मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रामकथा - भाग वीस ( रामायणकालीन शासन व्यवस्था )

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग वीस ( रामायणकालीन शासन व्यवस्था )  आधीच्या लेखात आपण रामायणकालीन समाजाची थोडक्यात माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. रामायणकालीन समाजाची काही मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा समाज मानवी समाजाच्या एका प्रगत पातळीवर जगत होता. आज आपल्याला अक्षरशः स्वप्नवत वाटेल अशा प्रकारचे जीवन या लोकांचे होते. उच्च नैतिक मूल्यांचे पालन, आपल्या कार्याला धर्माचे अधिष्ठान, त्याग, सेवावृत्ती आणि सहकार्य यावर आधारित जीवनशैली त्यांची होती. सर्वात महत्वाचे म्हणजे मी समाजाचे काही देणे लागतो, ही भावना प्रत्येकामध्ये न सांगताही जागृत होती. याच भावनेतून लोक स्वेच्छेने कर ( व्हॉलंटरी टॅक्स पेयिंग ) देत होत होती. या रामायणकालीन जनतेचे मला काही विशेष वाटेल असेल तर ते हे आहे की ही जनता आनंदी होती. रामराज्यात दीन, दुःखी, भिकारी, लाचार असा कोणी नव्हता. आज संयुक्त राष्ट्रांतर्फे जगातील आनंदी राष्ट्रांची यादी जाहीर केली जाते. त्याला आनंदाचा निर्देशांक ( हॅपिनेस इंडेक्स ) म्हटले जाते. रामराज्यात हा आनंदाचा निर्देशांक सर्वात जास्त होता म्हणून तर रामराज्...

रामकथा - भाग एकोणीस ( रामायणकालीन समाज )

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग एकोणीस ( रामायणकालीन समाज ) गेले काही दिवस आपण रामकथेवर चर्चा करतो आहोत. श्रीराम, रामायण आणि रामराज्य हे समजून घेत असताना रामायणकालीन समाज कसा होता हे पाहणे उद्बोधक ठरते. रामायणकालीन समाजाबद्दलची अधिकृत माहिती मिळण्याचा प्रमुख स्रोत म्हणजे वाल्मिकी रामायण. वाल्मिकींचा जीवनकाल आणि रामायण किंवा रामराज्य हे समकालीन आहेत. रामायणाच्या बालकांडात अयोध्येतील लोकांचे आणि तत्कालीन समाजाचे सुंदर वर्णन वाल्मिकींनी केले आहे. प्रसिद्ध संस्कृत कवी भवभूती याच्या उत्तररामचरितमानस या ग्रंथातही भवभूती रामायणकालीन समाजाचे सविस्तर वर्णन करताना दिसतात.  रामायणकालीन समाज हा धर्मनियंत्रित होता असे प्रामुख्याने म्हणावे लागेल. त्यांच्या प्रत्येक कृतीच्या मागे धार्मिक अधिष्ठान होते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आपण भारतीय संस्कृतीत मानतो. पण रामायणकाळात अर्थ, काम आणि मोक्ष हे जे तीन पुरुषार्थ आहेत, त्यांना धार्मिक अधिष्ठान होते. त्यामुळे आपोआपच नैतिक मूल्यांचे पालन होऊन वाईट गोष्टींना आळा बसत होता. रामायणकाळात वर्णाश्रम व्यवस...

रामकथा -भाग अठरा ( राम आणि रावण )

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा -भाग अठरा  ( राम आणि रावण )  रामायणातील महत्वाच्या पात्रांचा आपण आतापर्यंत आढावा घेतला. रावण, कैकयी, मंथरा,  वाली अशी काही पात्रे सोडली तर, इतर पात्रांनी आपल्यापुढे आपल्या वागणुकीने आदर्श उभे केले आहेत. केवळ राम सीताच नव्हे तर लक्ष्मण, भरत, हनुमान आदींनी त्यांच्या वागणुकीतून चारित्र्याचे, सेवेचे आणि भक्तीचे उच्चतम आदर्श आपल्यापुढे ठेवले आहेत. अनेक युगे लोटली तरी हे आदर्श काळाच्या ओघात नष्ट झाले नाहीत यातच त्यांची महानता आहे. आजच्या या लेखात आपण राम आणि रावण यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत, पण ती वेगळ्या अंगाने. राम आणि रावण या व्यक्ती म्हणून रामायणकाळात होत्या. आज त्या अस्तित्वात नाहीत. पण राम आणि रावण या दोन प्रवृत्ती आहेत, असा जर विचार केला तर या दोन्ही व्यक्ती प्रवृत्तीरूपाने आजही अस्तित्वात आहेत.  ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत ' हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर, आपणचि जाला ' असे म्हटले आहे. हा खूप व्यापक विचार ज्ञानदेवांनी आपल्याला दिला आहे. पण तो जगून दाखवला तो रामासारख्या युगानुगाचे दीपस...

रामायणकालीन समाज, शिक्षण व शासनव्यवस्था

 रामायणकालीन समाज, शिक्षण व शासनव्यवस्था                                                                                                                   - विश्वास देशपांडे, चाळीसगाव    रामायणकालीन समाज आणि शासनव्यवस्थेवर लिहिताना माझा ऊर अभिमानाने भरून येत  आहे. तो यासाठी की अशा प्रकारची आदर्श समाजरचना कोणे एके काळी आपल्या देशात विद्यमान होती. आज जेव्हा आपण आपल्या कुटुंब व्यवस्थेचा, समाज व्यवस्थेचा आणि शिक्षण व्यवस्थेचा विचार करतो, तेव्हा रामायणकालीन समाजव्यवस्थेतील फरक आपल्या नजरेत ठळकपणे भरतो. हा फरक सगळ्याच बाबतीत पडलेला आहे. शिक्षणपद्धती, कुटुंबव्यवस्था, शासन संस्था या सगळ्यांमध्ये कमालीचा बदल झालेला आहे. आज जेव्हा आपली भौतिक प्रगती झाली आहे, अनेक नवनवीन शोध लागत आहे...

रामकथा - भाग सतरा ( रामकथेचे महत्व - भाग दोन )

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग सतरा  ( रामकथेचे महत्व - भाग दोन )  रामकथा आजपर्यंत अनेक विद्वान आणि ज्यांची वाणी रसपूर्ण आहे अशा अनेक अधिकारी व्यक्तींनी सांगितली आहे. आपण सर्वानी ती वेगवेगळ्या ठिकाणी ऐकली, पाहिली किंवा वाचली असेल. तरीही माझ्यासारख्या एका अतिसामान्य व्यक्तीकडून आपण ती ऐकत आहात, वाचत आहात हे माझे केवढे भाग्य !  मला खरोखर प्रश्न पडतो की वाल्मिकींसारख्या तपस्वी मुनींनी रामायण का लिहिलं असेल ? आपली साधना, तपस्या सोडून हा ग्रंथ लिहिण्यासाठी कर म्हणून प्रवृत्त झाले असतील ? राम आणि रावणाचं जे युद्ध झालं त्याने वाल्मिकी प्रभावित झाले असावेत का ? पण मग इतिहासात तर अशी अनेक युद्धे झाली. त्यासाठी एवढी प्रदीर्घ कथा लिहिण्याची काय गरज होती ? वाल्मिकींनी लवकुशांना रामायण शिकवले आणि त्यांच्याकडून ते मुखोद्गत करून घेतले, ते रामापुढे केवळ सांगण्यासाठी ? की ते रामायण राम नावाच्या चक्रवर्ती सम्राटापुढे ठेवून त्यांना त्याच्याकडून काही अपेक्षा होती ? माझ्या रसिक वाचक मित्रानो, यापैकी कोणताही उद्देश वाल्मिकींचा नव्हता.  रामायण काळात म...

रामकथा - भाग सोळा ( रामकथेचे महत्व भाग एक )

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग सोळा ( रामकथेचे महत्व भाग एक )  नमस्कार रसिक वाचकहो,  एवढे दिवस रामकथा तिच्यातील पात्रांच्या संदर्भात आपण पाहिली. श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, भरत, रावण, बिभीषण, उर्मिला आदी वेगवेगळी चरित्रे पाहिली . रामकथा म्हणजे वाल्मिकींनी गुंफलेला एक सुंदर फुलांचा हार. रामायणातील ही सगळी पात्रे म्हणजे त्यातील सुंदर फुले. त्या फुलांना एकत्र बांधून ठेवणारे सूत्र म्हणजे श्रीराम. या दोन भागात आपण आजच्या काळात रामकथा का वाचायची याचा विचार करणार आहोत.  आपल्या या भारत देशात अनेक मौल्यवान धार्मिक आणि अध्यात्मिक ग्रंथ आहेत. परंतु समर्थ रामदासांना या रामकथेचीच मोहिनी पडली. सर्व कथांमध्ये त्यांना रामकथा अधिक गोड वाटते. म्हणून ते म्हणतात, ' समस्तांमधे कथा गोड या राघवाची. ' ही  रामकथा ब्रह्माण्ड भेदून पलीकडे न्यावी असं समर्थ म्हणतात. या रामकथेचा गोडवा ती कितीही ऐकली तरी कमी होत नाही. हजारो वर्षांपासून येथील लोक रामकथा ऐकत आले आहेत, सांगत आले आहेत. रामायण हे दूरदर्शनवरील धारावाहिक अनके वर्षांनी पुन्हा लागले होते. पण लोकांन...

रामकथा भाग चौदा ( हनुमान - उत्तरार्ध )

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा भाग चौदा ( हनुमान - उत्तरार्ध )  हनुमान लंकेस जाण्याआधी त्याची जणू तीन प्रकारची परीक्षा नियतीने घेतली. त्याच्या बुद्धिमत्तेची, धैर्याची आणि स्वामी निष्ठेची. पण या तीनही परीक्षेत तो लीलया आपल्या बुद्धिचातुर्याने उत्तीर्ण झाला. कारण त्याचे ध्येय निश्चित होते, आपल्या स्वामींवर म्हणजेच रामावर आणि त्याच्या कार्यावर अतूट श्रद्धा होती. त्याने लंकेसाठी जेव्हा उड्डाण केले तेव्हा, नागमाता सुरिका त्याच्यासमोर आली. तू माझे खाद्य आहेस. माझ्या तोंडातून बाहेर पडू शकलास तर पुढे जाता येईल असे तिने हनुमानाला सांगितले. हनुमान आपल्या प्रसंगावधान आणि बुद्धिचातुर्यामुळे या प्रसंगातून बाहेर पडला एवढेच नव्हे तर नागमाता सुरिकेचा आशीर्वादही त्याला प्राप्त झाला. पुढे समुद्रात असणारा मैनाक पर्वत विविध प्रलोभने घेऊन त्याच्यासमोर आला आणि तू या ठिकाणी थोडी विश्रांती घे अशी विनंती त्याला करू लागला. परंतु त्याही प्रलोभनानाला हनुमान बळी पडलेला नाही. ज्याची आपल्या ध्येयावर आणि कार्यावर दृढ निष्ठा असते, त्याच्या मार्गात अशी अनेक प्रलोभने येतातच. जो या प्...

रामकथा - भाग तेरा ( हनुमान )

 उगवतीचे रंग  रामकथा - भाग तेरा  ( हनुमान - पूर्वार्ध )  संपूर्ण रामायणाचा जर विचार करायचा झाला तर रामायणामध्ये रामाचे वनवासात जाणे, सीतेचे रावणाने हरण करणे आणि नंतर रामाने वानरांच्या आणि अन्य लोकांच्या मदतीने रावणाशी युद्ध करून रावणाला ठार मारणे आणि सीतेसह अयोध्येत परत येणे अशी महत्वाची कथा स्थूलमानाने सांगता येईल. अशा या रामायणात किष्किंधाकांडापासून  हनुमानाचा प्रवेश होतो. संपूर्ण रामायणात हनुमानाच्या चरित्राला एक आगळेवेगळे महत्व आहे. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात राहत असताना, रावणाचा मामा मारीच सुवर्ण मृगाचे रूप घेऊन येतो. त्याच्या त्या मायावी रूपाची मोहिनी सीतेवर पडते. त्याच्या शोधार्थ सीता रामाला त्या सुवर्ण मृगामागे पाठवते. पुढे तो मारीच रामाचा आवाज काढून लक्ष्मण आणि सीतेला आपल्याला वाचवण्यासाठी आर्त साद घालतो. लक्ष्मणाला हा मायावी आवाज आहे हे समजते पण रामाच्या प्रेमाने व्याकुळ झालेल्या सीतेला तो आवाज खरा वाटतो आणि  लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी पाठवते. या परिस्थितीचा फायदा घेऊन रावण सीतेला पळवून नेतो.  इथून पुढे रामाच्या सीतेचा शोध...

रामकथा - भाग बारा ( बिभीषण )

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे , चाळीसगाव  रामकथा - भाग बारा ( बिभीषण )  बिभीषण हे रामायणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व. रावणाचा सख्खा भाऊ असला तरी त्या दोघांच्या स्वभावात जमीन अस्मानाचं अंतर आहे. एक सद्वर्तनी, सदाचारी आणि धर्मपरायण आणि दुसरा विद्वान आहे, शूर आहे पण दुराचारी, अनीतीने वागणारा आहे. राक्षसकुळात जन्म घेऊन सुद्धा बिभीषण आपल्या कर्तव्याने आणि विचाराने एक वेगळी उंची गाठतो. बिभीषण हा रामाचा परमभक्त आहे, सेवक आहे.  ' दैवायत्तम कुले जन्म, मदायत्तम तू पौरुषम .' हे वचन सार्थ ठरवणारा तो आहे. कोणत्या कुळात जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसते, पण आपल्या कर्तृत्वाने आपले मोठेपण आपल्याला सिद्ध करता येते असा या वचनाचा अर्थ आहे.  बिभीषणावर काही लोक आक्षेप घेतात, आरोप करतात. काहींना असे वाटते की बिभीषण हा कुलद्रोही, देशद्रोही आहे. संकटाच्या काळी आपला भाऊ रावण याच्या सोबत उभे राहण्याचे सोडून तो शत्रू पक्षाला जाऊन मिळतो. तो ज्या कुलात जन्मला, त्या राक्षस कुळाला त्याने आपल्या वागण्याने कलंक लावला. आपल्या राष्ट्राशी द्रोह केला. पण या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. ...

रामकथा - भाग अकरा ( श्रीराम -भाग ३ )

 उगवतीचे रंग   विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग अकरा ( श्रीराम -भाग ३ ) रामायण म्हणजे ' वाल्मीकींच्या भाव मनीचे. ' हे वाल्मीकींच्या मनीचे भाव तर रामाचे चरित्र रेखाटताना एका विशेष उंचीवर पोहोचले आहेत. रामायणातले लक्ष्मण, भरत, सीता, हनुमान आदी चरित्रे भव्यदिव्य तर खरीच, पण त्या सगळ्यांपेक्षा रामाचे व्यक्तिमत्व विशेष तेजाने आणि आपल्या अलौकिक कर्तृत्वाने झळाळून निघणारे आहे. रामरायाचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्षाची अखंड मालिका आहे. त्याचे संपूर्ण आयुष्य म्हणजे भावना आणि कर्तव्य यांच्यातील संघर्ष आहे. पण आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींमध्ये आणि रामामध्ये हा एक मोठा फरक आहे की आपल्या जीवनात बऱ्याचदा कर्तव्यापेक्षा भावनेला आपण श्रेष्ठ स्थान देतो. रामाचे जीवन म्हणजे कर्तव्यनिष्ठतेची पराकाष्ठा. त्याच्या आयुष्यात भावना आणि कर्तव्य यांच्यात नेहमीच कर्तव्याचा विजय झालेला आहे. आपल्या ध्येयापासून तो कधीही ढळलेला नाही. शिवाजी महाराजांच्या बद्दल समर्थ रामदास स्वामींनी जे म्हटले आहे "निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु, श्रीमंत योगी, जाणता राजा ' ते  सगळे वर्णन श्रीरामाल...

रामकथा - भाग दहा ( श्रीराम- भाग दोन )

उगवतीचे रंग  विश्वास  देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग दहा ( श्रीराम -भाग दोन ) ' जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे '  असे तुकाराम महाराज म्हणतात ते खरेच आहे. ऋषी वाल्मिकींनी रामायण का लिहिले त्याचे हेच कारण आहे. जगाच्या कल्याणासाठी. कारण रामरायांचा आदर्श त्यांना लोकांसमोर ठेवायचा होता. हा आदर्श लोकांसमोर ठेवण्यासाठी रामाला देवत्व प्रदान करून चालणार नव्हते. म्हणून मानव रूपातल्या श्रीरामाचा आदर्शच त्यांनी लोकांसमोर ठेवला. आपण श्रीरामाला विष्णूचा अवतार मानतो. वेद , उपनिषदे, पुराणे त्याचे गुणगान गातात, सकाळचे उषेचे आरक्त रंग आणि संध्यासमयीचे आकाशात उमलणारे सूर्यास्ताचे मनोहारी रंग, इंद्रधनुष्याचे सप्तरंग, ही मनोहर सृष्टी, आकाशात प्रकाशणारे चंद्रसूर्यादी तारे हे सगळे ज्याच्यामुळे प्रकाशमान होतात ती शक्ती म्हणजे राम. हे वाल्मिकींना माहित नव्हते का ? पण वाल्मिकींनी रामाचे हे रूप वाल्मिकी रामायणातून आपल्यासमोर आणले नाही. त्यांना त्याचे मानवी अवतारातील कार्यच दाखवायचे होते. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे होणारी त्याची वाटचाल दाखवायची होती. मानवजातीसमोर त्...

रामकथा - भाग नऊ ( श्रीराम भाग एक )

उगवतीचे रंग  रामकथा - भाग नऊ  ( श्रीराम भाग एक )  विश्वास देशपांडे, चाळीसगाव.  ( आज अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होतं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे. रामकथा या सुरु असलेल्या आपल्या लेखमालिकेत मी आज बिभीषणावर लिहिणार होतो पण आजच्या या शुभ दिवशी रामावरच लिहावं असं वाटलं. जणू त्यानंच बुद्धी दिली. ) श्रीरामाचे चरित्र हिमालयासारखं उत्तुंग आहे. कुठून आणि कशी सुरुवात करावी ते कळत नाही. इतर व्यक्तिरेखा लिहिताना मला असा प्रश्न पडला नाही. राम हा तेजोनिधी आहे. सदासर्वकाळ ज्याचे गुणगान करावं असं पावन व्यक्तिमत्व आहे. रात्री आकाशातल्या तारका चंद्रामुळे शोभून दिसतात. ज्याच्यामुळे रामायणातील व्यक्तिरेखारुपी तारे शोभून दिसतात असा चंद्र म्हणजे रामचंद्र आहे. आतापर्यंत रामायणातील अनेक पात्रांची चरित्रे आपण पाहिली. पण या सगळ्या पात्रांना ज्याच्यामुळे महत्व प्राप्त होते, असे सगळ्यात महत्वाचे सुपात्र म्हणजे श्रीराम. राम म्हणजे गुणांची खाण. राम म्हणजे सागराचे गांभीर्य. राम म्हणजे हिमालयासारखे अढळ धैर्य. राम म्हणजे तेजाचा सूर्य. जो जो या प्रकाशात न्ह...