उगवतीचे रंग
ये दिल मांगे मोअर ...
माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला अधिक अधिक हवे असते. हवे , हवे आणि हवे. या हवेची हाव कधी संपत नाही. या अर्थाने तो ' हवेशीर ' प्राणी आहे. म्हणून तर आमच्या जाहिरातीत सुद्धा ये दिल मांगे मोअर अशा असतात. झालं असं की सुरुवातीला माझ्याकडे एक सायकल होती. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी. तेव्हा स्कूटर, मोटरसायकल चालवणाऱ्यांचा हेवा वाटायचा . मग पुढे मोटारसायकल आली . तेव्हा बऱ्याच मंडळींकडे फोरव्हीलर म्हणजे मराठीत आपली चारचाकी हो, ती असायची. तिचे सुख काही वेगळेच. आणि ज्या प्राण्यांकडे म्हणजे मनुष्यप्राण्यांकडे बरं का, ती असायची त्यांचा भाव वेगळाच असायचा. म्हणजे आताच्या भाषेत ' लई भारी.'
पण करणार काय ? आपल्याला जे काही घ्यायचे ते आपल्याच बळावर. आपल्या पूर्वजांनी काही गडगंज संपत्ती कमावून ठेवली नव्हती. त्यांचा उदात्त हेतू इतकाच होता की पुढच्या पिढीच्या कर्तुत्वाला वाव मिळावा.
त्यामुळे जोपर्यंत हातात पैसे येत नाही, तोपर्यंत गाडीत बसून फिरण्याचे स्वप्न फक्त पाहत होतो. दुसरं काय करणार ?
ते किशोरकुमारचं गाणं आम्हाला आपलं वाटायचं.
' थोडा है, थोडे की जरुरत है..
जिंदगी फार भी यहां खूबसूरत है..
आणि त्या गाण्यातली पुढची ओळ -
जिस दिन पैसा होगा, वो दिन कैसा होगा ?
जिस दिन पहिये घुमेंगे और किस्मत के लब चुमेंगे ..
तर या गाण्याप्रमाणे खरोखरीच एक दिवस आला. आणि अस्मादिकांजवळ म्हणजे माझ्याजवळ हो, नवी कोरी करकरीत मारुती उभी राहिली. जणू जन्मोजन्मीची तपश्चर्या फळाला आली . तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले. म्हणजे गाडीला हो. अर्थात कुठे ठेवणार ? ठेवली घरासमोर. मग काही दिवस हिम्मत करून गाडी चालवण्याचा सराव म्हणजे मराठीत प्रॅक्टिस का काय म्हणतात ते केले ? सुरुवातीला सौ आमच्याबरोबर गाडीत बसायला तयार नव्हती.
काय म्हणता , का बरं ..?
अहो असे भलते प्रश्न विचारून आम्हाला अडचणीत नका आणू ना राव..
म्हणजे आमचे नाव जरी विश्वास असले तरी सुरुवातीला अविश्वास होता. पण आम्ही नावाला जागलो बरं का, म्हणून तर मग पुढे सहकुटुंब गाडी घेऊन लांब लांबची सफर करून आलो. मग असं सगळं छान छान काही दिवस बरं चाललं. आता आमच्या शेजाऱ्याला होंडा सिटीची गाडी घ्यायची काही गरज होती का ? म्हणजे इतके दिवस वधारलेला आमचा भाव धाडकन शेअर मार्केट कोसळावे तसा खाली आला ना राव. पण आणली त्यानं. आमचा विचार कोण करतो ? मग आम्हाला उगीचच असं वाटू लागलं की छे, थोडं थांबलो असतो पण हीच गाडी घेतली असती. जाऊ द्या तर हे असं चालूच राहणार.
समर्थ रामदासांनी ही मनाची अवस्था अचूक ओळखली होती बरं का ! ही जी सुखाची हाव आहे, ती कधीच पूर्ण होत नाही. सारखं ' ये दिल मांगे मोअर. ' मन हे चंचल आहे. आणि ते सारखं सुखाला लालचावलेलं आहे. आम्ही ठरवतो काही अन होतं काही. म्हणून समर्थ म्हणतात-
घडीघडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा,
म्हणऊनि करुणा हे बोलतो दीनवाचा .
म्हणून आपल्याकडे जे असलं, त्यात समाधान मानायला शिकलं तर जगणं सोपं होईल,सुंदर होईल. तीच सुखी होण्याची गुरुकिल्ली आहे, नाही का ?
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२
ये दिल मांगे मोअर ...
माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला अधिक अधिक हवे असते. हवे , हवे आणि हवे. या हवेची हाव कधी संपत नाही. या अर्थाने तो ' हवेशीर ' प्राणी आहे. म्हणून तर आमच्या जाहिरातीत सुद्धा ये दिल मांगे मोअर अशा असतात. झालं असं की सुरुवातीला माझ्याकडे एक सायकल होती. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी. तेव्हा स्कूटर, मोटरसायकल चालवणाऱ्यांचा हेवा वाटायचा . मग पुढे मोटारसायकल आली . तेव्हा बऱ्याच मंडळींकडे फोरव्हीलर म्हणजे मराठीत आपली चारचाकी हो, ती असायची. तिचे सुख काही वेगळेच. आणि ज्या प्राण्यांकडे म्हणजे मनुष्यप्राण्यांकडे बरं का, ती असायची त्यांचा भाव वेगळाच असायचा. म्हणजे आताच्या भाषेत ' लई भारी.'
पण करणार काय ? आपल्याला जे काही घ्यायचे ते आपल्याच बळावर. आपल्या पूर्वजांनी काही गडगंज संपत्ती कमावून ठेवली नव्हती. त्यांचा उदात्त हेतू इतकाच होता की पुढच्या पिढीच्या कर्तुत्वाला वाव मिळावा.
त्यामुळे जोपर्यंत हातात पैसे येत नाही, तोपर्यंत गाडीत बसून फिरण्याचे स्वप्न फक्त पाहत होतो. दुसरं काय करणार ?
ते किशोरकुमारचं गाणं आम्हाला आपलं वाटायचं.
' थोडा है, थोडे की जरुरत है..
जिंदगी फार भी यहां खूबसूरत है..
आणि त्या गाण्यातली पुढची ओळ -
जिस दिन पैसा होगा, वो दिन कैसा होगा ?
जिस दिन पहिये घुमेंगे और किस्मत के लब चुमेंगे ..
तर या गाण्याप्रमाणे खरोखरीच एक दिवस आला. आणि अस्मादिकांजवळ म्हणजे माझ्याजवळ हो, नवी कोरी करकरीत मारुती उभी राहिली. जणू जन्मोजन्मीची तपश्चर्या फळाला आली . तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले. म्हणजे गाडीला हो. अर्थात कुठे ठेवणार ? ठेवली घरासमोर. मग काही दिवस हिम्मत करून गाडी चालवण्याचा सराव म्हणजे मराठीत प्रॅक्टिस का काय म्हणतात ते केले ? सुरुवातीला सौ आमच्याबरोबर गाडीत बसायला तयार नव्हती.
काय म्हणता , का बरं ..?
अहो असे भलते प्रश्न विचारून आम्हाला अडचणीत नका आणू ना राव..
म्हणजे आमचे नाव जरी विश्वास असले तरी सुरुवातीला अविश्वास होता. पण आम्ही नावाला जागलो बरं का, म्हणून तर मग पुढे सहकुटुंब गाडी घेऊन लांब लांबची सफर करून आलो. मग असं सगळं छान छान काही दिवस बरं चाललं. आता आमच्या शेजाऱ्याला होंडा सिटीची गाडी घ्यायची काही गरज होती का ? म्हणजे इतके दिवस वधारलेला आमचा भाव धाडकन शेअर मार्केट कोसळावे तसा खाली आला ना राव. पण आणली त्यानं. आमचा विचार कोण करतो ? मग आम्हाला उगीचच असं वाटू लागलं की छे, थोडं थांबलो असतो पण हीच गाडी घेतली असती. जाऊ द्या तर हे असं चालूच राहणार.
समर्थ रामदासांनी ही मनाची अवस्था अचूक ओळखली होती बरं का ! ही जी सुखाची हाव आहे, ती कधीच पूर्ण होत नाही. सारखं ' ये दिल मांगे मोअर. ' मन हे चंचल आहे. आणि ते सारखं सुखाला लालचावलेलं आहे. आम्ही ठरवतो काही अन होतं काही. म्हणून समर्थ म्हणतात-
घडीघडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा,
म्हणऊनि करुणा हे बोलतो दीनवाचा .
म्हणून आपल्याकडे जे असलं, त्यात समाधान मानायला शिकलं तर जगणं सोपं होईल,सुंदर होईल. तीच सुखी होण्याची गुरुकिल्ली आहे, नाही का ?
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा