उगवतीचे रंग
मो.रफी-एक महान कलाकार
परवा प्रवासात येताना गाडीमध्ये शास्त्रीय गाण्यांची एक सी डी ऐकत होतो. त्यातील पहिल्याच गाण्याने मन आकर्षून घेतले. गीत होते " मन तडपत हरी दर्शन को आज. " बैजू बावरा या चित्रपटातील हे गीत गायले आहे मो. रफीने. या गीताचे संगीतकार आहेत नौशाद . लिहिले आहे हिंदी चित्रपट सृष्टीतील महान गीतकार शकील बदायुनी यांनी. श्रीकृष्ण भक्तीचे हे गीत इतके अप्रतिम आहे की ऐकताना जणू समाधी लागते. नादब्रह्म म्हणजे काय याचा प्रत्यय हे गीत ऐकताना येतो.
हे गीत तयार करणारे हे तिन्ही कलाकार धर्माने मुस्लिम पण त्यांचा धर्म हे गीत सादर करताना कुठेही आड आला नाही. मो. रफीने हे गीत अक्षरशः जीव ओतून गायले आहे. त्यातील ईश्वर भक्तीची आर्तता मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. मालकंस रागावर आधारित हे गीत आहे. या गीताबद्दल संगीतकार नौशाद म्हणतात , " यात मी विशेष काही केले नाही. ही तर रफीसाहेबांची कमाल आहे. " मो. रफी म्हणतात की , यामध्ये मी विशेष असे काही केलेले नसून ही राग मालकंसची कमाल आहे. हे सगळे एवढे महान कलाकार आहेत की स्वतःकडे मोठेपणा घ्यायला नाही.
मो. रफीबद्दल नौशादजी म्हणतात, " असा कलाकार शेकडो वर्षातून एखादाच जन्माला येतो. आजही भारतातले लाखो लोक आहेत की ज्यांचा दिवस मो. रफीच्या आवाजाने सुरु होतो आणि रात्रही त्यांच्याच आवाजाने . दुनियेत करोडो लोक आहेत की रफी साहेबांचे चाहते आहेत. " मो. रफी कलाकार म्हणून जेवढे श्रेष्ठ होते तेवढेच एक माणूस म्हणूनही महान होते. अनेक गरजूना त्यांनी कोणतीही जाहिरात न करता मदत केली. किस्सा कोहिनुर चित्रपटातील मो. रफीच्या गाण्याचा आहे. मधुबन मे राधिका नाचे रे .सुरुवातीला हे गीत गाण्यास कठीण आणि त्यातील शास्त्रीय संगीतामुळे लोकांना कितपत आवडेल होता. त्यामुळे चित्रपट निर्मात्याने हे गीत असे ठरवले. पण मो. रफीनी त्यांना विनंती केली,मला हे गीत गाऊ द्या. हे गीत लोकप्रिय झाले तर मी माझे मानधन घेईन. रफींनी हे गीत गायले आणि प्रचंड गाजले. याही गीताच्या लोकप्रियतेबद्दल त्याचे श्रेय घेण्यास ना संगीतकार नौशाद तयार होते ना मो. रफी. इतकी ही मंडळी महान होती. निर्मात्यांनी मो. रफींना त्यांची फी विचारली तर ते म्हणाली की , मला माझी फी मिळाली आहे. लोकांनी हे गाणे पसंत केले हीच माझी फी आहे. ती मला मिळाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा