मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग एक

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग एक 

कालच म्हणजे १५ डिसेंबरला सरदार पटेलांची पुण्यतिथी होती. आजपासून आपण त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आढावा घेणार आहोत. भारताचे पहिले गृहमंत्री, उपपंतप्रधान, एक सच्चे स्वातंत्र्यसैनिक आणि त्यावेळच्या राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणजे सरदार पटेल. त्यांच्याविषयी मी जसजसे वाचू लागलो, तसतसे या व्यक्तिमत्वाने मला अधिकाधिक प्रभावित केले. मग त्यांचा गुजरातमधील अलीकडेच उभारण्यात आलेला पुतळा ' द स्टॅच्यू ऑफ युनिटी ' माझ्या डोळ्यांसमोर आला. त्यांचे कार्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे यथार्थ प्रतीक म्हणजे स्टॅचू ऑफ युनिटी. 

स्वातंत्र्यपूर्वकाळ आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड म्हटला की काही ठळक नावे आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यात प्रामुख्याने पंडित नेहरू, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यासारख्या व्यक्ती प्रमुख आहेत. या सगळ्या महान पुरुषांच्या यादीत सरदार पटेलांचे नाव घेतल्याशिवाय कोणताही इतिहासाचा लेख पूर्ण होऊ शकणार नाही, एवढे मोठे कर्तृत्व सरदार पटेलांचे आहे. हा काळ कोणाला गांधीयुग वाटतो, तर कोणाला नेहरू युग. तसाच हा काळ पटेल युगही म्हणायला हरकत नसावी. कारण सरदार पटेल हे गांधीजींच्या सत्याग्रहाची कल्पना राबवणारे प्रभावी कप्तान होते. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी भारतातील ५६५ संस्थाने देशात विलीन करून सरदार पटेलांनी भारतीय स्वातंत्र्याला एक नवा अर्थ प्राप्त करून दिला. ही संस्थाने भारतात विलीन झाली नसती तर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असे म्हणता आले नसते. 

ही सगळी संस्थाने एकहाती स्वतंत्र भारतात विलीन करण्याचे श्रेय सरदार पटेलांचे आहे. त्यामुळे पंडित नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठीचा मार्ग निष्कंटक झाला. ही संस्थाने जर स्वातंत्र्यपूर्वी भारतात विलीन झाली नसती, तर ती स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी डोकेदुखी ठरली असती. त्यांच्याशी लढताना स्वतंत्र भारताचा वेळ आणि पैसा खर्च झाला असता. पंडित नेहरू आणि महात्मा गांधी ही निःसंशय मोठी व्यक्तिमत्वे. पण त्यांना जे यश मिळाले त्यामागे सरदार पटेलांचा पोलादी हात होता. काही माणसं बाजी जिंकून देणारी असतात. तसेच नेहरू आणि गांधीजींच्या कार्यात त्यांची बाजू जिंकून देणारे हे व्यक्तिमत्व. 

त्यांच्या बोलण्यात जरब होती. नजरेत वाघासारखी दहशत. त्यामुळे मोठमोठे संस्थानिक, इंग्रज अधिकारी सरदार पटेलांना वचकून असत. त्यांच्याजवळ हा लांबचा आणि तो जवळचा असा भेदभाव नसे. सगळ्यांना सारखी वागणूक आणि सगळ्यांना समान न्याय. एकदा का त्यांच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली की ती त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन जायची. मात्र वरवर कठोर वाटणाऱ्या या महापुरुषाचे अंतःकरण तितकेच मृदू आणि संवेदनशील होते.  अशा या महापुरुषाचे चरित्र आपण पुढील काही भागात पाहणार आहोत. ( पुढील भाग शुक्रवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१६-१२-२०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )








 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...