मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतरत्नावली उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग दोन

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग दोन      आईवडील आणि त्यांच्या शाळेतील शिक्षकांव्यतिरिक्त  कलामांच्या बालपणीच्या जीवनावर प्रभाव टाकणारी आणखी दोन व्यक्तिमत्वे होती. एक म्हणजे त्यांचा चुलतभाऊ शमसुद्दीन आणि दुसरे म्हणजे त्यांच्या बहिणेचे पती अहमद जुलालुद्दिन. हे दोघेही त्यांचे नातेवाईक तर होतेच पण त्याहून जास्त त्यांचे मित्र होते. जुलालुद्दिन कलामांच्या वडिलांना नावा दुरुस्तीच्या आणि बांधणीच्या कामात मदत करीत असे. त्या काळात त्या गावात इंग्रजी जाणणारी जुलालुद्दिन ही एकाच व्यक्ती होती. तो गावातील लोकांना त्यांची पत्रे वाचून दाखवत असे. तो कलामांना आपल्याबरोबर फिरायला नेई. त्यांना आधुनिक विज्ञानातील शोध , घटना आणि इतर आश्चर्यकारक   गोष्टी सांगे. तो त्यांच्याशी देव आणि त्याची शक्ती याबद्दल बोलत असे. शमसुद्दीनचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय होता. त्यावेळी गावात तो एकच वर्तमानपत्र विक्रेता होता. तो कलामांना वर्तमानपत्रात आलेल्या गोष्टी सांगत असे.  ...

भारतरत्नावली उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग एक

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग एक       रामेश्वरम. समुद्रकिनारी असलेले निसर्गरम्य गाव. सतत समुद्राची भरती आणि ओहोटी येणारे. समुद्राची गाज सतत कानावर पडणारे. उंचच उंच नारळी पोफळीची झाडे. विविध पक्ष्यांचे मधुर कूजन कानी पडणारे गाव. विशाल फेसाळता नि खळाळता दर्या. तितकेच विशाल हृदय असणारी पण साधी आणि संस्कारसंपन्न माणसे. अशा या गावात श्री शंकराचे प्रसिद्ध मंदिर. देशभरातून लाखो भक्त दर्शनासाठी येणारे. अत्यंत पवित्र ठिकाण. गावात या मंदिराच्या बरोबर मशीद आणि चर्च सुद्धा. जणू हिंदू , मुस्लीम आणि ख्रिश्चन या धर्मांचा त्रिवेणी संगम. गावातील लोक वेगवेगळ्या धर्माचे असले तरी समंजस आणि आपापल्या धर्माचे आपल्या पद्धतीने पालन करणारे. दुर्मिळ असा गावकऱ्यातील एकोपा. काही प्रश्न आलाच तर तो एकत्र बसून चर्चेने आणि शांततेने सोडवणार !      अशा या गावात वडील जैनुलाब्दीन आणि आई अशिअम्मा या धार्मिक दाम्पत्याच्या पोटी १५ ऑक्टोबर १९३१ रोजी कलामांचा जन्...

निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे ( भाग पाच - अंतिम )

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे,चाळीसगाव  भारतरत्नावली  निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे (  भाग पाच - अंतिम )      परदेशातून मिळालेल्या या  सगळ्या निधीचा चोख हिशेब अण्णांनी ठेवला. अण्णा केवळ मदत घेणाऱ्यातले नव्हते. अण्णांची वृत्ती देणाऱ्याची होती. विंदा करंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ घेणाऱ्याने घेत जावे , देणाऱ्याने देत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ‘ त्यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून स्वतःच्या संस्थाना तर मदत केलीच पण कोठेही चांगले काम दिसले की अण्णांचा हात देण्यासाठी पुढे असायचा. आता अण्णांचे वय झाले होते ७८ वर्षांचे. आपल्या संस्थांचे कौतुक पहात , आपली स्तुती ऐकण्यात आणि आराम करण्यात घालवावे असे हे वय. पण स्वस्थ बसणे हा अण्णांचा स्वभाव नव्हता. या वयात शिक्षण प्रसाराचा एक नवीन उपक्रम अण्णांनी हाती घेतली. खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार व्हावा , मुलांनी शिकावे म्हणून अण्णांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ नावाची संस्था काढली. खेडी शिक्षणाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावीत. खेड्यातील लोकांनीच पैसे जमवून शाळा बांधावी , श...

निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे भाग चार

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे भाग चार       कोणतीही संस्था चालवण्यासाठी , सामाजिक कार्य करण्यासाठी पैसा आणि समर्पित कार्यकर्त्यांची गरज असते. कर्व्यांच्या संस्थांना लोकाश्रय आणि राजाश्रय मिळू लागला. त्या चालवण्याकरिता आवश्यक तेवढा पैसाही वेळोवेळी उभा राहिला. पण हे सगळे कार्य चालवण्यासाठी निस्वार्थ आणि समर्पित कार्यकर्त्यांची गरज होती. असे कार्यकर्ते घडवण्यासाठी कर्व्यांनी ‘ निष्काम कर्म मठाची ‘ स्थापना केली. या मागे भगवद गीतेतील निष्काम कर्मयोगाची कल्पना कर्व्यांच्या डोळ्यांसमोर होती. पण काही काळातच ही संस्था बंद करावी लागली. कारण पुरेशा समर्पित कार्यकर्त्यांचा अभाव होता. शिवाय लोकांनाही या मठाच्या उपयुक्ततेबद्दल शंका होती. अण्णांची मठ स्थापन करण्यामागे जी उदात्त कल्पना होती ती लोकांना समजू शकली नाही. अण्णांच्या मनात आणि आचरणात सुद्धा असलेला निष्काम कर्मयोग समजून घेण्यात समाज कमी पडला. पण अशा गोष्टींमुळे अण्णा विचलित होत नसत. कोणत्याही परिस्थितीत  ठरवलेले ध्येय पूर्ण क...

भारतरत्नावली निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे ( भाग तीन )

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे  ( भाग तीन )       कर्वे मुंबईत शिक्षक म्हणून काम करीत असताना गोपाळ  कृष्ण गोखले यांनी कर्व्यांना पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात गणित शिकवण्यासाठी आमंत्रित केले. हा कर्व्यांच्या विद्ववत्तेचा एक प्रकारे मोठा सन्मानच होता. गोखले यांना कर्व्यांचे गणितावरील प्रभुत्व माहिती होते. हे आमंत्रण स्वीकारावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत कर्वे असताना त्यांचे गुरु राजाराम शास्त्री भागवत यांनी त्यांना पुण्याला जाण्याचा सल्ला दिला आणि प्रो. कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुण्यात आल्यानंतर कर्व्यांच्या जीवनाला एक वेगळे वळण मिळण्यास सुरुवात झाली. कर्व्यांची विद्वत्ता, त्यांची फर्ग्युसन सारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयात असलेली प्राध्यापकाची नोकरी आणि त्यांचे सामाजिक स्थान पाहून त्यांना पुनर्विवाह करण्याविषयी वारंवार विचारणा होत असे. पण कर्व्यांच्या मनात केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार कधीच मनाला शिवला ...

निश्चयाचा महामेरू : महर्षी धोंडो केशव कर्वे - भाग दोन

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  निश्चयाचा महामेरू : महर्षी धोंडो केशव कर्वे  - भाग दोन  ( महर्षी कर्वे यांच्या लहानपणीच्या घटना सांगताना सुरुवातीला त्यांचा सोयीसाठी धोंडू म्हणून उल्लेख केला आहे ) धोंडूचा सहावी पर्यंतचा अभ्यास तर तयार झाला होता. आता सहावीची परीक्षा देणे फक्त बाकी होते. त्या काळी सहावी पास झालेल्यांना शिक्षक म्हणून काम करता येई. पण तेव्हा परीक्षा देणे आजच्या सारखे सहज सुलभ नव्हते. परीक्षा देण्यासाठी त्यांना केवढे दिव्य करावे लागले ते आपल्याला पुढील हकीकत वाचून लक्षात येऊ शकेल. तेव्हा सहावीच्या परीक्षेची दोनच केंद्रे धोंडूसाठी उपलब्ध होती. मुंबई आणि सातारा. त्या वेळी पावसाळा असल्याने मुंबईला जाण्यासाठी समुद्रमार्गे जायला जहाजे तयार नव्हती. धोंडू आणि त्याच्या मित्रांनी साताऱ्याला जाण्याचे ठरवले. मुरुड ते सातारा हे अंतर एकशे पन्नास मैलाचे होते. हातात , पाठीवर सामान. रस्ते आधीच खराब. त्यात पावसाळ्यामुळे सर्वत्र चिखल झालेला. अशा परिस्थितीत हे सगळे एकशे पन्नास मैलांचे अंतर कापून मजल दरमजल करीत कसेबसे साताऱ्याला येऊ...

भारतरत्नावली निश्चयाचा महामेरू : महर्षी धोंडो केशव कर्वे - भाग एक

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  निश्चयाचा महामेरू : महर्षी धोंडो केशव कर्वे  - भाग एक                          संध्याकाळची वेळ. अंधार पडत आलेला. आकाशात ढगांची दाटी झालेली. कोणत्याही क्षणाला आता पाऊस कोसळेल अशी स्थिती. अशा स्थितीत एक गृहस्थ आपल्या पाठीवर एक पायली धान्याचे पीठ आणि हातात भाजी आणि किराणा सामानाची पिशवी असे ओझे घेऊन चाललेला. रस्त्यात चिखल , दगडांचे साम्राज्य. तरी देखील तरुणाच्या उत्साहाने ती व्यक्ती भराभर चालत निघाली होती. पाच सहा मैलांची पायपीट करून त्या व्यक्तीला पुण्याजवळ असलेल्या हिंगणे येथील अनाथ बालिकाश्रमात पोहचायचे होते. त्या बालिकाश्रमात काही अनाथ , विधवा मुली , स्त्रिया त्यांची आतुरतेने वाट पहात होत्या. ती व्यक्ती होती अण्णासाहेब धोंडो केशव कर्वे. ज्यांनी आपल्या आयुष्यात विधवा स्त्रियांसाठी , मुलींसाठी स्त्री शिक्षणाचे भरीव कार्य केले. विधवांना सन्मान मिळवून दिला. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले ते महर्षी...

भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री ( अंतिम भाग )

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री ( अंतिम भाग )  १९६५ च्या या भारत पाक युद्धात शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचे आक्रमण तर परतवून लावलेच पण पाकिस्तानवर निःसंदिग्ध विजय प्राप्त केला. पण इंग्लंड , अमेरिका इ. राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याबद्दल भारताला दोष दिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाटाघाटी घडवून आणण्यासाठी रशियाने पुढाकार घेतला. भारताने पाकिस्तानवर निःसंदिग्ध विजय मिळवल्याने खरे म्हणजे या वाटाघाटींची अजिबात आवश्यकता नव्हती. पण एकंदरीत असे वातावरण निर्माण करण्यात आले की या परिषदेला जाणे शास्त्रीजींना भाग पडले. हा सगळा आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचाच भाग होता. त्यासाठी १० जानेवारी १९६६ ला रशियात ताश्कंद करार परिषद झाली. या परिषदेसाठी शास्त्रीजी प्रकृती ठीक नसतानाही रशियाला गेले. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान करार होऊन त्यावर सह्या झाल्या. या करारामुळे भारताला आपल्या मालकीच्या काश्मीरच्या प्रदेशातून माघार घ्यावी लागणार होती. हा भारताच्या भूमिकेचा राजनैतिक पराभवच होता. या करारा...

भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री - भाग सहा 

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री - भाग सहा       १९६४ मध्ये कॉंग्रेसच्या भुवनेश्वर अधिवेशनाच्या वेळी पं नेहरूंची प्रकृती ठीक नव्हती. साहजिकच या अधिवेशनातील ठराव मांडण्याची जबाबदारी शास्त्रीजींवर आली. शास्त्रीजींनी ती नेहमीप्रमाणे यशस्वीपणे पार पाडली. दुर्दैवाने २७ मे रोजी पंडित नेहरूंचे निधन झाले. या वेळी मंत्रिमंडळात ज्येष्ठ असलेले श्री गुलझारीलाल नंदा यांची यांची हंगामी पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. परंतु कामराज यांना ही निवड पसंत नव्हती. त्यांनी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांबरोबर बैठकी घेतल्या. इतर काही नावे समोर आली तरी बहुतेक सर्वांचा कल शास्त्रीजींच्या नावाकडेच राहिला. शेवटी सर्वानुमते शास्त्रीजींची पंतप्रधान पदी निवड झाली.      देशाला स्वातंत्र्य मिळून आता सोळा वर्षे झाली होती. या कालावधीत पंडित नेहरूंच्या देशाने बरीच प्रगती केली होती. विशेषतः औद्योगिक व वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने पावले पुढे पडली होती. पण तरीही देश दुष्काळाच्या छायेत होता. अन्नधान्याचे विशेष उत्पादन नव्हत...

भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री -भाग पाच

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री -भाग पाच       याच सुमारास चीनने विश्वासघात करून भारतावर आक्रमण केले. या युद्धाला तोंड देण्यास त्यावेळी भारत सज्ज नव्हता. पण तरीही भारताने प्रचंड धैर्याने या आक्रमणाचा सामना केला. यावेळी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली. परंतु राष्ट्रानेत्यांच्या पाठीशी सर्व जनता खंबीरपणे उभी राहिली. यावेळी देशातील सुव्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्री या नात्याने आपसूकच शाश्त्रीजींवर आली. त्यांनी अगदी खंबीरपणे हा प्रश्न हाताळला. वृत्तपत्रे आणि राजकीय पक्ष यांना त्यांनी स्वातंत्र्य दिले पण चीनची बाजू घेणाऱ्यांना कडक दम भरला. काही देशद्रोही विचार करण्याऱ्या कम्युनिस्टांना सरळ तुरुंगात डांबले. शेवटी भारतीयांच्या खंबीर धोरणापुढे आणि झुंजीसमोर चीनला हार मानावी लागली. युद्ध थांबले.      १९६३मध्ये भारत नेपाळ संबंधात फूट पडेल अशी चिन्हे दिसू लागली. पाकिस्तान वा चीन यापैकी कोणत्यातरी देशाने नेपाळला भारताविरुद्ध चिथावणी देऊन शेवटी नेपाळचा भाग आपल्या घशात घालण्याचा डाव रचला. हा डाव य...