मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर वारसा आणि कार्य- भाग 57

 उगवतीचे रंग

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 57
गुरुदेवांचे संस्मरणीय विचार 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आज आपल्यात नसले तरी त्यांनी चिरंतन साहित्यसंपदा मागे ठेवली आहे. आणि त्यातील विचार हे चिरंतन आहेत. संस्मरणीय आहेत. त्यातीलच काही विचारांचा घेतलेला हा मागोवा.

१. ' देखा ' पाहणे अशा शीर्षकाचा त्यांचा एक सुंदर निबंध आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की प्रकाश रोज एकच संदेश घेऊन येत असतो. पाहा ! बस. एकवार न्याहाळून पाहा. प्रकाशाचे येण्याचे प्रयोजन आपण पाहावे. हे अंत:चक्षूंनी वगैरे नव्हे. साध्या निसर्गदत्त डोळ्यांनी. विधात्याने हा जो काही सारा पसारा मांडला आहे, तो काय उधळपट्टी करायची हौस म्हणून नव्हे. रोज इतका प्रकाश ओतला जातो, तो काय केवळ सूर्यमाला तयार झाल्या म्हणूनच का ? हा सारा प्रकाश ओरडत असतो - की ' पाहा '. रोपटे त्या प्रकाशाकडे पाहत असते. पाहता पाहता तो प्रकाश देहात साठवता साठवता एके दिवशी फूल उमलते. ते फूलही पाहू लागते. फळ पाहू लागते. त्याचे बीज जमिनीत जाते. प्रकाशाला भेटायची ओढ त्याला मातीतून वर ओढून आणते. असे हे पाहणे. आकाशातल्या नक्षत्रलीलांपासून मलेरियाच्या डासांपर्यंत टागोरांनी प्रत्येक गोष्ट अशी उत्कंठेने पाहिली. रोपट्याच्या पाहण्यातून फूल यावे तशी त्यांची कविता आली. फुलाबरोबरच रंग यावा तसे उपजतानाच सूर घेऊन आली. "
( वंगचित्रे : पु ल देशपांडे )

२. " ध्येयापासून न ढळता, स्वतःच्या मताला मुरड न घालता, स्वतःला खुजेपणा न आणताही व्यक्तीचा मान ज्या समाजात होतो, त्या समाजाची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. निष्ठा अन् मूल्ये यांना हानी पोहोचू न देता मिळणारा मान हा खरा मान. पक्ष, पंथ किंवा गट लक्षात घेऊन होणारा सन्मान केव्हाही सदोषच असतो. "
( शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ : आशा साठे )

३.  "You can’t cross the sea merely by standing and staring at the water."
या वाक्यात गुरुदेव कृतीचे महत्त्व सांगतात. तुम्ही केवळ समुद्राकडे पाहून समुद्र पार करू शकत नाही. त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. जीवनात कोणतेही महान कार्य साध्य करण्यासाठी कृतीची आणि प्रयत्नांची आवश्यकता असते.

४. "Clouds come floating into my life, no longer to carry rain or usher storm, but to add color to my sunset sky."
या वाक्यात जीवनातील संकटांकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश गुरुदेव आपल्याला देतात. अडचणींचे ढग माझ्या आयुष्यात येतात ते पाऊस किंवा वादळ आणण्यासाठी नव्हे तर माझ्या संध्याकाळच्या आकाशात रंग भरण्यासाठी ! जीवनातील संकटे किंवा अडचणी या आपले जीवन समृद्ध आणि अनुभवाने परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत असेच ते यातून सांगतात.

५. "The butterfly counts not months but moments, and has time enough."
फुलपाखरू महिन्यांची गणना करत नाही तर क्षणांचा आनंद घेते. त्याच्या जीवनातील क्षण महत्वाचे असतात. असेच आपणही आपल्या जीवनातील क्षणांचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे.

६. . "Let me light my lamp," says the star, "And never debate if it will help to remove the darkness."
एक तारा म्हणतो," मला माझा दिवा पेटवू दे. तो अंधार दूर करेल किंवा नाही याबद्दल वाद नको." म्हणजेच या ठिकाणी गुरुदेव आपल्याला कृतीचे महत्त्व सांगत आहेत. कृतीच्या परिणामांची पर्वा न करता आपण आपल्या परीने चांगले काम करीत राहावे. 

७. "Where the mind is without fear and the head is held high..."

गुरुदेव अशा राष्ट्राची कल्पना करतात की ज्या देशात ज्ञान मुक्त असेल, व्यक्ती निर्भय असेल. जेथे जातपात, धर्म इ. भेदांच्या भिंती उभ्या नसतील. अशा देशात हे परमेश्वरा, तू माझ्या राष्ट्राला जाग येऊ दे. ( गुरुदेवांची गीतांजली या संग्रहातील प्रसिद्ध कविता Where the Head is held High...)

८. मनुष्याच्या अंतःकरणात माया आणि प्रेमाचे स्थान हे वंश, जाती, धर्म आणि देश यांच्यापेक्षा मोठे असते. ( ' काबुलीवाला ' या कथेत मांडलेला विचार )

९. शाळा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे. ती माणूस घडवण्याची जागा असली पाहिजे. निसर्गाशी एकरूप होऊन शिक्षण घडले पाहिजे. 
( शिक्षणावरील विचार - शांतिनिकेतन मधील भाषण )

१०. जीवनाचे अंतिम ध्येय हे आनंदात आहे, पण तो आनंद केवळ स्वतःपुरता नको. तो सर्वत्र व्यापणारा हवा. ( त्यांची विश्वकल्याणाचा विचार करणारी भावना यातून प्रकट झाली आहे )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
७/४/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...