मुख्य सामग्रीवर वगळा

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग नऊ

 उगवतीचे रंग 

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग नऊ

झुरीचवरून आम्ही इटलीला जाण्यासाठी निघालो. या प्रवासासाठी आमची बस सज्ज होती. सकाळी लवकर नाश्ता करून आम्ही आठ वाजताच बस मध्ये बसलो. वाटेत एका ठिकाणी भारतीय पद्धतीच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण घेतले आणि पुन्हा प्रवास सुरू झाला. स्वित्झरलँडमधील झुरीच ते इटलीमधील पडूआ हा सुद्धा सहा ते सात तासांचा प्रवास होता. पण रस्त्याने निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे प्रवासाचा कंटाळा वाटला नाही. जसजसे आम्ही स्वित्झर्लंड पासून दूर जाऊ लागलो, तसतसा हवामानात बदल जाणवू लागला. आधीचे थंड आणि आल्हाददायक हवामान आता थोडे उष्ण होऊ लागले होते आणि आपण एका वेगळ्या भौगोलिक प्रदेशात प्रवेश आणि प्रवास करतो आहोत याची जाणीव व्हायला लागली होती. आमचे गाईड राहुल गमतीने म्हणाले, " तुम्हाला एकदम थंड प्रदेशातून भारतात जायला नको. भारतातील हवामानाची सवय व्हायला हवी म्हणून आपण इटलीहून भारतात परत जाणार आहोत."

संध्याकाळच्या सुमाराला आम्ही पडूआ इथे पोहोचलो. पडूआ हे इटलीतील एक जुने प्रसिद्ध ऐतिहासिक शहर आहे. इथे बरीच संग्रहालये आणि ऐतिहासिक इमारती आहेत. इटलीतील बरीच प्रसिद्ध ठिकाणे इथून जवळ आहेत. त्यामुळे बरेचसे पर्यटक येथे मुक्काम करतात. इथून व्हेनिसचे अंतर 40 किलोमीटर आहे. त्यामुळे आमचा मुक्काम पडूआलाच होता. पण आमचा प्रवेश इटलीमध्ये झाला होता.

जगातील अनेक पर्यटक दरवर्षी इटलीला आवर्जून भेट देतात. इटली म्हटले की आपल्याला पास्ता आणि पिझ्झा आठवतो. पण सगळेच इटालियन खाद्यपदार्थ जगभर लोकप्रिय आहेत. इटालियन लोक चीज आणि वाईनप्रेमी आहेत. इटालियन खाद्यपदार्थ आपले रूप, रंग, स्वाद आणि सुवास यासाठी जगभर नावाजले जातात. पण इटली केवळ खाद्यपदार्थांसाठीच प्रसिद्ध आहे असे नाही. या देशाने जगाला अनेक विचारवंत साहित्यिक आणि कलाकार दिले आहेत.

मायकेल अँजेलो, लिओनार्दो द विंची, राफेल, दोनातेल्लो हे चित्रकार आणि शिल्पकार म्हणून जगप्रसिद्ध आहेत तर दांते, बोकॅशिओ, तासो यांच्यासारखे साहित्यिक आणि गॅलिलिओ, मार्कोनी यांच्यासारखे वैज्ञानिक इटलीतच जन्मले आहेत. ऑपेरा या नृत्य नाट्याचा उगम इथलाच त्याचप्रमाणे पाश्चिमात्य संगीत प्रकारातील सिम्फनी, कॉन्सर्ट यांची निर्मिती इथेच झाली. पियानो आणि व्हायोलिन या वाद्यांची जननी इटली आहे. उद्योग आणि व्यापारातही इटली आघाडीवर आहे. 

इटलीला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. इटलीच्या उत्तरेला आल्प्स पर्वतांची रांग आहे तर दक्षिण कडेला एका बाजूने भूमध्य समुद्र आणि दुसऱ्या बाजूने अडियोट्रिक समद्र  यांची साथ लाभली आहे. त्यामुळे उत्तरेला हिमाच्छादित पर्वत आणि दक्षिणेला सुंदर समुद्रकिनारे अशी निसर्गाची देणगी इटलीला लाभली आहे. फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया इ देशांची सीमा इटलीला लागून आहे. इटलीची राजधानी रोम शहर त्याचप्रमाणे नेपल्स, कॅप्री, फ्लॉरेन्स, मिलान, पिसा, व्हेनिस इ .ठिकाणे पर्यटकांची आकर्षणे ठरली आहेत. जगभरातून पर्यटक ही ठिकाणे पाहण्यासाठी इटलीला येतात. धार्मिक स्थळांची यात्रा करणारे लोक इटलीमधील व्हॅटिकन सिटी या ठिकाणाला भेट देतात. आमच्या सहलीच्या ठिकाणांमध्ये मात्र इटलीतील व्हेनिस आणि पिसा ही दोनच ठिकाणे होती आणि इटलीतीलच मिलान या ठिकाणाहून आमचे परतीचे विमान निघणार होते.

९जून २०२४ हा आमच्या सहलीचा आठवा दिवस होता. आम्ही सकाळी लवकर तयार होऊन बस मध्ये बसलो आणि व्हेनिस शहराची सफर करण्यासाठी निघालो. कालव्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर यापूर्वी केवळ चित्रपटात पाहिले होते पण आता ते प्रत्यक्ष बघण्याचा योग आला होता. व्हेनिस हे शहर सिटी ऑफ लाईट, सिटी ऑफ वॉटर, सिटी ऑफ ब्रिजेस अशा विविध नावांनी सुद्धा ओळखले जाते. ११७ लहान लहान बेटं आणि १५० कालव्यांनी व्हेनिस शहर तयार झालं आहे. या शहरात विविध कालवे आहेत आणि शहरातील विविध लहान लहान बेटे ४०० विविध पुलांनी एकमेकांशी जोडलेली आहेत. म्हणूनच हे शहर म्हणजे सिटी ऑफ वॉटर आणि सिटी ऑफ ब्रिजेस असे म्हटले जाते. या शहरात आपल्याला कार, बस, टॅक्सी, रिक्षा किंवा इतर कोणत्याही वाहनांचा वापर केलेला दिसत नाही किंबहुना तो करता येणंच शक्य नाही अशी इथली परिस्थिती आहे. सगळी वाहतूक पारंपारिक होड्यांमधून म्हणजेच ज्याला आपण गोंडोला म्हणतो त्यातून होते. स्थानिक लोक क्रूज, मोटर लाँचेस, वेपरेटो, वॉटर बसेस इत्यादींचा वापर करतात. 

आपल्यासारख्या बाहेरून आलेल्या पर्यटकांना कदाचित या गोष्टींचे आकर्षण वाटेल पण याच गोष्टी व्हेनिसच्या प्रगतीत अडथळा ठरल्या आहेत. व्हेनिसच्या दृष्टीने जणू काळ थांबला आहे. या शहराची औद्योगिक किंवा सांस्कृतिक प्रगती त्यामुळे होत नाही. दरवर्षी येथील हजारो तरुण नोकरी धंद्याच्या शोधासाठी बाहेर पडत आहेत. साधारणपणे ३०/४० वर्षांपूर्वी येथील लोकसंख्या दीड लाखांच्या आसपास होती. आता ती केवळ ४०/५० हजारावर येऊन पोहोचले आहे. 

ज्याला ग्रँड कॅनॉल म्हटले जाते तो म्हणजे समुद्राचे बॅकवॉटर आहे.  येथील छोट्या छोट्या बेटांवर जाण्यासाठी कालवे आहेत. त्यातून गोंडोला किंवा होड्यांमधून आपल्याला प्रवास करावा लागतो. अशाच गोंडोलामधून आम्ही जलप्रवास केला. येथील पारंपारिक नावाडी त्या मोठ्या कौशल्याने वल्हवतात. त्यांची घरे आणि दुकाने देखील त्या बेटांवरच आहेत. पण या कालव्यांमधील पाणी मात्र स्वच्छ नाही त्याला एक प्रकारची दुर्गंधी आहे. कारण हे वाहते पाणी नाही त्याचप्रमाणे हे लोक इथे वर्षानुवर्षे राहत असल्यामुळे त्यांचे सांडपाणी देखील या पाण्यातच सोडले जाते.

येथील नौकेत बसल्यावर आम्हाला अमिताभ बच्चनच्या ' द ग्रेट गॅम्बलर ' या चित्रपटातील ' दो लब्जो की है दिल की कहानी...' हे गाणं आठवलं. तशाच प्रकारचे अगदी रम्य वातावरण इथे होतं. ( क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२५/८/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...