उगवतीचे रंग
जगण्याचे भान देणारी गाणी ...
मी शाळेत काम करत असताना परीक्षा झाल्या की पेपरचे गट्ठे माझ्याकडे तपासण्यासाठी येत असत. तासनतास ते तपासण्यासाठी बैठक मारावी लागत असे. अशा वेळी संगीत माझ्या मदतीला येई. माझी आवडती गाणी ऐकता ऐकता ते काम सहज होऊन जाई . गृहिणी स्वयंपाक करीत असताना देखील बऱ्याच वेळेला संगीताच्या सुरात सूर मिसळून आपले काम करीत असतात. त्यांचा स्वयंपाक मग सहज होऊन जातो. गाण्यांच्या सुरातली गोडी मनात भिनते, गाण्याची लय काम करताना हाताचा ताबा घेते. आणि एकूणच प्रसन्न वातावरणात या सगळ्या मधुर सूर, ताल आणि लय यांचा संगम होऊन ती गोडी अन्नात उतरते. खाणाऱ्यांच्या मनापर्यंत पोचते. अशी ही गाण्यातली जादू.
पण कधी कधी मन उदास झालेले असते. आपल्याला जीवनातल्या रोजच्या समस्यांनी हैराण केलेले असते. प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. निराशा निश्चितच नसते. पण तरीही एक अनामिक उदासी भरून राहिलेली असते. ' तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हूं मै ..' अशा सारखी अवस्था येते. ही अवस्था तुम्ही, मी सगळ्यांनी कधी ना कधी तरी अनुभवलेली असते. अशा वेळी संगीत आपल्या मदतीला येते. कोणाला शास्त्रीय संगीत आवडते , कोणाला नाट्य तर कोणाला भाव किंवा भक्तिगीत . संगीत कोणतेही असो, पण त्यात जादू मात्र आहे. आपल्या मनाला उभारी देण्याचे, मरगळ घालवण्याचे आणि नवचैतन्य देण्याचे सामर्थ्य संगीतात आहे. एरव्ही सुद्धा आपण आपले काम करत असताना बरेचदा गाणी ऐकत असतो. आपल्याला आवडणारी अशी गाणी ऐकता ऐकता काम पण सहज होत असते. जनाबाई तर ' दळीता कांडिता, तुज गाईन अनंता ' असे म्हणतात.
जगण्याचे भान देणारी गाणी खूप आहेत. ही गाणी आपला उदास मूड घालवतात, प्रसन्नतेचा शिडकावा करतात आणि जगण्याचे बळही देतात. आज तुमच्याशी मला आवडणाऱ्या अशाच एका गाण्याबद्दल बोलणार आहे. हे गाणे आहे अभिषेकी बुवांनी गायिलेले. ' माझे जीवनगाणे. ' या गीताचे शब्द आहेत माझे आवडते कवी आणि गीतकार मंगेश पाडगावकर यांचे. आणि संगीत आहे पु ल देशपांडे यांचे. अभिषेकी बुवांचा जादुई सूर, पाडगावकरांचे अर्थघन शब्द आणि पुलंचं संगीत यांचा त्रिवेणी संगमच जणू. आपण काय करायचं अशा वेळी ? तर या सुरनदीत स्वतःला झोकून द्यायचं आणि चिंब भिजायचं.
असं म्हणतात की अभिषेकी बुवांनी गायनाच्या विविध घराण्यांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांच्या गायनातही नैसर्गिकपणे त्यांच्या अभ्यासाचे प्रत्यंतर येते. ' माझे जीवनगाणे ' ऐकताना पं जितेंद्र अभिषेकींचे स्वर जेव्हा कानावर पडतात, तेव्हा कानातून ते थेट मनात उतरतात, रक्तात भिनतात . पाडगावकरांचे अर्थवाही शब्द आणि पुलंचं संगीत आपल्याला एका निराळ्याच विश्वात घेऊन जातात.
कधी विचार केला का हे गाणं ऐकताना की या गाण्यात केवढी स्थितप्रज्ञता आहे !
व्यथा असो आनंद असू दे,
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे
गात पुढे मज जाणे,
माझे जीवनगाणे.
परिस्थिती कशीही असो. व्यथा असो किंवा आनंद. प्रकाश असो वा मनाला घाबरावणारा समस्यांचा घनघोर अंधार. कदाचित वाटचाल करताना समोरची वाट दिसणार नाही. पण निर्भयपणे वाटचाल करीत राहायची आहे. कशी ? रडतकढत ? नाही. तर गात पुढे मज जाणे. निःशंक , निर्भय मनाने पुढील वाटचाल करीत राहायची आहे. निसर्गात, मनात, झऱ्यात संगीत भरलेले आहे. ते आपल्या तनामनात उतरवायचे. या संगीताच्या सुरांवर पक्षांसोबत आनंदाचे गाणे गात विहार करायचा आहे. ' गीत गाता चल ओ साथी, गुनगुनाता चल ' जीवन म्हटले की ताणतणाव, समस्या, दुःख, चिंता असणारच ! ते कोणाला चुकले आहे. अशा वेळी ' निःशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे 'अशी स्वामींवर, जीवनावर प्रगाढ श्रद्धा असली की वाटचाल सुकर होते. जीवनगाणे हे आनंदगाणे होते. असे हे जगण्याचे भान देणारे गाणे. आणखी काही गाण्यांबद्दल पुढील वेळेला.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२
जगण्याचे भान देणारी गाणी ...
मी शाळेत काम करत असताना परीक्षा झाल्या की पेपरचे गट्ठे माझ्याकडे तपासण्यासाठी येत असत. तासनतास ते तपासण्यासाठी बैठक मारावी लागत असे. अशा वेळी संगीत माझ्या मदतीला येई. माझी आवडती गाणी ऐकता ऐकता ते काम सहज होऊन जाई . गृहिणी स्वयंपाक करीत असताना देखील बऱ्याच वेळेला संगीताच्या सुरात सूर मिसळून आपले काम करीत असतात. त्यांचा स्वयंपाक मग सहज होऊन जातो. गाण्यांच्या सुरातली गोडी मनात भिनते, गाण्याची लय काम करताना हाताचा ताबा घेते. आणि एकूणच प्रसन्न वातावरणात या सगळ्या मधुर सूर, ताल आणि लय यांचा संगम होऊन ती गोडी अन्नात उतरते. खाणाऱ्यांच्या मनापर्यंत पोचते. अशी ही गाण्यातली जादू.
पण कधी कधी मन उदास झालेले असते. आपल्याला जीवनातल्या रोजच्या समस्यांनी हैराण केलेले असते. प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. निराशा निश्चितच नसते. पण तरीही एक अनामिक उदासी भरून राहिलेली असते. ' तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हूं मै ..' अशा सारखी अवस्था येते. ही अवस्था तुम्ही, मी सगळ्यांनी कधी ना कधी तरी अनुभवलेली असते. अशा वेळी संगीत आपल्या मदतीला येते. कोणाला शास्त्रीय संगीत आवडते , कोणाला नाट्य तर कोणाला भाव किंवा भक्तिगीत . संगीत कोणतेही असो, पण त्यात जादू मात्र आहे. आपल्या मनाला उभारी देण्याचे, मरगळ घालवण्याचे आणि नवचैतन्य देण्याचे सामर्थ्य संगीतात आहे. एरव्ही सुद्धा आपण आपले काम करत असताना बरेचदा गाणी ऐकत असतो. आपल्याला आवडणारी अशी गाणी ऐकता ऐकता काम पण सहज होत असते. जनाबाई तर ' दळीता कांडिता, तुज गाईन अनंता ' असे म्हणतात.
जगण्याचे भान देणारी गाणी खूप आहेत. ही गाणी आपला उदास मूड घालवतात, प्रसन्नतेचा शिडकावा करतात आणि जगण्याचे बळही देतात. आज तुमच्याशी मला आवडणाऱ्या अशाच एका गाण्याबद्दल बोलणार आहे. हे गाणे आहे अभिषेकी बुवांनी गायिलेले. ' माझे जीवनगाणे. ' या गीताचे शब्द आहेत माझे आवडते कवी आणि गीतकार मंगेश पाडगावकर यांचे. आणि संगीत आहे पु ल देशपांडे यांचे. अभिषेकी बुवांचा जादुई सूर, पाडगावकरांचे अर्थघन शब्द आणि पुलंचं संगीत यांचा त्रिवेणी संगमच जणू. आपण काय करायचं अशा वेळी ? तर या सुरनदीत स्वतःला झोकून द्यायचं आणि चिंब भिजायचं.
असं म्हणतात की अभिषेकी बुवांनी गायनाच्या विविध घराण्यांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांच्या गायनातही नैसर्गिकपणे त्यांच्या अभ्यासाचे प्रत्यंतर येते. ' माझे जीवनगाणे ' ऐकताना पं जितेंद्र अभिषेकींचे स्वर जेव्हा कानावर पडतात, तेव्हा कानातून ते थेट मनात उतरतात, रक्तात भिनतात . पाडगावकरांचे अर्थवाही शब्द आणि पुलंचं संगीत आपल्याला एका निराळ्याच विश्वात घेऊन जातात.
कधी विचार केला का हे गाणं ऐकताना की या गाण्यात केवढी स्थितप्रज्ञता आहे !
व्यथा असो आनंद असू दे,
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे
गात पुढे मज जाणे,
माझे जीवनगाणे.
परिस्थिती कशीही असो. व्यथा असो किंवा आनंद. प्रकाश असो वा मनाला घाबरावणारा समस्यांचा घनघोर अंधार. कदाचित वाटचाल करताना समोरची वाट दिसणार नाही. पण निर्भयपणे वाटचाल करीत राहायची आहे. कशी ? रडतकढत ? नाही. तर गात पुढे मज जाणे. निःशंक , निर्भय मनाने पुढील वाटचाल करीत राहायची आहे. निसर्गात, मनात, झऱ्यात संगीत भरलेले आहे. ते आपल्या तनामनात उतरवायचे. या संगीताच्या सुरांवर पक्षांसोबत आनंदाचे गाणे गात विहार करायचा आहे. ' गीत गाता चल ओ साथी, गुनगुनाता चल ' जीवन म्हटले की ताणतणाव, समस्या, दुःख, चिंता असणारच ! ते कोणाला चुकले आहे. अशा वेळी ' निःशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे 'अशी स्वामींवर, जीवनावर प्रगाढ श्रद्धा असली की वाटचाल सुकर होते. जीवनगाणे हे आनंदगाणे होते. असे हे जगण्याचे भान देणारे गाणे. आणखी काही गाण्यांबद्दल पुढील वेळेला.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

हो सर अगदी बरोबर संगीत हा घटक आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहेच, संगीताशिवाय आपली दुनिया अधुरीच म्हणता येईल, आपल्याला कितीही कंटाळा किंवा आळस आला असेल तर एखादे आवडीचे संगीत ऐकल्याने आपला कंटाळा कुठच्या कुठं पळुन जातो, आपल्या लेखाने मला ही एक संगीत आठवले 'का रे दुरावा'मंगेश पाडगावकर यांनी केलेलं हे संगीत खुपच छान
उत्तर द्याहटवा