमध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहून कादंबरी या साहित्य प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. बंकिमचंद्र यांच्या ' आनंदमठ ' या कादंबरीला बंगालमध्ये अतिशय लोकप्रियता लाभलेली होती. बंकिमचंद्रांच्या इतर अनेक चाहत्यांप्रमाणे या कादंबरीचे वाचन रवींद्रनथांनी सुद्धा केले होते. त्यातूनच आपणही कादंबरी लेखन केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. ' बौ ठाकुरणीर हाट ' ही त्यांची पहिली कादंबरी. ही कादंबरी म्हणजे कौटुंबिक कथाच आहे. यानंतर वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी ' राजर्षी ' ही दुसरी कादंबरी लिहिली. ही त्यांची एक ऐतिहासिक क...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग २३

  उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग २३ आणखी एक कथा - नष्टनीड  रवींद्रनाथांच्या कथांचा आढावा आपण घेत आहोत. मागील २१ आणि २२ या  भागात आपण त्यांच्या काही लघुकथा पाहिल्या. आजच्या या भागात त्यांची एक दीर्घकथा किंवा जिला लघु कादंबरी असेही म्हणता येईल, अशा नष्टनीड कथेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.  नष्टनीड ही टागोरांची अतिशय लोकप्रिय कथा आहे. या कादंबरीवर सत्यजित रे यांनी ' चारुलता ' या नावाचा सुंदर चित्रपट काढला आहे. १९६४ मध्ये हा चित्रपट आला. या चित्रपटामध्ये तत्कालीन बंगालमधील वातावरण बघायला मिळते. अनेक कलात्मक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या सत्यजित रे यांचा हा स्वतःचा अतिशय आवडता असा चित्रपट. या चित्रपटाचे कथानक थोडक्यात असे आहे. भूपती हा एक लिहिण्याची आवड असलेला पत्रकार आहे. पण साहित्यविषयक लेखन त्याला आवडत नाही राजकीय घटनांमध्ये त्याला रस आहे. तो स्वतःचे इंग्रजी वर्तमानपत्र सुरू करतो. खरे तर भूपती हा गर्भश्रीमंत आहे आणि त्याला काही कामधंदा करण्याची आवश्यकता नाही. परंतु आपली आवड म्हणून तो ही पत्रकारिता करीत असतो. या भूपतीचे लग्न चारुलता ना...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग २२

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग २२ रवींद्रनाथांच्या काही स्त्रीपात्र प्रधान कथा  आजच्या या भागात रवींद्रनाथांच्या काही स्त्रीपात्र प्रधान कथा आपण पाहणार आहोत. या कथांमधून त्यांनी सर्वसामान्य स्त्रीच्या जीवनातील सुखदुःखे मांडली आहेत. त्यांच्या अंतरातील व्यथा, वेदना, तळमळ या गोष्टी यातून व्यक्त झाल्या आहेत. काही कथांमध्ये ही स्त्री सोशिक आहे, अन्याय, अत्याचार सहन करणारी आहे.  काही ठिकाणी ती अत्यंत स्वाभिमानी आणि बाणेदार आहे. परिस्थितीविरुद्ध बंड करणारी आहे. पण रवींद्रनाथांच्या सर्व कथांमध्ये एक समान धागा आपल्याला दिसतो. त्यांनी स्त्रीची प्रतिष्ठा जपली आहे. तिच्या सन्मानाला धक्का लागू दिलेला नाही. काही कथांमधील स्त्रिया या काळाच्या दृष्टीने खूपच पुढारलेल्या वाटतात. त्यातूनच रवींद्रनाथांचा सामाजिक आणि स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. काही ठिकाणी पुरुषी मानसिकतेला त्या पुरून उरताना दिसतात. त्यांना दोन शब्द सुनावण्याची हिम्मत त्यांच्यात आहे. समाजाला दिशा देण्याची मानसिकता त्यांच्यात आहे. एक स्त्री म्हणून स्वतःच्या विकासाकडे त्या वाटचाल करताना...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग २१

उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग २१   कथाकार रवींद्रनाथ : भाग दोन  मागील भागापासून रवींद्रनाथांच्या कथाविश्वाचा आढावा घ्यायला आपण सुरुवात केली आहे.   रवींद्रनाथांच्या कथांना निसर्गाची नुसतीच पार्श्वभूमी लाभली आहे असे नाही. त्यांच्या कथांमध्ये निसर्ग आणि माणूस हातात हात घालून चालतात. किंबहुना माणूस हा निसर्गाचा एक भाग झालेला दिसतो. निसर्गात होणाऱ्या फेरबदलांची पार्श्वभूमी मानवी भावभावनांना लाभलेली दिसते. परंतु शेवटी त्यांच्या कथेत महत्वाचा आहे तो माणूस. माणसाच्या स्वभावाचे, वागण्याबोलण्याचे एवढे जिवंत वर्णन त्यांच्या कथेत आलेले असते की त्यांची पात्रे दीर्घकाळ आपल्या मनात घर करून राहतात. या भागात आपण त्यांच्या तीन कथा थोडक्यात पाहू. काबुलीवाला, अंध भिकारीण आणि अतिथी.  काबुलीवाला ही रवींद्रनाथांची अतिशय लोकप्रिय कथा आहे. या कथेवर पूर्वी चित्रपटही निघाला होता. या चित्रपटात अभिनेते बलराज साहनी यांची प्रमुख भूमिका होती. आपल्यापैकी अनेकांनी तो पाहिलाही असेल. शालेय पाठ्यपुस्तकातही या कथेचा समावेश होता. ही कथा थोडक्यात अशी आहे. मिनी नावाची एक छोटी पाच ...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग २०

उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग २०   कथाकार  रवींद्रनाथ  मागील काही भागात रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे काव्यविश्व अफाट आहे. दोन अडीच हजारांवर त्यांनी कविता लिहिल्या आहेत. त्यामुळे काही निवडक कवितांबद्दल आणि त्यांच्या काव्यलेखनातील प्रतिभेबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या भागापासून त्यांच्या कथाविश्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू या.  रवींद्रनाथ हे प्रकृतीने, स्वभावाने मूलतः कवी होते. असे जरी असले तरी जेव्हा कवितेचे माध्यम त्यांना व्यक्त होण्यासाठी अपूर्ण वाटले, तेव्हा त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, संगीत, चित्रकला आदी वाङ्मय आणि कलाप्रकारांचा देखील अवलंब केला. चतुरस्त्र प्रतिभेचे धनी असलेले रवींद्रनाथ कलेच्या विविध अंगानी व्यक्त झाले. शिक्षण, साहित्य, तत्वज्ञान अशा वेगवेगळ्या प्रांतात संचार करून आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा त्यांनी उमटवला. त्यासोबतच प्रचंड कार्यही केले. प्रवास केला. एकाच व्यक्तीच्या प्रतिभेचे हे अफाट कर्तृत्व पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.  काव्यलेखनाला रवींद्रनाथांनी बा...

प्रसन्न वदने..

  उगवतीचे रंग  प्रसन्न वदने.. " सुनीता, चहा आणतेस का जरा ? आणि येताना पाणी पण घेऊन ये," रमेशरावांनी बाहेरच्या पोर्चमधून आवाज दिला. दुपारी थोडा वेळ झोपायचं आणि उठल्यावर बाहेर पोर्चमध्ये येऊन बसायचं, बाहेर खुर्च्या टाकलेल्याच असायच्या. रमेशराव आपलं एखादं आवडतं पुस्तक किंवा वर्तमानपत्र घेऊन बाहेर बसायचे. हा त्यांचा रोजचा आवडता उद्योग होता. त्यांच्या घराच्या बाहेर छोटासा पोर्च होता. आजूबाजूला छोटीशी बाग होती. बागेतील फुलझाडे सुनीताबाईंनी मोठ्या आवडीने लावली होती. बाहेरची मोकळी हवा त्यांना फार आवडायची.  सुनीताबाईंनी चहा आणि सोबतच रमेशरावांना आवडणारी बिस्किटे पण आणली. सुनीताबाई आणि रमेशरावांची मुलं पुण्याला होती. ते अधूनमधून पुण्यात जात असत. जाताना किंवा येताना ते वाटेतील सुपा गावात थांबून तेथील बेकरीत चांगल्या तुपापासून बनवलेली खास कणकेची बिस्किटे घेत. ही बिस्किटे रमेशरावांची फार आवडती.  चहा बिस्किटांचा आस्वाद घेता घेता रमेशराव म्हणाले, " मग काय प्लॅन आता ? नवरात्र जवळ आलंय. लगेच दसरा आणि दिवाळी. "  " अहो, खूप कामं आहेत. एवढं मोठं घर आपण घेतलं. त्यावेळी छान वाटलं. प...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १९

   उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १९ रवींद्रनाथांची अफाट आणि विस्मयकारक काव्यसृष्टी  गेल्या काही भागांपासून रवींद्रनाथांच्या काव्यसृष्टीचाआढावा घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. हा आढावा म्हणजे टागोरांच्या काव्यसृष्टीला केलेला केवळ स्पर्श आहे याची मला जाणीव आहे. एखाद्या मोठया प्रासादात विविध दालने असावीत आणि त्यातील काही दालनेच पाहता यावीत, त्यानेच डोळे दिपून जावेत तसे माझे झाले आहेत. त्याची काव्यसृष्टी म्हणजे सागर आहे. कितीही वेळा खोल बुडी मारली तरी प्रत्येक वेळी मौल्यवान रत्ने, मोती हाताला लागतील.  टागोरांनी जवळपास दोन अडीच हजार कविता लिहिल्या. नुसत्या कविताच लिहिल्या असं नाही तर त्यातील बऱ्याच कवितांना चाली दिल्या. रवींद्रनाथ थोर साहित्यिक असले तरीही त्यांचा जीव जडला होता तो कविता या साहित्यप्रकारावर. कवितेशी त्यांचं नातं अतूट होतं, आजन्म होतं. आपल्या पुतणीला लिहिलेल्या एका पत्रात ते आपलं आणि कवितेचं नातं स्पष्ट करतात.  " कविता ही माझी पूर्वीपासूनची प्रेयसी. मला वाटतं मी रथीच्या ( रवींद्रनाथाचा मुलगा रथींद्रनाथ )वयाचा होतो तेव्हाच तिच्...

अर्थ नवा

 उगवतीचे रंग  अर्थ नवा...  एका प्रसन्न सकाळी घरासमोरील बागेत मला जास्वंदीच्या झाडावर एक सुंदर फुल उमललेलं दिसलं. ते जणू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होतं. मी थोडावेळ तिथंच थांबलो. त्या फुलानं माझ्या विचारांना गती दिली. ते विचार तुमच्यासमोर मांडतोय. रचना म्हटली तर गद्यात, म्हटली तर पद्यात. पण रचनेपेक्षा मनातील भाव महत्वाचा, काहीसा काव्यात्मकच !  अर्थ नवा..  हे फुला, तू इतका सुंदर उमलला आहेस की  असं वाटतं तुझ्यापासून क्षणभरही दूर जाऊ नये.  किती लालभडक रंग तुझ्या त्या पाकळ्यांचा ! पाकळ्यांची नाजूकता तरी केवढी !  जणू उलगडलेली रेश्माची लडी ! सांगशील का मला तुझ्या जन्माचे रहस्य  आलास तू कुठून कसा, घेऊन हे सुहास्य ? फांदी हिरवी, पाने हिरवी, खोड सावळ्या रंगाचे  तरी लाभले कुठून तुला रे हे लेणे प्रसन्न वर्णाचे ?  काल पाहिली तुझ्याच जागी नाजूक एक कळी ती कोमल.  कळी कसली ती ?  मजला वाटे एक चिमुकली गोड परी. हिरवे हिरवे वस्त्र तिचे अन् ओठांवरती नाजूक लाली.  ऐकले होते कधी कुठे मी, जीवनात अपुल्याही येते परी  आणि जाताना देऊन जा...