उगवतीचे रंग
तेथे कर माझे जुळती ...
आचार्य अत्रेंनी सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर ' संबोधले आणि ही उपाधी सावरकरांच्या नावामागे कायमची चिकटली.आणि खरोखरच स्वातंत्र्यवीर ही उपाधी त्यांना खऱ्या अर्थाने शोभून दिसते. सावरकर हे व्यक्तिमत्वच असे आहे की देशासाठीच्या आपल्या सर्वस्व त्यागाने ते झळाळून उठते. ज्यांना दोन दोन जन्मठेपेची शिक्षा झाली, आणि ती पूर्ण करून जे पुन्हा राष्ट्राच्या सेवेत सक्रिय झाले असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. ज्यांनी अंदमानच्या एकांतवासाच्या कोठडीत खिळ्याने आणि कोळशाने भिंतीवर कविता लिहिल्या, त्या पाठ केल्या आणि तुरुंगातून बाहेर पडल्यावर या दहा हजार ओळी पुन्हा लिहून काढल्या असा एकमेव कवी स्वातंत्र्यवीर सावरकर.
सावरकरांच्या कवितांनी मला लहानपणापासूनच मोहून टाकले आहे. ' स्वतंत्रतेचे स्तोत्र ' या कवितेत किती सूक्ष्म, तरल आणि सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, की ज्या फक्त एक संवेदनशील हृदयाचा कवीच करू शकतो. या पुढील दोन ओळीतले सौंदर्य पहा -
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली.
कुसुमासमान असलेल्या गालांवरची लाली किंवा कुसुमांच्या म्हणजे फुलांच्या गालावर असलेली लाली, हे स्वतंत्रदेवते, ती म्हणजे तूच आहेस. किती सुंदर कल्पना ...! किंवा
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
अशी सुंदर रचना सावरकरच करू जाणे.
किंवा मातृभूमीबद्दलची केवढी ओढ आणि तळमळ ' सागरा प्राण तळमळला ' या गीतातून व्यक्त झाली आहे. मला तर असे वाटते की सावरकरांनी इतर काही केले नसते आणि फक्त या दोन कविता लिहिल्या असत्या तरीदेखील कवी म्हणून ते अजरामर झाले असते. आणि अर्थात ते अजरामर आहेतच. त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतले कार्य कोणीही पुसून टाकू शकणार नाही. आज जे सावरकरांवर टीका करतात, त्यांनी सावरकरांनी सोसलेल्या हालअपेष्टांची केवळ कल्पना करून बघावी. त्या ठिकाणी स्वतःला कल्पून बघावे. तरच त्यांना सावरकरांच्या त्यागाची थोडीफार कल्पना येऊ शकेल.
देशासाठी केवढ्या यातना त्यांनी सहन केल्या , घरादारावर तुळशीपत्र ठेवले हे त्यांचे ' माझी जन्मठेप ' वाचताना आपण अक्षरशः थरारून जातो. जाज्वल्य देशभक्ती शिकावी ती सावरकरांकडूनच. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता, देखणे सोन्यासारखे पिळदार शरीर आणि हातात बॅरिस्टरची पदवी. एवढे भांडवल हाताशी असल्यावर एखाद्याला स्वर्ग चार बोटेच उरला असता. लग्न झालेले , मोठ्या घराण्यातून आलेली देखणी तरुण मुलगी पत्नी लाभलेली आणि हा तरुण देशभक्तीच्या वेडाने झपाटलेला. आज ज्या पद्धतीने सगळे जग चालले त्याच्या अगदी उलट. जगाच्या दृष्टीने वेडाच म्हटला पाहिजे.
सावरकरांच्या कवितांनी मला लहानपणापासूनच मोहून टाकले आहे. ' स्वतंत्रतेचे स्तोत्र ' या कवितेत किती सूक्ष्म, तरल आणि सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, की ज्या फक्त एक संवेदनशील हृदयाचा कवीच करू शकतो. या पुढील दोन ओळीतले सौंदर्य पहा -
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली.
कुसुमासमान असलेल्या गालांवरची लाली किंवा कुसुमांच्या म्हणजे फुलांच्या गालावर असलेली लाली, हे स्वतंत्रदेवते, ती म्हणजे तूच आहेस. किती सुंदर कल्पना ...! किंवा
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
अशी सुंदर रचना सावरकरच करू जाणे.
किंवा मातृभूमीबद्दलची केवढी ओढ आणि तळमळ ' सागरा प्राण तळमळला ' या गीतातून व्यक्त झाली आहे. मला तर असे वाटते की सावरकरांनी इतर काही केले नसते आणि फक्त या दोन कविता लिहिल्या असत्या तरीदेखील कवी म्हणून ते अजरामर झाले असते. आणि अर्थात ते अजरामर आहेतच. त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतले कार्य कोणीही पुसून टाकू शकणार नाही. आज जे सावरकरांवर टीका करतात, त्यांनी सावरकरांनी सोसलेल्या हालअपेष्टांची केवळ कल्पना करून बघावी. त्या ठिकाणी स्वतःला कल्पून बघावे. तरच त्यांना सावरकरांच्या त्यागाची थोडीफार कल्पना येऊ शकेल.
देशासाठी केवढ्या यातना त्यांनी सहन केल्या , घरादारावर तुळशीपत्र ठेवले हे त्यांचे ' माझी जन्मठेप ' वाचताना आपण अक्षरशः थरारून जातो. जाज्वल्य देशभक्ती शिकावी ती सावरकरांकडूनच. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता, देखणे सोन्यासारखे पिळदार शरीर आणि हातात बॅरिस्टरची पदवी. एवढे भांडवल हाताशी असल्यावर एखाद्याला स्वर्ग चार बोटेच उरला असता. लग्न झालेले , मोठ्या घराण्यातून आलेली देखणी तरुण मुलगी पत्नी लाभलेली आणि हा तरुण देशभक्तीच्या वेडाने झपाटलेला. आज ज्या पद्धतीने सगळे जग चालले त्याच्या अगदी उलट. जगाच्या दृष्टीने वेडाच म्हटला पाहिजे.
ते डोंगरीच्या तुरुंगात होते. तेंव्हा हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल आला. त्यानुसार त्यांना इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड केले म्हणून पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. इंग्रज सरकार आपल्याला फ्रान्सच्या ताब्यात देईल ही आशाही त्यामुळे मावळली होती. अशा वेळी एखादा सामान्य मनुष्य असता तर खचून गेला असता. पण ज्यांनी देशासाठी साऱ्याच सर्वस्वाचा होम केला होता त्या विनायक दामोदर सावरकरांना ही शिक्षा त्यांच्या विचारांपासून परावृत्त करू शकली नाही.
तेथून पुढे त्यांना अंदमानच्या तुरुंगात नेण्यासाठी भायखळ्याच्या तुरुंगात नेण्यात आले. त्यापूर्वी डोंगरीच्या कारागृहात त्यांची पत्नी सौ. यमुना ( माई ) त्यांना भेटण्यास आली. पन्नास वर्षाची जन्मठेपेची शिक्षा म्हणजे ही जवळजवळ त्यांची शेवटचीच भेट होती. क्षणभर सावरकरांचे मन ताटातुटीच्या विचारांनी भरून आले. त्यांची पत्नी तेव्हा फार तर एकोणीस वीस वर्षांची असावी . तेव्हा अशा तरुण वयात ताटातुटीचे विचार मनात येणे अगदी स्वाभाविक होते. पण ते अगदी क्षणभरच. पण दुसऱ्याच क्षणी ते त्यांचे लखलखीत तेजस्वी शब्द बाहेर पडले. अगदी जीव ओवाळून टाकावा असे शब्द. स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावेत असे शब्द, " बरे, ईश्वराची दया असेल तर पुनः भेट होईलच. तोवर जर कधी ह्या सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की , मुलामुलींची वीण वाढविणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणावयाचे असेल तर असला संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत. पण संसाराचा ह्याहून भव्यतर अर्थ जर घेणे असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत. आपली चार चूल-बोळकी आपण फोडून टाकली, पण त्यायोगे पुढेमागे हजारोजणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल."
सावरकरांच्या या तेजस्वी शब्दांवर आणखी काही बोलण्यासारखे नाही. ही प्रखर देशभक्ती पाहून नकळत हात जोडले जातात. ' दिव्यत्वाची जेथ प्रचिती , तेथे कर माझे जुळती. '
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
9403749932

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा