मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदनिधान दोन शब्द... पुस्तकाच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी

आनंदनिधान 

दोन शब्द... पुस्तकाच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी 

प्रिय रसिक वाचक 

माझं नवीन पुस्तक ' आनंदनिधान ' आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. जॉन किट्स नावाचा कवी म्हणतो A thing of beauty is joy forever, ' आपल्या भाषेत सांगायचं तर हीच गोष्ट ' सत्यं शिवं सुंदरम ' अशी सांगता येईल. सत्य, शिव आणि सुंदराचा मिलाफ असलेली कोणतीही गोष्ट ही चिरंतन आनंदाचा स्रोत असते. आनंदनिधान म्हणजे अशाच चिरंतन आनंद देणाऱ्या गोष्टी. कोणकोणत्या गोष्टी अशा आनंदनिधान असू शकतात याबद्दल मी ' आनंदनिधान ' या लेखात सविस्तरपणे लिहिले आहे. त्याची आता पुनरावृत्ती करीत नाही. आपण ते जरूर मुळातून वाचावं. 

मानवी जीवन सुखदुःखांनी भरलेले असते. आपण कधी निराश होतो, तर कधी आनंदी. आपण सारखा सुखाचा शोध घेत असतो. पण सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. सुखाचे क्षण किनाऱ्यावर बसून वाळूचे कण हाती घ्यावे आणि हातातील वाळू जशी निसटून जाते, तसेच तेही आपल्या हातातून निघून जातात. तर कधी हुलकावणी देतात. म्हणून सुखाच्या शोधात असलेल्या मानवाला नेमकं सुख म्हणजे काय, ते कशात आहे हे शेवटपर्यंत उमजत नाही. पण जर आनंदाचं निधान गवसलं तर मानवाचा सुखाचा शोध त्या ठिकाणी संपेल. 

ज्ञान आणि रंजन हे कोणत्याही अभिजात साहित्याचे अंगभूत गुण असतात आणि असले पाहिजेत असे मला वाटते. अशाच प्रकारचा सुखद अनुभव या पुस्तकातील ललित लेख वाचताना आपल्याला येईल. विविध विषयांवरचे प्रसंगानुरूप लिहिलेले हे लेख वाचताना आनंद तर देतीलच पण एखाद्या विषयाकडे पाहण्याची नवी दृष्टी सुद्धा देतील. प्रत्येक लेखात सकारात्मकता आणि सांगण्यासाठी काहीतरी आहेच. उदाहरणार्थ ' भिंत ' या साध्या विषयावरील लेख ' भिंतीसंबंधीच्या ' अनेक बाजू आपल्यासमोर उलगडेल. वाचनाच्या आनंदाबद्दल बोलणारे काही लेख आहेत. जीवनात हसतमुख असणे किती महत्वाचे आहे हे ' सुहास्य तुझे मनास मोही ' हा लेख आपल्याला सांगेल. या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर नुसती नजर टाकली तरी विषयांची विविधता आपलयाला लक्षात येईल. आपल्यासाठी  विविध रंगांचा हा मनोहारी गोफ घेऊन मी आलो आहे. हा एक कॅलिडोस्कोप आहे. आनंद आणि सौंदर्य ही याची अविभाज्य अंगे आहेत. कोणताही लेख घ्या. त्यात आनंद, सौंदर्य, सकारात्मकता आणि काहीतरी संदेश आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आत्मस्तुतीचा दोष पत्करूनही मी ही खात्री आपल्याला देत आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द मला या ठिकाणी आठवतात. माउली म्हणतात

 तरी  एकले अवधान दीजे । मग सर्व सुखाते पात्र होईजे ।

 हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ।।

माऊलींची जी भावना आहे, तीच माझी आहे. माउली माउली आहेत आणि मी सामान्य ! पण आपण वाचक जाणकार आहात. मी आज जो काही आहे तो आपल्यामुळेच ! 

हे पुस्तक सुंदर स्वरूपात आपल्या हाती पडावे यासाठी सोहम क्रिएशनचे संपादक मा सुरेंद्र गोगटे आणि सौ स्नेहा गोगटे यांनी जी मेहनत घेतली आहे, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. पुस्तकाचे नावाला साजेसे मुखपृष्ठ तयार करणाऱ्या प्रथमेश नाझरकर याने आनंदनिधान मूर्तपणे मुखपृष्ठावर साकारले आहे. त्यासाठी त्याचाही मी ऋणी आहे. 

माझ्या इतर पुस्तकांप्रमाणेच आपण या पुस्तकाचे स्वागत कराल ही खात्री आहे. हे पुस्तक नावाप्रमाणेच आपल्यासाठी ' आनंदनिधान ' ठरो. 

- विश्वास देशपांडे. 






 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...