मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १८

  उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १८ रवींद्रनाथांची सर्वात मोठी देणगी - जन-गण -मन रवींद्रनाथांची भारताला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती असा प्रश्न जर कोणी विचारला तर माझ्या मते आपल्या भारताचं राष्ट्रगीत ' जन-गण -मन ' ही आहे. कारण रोज भारतातील लक्षावधी शाळांची सुरुवात या राष्ट्रगीताने होते. कोटी कोटी कंठातून हे राष्ट्रगीत निनादते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी ध्वजाला प्रणाम करताना जेव्हा राष्ट्रगीताचे सूर कानी पडतात, तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. एखाद्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जाताना जेव्हा पडद्यावर राष्ट्रगीत सुरु होते, तेव्हा चित्रपटगृहात उपस्थित असलेली सगळी माणसे आपली भाषा, जात, धर्म, पंथ विसरून उभे राहून मानवंदना देतात, तेव्हा अभिमानाने रोमरोम फुलून येतो. कधी कुठे जाताना राष्ट्रगीताचे सूर कानी पडले तर नकळत पावले थांबतात. उभे राहा असे कोणी सांगावे लागत नाही. केवळ ५२ सेकंदात गायिले जाणारे हे राष्ट्रगीत रोमरोम पुलकित करते. जोपर्यंत हे सूर्य चंद्र आहेत, जोपर्यंत ही सस्यश्यामल भारतभूमी अस्तित्वात आहे, तोपर्यंत जन-गण-मन आहे आणि जोपर्यंत  जण-गण...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १७

  उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १७ अष्टपैलू  साहित्यिक  रवींद्रनाथ टागोरांवर ' रवींद्रनाथ : तीन व्याख्याने 'असं छोटेखानी पु ल देशपांडे यांचं एक पुस्तक आहे. त्याचा उल्लेख मी मागच्या एका भागात केला होता. हे पुस्तक इतकं सुंदर आहे की मोठमोठ्या ग्रंथांमध्ये देखील जो आशय आणि जे सौंदर्य क्वचितच दृष्टीस पडेल, ते केवळ या ११२ पाने असलेल्या पुस्तकात बघायला मिळतं. पु ल देशपांडे नावाच्या एका सिद्धहस्त लेखणीचा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा हा चमत्कार आहे. पु ल देशपांडे टागोरांबद्दल म्हणतात," रवींद्रनाथांची अशरीरिणी प्रतिभा मला त्यांच्या कथा कविता कादंबरी नाटक निबंध आहेत चित्र संगीत अशा रूपाने भेटत असते." रवींद्रनाथांसारखे महान साहित्यिक  जरी देहाने आज आपल्यात नसले तरी आपल्या साहित्याच्या रूपाने ते अजरामर आहेत. प्रसंगी हयात असणाऱ्या माणसाच्या भेटी देखील दुर्मिळ होतात किंवा मोठ्या कष्टाने होतात परंतु रवींद्रनाथांसारखी माणसे की ज्यांनी अपार असे साहित्यधन, अक्षर वाङ्मय मागे ठेवले आहे, ते त्यांच्या साहित्यातून आपल्याला हवे तेव्हा भेटू शकतात किंवा आपण त्यांना ...

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग १४

  उगवतीचे रंग  आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग १४ युरोपवारीचे आतापर्यंत १३ भाग झालेत. हा १४ वा भाग. खरं तर प्रवास वर्णन आता करून झालं आहे. मग मी असं काय सांगणार आहे आता ? पण आता आहेत मागे रेंगाळणाऱ्या मनातील आठवणी. एखाद्या मंदिरातील घंटा वाजल्यानंतरही नंतर मंद असा नाद ऐकू येतो, त्याला अनुनाद असा सुंदर शब्द आहे. घंटा कंपन पावत असते. अशाच अनुनादमय काही आठवणी, दृश्ये डोळ्यासमोर येतात. त्याच तुमच्याशी शेअर करण्याचा आनंद घेतोय.  लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवरून फिरत असताना एक सुंदर दृश्य नेहमी दिसायचे. एखादी तरुण आई किंवा वडील छोट्या बाबागाडीतून आपल्या सानुल्याला फेरफटका मारायला घेऊन जायचे. कधी कधी आजी आजोबाही हा आनंद घ्यायचे. त्या बाबागाडीत बसलेली किंवा क्वचित झोपलेली मुलं इतकी गोड, गोजिरवाणी, सुंदर आणि नाजूक दिसायची की असा मोह व्हायचा की पुढे जाऊन या मुलांना उचलून घ्यावं आणि त्या गोड चिमण्या बाळांचा मुका घ्यावा. लहान मुलं, मग ती कोणत्याही देशातील असो, कोणत्याही वर्णाची असो, ती गोडच दिसतात. तेव्हा अशा मुलांना उचलून घ्यावं हा मोह कोणालाही होणं साहजिकच आहे. अर्थात कोण...

मुंगीताई मुंगीताई…

  मुंगीताई मुंगीताई … मुंगीताई मुंगीताई थांब ना थोडं सोडवतेस का जरा मला पडलेलं कोड एवढासा जीव , एवढेसे पाय  जातेस कुठं, तुझं काम तरी काय  ? ।। १ ।।  जायचं असो कुठेही  खाली अथवा वर  कशाची नाही फिकीर  चालतेस किती भरभर ! ।। २ ।। भिंतीवरून चालताना, छतावरून पळताना  तू पडत नाहीस कशी ?  खाली पडण्याची भीती  तुला अजिबात नाही कशी ? ।। ३ ।। जाताना शाळेत तू दिसली नाहीस कधी  पण शिस्त पाळण्याची घाई तुला आधी.  कितीही असो गर्दी, कितीही असो घाई  रांगेची शिस्त तू कधी मोडतच नाही. ।। ४ ।। दिवस असो वा रात्र,   नाही तुला विश्रांती  दीर्घोद्योगानेच होते का  जीवनात क्रांती ?  ऐकून सारे प्रश्न माझे  मुंगीताई थांबली क्षणभर. ।। ५ ।। म्हणाली, ऐक बाळा, अरे  जीवन हीच आमची शाळा.  जीव असला छोटा, तरी  पाळतो आम्ही शिस्त  कार्यरत राहण्यावरच असते आमची भिस्त.  उद्योगातच जगणे रमणे, जीवन आमचे मस्त ! ।। ६ ।। कणाकणाने करतो संचय, क्षणक्षणाचा करून वापर  आयुष्याचे सूत्र असे हे, व्यर्थ न दवडा कण व...

वतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १६

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १६ विश्वकवी रवींद्रनाथ  रवींद्रनाथांनी साहित्याच्या आणि कलेच्या सर्व प्रांतात मुक्तपणे संचार केला आणि आपला एक वेगळा ठसा सर्व प्रांतात उमटवला. परंतु रवींद्रनाथ हे प्रामुख्याने कवी होते असे म्हणावे लागेल. मागच्या एका भागात मी त्यांना रवींद्रनाथ हे कवींद्रनाथ होते असे म्हटल्याचे आपल्याला आठवत असेलच. मागच्या भागांमध्ये रवींद्रनाथांना निसर्गाचा झालेला साक्षात्कार आणि त्याची त्यांनी ' निर्झरेर स्वप्नभंग ' या कवितेत केलेली अभिव्यक्ती याचा उल्लेख मी केला होता. त्या कवितेत ते म्हणतात  आज पहाटे घेऊनी किरणे तो आला  कैसा न कळे, प्राणा माझ्या स्पर्शूनी तो गेला  गुहेत अंधाऱ्या गाणे प्रभात पक्षाचे सामावले, कैसे न कळे  दिवसांनी इतक्या जागृत झाला प्राण माझा,  कैसा न कळे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी रवींद्रनाथांनी ही कविता लिहिली. त्यात कल्पना अशी आहे की नुसताच डोह होऊन पडलेल्या निर्झराच्या प्राणाला रविकिरणांचा स्पर्श होतो आणि तो निर्झर जागून उठतो. मग कड्यावरून उड्या टाकत अभेद्य खडक फोडत सारं जीवन एका नव्या चैतन...

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग १३

  उगवतीचे रंग  आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग १३ प्रवास आणि चहा याचं एक अनोखं नातं आहे. पाऊस आणि चहा यांच्यासारखं. अशा वेळी चहाच्या चाहत्यांना चहाची चाह असतेच असते. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो हे खरेच ! अशा वेळी चहाची जी ओढ लागते ना महाराजा, ती खरा चहाप्रेमीच समजू जाणे ! असाच आमच्या प्रवासातला एक प्रसंग ! फ्रान्समधील पॅरिस, तेथील आयफेल टॉवर आणि व्हर्सायचा राजवाडा वगैरे प्रेक्षणीय ठिकाणे पाहून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर स्वित्झर्लंडमधील झुरिचला जाण्यासाठी निघालो. तारीख होती ६जून २०२४. एकूण अंतर होते साधारण ६०० किमी चे. सगळा प्रवास बसने होता. साधारण सात आठ तासांचा प्रवास. फ्रान्सची सीमा संपते आणि स्विसची हद्द सुरु होण्याच्या सुमाराला एक रमणीय शहर लागते. त्या शहरात आम्हाला दुपारी १२ च्या सुमारास एका भारतीय पद्धतीचे जेवण मिळणाऱ्या हॉटेलमध्ये जायचे होते. आमच्या बसने हायवे सोडून गावात प्रवेश केला. हॉटेलच्या जवळ बस पार्क करण्यास जागा नव्हती म्हणून बस जरा दूरच उभी करण्यात आली. तेथील अरुंद रस्त्यातून वाट काढत आमचे गाईड राहुलजी आम्हाला हॉटेलपर्यंत घेऊन गेले. तेथे आम्ही छान ...

एक संवाद बाप्पाशी

उगवतीचे रंग ‘ एक संवाद : बाप्पाशी ...’ गजानना, गणराया, मंगलमुर्ती असलेल्या बाप्पा, तुझे मनापासून स्वागत. अरे, किती दिवसांपासून वाट पाहत असतो आम्ही तुझी. तुझ्या स्वागतासाठी आबालवृद्ध सारेच उत्सुक असतात. तू आलास ना बाप्प्पा की काय जादूची कांडी फिरवतोस ते तुलाच माहिती बाबा. पण सगळे वातावरणच बदलून टाकतोस. कालपर्यंत शांत शांत असलेले सारे वातावरण मंगलमय होऊन जाते. तू येताना चैतन्य घेऊन येतोस. आणि खरेच मंगलमुर्ती असलेला तू आमची मनेही भक्तिमय करून टाकतोस. तू येतोस फक्त दहा दिवस. पण जणू काही आमच्या घरातील एक सदस्यच तू होऊन आलेला असतोस. म्हणून तर तू जेव्हा जातोस ना तेव्हा आमच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात. एखाद्या आईबाबांचा मुलगा वर्षभर परदेशात जावा, त्याच्या वाटेकडे त्यांनी वर्षभर डोळे लाऊन बसावे, आणि मग त्याचा निरोप यावा. हो, मी येतोय. मला सुटी मिळालीय. दहाबारा दिवसांचीच आहे. शुक्रवारी २५ तारखेला मी सकाळी हजर आहे. आणि त्या आईबाबांचा हर्ष गगनात मावत नाही. त्याला आल्यावर कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्यांना होऊन जाते. तसेच, अगदी तसेच रे बाप्पा, तसेच आतुरलेले असतो आम्ही. तुझी वाट पाहत असतो, तुझ्य...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग १५

 उगवतीचे रंग   रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग १५ रवींद्रनाथांची अपारंपरिक लेखनशैली  ज्योतिरिंद्रनाथ म्हणजे रवींद्रनाथांचे थोरले बंधू यांची पत्नी कादंबरीदेवी यांनी रवींद्रनाथांवर खूप माया केली. आईचे प्रेम त्यांना दिले. पण मुख्य म्हणजे त्यांना तिने लिहिण्याची प्रेरणा दिली. लिहिते केले. जे लिहिले त्याला उत्तेजन दिले आणि त्यांच्या काही चुका असल्या तर त्याही हसत खेळत लक्षात आणून दिल्या. दुर्दैवाने त्यांची ही आईसमान प्रेम करणारी वहिनी काही कारणाने लवकर गेली. पण तिचे प्रेम रवींद्रनाथ कधीही विसरू शकले नाहीत. त्यांनी आपला ' शैशव कविता ' हा काव्य संग्रह वहिनीला अर्पण केला.  सुरुवातीला रवींद्रनाथ त्या काळातील प्रख्यात कवींच्या कवितांच्या शैलीचे अनुकरण केले. त्यामध्ये बिहारीलाल चक्रवर्ती, भानू सिंह ठाकूर आदींच्या कवितेचा समावेश होता. पण लवकरच त्यांनी ही अनुकरण शैली सोडून स्वतःची शैली विकसित केली. त्यात ते लिहू लागले. अनुकरणातून मनुष्य फार प्रगती करू शकत नाही. रवींद्रनाथांना स्वतःची शैली गवसली, आपल्या आतील आवाज त्यांनी ऐकला. त्यांची हीच गोष्ट त्यांना महाकवी बनण्यासा...