मुख्य सामग्रीवर वगळा

मनापासून हाक तर मारा...

उगवतीचे रंग

मनापासून हाक तर मारा...

एक ग्राहक एकदा आपले केस कापून घेण्यासाठी केशकर्तनालयात जातो. त्याची दाढी कटिंग सुरु असताना त्या न्हाव्याच्या आणि त्याच्या विविध विषयांवर गप्पा होतात.  गप्पांच्या दरम्यान  देव आहे की नाही या विषयावर ते येतात.  तो न्हावी म्हणतो की या जगात देव नाही. मी देव आहे असे मानत नाही. तो ग्राहक विचारतो की असं तू का म्हणतोस ? तेव्हा तो न्हावी सांगतो, ' जरा बाहेर डोकावून पहा. काय चालले आहे जगात ! महिलांवर अन्याय, अत्याचार. बेकारी, गरिबी, भूक. कुठे महामारी. कुठे प्रचंड दुःख तर कुठे प्रचंड आनंद. ' हे त्या न्हाव्याचे उद्गार ऐकल्यानंतर तो ग्राहक वाद नको म्हणून त्याचे पैसे देऊन बाहेर पडतो.

काही अंतर गेल्यानंतर त्याला एक माणूस दिसतो. त्या माणसाचे केस प्रचंड वाढलेले असतात. त्याने बऱ्याच दिवसात दाढी, कटिंग केलेली नाही असे दिसते. त्या माणसाला पाहिल्यानंतर हा पहिला माणूस त्याला त्या न्हाव्याकडे घेऊन येतो. त्या न्हाव्याला तो म्हणतो, ' या माणसाकडे बघ. जगात न्हावी अस्तित्वात आहे असे तुला याच्याकडे पाहून वाटते का ? नाहीतर त्याचे केस एवढे वाढले असते का ? '

तो न्हावी म्हणतो, ' अलबत ! न्हावी आहे तर ! मी आहे. तो माझ्याकडे आला तर पाहिजे. '

तो माणूस म्हणाला, ' अगदी बरोबर बोललास. तसाच परमेश्वर देखील या जगात अस्तित्वात आहे. पण आपण त्याच्याकडे जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत त्याचे अस्तित्व आपल्याला कसे कळणार ? तू त्याचे अस्तित्व कसे नाकारू शकतोस ? '

एखादी गोष्ट नाकारणे सोपे आहे. पण आपण जोपर्यंत त्याचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत ती नाही असे विधान करणे धाडसाचेच ठरेल. आणि तो अनुभव घेण्यासाठी जी तपश्चर्या किंवा साधना करावी लागते ती करण्याची आमची तयारी नाही.

द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. द्रौपदी ही शक्तिशाली अशा पाच पांडवांची पत्नी असताना, ते त्या दरबारात तिचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतात. द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह भीष्म आदी दिग्गज ज्येष्ठ मंडळी तेथे उपस्थित असताना, हे दुष्कृत्य कौरवांकडून घडते. आणि सगळे केवळ असहायपणे पाहत राहतात. दुःशासन द्रौपदीला केसांना धरून फरफटत आणतो. आणि तिच्या वस्त्रांना निर्लज्जपणे हात घालतो. आपल्या मदतीला जेव्हा कोणीही धावून येत नाही, हे तिच्या लक्षात येते, तेव्हा ती श्रीकृष्णाचा धावा करते. ' कृष्णा , त्राही माम. ' असा आर्ततेने धावा करते, तेव्हा श्रीकृष्ण तिचे लज्जारक्षण करतो.

श्रीकृष्ण हा द्रौपदीचा सखा, बंधू आणि तिचे दैवतही होता. असे असताना तिच्या लज्जारक्षणासाठी तो स्वतः धावून का येत नाही किंवा येण्यासाठी एवढा उशीर का लावतो ? द्रौपदी त्याला तसे विचारते. तेव्हा त्याने दिलेले उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणतो, ' पांचाली, जेव्हा तुझे वस्त्रहरण होत होते तेव्हा तू आपल्या पतींकडे ते आपलं  रक्षण करतील म्हणून आशेने पाहत होतीस. जेव्हा तुला आढळलं की त्यांच्यापैकी कोणीही आपलं रक्षण करू शकत नाही, तेव्हा तू माझा धावा केलास. तू जोपर्यंत मला हाक मारत नाहीस, तोपर्यंत मी कसा येणार ? तू जेव्हा मनापासून हाक मारलीस, तेव्हा मला येणे भागच होते. '

पण कुठे जायचं त्याला हाक मारायला ? मंदिरात ? मशिदीत ? आवश्यकता नाही. तो कुठे नाही ? मनापासून मारलेली हाक त्याच्यापर्यंत पोहोचते. आणि खरं म्हणजे तो बाहेर कुठेही नसतो. तो आपल्या सगळ्यांच्या अंतर्यामी आहे. तो वेगवेगळ्या रूपातही कार्यरत असतो. कधी तो आईच्या रुपात असतो, तर कधी संतांच्या रुपात. आज तो आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार यांच्या रुपानेही काम करतो आहे. आणि आपल्याच घरी सुरक्षित राहून त्यांना त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांमध्येही तो विद्यमान आहे.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

        ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...