मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १०४

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०४ 

क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।

परी चीत दुश्चीत ते लाजवीते ।

मना कल्पना धीट सैराट धावे ।

तया मानवा देव कैसेनि पावे ।।१०४।।

अर्थ : मनुष्य निरनिराळ्या प्रकारे बोलतो. परंतु बोलण्याप्रमाणे त्याचे स्वतःचेच वागणे नसल्याने त्याचे मनच त्याला आतून लाजवते. प्रत्यक्ष आचरण न करता ज्याचे मन नुसत्या स्वैर कल्पना करण्यात दंग असते अशा मनुष्याला परमेश्वर कसा प्रसन्न होईल ? 

( नानापरी - विविध प्रकारे, चीत - चित्त, दुश्चित - वाईट विचारांनी दूषित झालेले मन, सैराट - स्वैरपणे/बेलगाम, धीट - अनियंत्रित )

विवेचन 

व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो की ज्यांचे बोलणे मोठे आकर्षक असते. आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर छाप पडण्याचा प्रयत्न ते करीत असतात. परंतु ज्यावेळी त्यांच्या परीक्षेचा प्रसंग येतो, तेव्हा अशी माणसे उघडी पडतात. अशी माणसे लोकांना आपल्या बोलण्याने काही काळ प्रभावित करण्यात यशस्वी देखील होतात पण त्यांचे अंतर्मनच त्यांना सांगत असते की तू खोटे बोलतो आहेस, लोकांना फसवतो आहेस. अशा वेळी त्यांचीच त्यांना लाज वाटते. पण हा आतला आवाज ऐकून जे सावध होतात त्यांना प्रगतीची काहीतरी संधी नक्कीच असते. पण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून जे आपले वागणे सुरूच ठेवतात, अशा व्यक्ती परमेश्वरापासून लांबच जातात. जे स्वतःशीच प्रामाणिक नाहीत, ते परमेश्वराला कसे प्रसन्न करून घेणार ? 

महाराष्ट्रातील एका कीर्तनकाराचे उदाहरण या बाबतीत सांगता येईल. त्यांच्या कीर्तनाला अक्षरश: हजारोंचा जनसमुदाय जमत होता. आपल्या कीर्तनात हे बुवा आपल्या मुलामुलींचे लग्न अत्यंत साधेपणाने करा. अवास्तव खर्च, थाटमाट या सगळ्या गोष्टींना फाटा द्या असे आवाहन करीत. आजची परिस्थिती पाहता सामाजिक बदलाच्या दृष्टीने त्यांची ही सूचना योग्यच होती. कारण सामान्य परिस्थितले अनेक लोक किंवा गरीब शेतकरी मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून अडचणीत येतात. पण ज्यावेळी त्यांच्या मुलीचे लग्न ठरले तेव्हा त्यांनी साखरपुड्यालाच एवढा प्रचंड खर्च आणि थाटमाट केला की त्यापुढे श्रीमंतांकडील लग्नही फिके पडावे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ' बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.' प्रत्यक्ष आचरणाला अतिशय महत्व आहे. 

त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात, ' नसत्या कल्पना करू नये.' बऱ्याच वेळा माणूस भूतभविष्याचा विचार करून नको त्या कल्पना करत बसतो. बऱ्याच वेळा या कल्पना मोहाच्या वा विषयांच्या संदर्भात असतात. कल्पनेचा अश्व चौखूर दौडत असतो. कल्पनांना देखील काही एक महत्व निश्चितच आहे. पण त्या वास्तवतेवर आधारित असाव्यात. त्यांच्या साहाय्याने सत्याचा शोध घेण्यात मदत व्हावी अशा त्या असल्या तर जीवनात अत्यंत उपयोगी ठरतात. पण कोणताही वास्तविक आधार नसताना सैराट म्हणजे सैरावैरा धावणारे मन नको त्या कल्पना करते. त्यातून माणूस नको त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त होतो. अशा गोष्टींचा सुद्धा संसारात ताप होतो. परमार्थात तर अशा कल्पनांना थारा नाही. म्हणूनच माणसाने बोलण्यासारखे वागावे. आपल्याच वागण्याने आपल्याला लाज उत्पन्न होईल असे कर्म करू नये. चित्त दूषित करणाऱ्या अशा गोष्टींपेक्षा आपले चित्त ईश्वराकडे लावावे.

स्वसंवाद 

१. मी समाजमाध्यमांवर किंवा चार लोकांमध्ये जे मोठे आणि आदर्श विचार मांडतो, माझ्या वैयक्तिक आयुष्यात प्रसंग आल्यावर मी स्वतः खरोखरच त्याप्रमाणे आचरण करतो का? 

२. "बोले तैसा चाले" या तुकाराम महाराजांच्या सूत्राचा आदर राखताना, माझे अंतर्मन कधी माझ्याच एखाद्या ढोंगी वागण्यामुळे मला आतून 'लाजवते' का?

 ३. भूतकाळातील चुका किंवा भविष्यातील चिंता यांमुळे माझे मन 'सैराट' (बेलगाम) धावत असताना, मी त्याला विवेकाने आवर घालून वास्तवतेच्या भूमीवर आणतो का? 

४. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी बाह्य देखावा किंवा कोरडी बडबड करण्यापेक्षा, मी माझे चित्त 'दुश्चींत' (दूषित) होण्यापासून वाचवून देवाकडे लावायला तयार आहे का? (क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२१/६/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...