उगवतीचे रंग
किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार...
आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. दररोजचे जीवन तर आपण जगतच असतो. तेच तेच रुटीन . हे जीवन जगत असताना कोणाच्या चेहऱ्यावर आपण हसू फुलवू शकलो तर ? किती छान होईल ! राज कपूरच्या अनाडी चित्रपटात एक गाणं आहे. फार सुंदर... अभिनय करतानाचा त्याचा तो भोळा, हसतमुख आणि निरागस चेहरा आपल्या मनाची पकड घेतो.
किसी के मुस्कुराहटोंपे हो निसार
किसी का दर्द मिल सके तो ले उधार
किसी के वास्ते हो तेरे दिलमे प्यार
जिना इसी का नाम है.
माझ्याकडे कधी काही कार्यक्रम असला तर स्वयंपाकासाठी आम्ही एका बाईंना बोलावतो. त्या येतात त्यांचे काम करतात आणि निघून जातात. त्यांना त्यांचे ठरलेले पैसे तर मी देणारच असतो. पण तरीही त्यांचा स्वयंपाक झाल्यावर मी किचनमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो, " काकू, स्वयंपाक फार छान झाला बरं का आज. " त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमलते. त्यांनी खरे तर याची अपेक्षा केली नसते. मी नसते काही म्हटले तरी त्या आपले काम करून जाणारच होत्या. पण आता जाताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू ,आनंद आणि समाधान होते.
एकदा मी आणि माझा एक मित्र प्रवासादरम्यान एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो. त्या चहावाल्याने आम्हाला स्पेशल चहा बनवून दिला. आम्ही पैसे दिले. पण जाता जाता त्या चहावाल्याला म्हटले, " चहा छान बनवला बरं का." त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तो म्हणाला, " तुम्हाला आवडला ना साहेब " आणि गाणं गुणगुणत तो आपल्या कामात गढून गेला.
खरं तर या दोन्ही प्रसंगात मी विशेष काही केले नाही. पण प्रेमाचे दोन शब्द खर्च केले. आपण जर असे ठरवले की रोज मी किमान एका माणसाला तरी आनंदी करीन तर एका वर्षात किमान ३६५ लोकांना आपण आनंदी करु शकू. काही क्षण का होईना पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकू. घरात आपल्या आईने, पत्नीने आपल्यासाठी प्रेमाने, कष्टाने स्वयंपाक केलेला असतो. तिला फक्त म्हणा, " आज स्वयंपाक छान झाला, आज भाजी छान झाली ,"तर तिलाही तिच्या श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटेल. असे अनेकछोटेमोठे प्रसंग आपल्या जीवनात येत असतात. एखाद्या लग्नसमारंभात पाणी पिण्यासाठी, चहा घेण्यासाठी , जेवण घेण्यासाठी लोकांची रांग लागलेली असते. अशा वेळी आपण आपण पटकन एखाद्याला पाणी , चहा , जेवणासाठीची डिश देऊ शकतो. लिफ्टमध्ये चढताना कोणाला गर्दी असल्यास पुढे जाण्याची संधी देऊ शकतो. आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो.सध्या कोरोनामुळे अनेक गोरगरिबांवर आणि मजुरांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांचा रोजगार कोरोनाने हिरावून घेतला आहे. जवळ पैसा नाही. खायला अन्न नाही. ' जिवलगा, राहिले दूर घर माझे..' अशी परिस्थिती आहे. पण खूप लोक त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांना सलाम..!
खरं म्हणजे आपल्यातील बरीच सहृदयी माणसे अशी कामे करीतच असतात. पण आपण ती आजपासून जाणीवपूर्वक करु या. एक सुंदर वाक्य मध्ये वाचनात आले होते, "जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे प्रयत्न करतात, परमेश्वर त्यांच्या जीवनातील आनंद कधी कमी होऊ देत नाही. "
©️ *विश्वास देशपांडे,* *चाळीसगाव .*
*९४०३७४९९३२*
( *वाचकांना विनंती की,* *लेख शेअर करताना नावासहित करावा. तसेच त्याची ध्वनिफीत ( ऑडिओ ) बनवू नये.)*
किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार...
आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. दररोजचे जीवन तर आपण जगतच असतो. तेच तेच रुटीन . हे जीवन जगत असताना कोणाच्या चेहऱ्यावर आपण हसू फुलवू शकलो तर ? किती छान होईल ! राज कपूरच्या अनाडी चित्रपटात एक गाणं आहे. फार सुंदर... अभिनय करतानाचा त्याचा तो भोळा, हसतमुख आणि निरागस चेहरा आपल्या मनाची पकड घेतो.
किसी के मुस्कुराहटोंपे हो निसार
किसी का दर्द मिल सके तो ले उधार
किसी के वास्ते हो तेरे दिलमे प्यार
जिना इसी का नाम है.
माझ्याकडे कधी काही कार्यक्रम असला तर स्वयंपाकासाठी आम्ही एका बाईंना बोलावतो. त्या येतात त्यांचे काम करतात आणि निघून जातात. त्यांना त्यांचे ठरलेले पैसे तर मी देणारच असतो. पण तरीही त्यांचा स्वयंपाक झाल्यावर मी किचनमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो, " काकू, स्वयंपाक फार छान झाला बरं का आज. " त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमलते. त्यांनी खरे तर याची अपेक्षा केली नसते. मी नसते काही म्हटले तरी त्या आपले काम करून जाणारच होत्या. पण आता जाताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू ,आनंद आणि समाधान होते.
एकदा मी आणि माझा एक मित्र प्रवासादरम्यान एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो. त्या चहावाल्याने आम्हाला स्पेशल चहा बनवून दिला. आम्ही पैसे दिले. पण जाता जाता त्या चहावाल्याला म्हटले, " चहा छान बनवला बरं का." त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तो म्हणाला, " तुम्हाला आवडला ना साहेब " आणि गाणं गुणगुणत तो आपल्या कामात गढून गेला.
खरं तर या दोन्ही प्रसंगात मी विशेष काही केले नाही. पण प्रेमाचे दोन शब्द खर्च केले. आपण जर असे ठरवले की रोज मी किमान एका माणसाला तरी आनंदी करीन तर एका वर्षात किमान ३६५ लोकांना आपण आनंदी करु शकू. काही क्षण का होईना पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकू. घरात आपल्या आईने, पत्नीने आपल्यासाठी प्रेमाने, कष्टाने स्वयंपाक केलेला असतो. तिला फक्त म्हणा, " आज स्वयंपाक छान झाला, आज भाजी छान झाली ,"तर तिलाही तिच्या श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटेल. असे अनेकछोटेमोठे प्रसंग आपल्या जीवनात येत असतात. एखाद्या लग्नसमारंभात पाणी पिण्यासाठी, चहा घेण्यासाठी , जेवण घेण्यासाठी लोकांची रांग लागलेली असते. अशा वेळी आपण आपण पटकन एखाद्याला पाणी , चहा , जेवणासाठीची डिश देऊ शकतो. लिफ्टमध्ये चढताना कोणाला गर्दी असल्यास पुढे जाण्याची संधी देऊ शकतो. आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो.सध्या कोरोनामुळे अनेक गोरगरिबांवर आणि मजुरांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांचा रोजगार कोरोनाने हिरावून घेतला आहे. जवळ पैसा नाही. खायला अन्न नाही. ' जिवलगा, राहिले दूर घर माझे..' अशी परिस्थिती आहे. पण खूप लोक त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांना सलाम..!
खरं म्हणजे आपल्यातील बरीच सहृदयी माणसे अशी कामे करीतच असतात. पण आपण ती आजपासून जाणीवपूर्वक करु या. एक सुंदर वाक्य मध्ये वाचनात आले होते, "जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे प्रयत्न करतात, परमेश्वर त्यांच्या जीवनातील आनंद कधी कमी होऊ देत नाही. "
©️ *विश्वास देशपांडे,* *चाळीसगाव .*
*९४०३७४९९३२*
( *वाचकांना विनंती की,* *लेख शेअर करताना नावासहित करावा. तसेच त्याची ध्वनिफीत ( ऑडिओ ) बनवू नये.)*

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा