मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग एक

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग एक 

     रामेश्वरम. समुद्रकिनारी असलेले निसर्गरम्य गाव. सतत समुद्राची भरती आणि ओहोटी येणारे. समुद्राची गाज सतत कानावर पडणारे. उंचच उंच नारळी पोफळीची झाडे. विविध पक्ष्यांचे मधुर कूजन कानी पडणारे गाव. विशाल फेसाळता नि खळाळता दर्या. तितकेच विशाल हृदय असणारी पण साधी आणि संस्कारसंपन्न माणसे. अशा या गावात श्री शंकराचे प्रसिद्ध मंदिर. देशभरातून लाखो भक्त दर्शनासाठी येणारे. अत्यंत पवित्र ठिकाण. गावात या मंदिराच्या बरोबर मशीद आणि चर्च सुद्धा. जणू हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन या धर्मांचा त्रिवेणी संगम. गावातील लोक वेगवेगळ्या धर्माचे असले तरी समंजस आणि आपापल्या धर्माचे आपल्या पद्धतीने पालन करणारे. दुर्मिळ असा गावकऱ्यातील एकोपा. काही प्रश्न आलाच तर तो एकत्र बसून चर्चेने आणि शांततेने सोडवणार !

     अशा या गावात वडील जैनुलाब्दीन आणि आई अशिअम्मा या धार्मिक दाम्पत्याच्या पोटी १५ ऑक्टोबर १९३१ रोजी कलामांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव होते आवूल पाकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम. त्यांचे वडील जैनुलाब्दीन हे मशिदीचे इमाम होते. ते नावाड्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. पण त्यांचा अध्यात्मिक अधिकार मोठा होता त्यामुळे आणि त्यांचा गावातील लोक आदर करीत. त्यांची आई एका संस्कारसंपन्न उच्च कुटुंबातून आली होती. कलामांना दोन भाऊ आणि एक बहीण होती. घराची परिस्थिती तशी सामान्य होती. पण खाऊन पिऊन सुखी कुटुंब होते. संस्कारांची मात्र श्रीमंती होती. कलमांची आई सुगरण होती. साधाच पण चवदार स्वयंपाक करीत असे. त्यांच्याकडे कायम येणारा जाणारा असे. जेवणाला घरातील लोकांबरोबरच बाहेरील लोक नेहमी असत. पण त्यांच्या आईने कधी कंटाळा केला नाही.

     कलामांचे वडील त्यांना संध्याकाळी मशिदीत घेऊन जात. वडिलांनी त्यांना प्रार्थनेचे महत्व अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितले होते. ते म्हणायचे, आपण जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा या देहापासून दूर जातो. बाहेरील विश्वाचा आपण एक भाग होतो. आणि या अनंत विश्वाला जातपात, भेदभाव काहीही ठावूक नाही. ते त्यापासून अलिप्त आहे. म्हणून आपणही प्रार्थना करताना सगळे भेदभाव विसरून त्या शक्तिमान परमेश्वराला शरण जावे. वडिलांनी कलामांना संयम, शिस्त, सचोटी शिकवली. तर आईने त्यांच्यावर इतरांवर प्रेम करणे, त्यांच्याप्रती सहानुभूती ठेवणे आणि विश्वास ठेवणे या गुणांचे संस्कार केले. संस्कारांची ही आईवडिलांकडून मिळालेली शिदोरी त्यांना आपल्या पुढील आयुष्यात कामी आली. त्यांनी पुढील आयुष्यात जेव्हा शास्त्रज्ञ म्हणून मोठमोठे प्रकल्प राबवले आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या चमूचे नेतृत्व केले, तेव्हा हे आईवडिलांकडून मिळालेले संयम,स्वयंशिस्त, इतरांबद्दल प्रेम, विश्वास गुण त्यांना अतिशय उपयोगी पडले.

     बालपणीचे काही प्रसंग मात्र त्यांच्या हळव्या आणि संस्कारक्षम मनावर कायमचे कोरले गेले. ते शाळेत असतानाचा एक प्रसंग. ते आणि गावातील शंकराच्या मंदिराचे प्रमुख पुजारी पक्षी लक्ष्मणशास्त्री यांचा मुलगा रामनाथन हे वर्गात पुढे एकाच बाकावर बसत. कलामांच्या डोक्यावरील मुस्लीम पद्धतीची गोल टोपी आणि रामनाथन याच्या कपाळावरील गंध, शेंडी इ गोष्टींमुळे त्या दोघांचा भिन्न धर्म चटकन लक्षात येत असे. एकदा त्या शाळेत एक नवीन शिक्षक आले. त्यांनी या दोघांना पहिल्या बाकावर शेजारी बसलेले पाहिले आणि त्यांना ते खटकले. एका ब्राह्मणाच्या मुलाजवळ मुस्लीम मुलगा बसलेला पाहून त्यांचे पित्त खवळले. आणि त्यांनी सरळ कलामांना उठून मागे जाऊन बसण्यास सांगितले. कलामांना आपले काय चुकले हे कळले नाही. पण आपल्या प्राणप्रिय मित्रापासून दूर उठून जाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. घरी गेल्यावर दोघांनीही हा प्रसंग आपल्या घरच्यांना सांगितला. कलामांच्या वडिलांना आणि पक्षी लक्ष्मणशास्त्रीना या घटनेमागील गांभीर्य लक्षात आले. लक्ष्मणशास्त्रींनी त्या शिक्षकांना निरोप पाठवून बोलावून घेतले. आणि सर्वांसमक्ष सांगितले की मुले निरागस आहेत. त्यांच्या मनात हे जातीय असहिष्णुतेचे आणि सामाजिक विषमतेचे बीज पेरू नका. आणि हे जमत नसेल तर गाव आणि शाळा सोडा. येथे कलामांना नीतिमूल्यांचा एक नवीन पाठ अप्रत्यक्षपणे शिकायला मिळाला. आणि ते शिक्षकही खजील झाले. आपल्या वागणुकीचा त्यांना पश्चाताप झाला. हा प्रसंग कलामांच्या मनावर कायमचा कोरला गेला.

     या प्रसंगातून त्या गावातील कलामांच्या वडिलांसारखी माणसे, लक्ष्मणशास्त्री इ किती समजूतदार आणि मोठ्या मनाची होती हे दिसते. अशीच घरे आणि माणसे संस्काराची अप्रत्यक्ष पाठशाळा असतात. त्यातूनच कलामांसारखी व्यक्तिमत्वे घडतात आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करतात. असेच कलामांचे आणखी एक शिक्षक होते. ते कर्मठ ब्राह्मण असले तरी आधुनिक विचारांचे होते. त्यांनी आपल्या घरी कलामांना जेवायला बोलावले. त्यांच्या पत्नीने जेव्हा कलामांना आपल्या स्वयंपाकघरात वाढण्यास नकार दिला तेव्हा ते शिक्षक स्वतः त्यांच्यासोबत बाहेरच्या खोलीत बसून जेवले. त्या गुरूंचे नाव शिव सुब्रह्मण्यम् अय्यर. त्यांनी कलामांमधील सुप्त गुण ओळखले होते. ते म्हणायचे, मी मोठ्या शहरात राहणाऱ्या शिक्षित माणसांच्या बरोबर तुला आणणार आहे. आणि त्यांचे हे शब्द पुढे अक्षरशः खरे ठरले.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

३०/१०/२०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२ 

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...