मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाभारतातील युद्ध : केवळ रणांगणावरचे ... ?

उगवतीचे रंग  महाभारतातील युद्ध : केवळ रणांगणावरचे ... ? महाभारत हा ग्रंथ महर्षी व्यासांच्या अलौकिक प्रतिभेचा अविष्कार आहे, हे जेव्हा महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपण पाहतो, तेव्हा लक्षात येते. महाभारतातील युद्ध केवळ रणांगणावर झालेले नाही. ते मनामनातले पण युद्ध आहे. एक कृष्णाची व्यक्तिरेखा जर सोडली, तर बाकी सर्वांच्या व्यक्तिमत्वाला हे दुभंगलेपण व्यापून राहिले आहे. पितामह भीष्मांपासून आपण सुरुवात करू. भीष्म हे आपल्याच हस्तिनापूरच्या असलेल्या निष्ठेप्रती असलेल्या प्रतिज्ञेने बांधले गेले आहेत. धृतराष्ट्राचे अनेक निर्णय पितामहांना आवडत नाही. दुर्योधनाचे वागणे त्यांना पसंत नाही. शकुनीची कपटनीती ते ओळखून आहेत. पण आपल्या प्रतिज्ञेशी बांधले गेले असल्याने, ते काही करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात कायम द्वंद्व सुरु आहे. आणि ज्याच्या मनात आयुष्यभर असं द्वंद्व सुरु राहतं, त्याच्यावर केवढा मानसिक ताण येत असेल याची कल्पना आपण करू शकतो. म्हणून पितामह भीष्म की जे एक शूर योद्धा आहेत, सगळं तत्वज्ञान आणि नीतीचे गाढे विद्वान आहेत, ते केवळ असहाय झालेले आपण पाहतो. जी गोष्ट भीष्मांची, ती...

दीनांचा कैवारी ...

*उगवतीचे रंग*  *दीनांचा कैवारी ...* आपल्यापैकी पुष्कळांनी डॉ अभिजित सोनवणे यांचं नाव ऐकलं असेल. ते पुण्यात भिक्षेकऱ्यांचा डॉ म्हणून प्रसिद्ध आहेत. मी पुण्यात गेलो तेव्हा त्यांना आवर्जून भेटलो. आणि माझ्या परीने यथाशक्ती मदतही त्यांना दिली. आज उगवतीचे रंग या सदरात या  जगावेगळ्या माणसाची माहिती तुमच्यापर्यंत माझ्यापरीने पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. या माणसाने अनेक भिक्षेकऱ्यांना अक्षरशः पायावर उभं केलं. त्यांना उद्योगाला लावलं. त्यांच्यातला माणूस जागा केला. पण त्यांचा हा इथपर्यंत झालेला प्रवास सोपा नाही. प्रचंड मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संकटातून त्यांना जावं लागलं. समाजाची उपेक्षा, हेटाळणी सहन करावी लागली. परंतु ' की न घेतले हे व्रत अंधतेने ' असे जाणून बुजून हे कठीण व्रत स्वीकारणाऱ्या आणि ते आपल्या सर्वस्वाचा त्याग करून निभावणाऱ्या एका ध्येयवादी तरुणाची ही कहाणी. विचार करायला लावणारी आणि तितकीच प्रेरणादायी. म्हसवड ता. माण जि सातारा हे त्यांचं मूळ गाव. डॉ अभिजित हे १९९८-९९ मध्ये डॉ झाले. घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती. तशातच लग्न होऊन पत्नीची जबाबदारी पण खांद्यावर पडले...

नारायण हवेत की नारायणी सेना...?

उगवतीचे रंग नारायण हवेत की नारायणी सेना...? महाभारतात एक प्रसंग आहे. कौरव आणि पांडव यांचे युद्ध होणार हे जणू आता ठरलेले असते. आणि या युद्धात पांडवांसमोर कौरवांचा टिकाव लागणार नाही याची कल्पना धृतराष्ट्र, शकुनी इ सगळ्यांनाचअसते. त्यांच्या मते कौरवांच्या मार्गातील मोठा अडसर म्हणजे वासुदेव, भगवान श्रीकृष्ण. म्हणून शकुनी दुर्योधनाला श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी पाठवतो. तेव्हा दुर्योधन त्याप्रमाणे आधी कृष्णाकडे जातो. आणि नंतर लगेच श्रीकृष्णाला भेटण्यासाठी अर्जुन सुद्धा येतो. अर्जुन पायाशी बसलेला असतो आणि दुर्योधन उशाला. साहजिकच कृष्णाचे लक्ष अर्जुनाकडे आधी जाते. तेव्हा दुर्योधन म्हणतो, ' मी आधी आलो आहे.' त्यामुळे आधी मदत मागण्याची संधी मला मिळाली पाहिजे. तसा श्रीकृष्ण प्रत्येकाच्या मनातील भाव ओळखण्यात अतिशय चतुर आहे. त्याला दुर्योधन आणि अर्जुन यांच्या स्वभावातील फरक चांगलाच माहिती असतो. त्यामुळे तो सांगतो, ' मी तर स्वतः युद्ध करणार नाही. हातात शस्त्रही घेणार नाही. तेव्हा एका बाजूला मी आहे. आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना .' अर्थात आधी मागण्याची संधी तो अर्जुनाला...

आणखी एक संतोष..

*उगवतीचे रंग*  *आणखी एक संतोष...* परवा मी गेवराईला असलेल्या संतोष गर्जे यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल ' नातं रक्तापलीकडचं ' हा लेख लिहिला होता. संतोष गर्जे यांनी अनाथ मुलांना घेऊन सहारा बालग्राम सुरु केलंय . पण आज मी तुम्हाला आणखी एका संतोषबद्दल सांगणार आहे. हा संतोष सांगलीचा. संतोष पुराणिक. कलावती आईंचा भक्त. कलावती आईंवर अपार श्रद्धा असणारा. ते त्याच्या बोलण्यातून नेहमी जाणवायचे. आणि हा संतोष आपल्या आवडत्या दैवताला म्हणजे कलावती आईंच्या उपासनेला वेळ देऊन आपल्या व्यवसायाकडे आणि सामाजिक कार्याकडे  लक्ष द्यायचा. कमालीचा धार्मिक. पारायणं वगैरे करायचा. आणि तो आणि त्याचं कुटुंब खूप आनंदात असायचं. या संतोषचं सांगलीला एक छोटंसं दुकान म्हणा की ऑफिस. ' श्रीकला एन्टरप्रायझेस ' या नावाचं. हे श्रीकला नाव कलावती आईंसाठीच दिलेलं. सगळ्या इ सर्व्हिसेस तिथे मिळायच्या. अशा या संतोषची माझ्या लेखांमुळे फेसबुकवर ओळख झाली. त्याने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि मी ती स्वीकारली. मग कधी मधी संतोषशी बोलणे होऊ लागले. आणि आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. तो मला काकाश्री म्हणा...

किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार...

उगवतीचे रंग  किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार... आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. दररोजचे जीवन तर आपण जगतच असतो. तेच तेच रुटीन . हे जीवन जगत असताना कोणाच्या चेहऱ्यावर आपण हसू फुलवू शकलो तर ? किती छान होईल !  राज कपूरच्या अनाडी चित्रपटात एक गाणं आहे. फार सुंदर... अभिनय करतानाचा  त्याचा तो भोळा, हसतमुख आणि निरागस चेहरा आपल्या मनाची पकड घेतो. किसी के मुस्कुराहटोंपे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिलमे प्यार जिना इसी का नाम है. माझ्याकडे कधी काही कार्यक्रम असला तर स्वयंपाकासाठी आम्ही एका बाईंना बोलावतो. त्या येतात त्यांचे काम करतात आणि निघून जातात. त्यांना त्यांचे ठरलेले पैसे तर मी देणारच असतो. पण तरीही त्यांचा स्वयंपाक झाल्यावर मी किचनमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो, " काकू, स्वयंपाक फार छान झाला बरं का आज. " त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमलते. त्यांनी खरे तर याची अपेक्षा केली नसते. मी नसते काही म्हटले तरी त्या आपले काम करून जाणारच होत्या. पण आता जाताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू ,आनंद आणि समाधान होते. एकदा मी आणि माझा एक...

नातं रक्तापलीकडचं...*

*उगवतीचे रंग*  *नातं रक्तापलीकडचं...* बीड जिल्ह्यातलं गेवराई गाव. या ठिकाणी एक व्यक्ती अनाथ लेकरांना सांभाळते आहे. ३ वर्षांपासून ते २२ वर्षे वय असलेली लेकरं या सहारा अनाथालयात म्हणजे बालग्राममध्ये  आहेत. आज या सगळ्यांचा मिळून एक परिवार झाला आहे. या परिवारात आज जवळपास एकशे सहा मुलं मुली राहत आहेत. कोण आहे ही व्यक्ती ? की जी या अनाथ मुलांना सांभाळते ? एखादा राजकीय नेता ? एखादा धनिक माणूस ? की एखादी समाजसेवी संस्था ? आपल्याला आश्चर्य वाटेल या अनाथांचा जो नाथ झाला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे संतोष गर्जे. आडनाव गर्जे असलं तरी अत्यंत शांततेने, कोणताही गाजावाजा न करता त्यांचं  काम सुरु आहे. त्यांची कहाणी अत्यंत हृदयस्पर्शी आहे. आईवडील मराठवाड्यातील आष्टी तालुक्यातील ऊसतोड कामगार. दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. दोन वेळेचं जेवण नीट मिळायचं नाही. घरामध्ये सहा भावंडं. आईवडील सहा सहा महिने कामानिमित्त घराबाहेर. अशी परिस्थिती. मोठ्या बहिणींसोबत संतोष लोकांकडे मोलमजुरी करायचा. त्यातच कसंबसं शिक्षण चालू होत. परिस्थितीमुळे जास्त शिक्षण घेता आलं नाही. एकदा लग्न झालेल्या मोठ्या बहिणीकड...

तेजोनिधी भगवान परशुराम

उगवतीचे रंग तेजोनिधी भगवान परशुराम आज भगवान परशुराम यांची जयंती आहे. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अद्वितीय संगम म्हणजे परशुराम. परशुराम हे भृगु कुळातील जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांचे पुत्र. ते वेदात पारंगत तर होतेच, पण शस्त्र आणि अस्त्रविद्येतही त्यांचा हात धरू शकेल असा त्या काळी संपूर्ण भारतवर्षात कोणी नव्हता. परशुरामांना विष्णूचा सहावा अवतार मानले जाते. ते शंकराचे निस्सीम भक्त होते. भगवान शंकरांकडूनच त्यांना आशीर्वाद स्वरूपात परशूची प्राप्ती झाली होती. म्हणून आपल्या मात्यापित्यांचा अत्यंत आज्ञाधारक असलेला हा राम परशुराम म्हणून ओळखला जाऊ लागला. आज महापुरुषांना जातीत अडकवून ठेवून आपण त्यांचे कर्तृत्व सीमित करण्याचा प्रयत्न करतो. भगवान परशुराम ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत असले तरी त्यांचे जीवनकार्य सर्वांनी समजून घ्यावे अशा प्रकारचे अत्यंत प्रेरणादायी आणि बोधप्रद आहे.   परशुरामांवर दोन आक्षेप घेतले जातात.  आधी त्यांच्याकडे वळू या. त्यांच्यावर घेतला जाणारा पहिला आक्षेप हा आहे की त्यांनी वडिलांच्या आज्ञेवरून का होईना पण आपल्या आईचा वध केला. आणि मातृहत्येचे अक्षम...

कृतार्थ मी ...

उगवतीचे रंग  कृतार्थ मी ...  काल जागतिक पुस्तक दिवस होता. आणि योगायोगाने माझा वाढदिवसही . आणि कालचा हा वाढदिवस मी कधी कधी नव्हे इतक्या आनंदात साजरा केला. कालचा माझा वाढदिवस आणि जागतिक पुस्तक दिन हा दुग्धशर्करा योग म्हटलं तर त्यामध्ये दुधाचा मसाला, ज्यामध्ये मौल्यवान केशर आदी वस्तू आहेत, ते मिसळलं तुम्ही वाचकांनी. काल खूप मित्र, नातेवाईकांचे फोन आले. त्याहून जास्त फोन आले माझ्या वाचक मित्रांचे. मेसेजला तर सीमाच नव्हती. वाचक मित्रांनी किती प्रेम करावं माझ्यावर... ! म्हणूनच आजचा लेख तुमच्या प्रेमाची उतराई होण्यासाठी. तुमचं ऋण व्यक्त करण्यासाठी. त्यानं मी कृतार्थ झालो. म्हणून कृतार्थ मी..! अनेक वाचकांनी माझे लेख त्यांच्या मित्रांना पाठवले. ते त्यांनी दुसऱ्यांना पाठवले. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला त्यासंबंधीच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. अनेकांनी लेख आवडल्याचे फोन करून कळवले. खूप जणांनी ही लेखमाला सुरूच ठेवा असा आग्रह धरला. काहींनी काही मौलिक सूचना केल्या. या निमित्ताने मला खूप नवीन मित्र मिळाले. अगदी सर्वसामान्यांपासून तर उच्चपदस्थांपर्यंत.या सगळ्यांमुळे मी...

माझे पहिले प्रेम...

उगवतीचे रंग  माझे पहिले प्रेम...  लेखाचे शीर्षक वाचून चक्रावला असाल ना ? आज यांना काय झाले ? ' व्यवस्थित ' तर आहात ना ..? नेहमी साधारणपणे गंभीर विषयांवर लिहिणारे हे लेखक महाशय आज चक्क ' माझे पहिले प्रेम  ' या विषयावर लिहिणार ?  हो,  आहे बुवा तसंच . आज मी तुम्हाला माझ्या पहिल्या प्रेमाबद्दलच सांगणार आहे. पण थांबा जरा. त्या आधी मला सांगा तुम्हाला तो एक दुजे के लिये चित्रपट आठवतो का ? त्यात लता मंगेशकरांचे मला एक फार आवडणारे गाणे आहे. ते म्हणजे ' ऐ प्यार तेरी पहली नजर को सलाम...'  त्या गाण्यात त्या चित्रपटाच्या नायिकेला तिच्या पहिल्या प्रेमाची संधी ज्या ज्या गोष्टींनी प्राप्त करून दिली त्या त्या गोष्टींना ती सलाम करते. मग पहली नजर, नंतर ' जिसने हमे मिलाया उस वक्त, उस घडी, उस डगर को सलाम ..' असं ती म्हणते. ती कृतज्ञ आहे त्याबद्दल. आपल्या प्रेमाला साहाय्यभूत ठरणाऱ्या पहिल्या आणि सुरुवातीच्या सगळ्या  गोष्टींना ती सलाम करते. आणि केलाच पाहिजे ना. ज्यांनी आयुष्यभरासाठी प्रेमाची एवढी मोठी दौलत दिली, त्यांना सलाम नाही तर काय करणार ? ...

जुने जाऊ द्या मरणालागुनी...

उगवतीचे रंग जुने जाऊ द्या मरणालागुनी... ' जुने जाऊ द्या  मरणालागुनी... ' ही ओळ केशवसुतांच्या तुतारी या कवितेतली. नवनिर्माण करायचे असेल तर जुन्याला निरोप द्या असा या कवितेचा भावार्थ. आज या लेखातून मी पण आपल्यला नव्याची आराधना करताना जुन्याला निरोप द्या असेच सांगणार आहे. पण ही नव्याची आराधना करायची म्हणजे नेमके काय करायचे आणि जुने टाकून द्या म्हणजे नेमके काय टाकून द्यायचे हे आपल्याला लक्षपूर्वक समजून घ्यावे लागेल. आजचा विषय थोडा गंभीर आणि वेगळा आहे. आपल्या भोवतालच्या सृष्टीत नित्य नवे बदल होत असतात. प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन होत असते. जुने नष्ट होत असते. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. आपल्या भोवतीची झाडं बघा. जुनी पालवी टाकून नवी धारण करीत असतात. जसजसे त्या पानांचे वय होत जाते, तसतसे ते एकेक करून गळून पडतात. त्या जागी नवीन पालवी फुटते. झाडांना रोज नवीन कळ्या , फुले, फळे येतात. रोज आपल्याला बदल बघायला मिळेल. जे काल पाहिले ते आज दिसणार नाही. जे आज आपण पाहतो आहोत ते उद्या दिसणार नाही. म्हणूनच जेव्हा जुने जाते तेव्हा नव्या गोष्टींना संधी मिळते. आणि हे सगळे बदल होतात, रोज ...

महाभारत : काही पटलेलं, काही न पटलेलं

उगवतीचे रंग महाभारत : काही पटलेलं, काही न पटलेलं सध्या दूरदर्शनवर महाभारत सुरु आहे. आपणही बहुतेक सगळे ते पाहत असाल. ते पाहत असताना मनात काही प्रश्न उठतात, काही विचार येतात. काही काही प्रश्न मनाला अस्वस्थही करतात. आणि असाही विचार येतो की असं खरंच घडलं असेल का त्या वेळी ? खरं म्हणजे महाभारताला इतिहास म्हटले जाते. ' हा जय नावाचा इतिहास आहे ' असं आनंद साधलेंचं पुस्तक देखील आहे.आणि महाभारतावर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर अनेक पुस्तकंही निघाली आहेत. मी आपल्यापुढे जे काही प्रश्न मांडणार आहे, ते माझ्या मनात आले आहेत. मी काही कोणी मोठा विचारवंत किंवा लेखक किंवा इतिहासकार नाही. महाभारत हा महर्षी व्यासांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने लिहिलेला ग्रंथ आहे. त्यावर भाष्य करणे किंवा काही लिहिणे ही माझी योग्यता नाही. मी आहे एक सामान्य वाचक, सामान्य प्रेक्षक. पण लहानपणापासून जी काही मूल्ये आपल्याला शिकवली जातात, जे काही संस्कार केले जातात, त्यांनासुद्धा एकदम धक्का बसेल असे काही प्रसंग या महाभारतात आहेत. काल आपण सगळ्यांनी द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग पाहिला असेल. हा प्रसंग पाहताना द्रौपदीची आर्तता, ...

एक जगावेगळा वनस्पतिशात्रज्ञ

उगवतीचे रंग एक जगावेगळा वनस्पतिशात्रज्ञ आज मी  तुम्हाला एका जगावेगळ्या माणसाची ओळख करून देणार आहे. त्याचं नाव आहे ल्युथर बरबँक. हा अमेरिकन वनस्पती शास्त्रज्ञ. गेल्या शतकात होऊन गेला. १८४९ ते १९२६ हा त्याचा जीवनकाल. त्यांचा जन्म अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स प्रांतातला. पण आपल्या प्रयोगांना अनुकूल असलेल्या कॅलिफोर्नियातील सांता रोझा येथे त्यांनी आपल्या वनस्पतींवरील संशोधन  कार्याला सुरुवात केली. त्या काळात या माणसाने वनस्पतींवर जे प्रयोग केले आणि त्याचे असे आश्चर्यकारक परिणाम मिळवले की आजही त्याच्यावर आपला विश्वास बसणे कठीण जाते. त्याला वनस्पतींचा जादूगारच म्हटले पाहिजे. आपल्या अनेक वर्षांच्या परिश्रमाने त्यांनी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे आदींवर प्रयोग करून त्यांच्या जवळपास आठशे नवीन जाती निर्माण केल्या. त्यांच्या नावावर पंधरा पेटंट्स जमा  आहेत. खरे म्हणजे त्यांचे कार्य त्याहूनही कितीतरी मोठे आणि विस्तृत आहे. त्यांनी जी पेटंटस मिळवली, त्यात केवळ प्लम फळांच्या १३३ जातींचा तर लिलीच्या ५० प्रकारच्या जातींचा समावेश आहे. प्लमचा नवा संकरित प्रकार साध्य करण्यासाठी बरबँक यांनी प्लमच...

सजगता महत्वाची

उगवतीचे रंग सजगता महत्वाची सजग असणे म्हणजे जागे असणे, सावध असणे. वर्तमानात राहणे. आपल्याला सजगता साधणे खूप महत्वाचे आहे. म्हणजे आता या क्षणी जे काही आपण करत असू, फक्त त्याच्यात आणि त्याच्यातच लक्ष असणे.असे असणे म्हणजे सजग असणे. आपले मन नेहमी भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा विचार करत असते. त्यामुळे बऱ्याचदा हाती असणारा वर्तमानातला महत्वाचा क्षण हातून निसटून जातो. आपण काही उदाहरणे पाहू या म्हणजे ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. समजा, मी नुकताच उठलेलो आहे आणि ब्रश करतो आहे. ब्रश करताना माझ्या डोक्यात अनेक विचार आहेत. आजचा पेपर आला की नाही ? आज चहा केव्हा घ्यायला मिळतो ? कालपरवापासून सलूनमध्ये जावे असे म्हणतो आहे. पण दुकाने कधी उघडतात कोणास ठाऊक ? असा विचार करत आपण दात घासत असतो. मग तोंड धुवून होते. तेव्हाही त्या काही क्षणात अशीच विचारांची गर्दी होते. आपले मूळ काम कोणते होते ? तर दात घासणे. त्या कामाकडे आपले कितीसे लक्ष होते ? असेच आपले अंघोळ करताना होते. अंगावर पाणी ओतता ओतता कितीतरी विचार आपण पाण्याबरोबर अंगावर जणू ओतून घेतो. मूळ अंघोळीचे जे काम आपण करणार होतो, त्याकडे आपले कितपत लक्ष होते ...

बाजी जिंकून देणारी माणसं ..

उगवतीचे रंग बाजी जिंकून देणारी माणसं ... आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं येतात की जी आपल्याला साहाय्यभूत ठरतात. प्रत्येकाचे आयुष्य ही एक प्रकारची परीक्षाच असते. अनेक संकटे आपल्या धैर्याची आणि सहनशक्तीची परीक्षा पहात असतात. अशा वेळी काही माणसे आपल्या मदतीला धावून येतात. त्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यात काही करणं शक्य होतं . अशी साहाय्यभूत होणारी माणसं आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. खूप माणसं अशी असतात की जे इतरांनी त्यांच्यासाठी केलेलं योगदान नाकारतात. हे यश, कीर्ती, पैसा हे फक्त मी आणि माझ्या जीवावर कमावले आहे असा गर्व त्यांना असतो. पण वस्तुस्थिती कधीच अशी नसते. कोणतीही एकटी व्यक्ती समाजामध्ये फक्त स्वतःच्या जीवावर प्रगती करू शकत नाही. पण अर्थात त्यांनी वस्तुस्थिती नाकारल्याने परिस्थिती बदलत नाही. पण काळ ही गोष्ट अशी आहे की एक दिवस अशा माणसांना तो त्यांची जागा दाखवून देतोच. रावणासारख्या त्रिलोक विजयाची घमेंड मिरवणाऱ्या माणसाची देखील काळ आला की वाताहत होते. आयुष्य म्हणजे नेहमी चांगल्या आणि वाईटात चाललेला संघर्ष असतो. आपण नेहमी असं म्हणतो की धर्माच्या बाजूने, सत्या...

कोण कुणाजवळून शिकलं ... ?

उगवतीचे रंग कोण कुणाजवळून शिकलं ... ? माझ्या शिक्षकी पेशात अनेक विद्यार्थ्यांशी माझा संबंध आला. त्यातील काही आपल्या वैशिट्यपूर्ण गुणांमुळे किंवा स्वभाववैशिष्ट्यांमुळे माझ्या लक्षात राहिले आहेत. खरं तर माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो. आणि असावा. मी मुलांना शिकवलं असं वाटत असताना मुलांनी सुद्धा माझं अनुभवविश्व आणि भावविश्व समृद्ध आणि संपन्न केलं आहे. माझं शिक्षकपण हे त्यांच्यामुळे होतं . माझ्यातला शिक्षक घडत गेला तो विद्यार्थ्यांमुळे. आणि माझ्यातल्या विद्यार्थी घडत गेला तो माझ्या शिक्षकांमुळे. त्यांनी कसं शिकायचं हे मला शिकवलं. खरा शिक्षक तोच असतो की जो आपल्या विद्यार्थ्यांना कसं शिकायचं हे शिकवतो. त्यांना ज्ञानाचे पंख देऊन त्या पंखांच्या जोरावर ज्ञानाच्या क्षेत्रात अजून उंच भरारी घेण्यास प्रवृत्त करतो. आपल्यापैकी काही माणसे नियमितपणे ज्ञानेश्वरी, गीता यासारखे ग्रंथ वाचणारी असतील.काहींची तर अनेक पारायणे या ग्रंथांची झाली असतील. पण गंमत अशी की दर वेळेस हे ग्रंथ वाचताना काही ओळींचा अर्थ आपल्याला नव्याने उलगडतो. तो आधी वाचताना लक्षात आलेला नसतो. मग पुन्हा वाचता वाचता तो अचानक ' क...